Thursday, 28 December 2023

राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत 10 पट वाढ

 राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत 10 पट वाढ

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बल्लारपूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

            चंद्रपूरदि. 27 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा 11 सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्रथम प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावीयासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            बल्लारपूर (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकूल येथे आयोजित 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

            तर बल्लारपूर येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात मेडल प्राप्त खेळाडू मिळतीलअशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भारतात घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच अनुषंगाने चंद्रपूरमधून मिशन ऑलिम्पिक ची सुरवात झाली असून सन 2036 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचे खेळाडू नक्कीच पदक मिळवतीलअसा आशावाद सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

            उद्घाटन समारंभाला आमदार रामदास आंबटकरअपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ताप्रधान सचिव विकास खारगेसांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चावरेजिल्हाधिकारी विनय गौडामुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनपोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह पद्मश्री पुरस्कार विजेते बहाद्दूरसिंह चव्हाणधावपटू हिमा दासललिता बाबरबैडमिंटनपटू मालविका बनसोड आदी उपस्थित होते.

            खेलो इंडियाफिट इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा देण्याचे कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेतअसे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की2036 मध्ये ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांचा पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे एक प्रकारे आव्हानात्मक कार्य असून चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

            चंद्रपूरचे नाव देशभरात अभिमानाने घेतले जाईल, असे या क्रीडा स्पर्धाचे आयोजन असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन जाहीर झाल्याची घोषणा तसेच मिशन ऑलिम्पिक ची घोषणा यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.  

भविष्यात पदक प्राप्त खेळाडू मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            बल्लारपुरात होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात पदक प्राप्त करणारे खेळाडू मिळतीलअसा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढील ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धेमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

            राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतून भविष्यात देशाचे नाव कमावणारे खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खेळामुळे खेळातून आत्मविश्वास निर्माण होतो खेळ भावनेतूनच व्यक्तिमत्व पूर्ण होते. देशाचे नाव उंचावण्यासाठी खेळाडूंनी खेळावेअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आवाहन केले

मिशन ऑलिम्पिक  2036 मध्ये चंद्रपूरचे खेळाडू पदक मिळवतील – पालकमंत्री मुनगंटीवार

            चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. वाघांच्या भूमीत खेळाडू वाघांसारखा पराक्रम करतीलअशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीमिशन ऑलिम्पिक  2036 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचे खेळाडू पदक मिळवतील. या स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने परिश्रम घेतले आहेत. खेळाडूंना कोणतीही समस्या जाणवणार नाही. त्यांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोतअसे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

            संपूर्ण देशभरातून येथे खेळाडू आले आहेत. या स्पर्धेचे आयोजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्कृष्ट केले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिशन ऑलिम्पिक  2036 चे लाँचिंग येथे करण्यात आल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.  

             सुरवातीला मान्यवरांनी बल्लारपूर तालुका क्रीडा संकूल येथे असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मनजित कुमार या खेळाडूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे क्रीडा ज्योत सुपूर्द केली. यावेळी संदीप गोंड या खेळाडूने शपथ दिली.

            अभूतपूर्व उद्घाटन सोहळा : उद्घाटन समारंभात शाल्मली खोलगडे यांनी सादर केलेला लाइव्ह’ परफॉर्मन्स सोबतच फायर शोलेझर शोॲक्रोबॅटिक डान्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरले.

            खेळाडूंचे ध्वजसंचलन : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी बल्लारपूर येथे दाखल झालेल्या सर्व राज्यातील खेळाडूंनी ध्वजसंचलन करीत आपापल्या राज्याचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास 1551 खेळाडू दाखल झाले आहेत.

            चंद्रपूर गॅझेटिअर व ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ पुस्तिकेचे विमोचन : पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर प्रथमच मराठी भाषेत प्रकाशित होत आहे. या गॅझेटिअरचे तसेच येथे आलेल्या खेळाडूंना चंद्रपूर जिल्ह्याचा ऐतिहासिकसांस्कृतिक वारसाची माहिती व्हावीया उद्देशाने हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

००००००

Wednesday, 27 December 2023

शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची 'दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची

'दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखतशिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची


'दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 

मुंबईदि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात   बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्या मुलाखतीचा तिसरा भाग गुरुवार दि. 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

शैक्षणिक प्रशासनात उल्लेखनीय योगदानासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबद्दल सन २०२२-२३ करिता राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था (एनआयईपीए)नवी दिल्ली या संस्थेद्वारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. कंकाळ यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, सर्वांगीण विकास साधण्यासाठी विशेष प्रयत्नत्याचबरोबर मोफत शिक्षणाची समान संधी आणि भौतिक सुविधांची उपलब्धता करून देणे  तसेच महानगरपालिका शाळांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावाया शाळांमधील पटसंख्येत वाढ व्हावी यासाठी मिशन अॅडमिशनएकच लक्ष्य - एक लक्ष ’ ही विशेष मोहीम राबविणे  तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि योजनांबाबत शिक्षणाधिकारी श्री. कंकाळ यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात सविस्तर माहिती दिली आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000


जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे

 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे

अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची मुलाखत

 

मुंबईदि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'डीप क्लीनिंग ड्राइव्हमोहिमेची अंमलबजावणीया विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

स्वच्छसुंदर मुंबईसाठी महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिकेने 'डीप क्लिनिंग ड्राइव्हमोहीम सुरु केली आहे. या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून मुंबईमधील विविध भागांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने स्वच्छता करण्यात येत आहे. या मोहिमेचे नियोजनअंमलबजावणी व नागरिकांचा सहभाग याबाबत अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

 ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवारदि. 28 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://x.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


कोविड’ उपाययोजनांसाठी 'टास्क फोर्स'ची स्थापना

 कोविड’ उपाययोजनांसाठी 'टास्क फोर्स'ची स्थापना

मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत

            मुंबईदि. 26: कोविड- १९ च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रणत्यावर उपाययोजना करण्यासाठी दि. १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) निर्मिती करण्यात आली होती. राज्यात पुन्हा एकदा कोविड-19 ची रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहेअशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी आज दिली.

            या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी आयसीएमआरदिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठनाशिकच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानीटकरवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालकबी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश  कार्यकर्तेनवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदारनवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आयुक्तआरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            गंभीर व अतिगंभीर आजारी कोविड-१९ रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणेकोविड-१९ क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणेगंभीरपणे आजारी कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे आदी कार्यवाही हा टास्क फोर्स करणार आहेअशी माहितीही आरोग्य मंत्री प्रा.डॉ सावंत यांनी दिली.


बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल

 बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन

प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल

- राज्यपाल रमेश बैस

50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन

 

            पुणेदि.26: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, असा विश्वास राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केला.

            या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलशालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलएनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तवशालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरेराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.बैस म्हणालेनियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बाल वैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनाचे आयोजन व्हावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. प्रत्येक व्यक्तीत असा गुण असतो आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून तो समोर येतो. बाल वैज्ञानिकांच्या या प्रदर्शनातूनही अशाच प्रकारे भविष्यातील वैज्ञानिक तयार होतीलत्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून नवे पेटंटची नोंद केली जाईल आणि हेच बाल वैज्ञानिक राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीत हातभार लावतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            हे बाल विज्ञान प्रदर्शन 'तंत्रज्ञान आणि खेळणीया विषयावर आधारित आहे. भारतात स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ही खेळणी विज्ञान विषयावर आधारित असल्यास मनोरंजनातून विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण होईल. शाळांमधूनही अशा प्रदर्शनाचे आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढीस लागेल. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीचे प्रयत्न न थांबविता संशोधनाचे प्रयत्न सुरू ठेवावेअसे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी  केले.

            पुणे हे संस्कृती आणि शिक्षणाचे केंद्र असल्याचे नमूद करतांना डॉ. वसंत गोवारीकरडॉ. जयंत नारळीकरडॉ. विजय भटकरडॉ. अनिल काकोडकरडॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वैज्ञानिक क्षेत्रात राज्याचे नाव जगभरात पोहोचविलेअसे गौरवोद्गार राज्यपाल श्री. बैस यांनी काढले.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले कीमुंबई येथे 1979 आणि 2006 मध्ये पुण्याला  हे प्रदर्शन भरविण्याची  संधी मिळाली होती. अलीकडच्या काळात आर्थिक प्रगतीसाठी नाविन्यता आणि नवकल्पनांना महत्व प्राप्त झाल्याने अशा प्रदर्शनाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणातही विद्यार्थ्यांची शोधकवृत्ती वाढीस लागेल यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रदर्शनातील वैज्ञानिक आविष्कार  अत्यंत उपयुक्त आहेतअसे त्यांनी सांगितले. एक ट्रस्ट तयार करून अशा प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेतअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर म्हणाले कीनव्या शैक्षणिक धोरणानुसार हे प्रदर्शन महत्वाचे आहे. नव्या युगातील गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आपल्याला लक्ष द्यावे लागेल. शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चांगले तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोर ठेवावे लागेल. या प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यातून जगाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी घडतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'माझी शाळा सुंदर शाळाअभियान राज्यात राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

            एनसीईआरटीचे सहसंचालक श्रीवास्तव म्हणालेगेल्या पाच दशकापासून विविध राज्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एनसीईआरटी प्रयत्न करते. विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. 'तंत्रज्ञान आणि खेळणीया विषयावरील नवकल्पना प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            श्री.येडगे यांनी प्रास्ताविकात बाल विज्ञान प्रदर्शनाविषयी माहिती दिली. यावर्षी 173 बाल वैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृतीसह या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. दररोज 10 हजार विद्यार्थीशिक्षकपालक प्रदर्शनाला भेट देतील. या कालावधीत राज्यभरातील शाळांमध्ये विज्ञान पंधरवडा साजरा करण्यात येणार आहेअशी माहिती त्यांनी दिली.

            कार्यक्रमापूर्वी राज्यपाल श्री. बैस यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या निर्मिती आणि शोधकवृत्तीला दाद दिली.

