Tuesday, 9 April 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 204 उमेदवार रिंगणात आठ मतदारसंघात 1 कोटी 49 लाख मतदार ; 16 हजार 589 मतदान केंद्र

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 204 उमेदवार रिंगणात

आठ मतदारसंघात 1 कोटी 49 लाख मतदार ; 

16 हजार 589 मतदान केंद्र

 

मुंबईदि. 8 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 299 उमेदवारांचे अर्ज पात्र असून त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने 204 उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्रालयातील पत्रकार कक्षात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी  मनोहर पारकर, अवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

            लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेकनागपूरभंडारा-गोंदियागडचिरोली-चिमुरचंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 एप्रिल तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणाअकोलाअमरावतीवर्धायवतमाळ-वाशिमहिंगोलीनांदेडपरभणी या आठ मतदारसंघामध्ये दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 4 एप्रिल होता. त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल केलेले उमेदवारनामनिर्देशन पत्र व पात्र उमेदवारांची संख्या याबाबतचा तपशील  खालीलप्रमाणे.

 

क्रमांक व मतदारसंघ

उमेदवार

नामनिर्देशन

पात्र उमेदवारांची संख्या

अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या

05- बुलढाणा

29

42

25

21

06 - अकोला

28

40

17

15

07- अमरावती

59

73

56

37

08- वर्धा

27

38

26

24

14- यवतमाळ - वाशिम

38

49

20

17

15 - हिंगोली

55

78

48

33

16 - नांदेड

74

92

66

23

17 - परभणी

42

65

41

34

एकूण

352

477

299

204

दुसऱ्या टप्प्यातील  या आठ लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीसाठी मतदारसंघनिहाय एकूण आठ जनरल निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक एकूण पाच आणि खर्च निरीक्षक एकूण 11 या प्रमाणे नियुक्त करण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील या आठ लोकसभा मतदारसंघातील मतदारांची यादी दि. 4 एप्रिल रोजी अद्ययावत करण्यात आलेली असून माहिती खालीलप्रमाणे

 

 

 

अ.क्र.

मतदारसंघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकूण

मतदान केंद्रे

1

05- बुलढाणा

9,33,173

8,49,503

24

17,82,700

1,962

2

06 - अकोला

9,77,500

91,32,69

45

18,90,814

2,056

3

07- अमरावती

9,44,213

89,17,80

85

18,36,078

1,983

4

08- वर्धा

8,58,439

8,24,318

14

16,82,771

1,997

5

14- यवतमाळ - वाशिम

10,02,400

9,38,452

64

19,40,916

2,225

6

15 - हिंगोली

9,46,674

8,71,035

25

18,17,734

2,008

7

16 -नांदेड

9,55,084

8,96,617

142

18,51,843

2,068

8

17 -परभणी

11,03,891

10,19,132

33

21,23,056

2,290

          एकूण

77,21,374

53,99,057

432

1,49,25,912

16,589

 

दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 23 जानेवारी 2024 पासून दिनांक 4 एप्रिल 2024 पर्यंत मतदार संख्येत झालेली वाढ खालीलप्रमाणे.

 

अ.क्र.

मतदारसंघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकूण

1

05- बुलढाणा

9015

9634

0

18649

2

06 - अकोला

6837

8345

-5

15177

3

07- अमरावती

9734

11464

2

21200

4

08- वर्धा

7510

9342

2

16854

5

14- यवतमाळ - वाशिम

8509

12046

5

20560

6

15 - हिंगोली

6857

8283

2

15142

7

16 -नांदेड

11737

13434

7

25178

8

17 -परभणी

9453

10110

7

19570

          एकूण

69,652

82,658

20

1,52,330

 

वयोगटानुसार मतदार संख्या :

 

अ.क्र

मतदारसंघाचे नाव

18-19

20-29

30-39

40-49


Monday, 8 April 2024

आपल्या मताचे करा दान, ही आहे लोकशाहीची जाण’…. आशा सेविकांच्या हाती मतदान जनजागृतीची दोरी, मतदान करून उभारू, लोकशाहीची गुढी

 आपल्या मताचे करा दानही आहे लोकशाहीची जाण’….

