Friday, 19 January 2024

दरदोडी उत्पन्न वाढीसाठी पुढील १५ वर्षांचा ‘पशुधन विकास बृहद आराखडा’ तयार करावा

 दरदोडी उत्पन्न वाढीसाठी पुढील १५ वर्षांचा

पशुधन विकास बृहद आराखडा’ तयार करावा

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

दहा विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

           

            मुंबईदि. १८ :- पुढच्या चार वर्षात एक ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषीउद्योगसेवापर्यटन या प्राधान्य क्षेत्रातील लघु व सूक्ष्म उद्योगांनापूरक-सहाय्यभूत उद्योग-व्यवसायांना चालना देण्यात यावी. या माध्यमातून उद्योजकतारोजगार वाढविण्यात यावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात महसूलनियोजनसामान्य प्रशासनजलसंपदाखारभूमीलाभक्षेत्र विकासमाहिती तंत्रज्ञानमाहिती व जनसंपर्कपशुसंवर्धनदुग्धविकास अशा १० विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. बैठकीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव (व्यय) ओ.पी. गुप्तासामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रेजलसंपदाखारभूमीलाभक्षेत्र विकास विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरमाहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैननियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेपशुसंवर्धनदुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढेवित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.

            विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीराज्याच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने राज्याबाहेरपरदेशात निर्यात वाढली पाहिजे. राज्यासह राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय बाजारात दूधअंडीमासेमांसलोकर या उत्पादनांना मोठी मागणी आहे. मागणीनुसार दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा करून नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी पुढील १५ वर्षांचा पशुधन बृहद विकास आराखडा’ तयार करावा. त्यासाठी पशुधनाची उत्पादकता वाढविणे आवश्यक असून त्यादृष्टीने नवनवीन संशोधनअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पशुधनावरील खर्च कमी करतानाच त्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी संतुलित पशुखाद्यरेतनपशुरोग निदानलसीकरणावर भर देण्यात यावाअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले कीराज्याची प्रत्यक्ष सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सिंचन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण केले पाहिजेत. मुख्य सिंचन प्रकल्पाचे काम सुरु असतानाचप्रकल्पात साठविले जाणारे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असणारे कालवेवितरिकांची कामे केली पाहिजेत. जुन्या कालव्यांच्या दुरुस्तीची कामे करून पाणी गळती थांबवावी. नवीन प्रकल्पांमध्ये केवळ नलिकेद्वारे पाणीपुरवठ्याच्या कामांचा समावेश करावा.

            पर्यावरण विषयाबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेनदीनाल्यांचे वाढलेले प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. नद्यांमधील पाणी स्वच्छ करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. प्रगत तंत्रज्ञानाच्या उपयोगातून कारखानाऔद्योगिक क्षेत्रातील पाण्याचा पुनर्वापर वाढीसाठी प्रयत्न करावा. पर्यावरण संतुलनासाठी सर्व निकषांची पूर्तता कटाक्षाने करावी. प्रक्रिया केलेले पाणीच नदीत सोडले जाईलयासाठी ठोस कारवाई करावी. पाणीहवा यांचे प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. भविष्यातील वाढती लोकसंख्यावाहनांचापाण्याचाजमिनीचा वापर लक्षात घेऊन हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत.

-------०००------

वंदना थोरात/विसंअ/

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi