Friday, 19 January 2024

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर - रे नगर येथील 15 हजार घरकुलांचे वितरण अमृत योजनेंतर्गत 1 हजार 201 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रावर विश्वास असल्याने विविध देश राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक


  

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर - रे नगर येथील 15 हजार घरकुलांचे वितरण

अमृत योजनेंतर्गत 1 हजार 201 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ

प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्रावर विश्वास असल्याने विविध देश राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            सोलापूर, दि. 19 : केंद्र शासन गोरगरिबांसाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून रे नगर येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प होय. या गृहप्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरिबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेले घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहेअसे भावोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.

            दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्माण होत असलेल्या 30 हजार घरकुलांपैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

            यावेळी राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारपालकमंत्री चंद्रकांत पाटीलगृहनिर्माण मंत्री अतुल सावेखासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीखा. रणजितसिंह निंबाळकरआमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळेसुभाष देशमुखविजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी तसेच रे नगर हाऊसिंग फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

            प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले कीजागतिकस्तरावर भारताचे महत्त्व वाढत असून त्यात छोट्या उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे. विकसित भारत होण्यास आत्मनिर्भर भारत बनणे गरजेचे आहे. त्यासाठी सूक्ष्मलघु व कुटीर उद्योगांची भूमिका मोठी आहे. अशा उद्योगांना केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे. त्यातून मेड इन इंडिया उत्पादकांसाठी मोठ्या आशा वाढल्या आहेत. अशा प्रयत्नातूनच आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था जगातील अग्रक्रमांकाच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

            केंद्र शासनाने गरिबांना सर्वोच्च प्राधान्य देऊन विविध योजना राबवल्या. त्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना देऊन मध्यस्थांची साखळी बंद केली. गेल्या 10 वर्षात 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गरीबशेतकरीमहिला आणि युवकांच्या खात्यावर थेट पाठविले. जनधन योजनाआधार आदीद्वारे 10 कोटी बनावट लाभार्थ्यांना हटविण्याचे काम केले. याशिवाय गरिबांना साधनसंसाधने उपलब्ध करून दिल्यास ते गरिबीचा पराभव करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे लक्षात घेऊन मागील 9 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी राबविलेल्या अनेक योजनांमुळे 25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आल्याचे ते म्हणाले.

            हे शासन गरिबांसाठी समर्पित होते असे 2014 मध्ये घोषित केले होते. त्यानुसार गरिबांच्या समस्या कमी होण्यासह त्यांचे जीवन सुलभ व्हावे म्हणून अनेक योजना राबविल्या. संपूर्ण देशात 4 कोटी लोकांना पक्की घरे 10 कोटी शौचालयेदेऊन त्यांचा आत्मसन्मान वाढविण्याचे काम केले. देशातील गोरगरिबांना मोफत अन्नधान्य योजना कोरोना काळापासून लागू केलेली होती. त्या योजनेला पुढील पाच वर्षे मुदतवाढ दिलेली आहे. एक देश एक रेशन कार्ड’ योजना राबवल्यामुळे देशभरात कोठेही गेल्यास संबंधित गरीब कुटुंबाला मोफत अन्नधान्य मिळण्याची सोय केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

            आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्यावरील उपचारासाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारजन औषधी केंद्राद्वारे 80 टक्के पर्यंत सवलतीच्या दराने औषधेहर घर जल योजनाशौचालय आदी सामाजिक न्यायाच्या योजना आहेत. संत रविदासमहात्मा फुलेसावित्रीबाई फुलेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले सामाजिक न्यायाचे स्वप्न याद्वारे पूर्ण केले जात आहे.

            सोलापूर शहर हे व्यापारी उद्योगांचे शहर असून येथील कापड व चादर उद्योग देशभरात प्रसिद्ध आहे. इथे कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचा लाभ येथील कामगारांनी घ्यावा असे आवाहनही प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी केले. संत ज्ञानेश्वर पालखी मार्गसंत तुकाराम पालखी मार्ग तसेच विविध महामार्गाचे जाळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण होत असून त्यातून विकासाची गती वाढणार आहेअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणुकीस उत्सुक

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            दावोस येथे नुकत्याच झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक करण्याचा कल मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या वर्षी 3 लाख 53 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली असून आणखी एक ते दीड कोटी रुपयांचे करार होणे अपेक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

            राज्याच्या प्रगतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मोठा हातभार आहेअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीराज्यात अनेक पायाभूत विकासाचे प्रकल्प येत आहेत. दावोस येथे अनेक देशांचे राजकीय नेतेप्रशासकउद्योजक व गुंतवणूकदार यांच्या भेटी झाल्या त्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून श्री. मोदी हे संपूर्ण जगात भारताचे महत्त्व वाढवत असल्याचा अनुभव मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितला.

            सोलापूर हे देशातील सर्वात मोठे श्रमिकांचे शहर असल्याचे सांगून रे नगर येथील गृहप्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन पंधरा हजार नागरिकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळत असल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद व्यक्त करून त्या सर्व कुटुंबांना शुभेच्छा दिल्या.

            प्रारंभी रे नगर फेडरेशन व गृह प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी प्रास्ताविक केले. या गृह प्रकल्पाविषयी तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने बजावलेल्या भूमिकेची माहिती त्यांनी दिली.

अमृत योजनेंतर्गत 1 हजार 201 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ

            केंद्र शासनाच्या अमृत.2 योजनेअंतर्गत भिवंडी-निजामपूरसांगलीउल्हासनगर व कल्याण डोंबिवली या महापालिका तर शेगावसातारा व भद्रावती या नगरपालिका यांच्या मंजूर असलेल्या एकूण 1 हजार 201 कोटी एक हजार रुपयांच्या खर्चाच्या पाणी पुरवठा व  मलनिस्सारण व्यवस्थापन विकास कामांचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले.

            रे नगर गृह प्रकल्प येथील तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधान श्री.मोदी यांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले. सोलापूर महानगरपालिका अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेच्या तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक  स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज मंजुरीचे पत्रही यावेळी वितरित करण्यात आले.

0000


भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त काव्य स्पर्धा

  भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त काव्य स्पर्धा

 

            नवी दिल्ली, 18: ‘शिवनेरी, फुलपाखरू, शेतकऱ्यांचे हाल, मी तुम्हाला कळलो नाही’, आयुष्यमैत्रीक्षणसभा पक्ष्यांची,  आई आई करना गं भेळ …,’ अशा सुंदर कविता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या.

       मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत चौगुले पब्लिक शाळेत काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

मराठी व हिंदी भाषिक स्पर्धक विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून कविता सादर केल्या. प्रथम तीन क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

       चौगुले पब्लिक शाळेच्या प्राचार्य पूजा साल्पेकर व इतर शिक्ष‍कांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

             या कविता स्पर्धेस पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र सदनच्या सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा उपस्थित होत्या.

0000

महाराष्ट्र मध उत्पादनाचा हब व्हावा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 महाराष्ट्र मध उत्पादनाचा हब व्हावा

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मध महोत्सवाचे उद्घाटन

            मुंबईदि. 18 :- महाराष्ट्रात मध निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. देशातील पहिल्याच अशा आगळ्या वेगळ्या मध महोत्सवाच्या माध्यमातून राज्य भविष्यात मध निर्मितीचा हब होईल यासाठी कौशल्य विकासप्रोत्साहनप्रशिक्षण आणि मध विकत घेण्याची हमी अशी एकात्मिक योजना गावागावात राबवावीअसे मत वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

            मधमाशापालनमध निर्मितीमधमाशांबाबतचे गैरसमज याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दोन दिवसीय (दि १८१९ जानेवारी) मध महोत्सवाचे आयोजन खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठेमंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमलासूक्ष्मलघु व मध्यम उद्योग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकरकेंद्रीय खादी व ग्रामोद्योग आयोगाचे संचालक योगेश भामरेउद्योग विभागाचे उपसचिव श्रीकांत पूलकुंडवारसहसचिव लक्ष्मीकांत ढोके उपस्थित होते. 

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेमहाराष्ट्र मध निर्मितीत पहिल्या क्रमांकावर यावा अशी अपेक्षा आहे. वाढत्या लोकसंख्येला अत्यंत चांगले पोषण मधातून मिळते. अगदी लहान बाळापासून आजारीवृद्धांपर्यंत सर्वांसाठी मध उपयुक्त आहे. ज्या गावांमध्ये मधुमक्षिका पालन केले जाते त्या ठिकाणी शेतीच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ झाल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे मधुमक्षिका पालन शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे.

            मध आपल्या जीवनात गोडवा निर्माण करतेच पण तिजोरीत सुद्धा भर घालते. रोजगार निर्मिती हा मधमाशापालनाचा एक भाग आहे. म्हणूनच चंद्रपूर जिल्ह्यात सेंद्रिय मध निर्मितीसाठी पिरली आणि मामगा या दोन गावांची निवड केली. यासाठी सामाजिक दायित्व निधीचा चांगला उपयोग करून घेता येईल. राज्याला मधनिर्मितीत पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वसमावेशक अशी उत्तम योजना तयार करावी. मधाच्या लक्ष्यासाठी निधी कमी पडणार नाही, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

            रवींद्र साठे म्हणालेमधमाशी पालनातून रोजगारपीक उत्पादनात वाढ, शरीराचे पोषण आणि आरोग्य अशा सर्वच बाबी मधमाशी देते. गाव तिथे मधपेटीप्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षणमधाची गावे तयार करणेशेतकऱ्यांप्रमाणेच महिला बचत गटांना यात गुंतवणे आदी बाबी खादी ग्रामोद्योग मंडळ येत्या काळात राबवणार आहे.  त्याचबरोबर मधमाशीच्या विषाला सुद्धा मोठी मागणी आहे. त्यामुळे 'मधमाशीचे विष संकलनहा ड्रीम प्रोजेक्ट राबविणार असल्याचे श्री साठे यांनी सांगितले. 

            या महोत्सवातून नागरिकशेतकरीविद्यार्थी यांनी मधमाशीच्या जगाचेजीवन प्रवासाचे आणि तिच्या उपयुक्ततेचे ज्ञान आत्मसात करावे. शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवन कसे जगावे याचा धडा मधमाशीच्या कार्यातून मिळतो, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी व्यक्त केले.

            याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रगतिशील मधपाळ सन्मानाने शेतकरीसरपंच व गावांचा सन्मान करण्यात आला. यात लातूरचे दिनकर पाटीलअहमदनगरचे राजू कानवडेमहाबळेश्वरमधील मांगर गावचे सरपंच गणेश जाधवकोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे सरपंच रवींद्र भुजड आणि नुकतीच निवड झालेले गाव घोलवडचे सरपंच यांचा सत्कार करण्यात आला.

            या महोत्सवाची प्रस्तावना उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी मांडली तर सूत्रसंचालन मृण्मयी भजक यांनी केले.

            या महोत्सवात मधापासून तयार करण्यात आलेले चॉकलेटआवळा कॅंडीजांभूळओवासूर्यफूलतुळशी असे विविध प्रकारचे मधमधापासून तयार केलेला साबणसुगंधी मेणबत्त्या तसेच मधमाशीचे जीवन कार्यमधाची चाचणी तसेच मधपेटी अशा विविध बाबींचे प्रदर्शन भेट देणाऱ्यांच्या ज्ञानात भर घालते.  उद्या १९ जानेवारीला सकाळी ११ वाजता मध व आरोग्य यावर परिसंवाद१२.३० वाजता प्रसिद्ध शेफ विष्णू  मनोहर यांचे  मधापासून विविध पाककृतीचे प्रात्यक्षिक बघायला मिळणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आर. विमला यांनी केले आहे.

००००

जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षण ही सर्वांची जबाबदारी

 जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षण ही सर्वांची जबाबदारी

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्य जैवविविधता मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

            मुंबईदि. 18 : जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र हे जैवविविधतेने नटलेले राज्य आहे. येथील जैवविविधता दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचेलअसा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

            महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जैवविविधता दर्शवणाऱ्या राज्यातील मानचिन्हांसह वन्यप्राणी, पक्षी, फुले यांच्या छायाचित्रांनी सजलेल्या सन 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिवमहाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ बी.एस. हुडामुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकरउपसचिव विवेक होशिंगमहाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पाच्या (विशेष कक्ष) संचालक डॉ. विनिता व्यासउपसचिव सिद्धेश सावर्डेकर आणि भगवान सावंत यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            दिनदर्शिकेत आंबाजारुळशेकरुहरियालनीलवंतपांढरी चिप्पी आणि पापलेट ही मानचिन्हे छापण्यात आली आहेत. याशिवाय राज्यातील रामसर स्थळे आणि तेथे आढळणारे मोठा रोहित. मोर शराटीरंगीत कारकोचापाणचिरापट्ट कदंब हंसचक्रवाक यांची छायाचित्रे विशेष लक्ष वेधून घेतात. नांदूर मध्यमेश्वरलोणार सरोवर. ठाणे खाडी येथील छायाचित्रे या दिनदर्शिकेत वापरण्यात आली आहेत.

            विविध प्रजातींची फुलपाखरेवाघबिबट्या सारखे प्राणीविविध प्रजातींचे पक्षीठोसेघरलिंगमळा येथील धबधबेपश्चिम घाटात आढळणाऱ्या स्थानिक वनस्पती व प्रजातीकास पठारावरील निसर्ग वैविध्यसरपटणारे प्राणीविविध ठिकाणची जैवविविधता वारसा स्थळे आदींच्या छायाचित्रांच्या समावेशाने ही दिनदर्शिका अधिक आकर्षक बनली आहे. याविषयी अधिक माहिती दिनदर्शिकेत दिलेल्या क्युआर कोड स्कॅन करुनही पाहता येणार आहे. प्रत्येक महिनानिहाय वनपर्यावरणजैवविविधता आदी बाबींशी निगडीत असणाऱ्या दिवसांची नोंदही आवर्जून दिनदर्शिकेमध्ये घेण्यात आली आहे.

'नवी पिढी हिंदी, मराठी लिहू - वाचू शकत नाही ही चिंतेची बाब'

 'नवी पिढी हिंदीमराठी लिहू - वाचू शकत नाही ही चिंतेची बाब'

- राज्यपाल रमेश बैस

राज्यपालांच्या हस्ते वाग्धारा सन्मान प्रदान

 

            मुंबई, दि. १८ : भाषा व साहित्य विभिन्न संस्कृती व दृष्टिकोन समजण्यास मदत करताततसेच विचारशीलताज्ञान व स्नेहभाव वृद्धिंगत करतात. मात्र आज वाचन संस्कृती लोप पावत आहे. दिवसेंदिवस नवी पिढी मराठीहिंदी व इतर प्रादेशिक भाषा लिहिण्यास व वाचण्यास असमर्थ होत आहे ही चिंतेची बाब आहे. हे चित्र बदलून आपल्या भाषांप्रती नव्या पिढीमध्ये अभिमान जागविण्यासाठी घरोघरी मातृभाषेतच बोलले पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.     

            साहित्यसंस्कृतीशिक्षणकला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील ४८ व्यक्तींना गुरुवारी (दि. १८) राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते 'वाग्धारा नवरत्न', 'स्वयंसिद्ध', 'यंग अचिव्हर्सव जीवन गौरव सन्मान मुक्ती सभागृह, अंधेरी, मुंबई येथे प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

            इंग्रजी भाषा अवश्य शिकली पाहिजे. त्याही पलीकडे जर्मनफ्रेंचमँडरिन या भाषा देखील शिकाव्या. परंतु मातृभाषेची उपेक्षा करुन विकसित भारताचे लक्ष्य गाठता येणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

            आज घरात चार व्यक्ती असतील तर चारही जण मोबाईलवर हरवलेले असतात. त्यामुळे संवाद हरवत चालला. केवळ मुलेच नाही तर आईवडील देखील मोबाईलवर अधिक वेळ घालवतात. व्हाट्सअप हेच जणू विद्यापीठ बनले आहे. चांगली व्यक्ती होण्यासाठी उत्तम वाचनाला पर्याय नाहीयास्तव वाचन संस्कृतीला चालना द्यावी लागेलअसे राज्यपालांनी सांगितले.

            ज्येष्ठ साहित्यिक नंदलाल पाठक यांना 'वाग्धारा जीवन गौरवपुरस्कार प्रदान करण्यात आला.  छत्तीसगड येथील प्रसिद्ध पांडवाणी गायिका रितू वर्मा तसेच तर ज्येष्ठ पत्रकार राजेश बादल यांना 'वाग्धारा नवरत्नसन्मान देण्यात आला. पत्रकार व संपादक नरेंद्र कोठेकरअभिनेत्री सीमा बिस्वास यांसह इतरांना 'वाग्धारास्वयंसिद्ध पुरस्कार देण्यात आला.    

            यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जयंत देशमुख,  'वाग्धारा'चे अध्यक्ष डॉ वागीश सारस्वतकार्यकारी अध्यक्ष दुर्गेश्वरी सिंह 'महक',  ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक विमल मिश्र आदी उपस्थित होते.

            सुदर्शन द्विवेदीसंगीता वाघेमंगला वाघेडॉ मुस्तफा युसूफ अली गोमइकबाल ममदानीवीरेंद्र सक्सेनाडॉ राजीव मिश्राडॉ जीवन संखे यांना  देखील यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

0000

 

Maharashtra Governor presents 'Vagdhara' awards

in literature, art, journalism, social work

 

            Maharashtra Governor Ramesh Bais presented the 'Vagdhara Samman 2024' to 48 eminent personalities from across the country at a function held at Andheri, Mumbai. The Awards were instituted by 'Vagdhara' an organisation working in the area of Literature, Culture, Education, Art and Social Work.  

            Well known writer Nandlal Pathak (Literature) was presented the 'Vagdhara Jeevan Gaurav Samman'. Well-known Pandwani presented from Chhattisgarh Ritu Verma and senior journalist Rajesh Badal were given the 'Vagdhara Nav Ratna' Samman. Journalist and Editor Narendra Kothekar and actor Seema Biswas were presented the 'Vagdhara Swayamsiddh' Samman by the Governor.

            Head of the Selection Jury Jayant Deshmukh, President of 'Vagdhara' Dr. Vageesh Saraswat, Executive President Durgeshwari Singh 'Mehak', senior journalist Vimal Mishra were present.

0000


निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या राबवावी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना

  निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या राबवावी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना

 

            मुंबई, दि. १८ : मुक्तनिष्पक्षसर्वसमावेशक आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांनी उत्कृष्ट योगदान देत राज्यातील निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या राबवावी, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले. 

            मुंबई येथे भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम तसेच आणि राज्यातील आगामी लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला.  वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धर्मेंद्र शर्मा, नितेश व्यास यांच्या नेतृत्वाखाली,  हिरदेश कुमार आणि  अजय भादूदोन्ही उप-निवडणूक आयुक्तांसह तसेच मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्यकायदा अंमलबजावणी संस्थांचे नोडल अधिकारीजिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारीपोलिस आयुक्त आणि सर्व जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत १६ ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत ही आढावा बैठक झाली.

            यावेळी आयोगाच्या वरिष्ठ अधिका-यांनी राजकीय पक्षांसह सर्व संबंधित भागधारकांचा समावेश असलेल्या मुक्तनिष्पक्षसर्वसमावेशक आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विशेषतः अपंग व्यक्तीट्रान्सजेंडर आणि विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांसह उपेक्षित गटांकडून मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यावर भर दिला. तसेच महिलातरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही दिले. क्षेत्र भेटीद्वारे गंभीर आणि असुरक्षित मतदान केंद्रे ओळखण्याचे आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी संबंधितांना देण्यात आले. विशेषतः त्रुटीमुक्त मतदार यादी आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अत्यंत पारदर्शकतेने करण्याबाबत तसेच सर्व तक्रारींचा विहित मुदतीत निपटारा करण्याबाबत सूचना दिल्या.

            भारत निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने मुख्य सचिवपोलीस महासंचालककाही प्रशासकीय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव यांची भेट घेतली आणि निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे मनुष्यबळपायाभूत सुविधा इत्यादींची खात्री करण्याबाबत काही निर्देश दिले.

            सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तसेच त्यांच्या जिल्ह्यातील पोलीस आयुक्त, अधीक्षक यांच्यासह आयोजित केलेल्या विशेष बैठकीत लोकसभा-२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीबाबत भारत निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासमोर त्यांचे तपशीलवार सादरीकरण केले. पोलीस आयुक्त/अधीक्षक यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थितीप्रतिबंधात्मक कारवाई आणि रोख रक्कमदारू आणि इतर अमली पदार्थ जप्त करण्याबाबतची अंमलबजावणी स्पष्ट केली. पोलिस विभाग आणि इतर अंमलबजावणी संस्थांनी अनधिकृत रोकडदारूड्रग्ज आणि इतर प्रलोभनांच्या हालचालींवर दक्षता वाढवावी, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने दिले.

गवसे, दर्डेवाडी गावे इको सेन्सिटिव झोनमधून वगळण्याबाबत

 गवसे, दर्डेवाडी गावे इको सेन्सिटिव झोनमधून वगळण्याबाबत

केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा करणार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

            मुंबईदि. १८ : कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे गवसे आणि दर्डेवाडी (ता. आजरा) ही गावे इको सेन्सिटीव झोन मधून वगळण्याबाबत केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा केली जाईल. या गावातील परिस्थिती अभ्यासून त्याप्रमाणे निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईलअशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

            मंत्रालयातील परिषद सभागृहात यासंदर्भातील बैठक झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफवन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि संबंधित गावांतील पदाधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीआजरा तालुक्यातील या दोन गावांप्रमाणेच इतर काही गावांतही इको सेन्सिटिव झोनच्या अनुषंगाने प्रश्न आहेत. त्याबाबतही त्रिसदस्यीय समिती नेमून गावे वगळण्याबाबत निर्णय घेण्याची कार्यवाही केली जाईल.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले कीया गावांचा परिसर हा अनेक वर्षापासून औद्योगिकदृष्ट्या वाढला आहे. इको सेन्सिटिव झोनमुळे स्थानिक विकासाला खीळ बसणार असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. वस्तुस्थिती तपासून यामध्ये निर्णय घेतला जावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.      

0000

दीपक चव्हाण/विसंअ/


 

Featured post

Lakshvedhi