Friday, 19 January 2024

नोंदणीकृत, अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा

 नोंदणीकृत, अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या

नोंदणीसाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा

- नंदकुमार काटकर

दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखत

 

            मुंबईदि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'अभय योजनाया विषयी नोंदणी व मुद्रांक विभागाचे सह नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ग्राहकांना नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळावी यासाठी मुद्रांक सवलतीची 'अभय योजनालागू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना सन 1980 ते 2000 या कालावधीतील तसेच 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील जुने दस्तऐवज आणि दंडामध्ये सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत दोन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 31 जानेवारी 2024 पर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यात 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत सवलत देण्यात येणार आहे.  ग्राहकांना ही सवलत कशा स्वरूपात दिली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहे. याचबरोबर भारतीय नोंदणी कायदा आणि महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम काय आहेयाबाबतची माहिती 'दिलखुलासकार्यक्रमात सह नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक अधीक्षक श्री. काटकर यांनी दिली आहे.

            दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. काटकर यांची मुलाखत सोमवार दि. 22मंगळवार दि. 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची मुलाखत

 जय महाराष्ट्रदिलखुलास’ कार्यक्रमात

प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलासकार्यक्रमात 'स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्याची उल्लेखनीय कामगिरीया विषयावर नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            केंद्र सरकारतर्फे स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राज्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचेमहानगरपालिकासर्व नगरपरिषदानगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. राज्यातील स्वच्छता प्रेमीनागरिकांचे योगदान आणि स्वच्छता कामगारांच्या परिश्रमामुळे स्वच्छ भारत अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली याबाबत  प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांनी  'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

             ‘दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांची मुलाखत शनिवार दि. 20 जानेवारी 2024 रोजी प्रसारित होणार आहे. दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.  जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

मुंबई फेस्टिव्हल २०२४' चे होणार उद्घाटन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २० जानेवारी रोजी

'मुंबई फेस्टिव्हल २०२४चे होणार उद्घाटन

  

            मुंबईदि. १९ : राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबईमध्ये  20 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल 2024' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता  क्रॉस मैदान गार्डनचर्चगेट येथे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

                या कार्यक्रमात काला घोडा फेस्ट‍िवलतर्फे तुषार गुहा यांचा गीत सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. शारदा विद्यालयातर्फे लेझीम सादरीकरणनृत्यांगना सुप्रिया सेन यांचा ओडिशी नृत्याचा कार्यक्रममुंबई फेस्ट‍िवल थीम साँगमराठी आणि हिंदी काव्यवाचन कार्यक्रमात अभिनेते अनुपम खेरसचिन खेडेकर यांचा सहभाग असेल. अभिनेत्री सारा अली खान यांचा नृत्याचा कार्यक्रमधारावी ड्रीम प्रोजेक्ट कार्यक्रम सादरीकरण होणार असून मराठी अभिनेते अमेय वाघ आणि हिंदी अभिनेत्री मिनी माथूर या कार्यक्रमाचे निवेदन करतील. या फेस्टिवलला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे.

          उद्घाटन सोहळ्याला पर्यटन मंत्री गिरीश महाजनमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढामुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरविधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकरविधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारमुंबई फेस्ट‍िवल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रासुप्रसिध्द अभिनेते अनुपम खेरसचिन खेडेकरकाला घोडा फेस्टीवलच्या आयोजक ब्रिंदा मिलेरपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजपर्यटन विभागाचे संचालक डॉ.बी.एन.पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी - शर्मा उपस्थिती राहतील.

महाएक्स्पोचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार उद्या उद्घाटन

            एमएमआरडीए मैदान वांद्रे येथे होणार महाएक्स्पोचे उद्घाटन २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व जपानच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत होणार आहे. एमएमआरडीए मैदान वांद्रे येथे महा एक्स्पोचे आयोजन केले असून २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महा एक्सपोचे उद्घाटन होईल. महा एक्सपो’ दिनांक २८ जानेवारी २०२४ पर्यंत सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत, तर शनिवार आणि रविवारी दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहील.

