Saturday, 13 January 2024

*जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? जाणून घ्या.....!*

 *आरोग्य मंत्र*...


*जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? जाणून घ्या.....!*


तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जेवणानंतर बडीशेप चघळण्याची का गरज आहे.


तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जेवणानंतर बडीशेप चघळण्याची का गरज आहे.


* बडीशेपमध्ये भरपूर पोषक आणि फायबर असतात आणि कॅलरी कमी असतात, जे तुमच्या निरोगी चयापचय आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे.


* बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्याने शरीरातील जळजळ कमी होते.


* बडीशेपमध्ये त्यात आढळणारे नायट्रेट लाळेसोबतच शरीराला फायदेशीर ठरते. नायट्रेट्स हृदयाच्या रक्ताभिसरणात पसरतात आणि तणाव कमी करतात.


* बडीशेप रक्ताभिसरण सुधारते आधीपासून अस्तित्वात असलेल्या रक्तवाहिन्यांमधून नवीन रक्तवाहिन्या तयार होण्यास मदत करते.


* फायबर रक्तातील कोलेस्टेरॉलच्या पातळीची काळजी घेते, ज्यामुळे प्लेक्स आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. 


* बडीशेपच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते. ते पचन मंद करतात आणि साखरेची वाढ टाळण्यास मदत करतात.


* बडीशेप खाल्ल्याने खूप वेळा भूक लागत नाही. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बडीशेप पाणी देखील समाविष्ट करू शकता.


* बडीशेपमधील विरघळणारे फायबर रक्तातील साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करू शकते.


विचारा आरोग्य विषयक समस्या अन मिळवा त्यावर समाधानकारक निवारण.


*डॉ. सुनील इनामदार*,


🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹


*(कॉपी पेस्ट)*

*आरोग्य आणि समर्थ social foundation 

-------------------------

*ज्ञान ,मनोरंजन, माहिती, यासारख्या update 5EOqzNR54

मातीची भांडी

 आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. जुनी जानती मंडळी आज देखील मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंद करत आहेत. आयुर्वेदात असं म्हणमं आहे की, आगीवर हळूहळू जेवणं शिजणं शरीरासाठी हितकारक आहे. मात्र स्टील आणि एल्युमिनिअममधील अन्न हे शरीरासाठी हानिकारक आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. जुनी जानती मंडळी आज देखील मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंद करत आहेत. आयुर्वेदात असं म्हणमं आहे की, आगीवर हळूहळू जेवणं शिजणं शरीरासाठी हितकारक आहे. मात्र स्टील आणि एल्युमिनिअममधील अन्न हे शरीरासाठी हानिकारक आहे. 


 *मातीचे भांडेच का?* 

असं म्हटलं जात की मातीच्या तव्यावर पोळी बनवल्याने त्यामधील एकही पोषकतत्व नष्ट होत नाही. अॅल्युमिनियमच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने त्यातील ८७ टक्के पोषकतत्वे कमी हतोता. पितळेच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने ७ टक्के पोषकतत्वे कमी होतात. केवळ मातीच्या भांड्यात बनवलेल्या पदार्थांमध्ये १०० टक्के पोषकतत्वे कायम राहतात.


 *मातीच्या भांड्यात जेवण करणे सोईचे* 

मातीच्या भांड्यात वरण 25 मिनिटाच्या आत हळू आचेवर शिजून जात. म्हणून वरणाला नेहमी मातीच्या भांड्यात शिजवायला ठेवून तुम्ही तुमचे बाकीचे काम करू शकता. एक वेळा मातीच्या भांड्यातील शिजलेले वरण जर तुम्ही खाल्ले तर ते एवढे स्वादिष्ट आणि पौष्टिक असत की तुम्ही त्याची चव विसरू शकत नाही. याच प्रमाणे मातीच्या तव्यावर बनलेली पोळी व माठाचे पाणी फक्त स्वादिष्टच नसत तर ते जन्मभर तुम्हाला निरोगी बनवत.


 *स्वादिष्ट आणि पौष्टिक* 

मातीच्या तव्यावर जेवण अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट होतं. मातीचे तत्व पोळ्यांमध्ये शोषले जाते यामुळे त्याची पौष्टिकता अधिक वाढते. 