आशा सेविकांच्या हाती मतदान जनजागृतीची दोरीमतदान करून उभारूलोकशाहीची गुढी

           

            मुंबई उपनगरदि. 8 मतदानाचा अधिकार हा कोणत्याही लोकशाही समाजातील मुलभूत अधिकार आहे. हा आपल्या लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे. मतदान करणे हा केवळ अधिकारच नाहीतर ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे. त्यामुळे सक्षम लोकशाहीसाठी आपल्या मताचे करा दानही आहे लोकशाहीची जाण’….. हा नारा घेवून आशा सेविकांनी घरोघरी मतदान जनजागृती करत लोकशाहीची ही गुढी उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

            देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. यासाठी यंदाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या मतदानाचा हा पवित्र हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात आशा सेविकांमार्फत घरोघरी जावून मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

            निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीपच्या माध्यमातून जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविणे, 18 वर्षावरील नव मतदारांची नोंदणी करणेदिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी करून घेणे इत्यादी कामे स्वीपच्यामार्फत हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्वीपअंतर्गत आशा सेविका तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना  वेळोवेळी प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. घरोघरी जनजागृती करतांना मतदार हेल्पलाइन voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि सक्षम Saksham-ECI ॲपच्या माध्यमातून नव मतदारांचे अर्ज भरून घेणेमतदार यादीत नाव तपासणे किंवा नोंदणी करणे इत्यादी बाबत मतदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

           

0000

दिलखुलास' कार्यक्रमात उष्माघात उपाययोजने विषयी लहुराज माळी यांची मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात उष्माघात उपाययोजने विषयी

लहुराज माळी यांची मुलाखत

 

        मुंबईदि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात 'उष्माघात उपाययोजनाया विषयी  आपत्ती व्यवस्थापन संचालक, लहुराज माळी यांची मुलाखत  बुधवार दि. १० एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.

              उष्णतेच्या लाटा, आपत्तीपूर्व नियोजनउष्माघात टाळण्यासाठी विविध उपाय योजना याविषयी सविस्तर  माहिती 'दिलखुलासकार्यक्रमातून श्री. माळी यांनी  दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

चुनाव का पर्व देश का गर्व' लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे सचिन तेंडुलकरचे आवाहन

 'चुनाव का पर्व देश का गर्व'

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे सचिन तेंडुलकरचे आवाहन

 

            मुंबई दि. ‌8 : लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच निवडणुकीत  मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्र मतदारांच्या स्वागताच्या प्रतीक्षेत आहे.  प्रत्येक नागरिकाने लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी असे आवाहन लोकप्रिय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी केले आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत राज्यात टप्प्यात मतदान होत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार असूनया  चार मतदारसंघात 73 लाख 28 हजार 865 मतदार आहेत. 

            मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे यासाठी सचिन तेंडुलकर यानी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून आवाहन केले आहे.

            'चुनाव का पर्व देश का गर्वम्हणत सचिन तेंडुलकर याने सांगितले आहे कीप्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे पाणीआरोग्य सुविधाप्रतीक्षा कक्षशौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग  आणि 80 वर्षांवरील मतदारांसाठी व्हील चेअरमदतनीस आणि रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे यासाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्व मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंद असल्याची खात्री करावी. नवमतदार 24 एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करू शकतात. यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या अथवा वोटर हेल्प लाईनमोबाईल हेल्प लाईनचा वापर करावा. 

            मुंबई उपनगर क्षेत्रात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी चारही मतदार संघात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे विशेष समन्वय अधिकारी  डॉ. सुभाष दळवी विविध उपक्रम राबवित आहेत. 

0000

 


 

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास कारवाई

 मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास कारवाई

 

            मुंबई दि. 8 : मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूहमहामंडळेकंपन्या व संस्थाऔद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. 

            मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीहीत्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुटी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना  देण्यात आल्या आहेत. ज्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल अशा आस्थापनांनी मतदारांना दोन तासांची सवलत द्यावी, मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील. 

           

0000


 

गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा

 गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा


 


            मुंबई, दि. 8 : राज्यपाल रमेश बैस यांनी गुढी पाडवा तसेच मराठी नूतन वर्षानिमित्त राज्यातील जनतला शुभेच्छा दिल्या आहेत.


            देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटी चंड म्हणून साजरा केला जातो.यानिमित्त लोकांमधील परस्पर स्नेह, बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत होवो, या प्रार्थनेसह सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


००००


 


 


Governor Ramesh Bais greets people on Gudi Padwa


 


             The Governor of Maharashtra Ramesh Bais has greeted the people of Maharashtra on the occasion of Gudi Padwa.


            In a message, the Governor has said, “I extended my heartiest greetings to all on the occasion of Gudi Padwa and the commencement of New Year.


 


             The festival is celebrated in different parts of the country as Chaitra Sukladi, Ugadi, Samsar Padvo and Cheti Chand. May the festival promote affection, brotherhood and harmony among the people of the country. I wish the people a happy Gudi Padwa and New Year".


००००


 


 


 

Featured post

Lakshvedhi