'मुंबई फेस्टिव्हल २०२४मध्ये विविध कार्यक्रम

             'मुंबई फेस्टिव्हल २०२४मध्ये विविध उपक्रम होतील. यामध्ये मुंबईतील विविध ठिकाणी १९ ते २१ जानेवारी आणि २६ आणि २८ जानेवारी रोजी ‘शॉपिंग फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. काळा घोडा येथे २० ते २८ जानेवारी रोजी कला महोत्सव होईल. बीच फेस्ट २० जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान असून यामध्ये योगाफुटबॉलव्हॉलीबॉलबीच क्लीन अप आणि स्क्रिनिंग असे विविध उपक्रम जुहू चौपाटी येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होईल. सिनेमा फेस्ट २० ते २४ जानेवारी दरम्यान असून सायंकाळी ७ वाजता पीव्हीआर चित्रपटगृहांमध्ये मुंबईत विविध शोंचे आयोजन केले आहे. टुरिजम कॉनक्लेव्ह २४ जानेवारी रोजी कलिना येथील ग्रॅण्ड हयात येथे आयोजित केले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे टुरिजम कॉनक्लेव्ह सुरू राहील. क्रिकेट क्लिनिक २६ ते २८ जानेवारी दरम्यान सकाळी ७ ते रात्री ९ आणि रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ठाकूर क्रिकेट मैदान (कांदिवली पूर्व) येथे आयोजित केले आहे.

          टाटा मुंबई मॅरेथॉनचे २१ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजन केले आहे. टर्बो स्टार्ट फॉरएव्हर प्लॅनेट चॅलेंज २५ जानेवारी रोजी बीएसई फोर्ट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजता आयोजित केले आहे. पॅरामोटर शो २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गिरगाव चौपाटी येथे आयोजित केला आहे. म्युझिक फेस्ट १९ ते २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विविध ठिकाणी आयोजित केले आहे. संगीत महोत्सवाचे महालक्ष्मी रेसकोर्स येथे २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी आयोजन केले आहे. समारोप कार्यक्रम २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता वांद्रे येथील एमएमआरडीए मैदान येथे आयोजित केला आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी  https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

****

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर - रे नगर येथील 15 हजार घरकुलांचे वितरण अमृत योजनेंतर्गत 1 हजार 201 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रावर विश्वास असल्याने विविध देश राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक


  

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर - रे नगर येथील 15 हजार घरकुलांचे वितरण

अमृत योजनेंतर्गत 1 हजार 201 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ

प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्रावर विश्वास असल्याने विविध देश राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            सोलापूर, दि. 19 : केंद्र शासन गोरगरिबांसाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून रे नगर येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प होय. या गृहप्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरिबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेले घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहेअसे भावोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.

            दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्माण होत असलेल्या 30 हजार घरकुलांपैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

            यावेळी राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारपालकमंत्री चंद्रकांत पाटीलगृहनिर्माण मंत्री अतुल सावेखासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीखा. रणजितसिंह निंबाळकरआमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळेसुभाष देशमुखविजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी तसेच रे नगर हाऊसिंग फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

            प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले कीजागतिकस्तरावर भारताचे महत्त्व वाढत असून त्यात छोट्या उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे. विकसित भारत होण्यास आत्मनिर्भर भारत बनणे गरजेचे आहे. त्यासाठी सूक्ष्मलघु व कुटीर उद्योगांची भूमिका मोठी आहे. अशा उद्योगांना केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे. त्यातून मेड इन इंडिया उत्पादकांसाठी मोठ्या आशा वाढल्या आहेत. अशा प्रयत्नातूनच आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था जगातील अग्रक्रमांकाच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

            केंद्र शासनाने गरिबांना सर्वोच्च प्राधान्य देऊन विविध योजना राबवल्या. त्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना देऊन मध्यस्थांची साखळी बंद केली. गेल्या 10 वर्षात 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गरीबशेतकरीमहिला आणि युवकांच्या खात्यावर थेट पाठविले. जनधन योजनाआधार आदीद्वारे 10 कोटी बनावट लाभार्थ्यांना हटविण्याचे काम केले. याशिवाय गरिबांना साधनसंसाधने उपलब्ध करून दिल्यास ते गरिबीचा पराभव करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे लक्षात घेऊन मागील 9 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी राबविलेल्या अनेक योजनांमुळे 25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आल्याचे ते म्हणाले.

            हे शासन गरिबांसाठी समर्पित होते असे 2014 मध्ये घोषित केले होते. त्यानुसार गरिबांच्या समस्या कमी होण्यासह त्यांचे जीवन सुलभ व्हावे म्हणून अनेक योजना राबविल्या. संपूर्ण देशात 4 कोटी लोकांना पक्की घरे 10 कोटी शौचालयेदेऊन त्यांचा आत्मसन्मान वाढविण्याचे काम केले. देशातील गोरगरिबांना मोफत अन्नधान्य योजना कोरोना काळापासून लागू केलेली होती. त्या योजनेला पुढील पाच वर्षे मुदतवाढ दिलेली आहे. एक देश एक रेशन कार्ड’ योजना राबवल्यामुळे देशभरात कोठेही गेल्यास संबंधित गरीब कुटुंबाला मोफत अन्नधान्य मिळण्याची सोय केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

            आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्यावरील उपचारासाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारजन औषधी केंद्राद्वारे 80 टक्के पर्यंत सवलतीच्या दराने औषधेहर घर जल योजनाशौचालय आदी सामाजिक न्यायाच्या योजना आहेत. संत रविदासमहात्मा फुलेसावित्रीबाई फुलेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले सामाजिक न्यायाचे स्वप्न याद्वारे पूर्ण केले जात आहे.

            सोलापूर शहर हे व्यापारी उद्योगांचे शहर असून येथील कापड व चादर उद्योग देशभरात प्रसिद्ध आहे. इथे कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचा लाभ येथील कामगारांनी घ्यावा असे आवाहनही प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी केले. संत ज्ञानेश्वर पालखी मार्गसंत तुकाराम पालखी मार्ग तसेच विविध महामार्गाचे जाळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण होत असून त्यातून विकासाची गती वाढणार आहेअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणुकीस उत्सुक

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            दावोस येथे नुकत्याच झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक करण्याचा कल मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या वर्षी 3 लाख 53 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली असून आणखी एक ते दीड कोटी रुपयांचे करार होणे अपेक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

            राज्याच्या प्रगतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मोठा हातभार आहेअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीराज्यात अनेक पायाभूत विकासाचे प्रकल्प येत आहेत. दावोस येथे अनेक देशांचे राजकीय नेतेप्रशासकउद्योजक व गुंतवणूकदार यांच्या भेटी झाल्या त्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून श्री. मोदी हे संपूर्ण जगात भारताचे महत्त्व वाढवत असल्याचा अनुभव मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितला.

            सोलापूर हे देशातील सर्वात मोठे श्रमिकांचे शहर असल्याचे सांगून रे नगर येथील गृहप्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन पंधरा हजार नागरिकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळत असल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद व्यक्त करून त्या सर्व कुटुंबांना शुभेच्छा दिल्या.

            प्रारंभी रे नगर फेडरेशन व गृह प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी प्रास्ताविक केले. या गृह प्रकल्पाविषयी तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने बजावलेल्या भूमिकेची माहिती त्यांनी दिली.

अमृत योजनेंतर्गत 1 हजार 201 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ

            केंद्र शासनाच्या अमृत.2 योजनेअंतर्गत भिवंडी-निजामपूरसांगलीउल्हासनगर व कल्याण डोंबिवली या महापालिका तर शेगावसातारा व भद्रावती या नगरपालिका यांच्या मंजूर असलेल्या एकूण 1 हजार 201 कोटी एक हजार रुपयांच्या खर्चाच्या पाणी पुरवठा व  मलनिस्सारण व्यवस्थापन विकास कामांचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले.

            रे नगर गृह प्रकल्प येथील तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधान श्री.मोदी यांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले. सोलापूर महानगरपालिका अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेच्या तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक  स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज मंजुरीचे पत्रही यावेळी वितरित करण्यात आले.