 *बद्धकोष्ठतेपासून सुटका*

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या साधारण झालीये. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय त्यांनी मातीच्या तव्यावर बनवलेली पोळी खाल्ल्याने त्रास दूर होतो.



*Nutritionist & Dietician* 

 *Naturopathist* 

 *Dr. Amit Bhorkar*  

 -----------------------

*

वाढीव पदांवर समायोजन झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत

 वाढीव पदांवर समायोजन झालेल्या शिक्षकांनी


विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


 


            मुंबई, दि. १३ : वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ समायोजनास पात्र शिक्षकांपैकी मुंबई विभागातील २० शिक्षकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते यासंदर्भातील आदेश प्रदान करण्यात आले. वाढीव पदावर समायोजन केलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईत नुकताच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 


            मान्यताप्राप्त खासगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढल्यामुळे वाढलेल्या अतिरिक्त कार्यभारानुसार पायाभूत पदांपेक्षा अतिरिक्त शिक्षक पदे मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले होते. सन २००३-०४ पासून २०१८-१९ पर्यंत वाढीव कार्यभारानुसार अतिरिक्त वाढीव पदे मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता. या कालावधीतील वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. 


            मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी समायोजन झालेल्या शिक्षकांना यावेळी शुभेच्छा दिल्या. समायोजनाचे आदेश प्राप्त शिक्षकांनीही शासनाच्या या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त करून आभार मानले. यावेळी संबंधित सर्व शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


 


00000


 

राज्य मागासवर्ग आयोगाचे मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भातील सूचना पाठविण्याचे आवाहन

 राज्य मागासवर्ग आयोगाचे मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भातील

सूचना पाठविण्याचे आवाहन

        मुंबईदि. १३ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात काही सूचना करावयाच्या असल्यास ५०० शब्दांच्या मर्यादेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे दि. १९ जानेवारी २०२४ पर्यंत mscbcpune2@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात,असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे.


भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली


 भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली

 

            मुंबईदि. १३ : - भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेले सृजनशीलअलौकीक प्रतिभा यांचे अनोखे वरदान म्हणता येईलअशी एक तेजस्वी गानप्रभा आज निमाली आहेअशा शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

            भारतीय संगीत क्षेत्राचे क्षितीज उजळवून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वात ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा समावेश करावा लागेल. शास्त्रीय संगीतातील त्यांचे योगदान उच्चकोटीचे आहे. संगीतातील विविध प्रवाहांना सामावून घेऊनहे क्षेत्र त्यांनी समृद्ध केले. आपल्या अलौकिक प्रतिभेने त्यांनी गायनातील मानदंड प्रस्थापित केले. त्यांचे गाणे स्वर्गीय आणि मंत्रमुग्ध करणारे होतेच. पण आपल्या संगीत क्षेत्राचे देखणेपण आणि नजाकत प्रकट करणारे होते. त्यांनी भारतीय संगीताचे हे रुप आपल्या प्रसन्नहसतमुख व्यक्तिमत्त्वातून देश-विदेशातही पोहचवले. आपल्या प्रसन्नवैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरांनी त्या अजरामरच आहेत. आवाजाच्या रुपात त्या आपल्या अवतीभवतीच राहतील. पण संगीत क्षेत्राला मात्र त्यांची निश्चितच पोकळी जाणवेल. ही भारतीय संगीत क्षेत्राची आणि रसिकांसाठी मोठी हानी आहे. भारतीय संगीतामध्ये होणारे विविध बदल सहजपणे आत्मसात करीत संगीत क्षितिजावर अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्वरयोगिनीच्या रुपातील  एक तेजस्वी तारा निखळला आहेअशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ज्येष्ठ गायिकापद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

            दरम्यान डॉ. अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत असे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.

