Wednesday, 27 December 2023

बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल

 बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन

प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल

- राज्यपाल रमेश बैस

50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन

 

            पुणेदि.26: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, असा विश्वास राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केला.

            या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलशालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलएनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तवशालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरेराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.बैस म्हणालेनियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बाल वैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनाचे आयोजन व्हावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. प्रत्येक व्यक्तीत असा गुण असतो आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून तो समोर येतो. बाल वैज्ञानिकांच्या या प्रदर्शनातूनही अशाच प्रकारे भविष्यातील वैज्ञानिक तयार होतीलत्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून नवे पेटंटची नोंद केली जाईल आणि हेच बाल वैज्ञानिक राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीत हातभार लावतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            हे बाल विज्ञान प्रदर्शन 'तंत्रज्ञान आणि खेळणीया विषयावर आधारित आहे. भारतात स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ही खेळणी विज्ञान विषयावर आधारित असल्यास मनोरंजनातून विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण होईल. शाळांमधूनही अशा प्रदर्शनाचे आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढीस लागेल. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीचे प्रयत्न न थांबविता संशोधनाचे प्रयत्न सुरू ठेवावेअसे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी  केले.

            पुणे हे संस्कृती आणि शिक्षणाचे केंद्र असल्याचे नमूद करतांना डॉ. वसंत गोवारीकरडॉ. जयंत नारळीकरडॉ. विजय भटकरडॉ. अनिल काकोडकरडॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वैज्ञानिक क्षेत्रात राज्याचे नाव जगभरात पोहोचविलेअसे गौरवोद्गार राज्यपाल श्री. बैस यांनी काढले.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले कीमुंबई येथे 1979 आणि 2006 मध्ये पुण्याला  हे प्रदर्शन भरविण्याची  संधी मिळाली होती. अलीकडच्या काळात आर्थिक प्रगतीसाठी नाविन्यता आणि नवकल्पनांना महत्व प्राप्त झाल्याने अशा प्रदर्शनाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणातही विद्यार्थ्यांची शोधकवृत्ती वाढीस लागेल यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रदर्शनातील वैज्ञानिक आविष्कार  अत्यंत उपयुक्त आहेतअसे त्यांनी सांगितले. एक ट्रस्ट तयार करून अशा प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेतअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर म्हणाले कीनव्या शैक्षणिक धोरणानुसार हे प्रदर्शन महत्वाचे आहे. नव्या युगातील गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आपल्याला लक्ष द्यावे लागेल. शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चांगले तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोर ठेवावे लागेल. या प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यातून जगाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी घडतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'माझी शाळा सुंदर शाळाअभियान राज्यात राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

            एनसीईआरटीचे सहसंचालक श्रीवास्तव म्हणालेगेल्या पाच दशकापासून विविध राज्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एनसीईआरटी प्रयत्न करते. विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. 'तंत्रज्ञान आणि खेळणीया विषयावरील नवकल्पना प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            श्री.येडगे यांनी प्रास्ताविकात बाल विज्ञान प्रदर्शनाविषयी माहिती दिली. यावर्षी 173 बाल वैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृतीसह या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. दररोज 10 हजार विद्यार्थीशिक्षकपालक प्रदर्शनाला भेट देतील. या कालावधीत राज्यभरातील शाळांमध्ये विज्ञान पंधरवडा साजरा करण्यात येणार आहेअशी माहिती त्यांनी दिली.

            कार्यक्रमापूर्वी राज्यपाल श्री. बैस यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या निर्मिती आणि शोधकवृत्तीला दाद दिली.