0000


भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त काव्य स्पर्धा

  भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त काव्य स्पर्धा

 

            नवी दिल्ली, 18: ‘शिवनेरी, फुलपाखरू, शेतकऱ्यांचे हाल, मी तुम्हाला कळलो नाही’, आयुष्यमैत्रीक्षणसभा पक्ष्यांची,  आई आई करना गं भेळ …,’ अशा सुंदर कविता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या.

       मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत चौगुले पब्लिक शाळेत काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

मराठी व हिंदी भाषिक स्पर्धक विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून कविता सादर केल्या. प्रथम तीन क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

       चौगुले पब्लिक शाळेच्या प्राचार्य पूजा साल्पेकर व इतर शिक्ष‍कांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

             या कविता स्पर्धेस पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र सदनच्या सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा उपस्थित होत्या.

0000

महाराष्ट्र मध उत्पादनाचा हब व्हावा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 महाराष्ट्र मध उत्पादनाचा हब व्हावा

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मध महोत्सवाचे उद्घाटन

            मुंबईदि. 18 :- महाराष्ट्रात मध निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. देशातील पहिल्याच अशा आगळ्या वेगळ्या मध महोत्सवाच्या माध्यमातून राज्य भविष्यात मध निर्मितीचा हब होईल यासाठी कौशल्य विकासप्रोत्साहनप्रशिक्षण आणि मध विकत घेण्याची हमी अशी एकात्मिक योजना गावागावात राबवावीअसे मत वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

            मधमाशापालनमध निर्मितीमधमाशांबाबतचे गैरसमज याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दोन दिवसीय (दि १८१९ जानेवारी) मध महोत्सवाचे आयोजन खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठेमंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमलासूक्ष्मलघु व मध्यम उद्योग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकरकेंद्रीय खादी व ग्रामोद्योग आयोगाचे संचालक योगेश भामरेउद्योग विभागाचे उपसचिव श्रीकांत पूलकुंडवारसहसचिव लक्ष्मीकांत ढोके उपस्थित होते. 

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेमहाराष्ट्र मध निर्मितीत पहिल्या क्रमांकावर यावा अशी अपेक्षा आहे. वाढत्या लोकसंख्येला अत्यंत चांगले पोषण मधातून मिळते. अगदी लहान बाळापासून आजारीवृद्धांपर्यंत सर्वांसाठी मध उपयुक्त आहे. ज्या गावांमध्ये मधुमक्षिका पालन केले जाते त्या ठिकाणी शेतीच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ झाल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे मधुमक्षिका पालन शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे.

            मध आपल्या जीवनात गोडवा निर्माण करतेच पण तिजोरीत सुद्धा भर घालते. रोजगार निर्मिती हा मधमाशापालनाचा एक भाग आहे. म्हणूनच चंद्रपूर जिल्ह्यात सेंद्रिय मध निर्मितीसाठी पिरली आणि मामगा या दोन गावांची निवड केली. यासाठी सामाजिक दायित्व निधीचा चांगला उपयोग करून घेता येईल. राज्याला मधनिर्मितीत पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वसमावेशक अशी उत्तम योजना तयार करावी. मधाच्या लक्ष्यासाठी निधी कमी पडणार नाही, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

            रवींद्र साठे म्हणालेमधमाशी पालनातून रोजगारपीक उत्पादनात वाढ, शरीराचे पोषण आणि आरोग्य अशा सर्वच बाबी मधमाशी देते. गाव तिथे मधपेटीप्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षणमधाची गावे तयार करणेशेतकऱ्यांप्रमाणेच महिला बचत गटांना यात गुंतवणे आदी बाबी खादी ग्रामोद्योग मंडळ येत्या काळात राबवणार आहे.  त्याचबरोबर मधमाशीच्या विषाला सुद्धा मोठी मागणी आहे. त्यामुळे 'मधमाशीचे विष संकलनहा ड्रीम प्रोजेक्ट राबविणार असल्याचे श्री साठे यांनी सांगितले. 