 

तरूणाईच्या बहारदार सादरीकरणानं जिंकली उपस्थितांची मनं तरूणाई, उत्साह अन् जल्लोष; तपोवनात अवतरला तरुणाईचा मेळा

 तरूणाईच्या बहारदार सादरीकरणानं जिंकली उपस्थितांची मनं


तरूणाई, उत्साह अन् जल्लोष;


तपोवनात अवतरला तरुणाईचा मेळा


 


            नाशिक, दि. 12 : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात तरूणाईच्या कलाकौशल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह उपस्थितांची मनं जिंकली. 'विकसित भारत @2047 - युवा के लिए – युवा द्वारा' या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमात तालबद्ध जिम्नॅस्टिक, मल्लखांब, योगासने, साहसी प्रात्यक्षिकांचे युवक-युवतींनी बहारदार सादरीकरण केले. राष्ट्रीय युवा महोत्सवातील देशभक्तीपर गीतांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचा पहिला दिवस तरूणाईच्या सळसळत्या उत्साहाने गाजला. एकाहून एक सरस, कलाकौशल्य दाखविताना तरूणाईची चपळता पहायला मिळाली‌.


            तपोवन मैदानावर स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन झाले. महाराष्ट्रासाठी 'सक्षम युवा-समर्थ भारत' या घोषवाक्यावर आधारित या महोत्सवात तरूणाईचा जल्लोष, उत्साह ओसंडून वाहत असून नाशिकमध्ये देशातील विविध राज्यातील तरूणाईचा मेळा अवतरला आहे.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली. त्यानंतर‌ भारताची विविधता, एकात्मता, संस्कृती, नृत्य व वेशभूषा यांचे दर्शन घडविणाऱ्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या चमूंचे प्रधानमंत्र्यांसमोर संचलन झाले.


            सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणात जिम्नॅस्टिकमध्ये हूप, बॉल, रिबन आणि रोप अशा साधनांचा वापर करत युवकांनी आपले कौशल्य दाखवत तालबद्ध जिम्नॅस्टिक सादर केले. जिम्नॅस्टिकचे कौशल्य पाहून उपस्थित आवाक झाले. महाराष्ट्राच्या तरूणांनी मल्लखांबावरील चित्तथरारक कसरती करून दाखवत उपस्थितांना आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. ढोल, झांज, लेझीम यासह कथकली, भरतनाट्यम्, भांगडा या विविध राज्यातील लोकनृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.


            तरूणांनी सादर केलेल्या साहसी शारीरिक कसरती, प्रात्यक्ष‍िकांच्या जोडीला सायकलिंग आणि स्केटिंगचे मनोवेधक सादरीकरण झाले. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता‌.


नाशिकच्या ढोल‌ पथकानं वेधलं लक्ष


             संचालनात नाशिकच्या सहस्त्रनाद ढोल पथकातील युवक- युवतींनी ढोल वाजवत साथ-संगत केली. सुमारे 10 मिनिटे चाललेल्या संचलनात ढोल पथकाच्या निनादात आसमंत ढवळून निघाला होता‌. 50 युवक- युवतींचा समावेश असलेल्या या ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं‌ होते.


००००

पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेला, अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे

 पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी

 शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन

सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेला,

अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे

 




            मुंबई, दि. 12 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. मोदींनी छायाचित्र दालन आणि अटल सेतूच्या प्रदर्शनीय प्रतिकृतीचा आढावा घेतला.

            एमटीएचएल अटल सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला गेला आहे आणि सुमारे 21.8 किमी लांबीचा 6-पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे.

      आमच्या नागरिकांसाठी जीवन सुलभता’ वाढवण्याच्या दृष्टीने एक पुढचे महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या अटल सेतूचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. हा पूल प्रवासाचा वेळ कमी करेल आणि कनेक्टिव्हिटी वाढवेल ज्याद्वारे दैनंदिन प्रवास सुरळीत होईल.

            पंतप्रधानांच्या समवेत राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतू

            शहरी वाहतूक पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी बळकट करून नागरिकांची प्रवास सुलभता’ सुधारणे हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. या संकल्पनेनुसारमुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)आता अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतू’ नामकरण झालेला पूल बांधण्यात आला आहे. डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पुलाची पायाभरणी करण्यात आली होती.

            एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून अटल सेतू बांधण्यात आला आहे. हा सुमारे 21.8 किमी लांबीचा 6-पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि मुंबई ते पुणेगोवा आणि दक्षिण भारत दरम्यानचा प्रवासाचा वेळ देखील कमी करेल. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल.

०००

Featured post

Lakshvedhi