बाल वैज्ञानिक प्रदर्शन 2023

            राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. संपूर्ण देशातील विद्यार्थीशिक्षकपालकविविध भागधारक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती या प्रदर्शनास भेट देणार आहेत. प्रदर्शनाकरीता 31 राज्यातील  विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला आहे. या व्यतिरिक्त नवीन शैक्षणिक विचार प्रवाहयशोगाथा व यशस्वी उपक्रम यासाठी राज्यातून निवडक 25 दालनाद्वारे विविध शासकीय व स्वयंसेवी संस्था यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. हे प्रदर्शन 30 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे.

            प्रदर्शनाचा मुख्य विषय  'तंत्रज्ञान आणि खेळणीअसा निश्चित केला आहे. सामाजिक,पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून  माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगतीपर्यावरणास अनुकूल सामग्रीआरोग्य आणि स्वच्छतावाहतूक आणि नवोपक्रम,पर्यावरणीय चिंतावर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास आणि आमच्यासाठी गणित असे सात उपविषय निर्धारित करण्यात आले आहेत.

0000


मेघालयात २०० वर्षांपूर्वी बांधलेला व्यापारी मार्ग !

 मेघालयात २०० वर्षांपूर्वी बांधलेला व्यापारी मार्ग !

- ‘डेव्हिड स्कॉट ट्रेल’ ची रंगत काही औरच...

चेरापुंजीच्या भेटीत दोनशे वर्षांपूर्वीच्या एका माणसाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. डेव्हिड स्कॉट हे त्याचे नाव. तो ब्रिटिश काळातल्या बंगालच्या गव्हर्नरचा एजंट. उत्तम प्रशासक म्हणून प्रसिद्ध होता. त्याने ब्रिटिशांच्या काळात अनेक महत्त्वाची कामे केली. त्याचा अनेक विषयांचा अभ्यास आणि व्यासंग. तत्वज्ञान, रसायनविज्ञान, भूविज्ञान, खनिजविज्ञान, प्राणिविज्ञान, नॅचरल हिस्टरी, मेकॅनिक्स, सर्व्हे अशा विषयांत त्याला गती. भाषा म्हणाल तर हिंदुस्थानी, फारसी, बंगाली, ईशान्य भारतातील स्थानिक बोली यांचा चांगला परिचय. त्याला निसर्गाचं भलतं वेड. त्यामुळे टेकड्यांवर, जंगलात भटकणे, त्यावर लिहणे, त्यांची टिपणे काढणे हा छंद.

त्याचे एक महत्त्वाचे काम म्हणजे- तेव्हाचा एकत्रित आसाम आणि आता बांगलादेशात असलेले सिल्हेट या दरम्यानचा घोडागाडीचा मार्ग. सुमारे १०० किलोमीटर लांबीचा हा रस्ता. डेव्हिड स्कॉटने तो बांधून घेतला. त्यामुळे व्यापाराच्या वाढीला चालना मिळाली. अर्थातच, यामागे महसुली उत्पन्न वाढवण्याचा मुख्य हेतू होताच. शिवाय सामरिकदृष्ट्याही त्याला महत्त्व होते. पूर्वीचा हा दळणवळणाचा मार्ग आता ऐतिहासिक बनून राहिला आहे.

१८९७ मधे मोठ्या भूकंपामुळे तिथल्या परिसराची हानी, आधुनिक रस्ते या कारणांमुळे आता हा मार्ग व्यापारासाठी वापरात नाही. मात्र, त्याच्यावरून चालणे, ट्रेक / ट्रेल करणे म्हणजे २०० वर्षांच्या काळात रमण्यासारखे आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा ट्रेल. तिथली पवित्र जंगलं (आपल्याकडील देवराईंसारखी), नितळ प्रवाह, उत्तम जंगल, जैवविविधता आणि अवतीभवतीचे डोंगर... हा ट्रेल काही टप्प्यांमध्ये करता येतो आणि निसर्ग अनुभवत असताना इतिहासही समजून घेता येतो. त्याच्यावरून काही अंतर चालताना तत्कालीन अनेक गोष्टींचा अंदाज येतो आणि त्या काळात रमायला होते. हा ‘डेव्हिड स्कॉट ट्रेल’ या नावानेच ओळखला जातो.

या डेव्हिडचा जन्म स्कॉटलंडमधला, पण वयाच्या ४५ व्या वर्षी मृत्यू इथे चेरापुंजीत झाला. त्याचे स्मारक पाहता येते... या ट्रेलवरून काही अंतर चालणे म्हणजे जुन्या काळात डोकावणेच!

- अभिजित घोरपडे

(मेघालय डायरी ३)

Exclusive Meghalaya - Kaziranga
नेहमीच्या गोष्टींपलीकडचं काही समजून घेण्यासाठी,
चलो मेघालय
(Feb - March च्या सीमेवर)
9545350862

३१ डिसेंबर च्या आधी सर्वात उंचावर जाऊन बसायला पाहिजे बुवा 🐔🐓

 ३१ डिसेंबर च्या आधी सर्वात उंचावर जाऊन बसायला पाहिजे बुवा 🐔🐓


आजचे गिरनार पर्वतावर धुनी चे दर्शन👏👏👏👏*🙏🌸🚩

 *आजचे गिरनार पर्वतावर धुनी चे दर्शन👏👏👏👏*🙏🌸🚩


दत्ताची खुप जुनी आणि मुळ आरती

 दत्ताची खुप जुनी आणि मुळ आरती


नी आणि मुळ आरती .👆🏽 

प्रत्येक कडव्यातील शेवटच्या ओळीतले एकाच पट्टीतले विशेषालंकार 

जसे ... 

नमन,शमन,गमन,धमन

तरतरीत,जळजळीत,गरगरीत, 

भजन, पूजन, सुजन


फारच सुखावह आणि पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. आपणही लक्षपूर्वक ऐकून सुखानंद घ्या !! ☺️ 🙏🏻

किती देता बोला की

 आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली, माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो . . .


तलाठ्यानं सांगितलं -

काम करू पण,

 देणार किती ?

मला वाटलं शेती आमची, 

बाप माझा, 

आजा माझा.

मग याला का पैसे द्यायचे ?


तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलिस स्टेशनला गेलो.

पोलीस म्हणाले -

 गुन्हा दाखल करू, तपास करू पण . . .

आमच्या चहा पाण्याचं काय ?


मला पुन्हा राग आला.

यांना तर, सरकार म्हणजेच मी पगार देतोय मग पुन्हा हे चिरीमिरी का मागत असतील.


म्हटलं हे आमदारांच्या कानावर टाकू,

आमदार म्हटले . . .

 त्याची गडचिरोलीला बदली करू, 

त्याला निलंबित करू,

मंत्र्यांना भेटू पण . . .

वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढं जातच नाही.


मला वाईट वाटलं.

यांना तर मी मतदान केलं होतं.


वाटलं कोर्टात जाऊ . . .

गेलो.

तिथं गेल्यावर कळलं की,

तिथं एक आज-उद्या मरेल अशी म्हतारी आली आहे. 


तिच्यावर तरुणपणी अत्याचार झाला होता. त्या मॅटरची तारीख होती.

अजून निकाल लागला नव्हता.

शिवाय निकाल कसा लागेल याची खात्री नव्हती. 


म्हटलं हे एखाद्या . . . पत्रकार, 

लेखक, 

कवीला सांगावं . . .

मन हलकं करावं ! आपल्या प्रश्नांना ते आवाज देतील.


तिकडे गेलो s s

तर सगळेच म्हणाले, 

पेन आमच्या हातात असला तरी,

त्यातली शाई आम्ही विकली आहे.

आम्ही तसं लिहू शकत नाही.

आमचे हात अन . . .

पेन बांधलेले आहेत. 


मला याचा प्रचंड राग आला होता.

म्हणून एका साधू कडे गेलो.

वाटलं तेवढीच आत्मशांती मिळेल.

मठावरचे सेवेकरी म्हणाले . . .

उद्या या !


सध्या भाऊसाहेब,

 P I साहेब, 

आमदार साहेब, 

पत्रकार साहेब,

लेखक, 

कवी आले आहेत.

महाराज त्यांच्यासोबत बिझी आहेत, 

नंतर . . .

 त्यांच्या सोबत जेवायला बसणार आहेत. 

आज ते तुम्हाला टाईम देणार नाहीत.


माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता.

म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ ...!


लोकांसमोर गेलो, लोकांना हे सांगितलं.

लोकं म्हटली हा येडा झालाय् . . . . .

हल्ली काही बरळतोय् !

नंतर कळलं . . .

लोकं गुलाम झाली आहेत !

लाचार झाली आहेत !


क्षणभर वाईट वाटलं.


मी करणार तरी काय होतो.


त्यांच्यात सामील व्हावं कि मरावं ?

कि मारावं यांना . . .

😢 😢

नाही पण मी यातलं काही करणार नाही.माझा सत्यावर विश्वास आहे.निश्चित एक दिवस परिस्थिती बदलेल.भ्रष्टाचार ही मानसिकता जरुर बदलेल.

हरिओम तत् सत् 🌹


- मी एक मतदार !

( या देशाचा मालक की सेवक ? )

Tuesday, 26 December 2023

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न

 महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न

- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

'महालक्ष्मी सरसप्रदर्शनाचे उद्घाटन, 513 स्टॉलचा समावेश

मुंबईदि.२६: ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावीप्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी. म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 'महालक्ष्मी सरस'च्या माध्यमातून २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादनांची विक्री होईल, असा विश्वास व्यक्त करीत ८ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असलेल्या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

एमएमआरडीए मैदान,वांद्रे (पूर्व)  येथे 'महालक्ष्मी सरस२०२३-२४ या  बचतगटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या उद्धघाटनानंतर ग्रामविकास मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, 'नाबार्ड'चे व्यवस्थापकीय संचालक रेमंड डिसोजामहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊतग्रामविकास विभागाचे उपसचिव के. पी. पाटीलउपायुक्त विकास कोकण विभाग गिरीश भालेरावग्रामविकास विभागातील अधिकारी,  महिला बचत गटाच्या सदस्य यावेळी उपस्थित होत्या.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, 'महालक्ष्मी सरसमध्ये स्टॉल मिळावा यासाठी महिला आग्रही आहेत. या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी आता महिला बचत गटांमध्ये देखील स्पर्धा निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी बचतगटांच्या माध्यमातून 17 कोटी रुपयांच्यावर उत्पादनांची विक्री झाली आहे. यंदा या विक्रीमध्ये वाढ होऊन 25 कोटी रुपयांच्यावर वस्तूंची विक्री होईल. त्याचबरोबर प्रत्येक विभागनिहाय महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करण्याबाबत  विचार करणार असून याबाबत लवकरच अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील सहा लाख बचतगटांना सन 2022 -23 मध्ये सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. तर यामध्ये वाढ होऊन 23-24 मध्ये हा कर्ज वितरण पुरवठा 7 हजार कोटी पर्यंत बचतगटांना कर्ज मिळाले आहे. महिला बचत गटांनी घेतलेले कर्ज फेडण्याचे प्रमाण हे 98 टक्के आहे आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. कोणत्याही क्षेत्रात घेतलेल्या कर्ज परतफेडीच्या प्रमाणापेक्षा महिला बचत गटांनी केलेली कर्ज परतफेड सर्वात अधिक आहे, असेही मंत्री श्री. महाजन म्हणाले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांचा विकास करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी देशात प्रभावीपणे केली आहे. महिलांचे परिश्रम कमी व्हावेत यासाठी उज्ज्वला गॅस योजनाप्रत्येक वाडीपर्यंत रस्तेप्रत्येकाला राहण्यासाठी घरकुलप्रत्येक घरामध्ये शौचालयगरीब व गरजूंना मोफत अन्नधान्य वितरण यासारख्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली आहे. महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. आज अनेक बचतगटांना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर कोटी रुपयांचे कर्ज मिळत आहे. बचत गटांच्या प्रामाणिकपणाचे हे यश आहे. बचतगटांनी तयार केलेले उत्पादन जागतिक बाजारपेठेत टिकले पाहिजे.

प्रधान साचिव श्री.डवले म्हणालेबचत गटांकडून घेतलेले कर्ज फेडीचे ९८ टक्के प्रमाण आहे. त्यामुळे बचत गटांना बँका कर्जपुरवठा करण्यास नेहमी उत्सुक आहेत. पंतप्रधान आवास योजनाविकसित भारत त्याचबरोबर सेंद्रिय शेती आणि शासनाच्या विविध योजना एकत्रितपणे राबवत आहोत याचा लाभ बचतगटांना होत आहे. बचतगटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहे.

   नाबार्डचे व्यवस्थापकीय संचालक श्री. डिसोजा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयवंशी यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे अतिरिक्त संचालक श्री. राऊत यांनी आभार मानले.

महालक्ष्मी सरस  प्रदर्शन व विक्री

८ जानेवारी २०२४ पर्यंत

राज्यातील ग्रामीण भागातील महिला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याकरीता सन २०११ पासून ग्राम विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची ३४ जिल्ह्यांतील ३५१ तालुक्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून त्यांना एक उद्योजक म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी निर्माण करण्यात येत आहे. अभियानांतर्गत महिलांच्या उपजिविकेवर भर देण्यात येत असून आतापर्यंत ६ लाख ३० हजार ०४० स्वयं सहायता समूह३१ हजार ३७०  ग्रामसंघ१ हजार ८५० प्रभागसंघ३०७ महिला शेतकरी उत्पादक कंपनी व १० हजार ४१४ उत्पादक गट स्थापित झालेले आहेत. सुमारे ६० लाखांपेक्षा जास्त महिला अभियानाशी प्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या आहेत.

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या करीता राज्यविभाग व जिल्हास्तरावर प्रदर्शनींचे आयोजन करण्यात येते. सन २००४ पासून ग्राम विकास विभागातंर्गत मुंबई येथे 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. देश पातळीवर प्रत्येक राज्यात विक्री व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनीचा मुख्य उद्देश देशातील व राज्यातील स्वयंसहाय्यता समूहांतील महिलांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच समूहांतील सदस्यांना विवीध राज्यातील उत्पादनेविक्री व बाजारपेठेची माहिती देणे व राज्या- राज्यातील लोकांचे राहणीमानखाद्यसंस्कृती व कलाकुसर इ.चा परस्परांना परिचय करुन देणे. शहरी भागातील लोकांना अस्सल देशी-गावरान वस्तू आणि पदार्थ उपलव्ध करुन देणे हा आहे.  

यावर्षी महालक्ष्मी सरस मध्ये एकूण ५१३ स्टॉल असूनमहाराष्ट्रातील २५५, देशभरातून येणारे इतर राज्यांचे ११८ आणि नाबार्ड चे ५० उर्वरित स्टॉल हे नावीन्यपूर्ण प्रकारचे  आहेत. यावेळी महाराष्ट्रातून जी उत्पादने येत आहेत त्यामध्ये त्या -त्या जिल्ह्यांची ओळख सांगणारे उत्पादने आहेत. मुंबईकरांना या प्रदर्शनातून खात्रीचा माल किंवा वस्तू मिळतील देशभरातील अस्सल चवी  चाखण्यास मिळतीलकलाकुसर अनुभवायला मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाल्यास ग्रामीण महिलांच्या या प्रयत्नांना हातभार  लागणार आहे.  वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ८ जानेवारी २०२४ पर्यंत असलेल्या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

Featured post

Lakshvedhi