बाल वैज्ञानिक प्रदर्शन 2023

            राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. संपूर्ण देशातील विद्यार्थीशिक्षकपालकविविध भागधारक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती या प्रदर्शनास भेट देणार आहेत. प्रदर्शनाकरीता 31 राज्यातील  विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला आहे. या व्यतिरिक्त नवीन शैक्षणिक विचार प्रवाहयशोगाथा व यशस्वी उपक्रम यासाठी राज्यातून निवडक 25 दालनाद्वारे विविध शासकीय व स्वयंसेवी संस्था यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. हे प्रदर्शन 30 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे.

            प्रदर्शनाचा मुख्य विषय  'तंत्रज्ञान आणि खेळणीअसा निश्चित केला आहे. सामाजिक,पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून  माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगतीपर्यावरणास अनुकूल सामग्रीआरोग्य आणि स्वच्छतावाहतूक आणि नवोपक्रम,पर्यावरणीय चिंतावर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास आणि आमच्यासाठी गणित असे सात उपविषय निर्धारित करण्यात आले आहेत.

0000


मेघालयात २०० वर्षांपूर्वी बांधलेला व्यापारी मार्ग !

 मेघालयात २०० वर्षांपूर्वी बांधलेला व्यापारी मार्ग !

- ‘डेव्हिड स्कॉट ट्रेल’ ची रंगत काही औरच...

चेरापुंजीच्या भेटीत दोनशे वर्षांपूर्वीच्या एका माणसाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. डेव्हिड स्कॉट हे त्याचे नाव. तो ब्रिटिश काळातल्या बंगालच्या गव्हर्नरचा एजंट. उत्तम प्रशासक म्हणून प्रसिद्ध होता. त्याने ब्रिटिशांच्या काळात अनेक महत्त्वाची कामे केली. त्याचा अनेक विषयांचा अभ्यास आणि व्यासंग. तत्वज्ञान, रसायनविज्ञान, भूविज्ञान, खनिजविज्ञान, प्राणिविज्ञान, नॅचरल हिस्टरी, मेकॅनिक्स, सर्व्हे अशा विषयांत त्याला गती. भाषा म्हणाल तर हिंदुस्थानी, फारसी, बंगाली, ईशान्य भारतातील स्थानिक बोली यांचा चांगला परिचय. त्याला निसर्गाचं भलतं वेड. त्यामुळे टेकड्यांवर, जंगलात भटकणे, त्यावर लिहणे, त्यांची टिपणे काढणे हा छंद.

त्याचे एक महत्त्वाचे काम म्हणजे- तेव्हाचा एकत्रित आसाम आणि आता बांगलादेशात असलेले सिल्हेट या दरम्यानचा घोडागाडीचा मार्ग. सुमारे १०० किलोमीटर लांबीचा हा रस्ता. डेव्हिड स्कॉटने तो बांधून घेतला. त्यामुळे व्यापाराच्या वाढीला चालना मिळाली. अर्थातच, यामागे महसुली उत्पन्न वाढवण्याचा मुख्य हेतू होताच. शिवाय सामरिकदृष्ट्याही त्याला महत्त्व होते. पूर्वीचा हा दळणवळणाचा मार्ग आता ऐतिहासिक बनून राहिला आहे.

१८९७ मधे मोठ्या भूकंपामुळे तिथल्या परिसराची हानी, आधुनिक रस्ते या कारणांमुळे आता हा मार्ग व्यापारासाठी वापरात नाही. मात्र, त्याच्यावरून चालणे, ट्रेक / ट्रेल करणे म्हणजे २०० वर्षांच्या काळात रमण्यासारखे आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा ट्रेल. तिथली पवित्र जंगलं (आपल्याकडील देवराईंसारखी), नितळ प्रवाह, उत्तम जंगल, जैवविविधता आणि अवतीभवतीचे डोंगर... हा ट्रेल काही टप्प्यांमध्ये करता येतो आणि निसर्ग अनुभवत असताना इतिहासही समजून घेता येतो. त्याच्यावरून काही अंतर चालताना तत्कालीन अनेक गोष्टींचा अंदाज येतो आणि त्या काळात रमायला होते. हा ‘डेव्हिड स्कॉट ट्रेल’ या नावानेच ओळखला जातो.

या डेव्हिडचा जन्म स्कॉटलंडमधला, पण वयाच्या ४५ व्या वर्षी मृत्यू इथे चेरापुंजीत झाला. त्याचे स्मारक पाहता येते... या ट्रेलवरून काही अंतर चालणे म्हणजे जुन्या काळात डोकावणेच!

- अभिजित घोरपडे

(मेघालय डायरी ३)

Exclusive Meghalaya - Kaziranga
नेहमीच्या गोष्टींपलीकडचं काही समजून घेण्यासाठी,
चलो मेघालय
(Feb - March च्या सीमेवर)
9545350862

३१ डिसेंबर च्या आधी सर्वात उंचावर जाऊन बसायला पाहिजे बुवा 🐔🐓

 ३१ डिसेंबर च्या आधी सर्वात उंचावर जाऊन बसायला पाहिजे बुवा 🐔🐓


Featured post

Lakshvedhi