            या महोत्सवातून नागरिकशेतकरीविद्यार्थी यांनी मधमाशीच्या जगाचेजीवन प्रवासाचे आणि तिच्या उपयुक्ततेचे ज्ञान आत्मसात करावे. शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवन कसे जगावे याचा धडा मधमाशीच्या कार्यातून मिळतो, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी व्यक्त केले.

            याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रगतिशील मधपाळ सन्मानाने शेतकरीसरपंच व गावांचा सन्मान करण्यात आला. यात लातूरचे दिनकर पाटीलअहमदनगरचे राजू कानवडेमहाबळेश्वरमधील मांगर गावचे सरपंच गणेश जाधवकोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे सरपंच रवींद्र भुजड आणि नुकतीच निवड झालेले गाव घोलवडचे सरपंच यांचा सत्कार करण्यात आला.

            या महोत्सवाची प्रस्तावना उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी मांडली तर सूत्रसंचालन मृण्मयी भजक यांनी केले.

            या महोत्सवात मधापासून तयार करण्यात आलेले चॉकलेटआवळा कॅंडीजांभूळओवासूर्यफूलतुळशी असे विविध प्रकारचे मधमधापासून तयार केलेला साबणसुगंधी मेणबत्त्या तसेच मधमाशीचे जीवन कार्यमधाची चाचणी तसेच मधपेटी अशा विविध बाबींचे प्रदर्शन भेट देणाऱ्यांच्या ज्ञानात भर घालते.  उद्या १९ जानेवारीला सकाळी ११ वाजता मध व आरोग्य यावर परिसंवाद१२.३० वाजता प्रसिद्ध शेफ विष्णू  मनोहर यांचे  मधापासून विविध पाककृतीचे प्रात्यक्षिक बघायला मिळणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आर. विमला यांनी केले आहे.

००००

जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षण ही सर्वांची जबाबदारी

 जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षण ही सर्वांची जबाबदारी

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्य जैवविविधता मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

            मुंबईदि. 18 : जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र हे जैवविविधतेने नटलेले राज्य आहे. येथील जैवविविधता दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचेलअसा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

            महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जैवविविधता दर्शवणाऱ्या राज्यातील मानचिन्हांसह वन्यप्राणी, पक्षी, फुले यांच्या छायाचित्रांनी सजलेल्या सन 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिवमहाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ बी.एस. हुडामुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकरउपसचिव विवेक होशिंगमहाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पाच्या (विशेष कक्ष) संचालक डॉ. विनिता व्यासउपसचिव सिद्धेश सावर्डेकर आणि भगवान सावंत यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            दिनदर्शिकेत आंबाजारुळशेकरुहरियालनीलवंतपांढरी चिप्पी आणि पापलेट ही मानचिन्हे छापण्यात आली आहेत. याशिवाय राज्यातील रामसर स्थळे आणि तेथे आढळणारे मोठा रोहित. मोर शराटीरंगीत कारकोचापाणचिरापट्ट कदंब हंसचक्रवाक यांची छायाचित्रे विशेष लक्ष वेधून घेतात. नांदूर मध्यमेश्वरलोणार सरोवर. ठाणे खाडी येथील छायाचित्रे या दिनदर्शिकेत वापरण्यात आली आहेत.

            विविध प्रजातींची फुलपाखरेवाघबिबट्या सारखे प्राणीविविध प्रजातींचे पक्षीठोसेघरलिंगमळा येथील धबधबेपश्चिम घाटात आढळणाऱ्या स्थानिक वनस्पती व प्रजातीकास पठारावरील निसर्ग वैविध्यसरपटणारे प्राणीविविध ठिकाणची जैवविविधता वारसा स्थळे आदींच्या छायाचित्रांच्या समावेशाने ही दिनदर्शिका अधिक आकर्षक बनली आहे. याविषयी अधिक माहिती दिनदर्शिकेत दिलेल्या क्युआर कोड स्कॅन करुनही पाहता येणार आहे. प्रत्येक महिनानिहाय वनपर्यावरणजैवविविधता आदी बाबींशी निगडीत असणाऱ्या दिवसांची नोंदही आवर्जून दिनदर्शिकेमध्ये घेण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi