Friday, 19 January 2024

कुशल मनुष्यबळासाठी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या

 कुशल मनुष्यबळासाठी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या

- मंत्री मंगल प्रभात लोढा

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन

            मुंबईदि. १८ : कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी विभागाने जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करावे असे आवाहन कौशल्यरोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री प्रभात लोढा यांनी केले.

            कौशल्यरोजगारउद्योजकता आयुक्तालय येथे कौशल्य विकास विभागामार्फत सर्व उप आयुक्त,  सहाय्यक आयुक्त व जिल्हा कौशल्य विकास समन्वयक अशा सर्व अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार आयुक्त तथा कौशल्य विकास सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर उपस्थित होते.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून गावागावात रोजगार निर्मिती करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. विभागीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसमवेतच ट्रेनिंग पार्टनर व ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख  देखील यांनी या कामासाठी सहकार्य करावे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनामहाराष्ट्र इंटरनॅशनलनाविन्यता, सारथी या योजना प्रभावीपणे राबवाव्या. 19 जानेवारी 2024 रोजी जागतिक जागतिक कौशल्य स्पर्धेसह आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजनेबाबत काही शंका असल्यास दोन दिवस होणाऱ्या कार्यशाळेत निश्चित सर्वांना शंका समाधान होईल. याबाबतीत काही सूचना किंवा अडचणी असतील तर जरूर सांगाव्यात. त्यावर मार्ग काढण्यात येईल, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

****

राष्ट्र पुरुषांच्या जीवनावर आधारित लाइट अँड साऊंड शो होणार सादर

 राष्ट्र पुरुषांच्या जीवनावर आधारित

लाइट अँड साऊंड शो होणार सादर

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गिरगाव चौपाटी येथे टिळक उद्यानातील नूतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण

            मुंबईदि. 18 : बृहन्मुंबई महानगरपालिकेने लोकमान्य टिळक उद्यानात सुरू केलेला लाइट ॲण्ड साऊंड शो उपक्रम कौतुकास्पद आहे. आगामी काळात राष्ट्र पुरुषांच्या जीवनावरील लाइट ॲण्ड साऊंड शो पहावयास मिळतीलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळक उद्यानाच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पणस्वराज्यभूमी फलकाचा अनावरण सोहळा व लाइट ॲण्ड साऊंड शोचे उदघाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज सायंकाळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढाआमदार प्रवीण दरेकरआमदार प्रसाद लाडबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशीलोकमान्य टिळक यांच्या कुटुंबातील सदस्य उज्ज्वला मेहेंदळे आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेभारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांना प्रेरित केले. त्यांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे', असे ब्रिटिशांना ठणकावून सांगितले. लोकमान्य टिळक यांच्या नावाने असलेल्या या उद्यानात अर्थात स्वराज्य भूमीत महानगरपालिकेने केलेले नूतनीकरणाचे काम कौतुकास्पद आहे. यावेळी मंत्री श्री. लोढामंत्री श्री. केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त श्रीमती जोशी म्हणाल्या कीलोकमान्य टिळक उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून लेझर शोमुलांसाठी ग्लो गार्डन करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

दरदोडी उत्पन्न वाढीसाठी पुढील १५ वर्षांचा ‘पशुधन विकास बृहद आराखडा’ तयार करावा

 दरदोडी उत्पन्न वाढीसाठी पुढील १५ वर्षांचा

पशुधन विकास बृहद आराखडा’ तयार करावा

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

दहा विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

           

            मुंबईदि. १८ :- पुढच्या चार वर्षात एक ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषीउद्योगसेवापर्यटन या प्राधान्य क्षेत्रातील लघु व सूक्ष्म उद्योगांनापूरक-सहाय्यभूत उद्योग-व्यवसायांना चालना देण्यात यावी. या माध्यमातून उद्योजकतारोजगार वाढविण्यात यावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात महसूलनियोजनसामान्य प्रशासनजलसंपदाखारभूमीलाभक्षेत्र विकासमाहिती तंत्रज्ञानमाहिती व जनसंपर्कपशुसंवर्धनदुग्धविकास अशा १० विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. बैठकीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव (व्यय) ओ.पी. गुप्तासामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रेजलसंपदाखारभूमीलाभक्षेत्र विकास विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरमाहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैननियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेपशुसंवर्धनदुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढेवित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.

            विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीराज्याच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने राज्याबाहेरपरदेशात निर्यात वाढली पाहिजे. राज्यासह राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय बाजारात दूधअंडीमासेमांसलोकर या उत्पादनांना मोठी मागणी आहे. मागणीनुसार दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा करून नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी पुढील १५ वर्षांचा पशुधन बृहद विकास आराखडा’ तयार करावा. त्यासाठी पशुधनाची उत्पादकता वाढविणे आवश्यक असून त्यादृष्टीने नवनवीन संशोधनअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पशुधनावरील खर्च कमी करतानाच त्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी संतुलित पशुखाद्यरेतनपशुरोग निदानलसीकरणावर भर देण्यात यावाअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले कीराज्याची प्रत्यक्ष सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सिंचन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण केले पाहिजेत. मुख्य सिंचन प्रकल्पाचे काम सुरु असतानाचप्रकल्पात साठविले जाणारे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असणारे कालवेवितरिकांची कामे केली पाहिजेत. जुन्या कालव्यांच्या दुरुस्तीची कामे करून पाणी गळती थांबवावी. नवीन प्रकल्पांमध्ये केवळ नलिकेद्वारे पाणीपुरवठ्याच्या कामांचा समावेश करावा.

            पर्यावरण विषयाबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेनदीनाल्यांचे वाढलेले प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. नद्यांमधील पाणी स्वच्छ करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. प्रगत तंत्रज्ञानाच्या उपयोगातून कारखानाऔद्योगिक क्षेत्रातील पाण्याचा पुनर्वापर वाढीसाठी प्रयत्न करावा. पर्यावरण संतुलनासाठी सर्व निकषांची पूर्तता कटाक्षाने करावी. प्रक्रिया केलेले पाणीच नदीत सोडले जाईलयासाठी ठोस कारवाई करावी. पाणीहवा यांचे प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. भविष्यातील वाढती लोकसंख्यावाहनांचापाण्याचाजमिनीचा वापर लक्षात घेऊन हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत.

-------०००------

वंदना थोरात/विसंअ/

राज्य सेवा मुख्य २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

 राज्य सेवा मुख्य २०२२ ची

सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

 

            मुंबईदि. १८ : राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

            राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नवी मुंबईनागपूरनाशिकछत्रपती संभाजीनगर या केंद्रांवर ३० नोव्हेंबर,२०२३ ते १८ जानेवारी२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा हा कार्यक्रम संपल्यानंतर एका तासाच्या अवधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे  गट-अ व गट-ब संवर्गातील विविध पदांकरीता ६२३ उमेदवार शिफारसपात्र ठरु शकतील.

0000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा यशस्वी जागतिक आर्थिक परिषदेत 3 लाख 53 हजार कोटींपेक्षा जास्त सामंजस्य करार स्वाक्षांकित

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा यशस्वी

जागतिक आर्थिक परिषदेत 3 लाख 53 हजार कोटींपेक्षा

जास्त सामंजस्य करार स्वाक्षांकित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 19 : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून या वर्षी 3 लाख 53 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षांकित झाले. त्याचप्रमाणेजवळपास एक ते दीड लाख कोटी रुपयांचे आणखी सामंजस्य करार स्वाक्षरीत होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखविले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितले.

            जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य व केंद्र शासनाचे शिष्टमंडळ दावोस येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेअमेरिकास्वित्झर्लंडसिंगापूर,  दक्षिण कोरीया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून यूएईओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे.  त्याचबरोबर आर्सेलर मित्तलजिंदालगोदरेजअदानी या  कंपन्यांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाला असल्याचे मत मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी व्यक्त केले. 

            ते पुढे म्हणाले कीमागील वर्षी दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी 75 ते 80 टक्के करार कागदावर न राहता प्रत्यक्षात आले. या करारामुळे 2 लाखांपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण होणार आहे. जेम्स आणि ज्वेलरीमाहिती तंत्रज्ञानहरित हायड्रोजनहरित ऊर्जापेपर आणि पल्पखाण उद्योग अशा अनेक उद्योजकांनी डेटा सेंटर,  इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केली आहे. जेम्स आणि ज्वेलरी उद्योगात 1 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            केंद्र आणि राज्य सरकारच्या समविचारी संबंधामुळे उद्योजक हे आत्मविश्वासाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचा अनुभव मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पायाभूत सुविधादळणवळणाच्या उत्तम सुविधाकुशल मनुष्यबळ असून महाराष्ट्रात एक इको सिस्टिम आहे. त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व्हिजनडॉयनॅमिक लिडरशीपग्लोबल लिडर म्हणून त्यांची ओळख झाली  असल्याचे दावोस दौऱ्यात अनेक देशातील लोकांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव जगभरात असून त्यांचे नाव लोक आदराने घेतात. परदेशी गुंतवणुकीसाठी याचाही फायदा महाराष्ट्राला झाला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

0000

Thursday, 18 January 2024

औद्योगिक क्षेत्रातील जागतिक बाजारपेठ संपादित करण्यास भारत सज्ज

 औद्योगिक क्षेत्रातील जागतिक बाजारपेठ

संपादित करण्यास भारत सज्ज

कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे

 

            मुंबई, दि. 17 :- भारत औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करत असून सुरक्षेला प्रथम  प्राधान्य देण्यात येत आहे. अग्नी सुरक्षेत मोठया प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञान येत आहे. भारत अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास नेहमीच अग्रगण्य राहिलेला आहे. भारत औद्योगिक क्षेत्रांमध्ये ग्लोबल प्लेयर बनला असून जागतिक बाजारपेठ संपादित करण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

            दुबई स्थित मे. फ्रँकफोर्ट यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे इंटरसेक एक्झिबिशन-२०२४" चे आयोजन केले होते. फायर प्रोटेक्शन असोशिएन ऑफ इंडिया आणि सेफ्टी अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरिंग असोशिएशन यांच्या प्रदर्शनात असणाऱ्या राज्याच्या आणि भारताच्या विविध दालनांचे उद्घाटन मंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते झाले   यावेळी ते बोलत होते.

            या प्रदर्शनामध्ये फायर सेफ्टी व सेक्युरिटी यांचेशी निगडित असणारे सुमारे एक हजार कंपनीच्या उत्पादनांचे स्टॉल्स आहेत. यामध्ये भारतातून आणि विशेषत: महाराष्ट्रातुन सुमारे १०० पेक्षा जास्त उद्योजकांचे स्टॉल्स आहेत.

            यावेळी मंत्री डॉ. खाडे म्हणालेया प्रदर्शनात मी भारताचा व  महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून सहभागी झालो आहे. महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून जागतिक व्यापारासाठी आपल्या सर्वांसाठी खंबीरपणे उभा आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. फायर सिक्युरिटी आणि सेफ्टीला प्राधान्य देत असून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि करारासाठी  तयार आहोत. महाराष्ट्रातीलभारतातील कोणत्याही उद्योजकांना या ठिकाणी कोणतीही मदत लागल्यास संपर्क साधावा.

            यावेळी मंत्री श्री. खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव  विनीता वेद सिंगल यांनी स्टॉल धारकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

            उद्घाटन सोहळ्यास  भारताच्या वाणिज्य दूतावासचे  के. कालिमुथुदुबई हेड फ्रँकफोर्टचे आयोजक प्रतिनिधी श्रीमती सोमय्याप्रसार भारतीचे सह संचालक विनोदकुमारराज्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक  देविदास गोरेमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभारमहाराष्ट्र फायर सेफ्टीचे श्री. वारीकफायर प्रोटेक्शन असोसिएशन ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

५४ लाख नोंदीच्या आधारे कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी शिबिरे घ्यावीत -

 ५४ लाख नोंदीच्या आधारे

कुणबीमराठा-कुणबीकुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी शिबिरे घ्यावीत

- अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांचे निर्देश

           

            मुंबईदि. १८ :-  कुणबीमराठा-कुणबीकुणबी-मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या ५४ लाख नोंदीच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबीमराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करावे. पात्र व्यक्तींना तातडीने जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी करावीअसे निर्देश महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी दिले आहेत.

याद्या गावस्तरावर प्रसिद्ध कराव्यात

            ज्यांच्या कुणबीमराठा- कुणबीकुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या संबंधित नागरिकांना पाहण्यासाठी या याद्या सर्व तलाठी यांच्यामार्फत गावस्तरावर मोहीम स्वरुपात प्रसिद्ध करण्यात याव्यातजेणेकरुन पात्र नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरीता सदर नोंदी या पुरावा म्हणून सादर करता येतील.

            राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबीमराठा- कुणबीकुणबी - मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कुणबी जाती संदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावेवंशावळीशैक्षणिक पुरावेमहसुली पुरावे. निजामकाळात झालेले करारनिजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदीराष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणीअंती कुणबीमराठा- कुणबीकुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी  न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

            न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समितीस विविध जिल्ह्यांमध्ये आढळून आलेल्या ५४ लाख कुणबी नोंदी संदर्भात संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र तत्काळ निर्गमित करणे आवश्यक आहे. यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र अनुसूचित जातीअनूसूचित जमातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम२००० तसेच नियम २०१२ व त्याअंतर्गत केलेल्या सुधारणांनुसार जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने करावी.

००००

Featured post

Lakshvedhi