Friday, 22 December 2023

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार

 महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

मुंबईदि.21 : मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी सरकारने महाराष्ट्र शुल्क अभय योजना राबविण्यास मान्यता दिली आहे.  दि. 1 डिसेंबर 2023 पासून दि.31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्प्यांत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन महसूल विभागामार्फत करण्यात आले आहे.

मुद्रांक शुल्क अभय योजनेमध्ये कमी स्टॅम्पड्युटी भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्कामध्ये आणि दंडामध्ये मोठयाप्रमाणात सूट दिली आहे. दि.०१ जानेवारी१९८० ते दि.३१ डिसेंबर२००० या कालावधीत निष्पादित केलेल्या ज्या दस्तांमध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाखापेक्षा कमी असणार आहे. अशा दस्तांवरील कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्यात येऊन व त्यावरील दंडाची रक्कम देखिल संपूर्णपणे माफ करण्यात आली आहे. तरकमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही १ लाखापेक्षा जास्त असेल तरकमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये  ५०% सूट देऊन त्यावरील दंडाची संपूर्ण रक्कम माफ करण्यात आली आहे.  दि.१ जानेवारी२००१ ते दि.३१ डिसेंबर२०२० या कालावधीमध्ये निष्पादित केला असेल तरअशा दस्तांवर देखिल कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये २५% पर्यंत सूट देण्यात येऊन त्यावरील दंड हा २५ लाख ते १ कोटी मर्यादेपर्यंतच वसुल करण्यात येणार आहे. त्यापेक्षा जास्त दंडाची रक्कम असेल तरती संपूर्णपणे माफ केली जाणार आहे.

काही कारणास्तव पहिल्या टप्यामध्ये सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झाला तर दुसऱ्या टप्यामध्ये देखिल सवलतीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. परंतुहा लाभ हा कमी प्रमाणात मिळेल.

 या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यासह नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अभय योजनेसाठी अर्जदार यांना संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात समक्ष किंवा ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्जाचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर (www.igmaharashtra.gov.inतसेचसर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच योजनेची सविस्तर माहिती या विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशने परिपत्रक-मुद्रांक अभय योजना या सदराखाली नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

००००

जगातील रोजगाराची मागणी लक्षात घेवून कुशल मनुष्यबळ विकसित करणार

 जगातील रोजगाराची मागणी लक्षात घेवून

कुशल मनुष्यबळ विकसित करणार

- कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

 

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकौशल्यरोजगारउद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये सामंजस्य करार

 

मुंबईदि.२१ :   महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकौशल्यरोजगारउद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल.राज्यात सहा ठिकाणी ही सुविधा केंद्र आहेत.  परदेशात रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जगातील रोजगाराची मागणी आणि त्याप्रमाणे कुशल मनुष्यबळ विकास देणे शासनाला शक्य होईल असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकौशल्यरोजगारउद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये सामंजस्य करारावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते.

कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्रामार्फत जे उमदेवार परदेशात नोकरी करू इच्छितात अशा उमेदवारांना सर्व प्रकारचे रोजगाराभिमुख  प्रशिक्षण येथे दिले जाईल. जगातील प्रत्येक क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी ची माहिती मिळाली तर विद्यार्थ्यांना त्याच प्रकारचे शिक्षण देणे शक्य होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया व डिजिटल इंडियाच्या माध्यमातून  देशभरात अनेक उपक्रम राबविले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य,रोजगारउद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत राबविण्यात येत आहेत असेही श्री.लोढा यावेळी म्हणाले.

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) चे संचालक वेदमनी तिवारी म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. हे बलस्थान लक्षात घेता या वयोगटातील तरुणांसाठी बदलत्या काळाची पाउले ओळखून कौशल्य  विकासाला बळ देण्याची गरज आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियाला प्रोत्साहन दिलेले आहे.अनेक व विकसित देशांची उदा. अमेरिकाऑस्ट्रेलियाकॅनडासिंगापूरजपान येथे  कार्यरत वयोगटाची लोकसंख्या कमी होत चालली आहे. असे देश कुशल मनुष्यबळाची  मागणी करत आहेत. भारतातील सद्यस्थितीत तरूण वयोगटाचे प्रमाण ६२ टक्क्यावरून सन २०३० पर्यंत ६८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.अशा परिस्थितीत जगासाठी उच्च दर्जाचे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची संधी आपल्या  देशाला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाशी झालेल्या करारामुळे राज्यातील युवकांना याचा नक्की लाभ होईल असेही ते म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या दोन नवीन कार्यालयांचा आरंभ आणि महाराष्ट्र इंटरनॅशनलच्या टेलिग्रामव्हॉट्सअँप चॅनललिंक्डइनचा  आरंभ करण्यात आला.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित 'अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचा निकाल जाहीर

 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित

'अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचा निकाल जाहीर

 

मुंबई दि.२१ :  राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने १ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या उद्देषाने या स्पर्धेत जाहिरातनिर्मितीभित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य लेखन या  तीन गटात  स्पर्धकांनी सहभाग घेतला.

यामध्ये जाहिरातनिर्मिती स्पर्धेसाठी ६९, भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेसाठी ६३८ आणि घोषवाक्य लेखन स्पर्धेसाठी ३५७ प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यातुन प्रत्येक स्पर्धेसाठीच्या परीक्षकांनी या प्रवेशिकांचे परीक्षण करून मुल्यांकन केले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आगामी राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच येत्या २४ जानेवारी २०२४ रोजी नियोजित आहे. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांसोबतचस्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला सहभागाचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. सोहळ्याचे ठिकाण आणि वेळ लवकरच जाहिर करुन सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांना कळवले जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळवण्यात आले आहे. स्पर्धेचा निकाल असा आहे.

जाहिरातनिर्मिती स्पर्धा

जाहिरातनिर्मिती स्पर्धेत प्रथम पारितोषिक कुणाल कोळी (जे.के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन) यांना तर निशा उपाध्याय (गुरु नानक कलाविज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय) यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.  शुभम फाळके (जे.के कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन) तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे‌.

            यासोबतच वेदांती आखाडे (जे.के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन) आणि तेजस साळगावकर (बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट - अप्लाईड आर्ट) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी प्रकाश कुंटे आणि विकास पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. जाहिरातनिर्मिती स्पर्धेतील प्रथमद्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. १ लक्ष, ७५ हजार, आणि रु. ५० हजार तसेच सन्मानचिन्हतर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. १० हजारचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धा

भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेत प्रथम पारितोषिक  दया गुजर (मंथन आर्ट स्कुल) यांनी मिळवले असून  आकांक्षा किरण मर्दे (सोफिया पॉलिटेक्निक) यांना द्वितीय पारितोषिक आणि अभिषेक ठाकरे (मंथन आर्ट स्कूल) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. यासोबतच संयुक्ता पवार (जे.के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन) आणि धनश्री भागडकर (सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी संदीप सावंत आणि डॉ. संतोष पाठारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेतील प्रथमद्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. ५० हजार, रु. २५ हजार आणि रु. १० हजार तसेच सन्मानचिन्हतर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. ५ हजारचे पारितोषिक देऊन गौरवले जाईल.

घोषवाक्य लेखन स्पर्धा

घोषवाक्य लेखन स्पर्धेत  प्रथम पारितोषिक साहिल कासारे (संवाद आणि पत्रकारिता विभागमुंबई विद्यापीठकलिनासांताक्रूझ) यांना  जाहीर झाले असून वैष्णवी धुरी (बी.एस. बांदेकर ललित कला महाविद्यालय) यांना द्वितीय पारितोषिक आणि अवेदिका रहिंज (सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. यासोबतच समृद्धी पाटील (सोफिया- श्री बी.के. सोमानी मेमोरियल पॉलिटेक्निक)साक्षी चक्रदेव (मंथन- द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अॅडव्हर्टायझिंग अँड आर्ट) आणि आदिती पोसणे (बी.एस.बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट्ससावंतवाडी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी डॉ. निर्मोही फडके आणि प्रा. अभिजित देशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. घोषवाक्य लेखन स्पर्धेतील प्रथमद्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. २५ हजार, रु. १५ हजार आणि रु. १० हजार तसेच सन्मानचिन्हतर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. ५ हजारचे पारितोषिक देऊन गौरवले जाईल.

या स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्व विजेते आणि स्पर्धकांचे निवडणूक कार्यालयाने अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

000000

Thursday, 21 December 2023

मुंबईत 26 डिसेंबरपासून 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शन

 मुंबईत 26 डिसेंबरपासून 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शन

महिला बचत गटांना सक्षम करणाऱ्या प्रदर्शनाला

भेट देण्याचे ग्रामविकास मंत्र्यांचे आवाहन

                                               

            मुंबई, दि. 21 : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन  व विक्री 26 डिसेंबरपासून वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरू होत आहे. 26 डिसेंबर ते 8 जानेवारी अशा दोन आठवड्यांच्या कालावधीत महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांना सक्षम करणाऱ्या सरस प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

           दरवर्षी लक्षणीय आर्थिक उलाढाल करणाऱ्या बचत गटांना सक्षम बनवण्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते. गेल्या दीड दशकात सुमारे 8 हजार बचत गटांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री तसेच या उत्पादनाला शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते. याशिवाय या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होतो.

         या प्रदर्शनात भरतकाम केलेल्या साड्याज्यूटच्या वस्तूबांबूच्या वस्तूलाकडी वस्तूचामड्याच्या वस्तूकृत्रिम दागिनेलेडीज बॅगबूट,ड्रेस मटेरियलसाड्याचादरीकार्पेट आणि पडदे यांचा समावेश असणार आहे. या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, शिवाय ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात. घरगुती मसालेपापडकुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील. मुंबईकर आणि संपूर्ण देशाने ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृती आणि नावीन्यपूर्ण उपक्रम साजरा करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

          सरस प्रदर्शनातग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध असतील. ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावच्या भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत पर्यटकांना ग्रामीण भागातील चव चाखण्याची आणि खरेदीची संधी मिळणार आहे. कोल्हापुरातील तांबडा-पंढरा रस्सा आणि सोलापूरची शेंगाची चटणी यांसारखे पारंपरिक पदार्थही उपलब्ध असतील. याशिवाय राज्याच्या विविध भागातील मसाले आणि हातसडीचे तांदूळ प्रदर्शनात असतील. अधिकाधिक नागरिकांनी सरस प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी, ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन मंत्री श्री.महाजन यांनी केले आहे.

000

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून

 कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरलइलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

नागरिकांनो घाबरू नका, काळजी घ्या

राज्यात 63 हजार विलगीकरण, 33 हजार ऑक्सिजन बेड्स उपलब्ध

 

ठाणेदि.21 (जिमाका) :- देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरलइलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश दिले. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले. राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेतली. त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंतवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमुख्य सचिव मनोज सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणीप्रधान सचिव विकास खारगेप्रधान सचिव  ब्रिजेश सिंहआरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरसर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

ऑक्सिजन प्लांट्सव्हेंटिलेटरऑक्सिजन पाईपलाईन्सआरटीपीसीआर लॅबडयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावाज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावीअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटरविलगीकरण बेड्सआयसीयू बेड्सव्हेंटिलेटर बेड्सच्या सद्य:स्थितीबाबतचीही माहिती यावेळी घेतली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोविडच्या संकटाचा धीरोदात्तपणे यशस्वी मुकाबला केला आहे. संपूर्ण जगाने त्याबाबतीत आपल्या देशाचे अनुकरण केले. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दीखोकलाताप यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नागरिकांना केले.

सोशल मीडियावरून तसेच प्रसारमाध्यमांनी देखील या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होणार नाहीअफवा पसरणार नाही. माहिती प्रसारीत करताना अधिकृत माहितीचाच उपयोग करावायासाठी सहकार्य करावेअसे आवाहनही त्यांनी केले.

शासन यंत्रणा एकजुटीने कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे. यंत्रसामुग्रीऔषध साठाइतर साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने घाबरु नये. काळजी घ्यावी काळजीअसेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफआरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आरोग्ययंत्रणेच्या सज्जतेबाबत माहिती दिली. आरोग्य यंत्रणेच्या सर्व यंत्रसामुग्रीइतर सर्व यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याची खात्री करण्यासाठी दि. 15 ते 17 डिसेंबर 2023 या कालावधीत ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या राज्यात 63 हजार विलगीकरण बेड्स, 33 हजार ऑक्सिजन बेड्स, 9 हजार 500 आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे 45 रुग्ण (मुंबई-27, पुणे-8, ठाणे-8,कोल्हापूर-1, रायगड-1) आढळून आले आहेतअसे श्री. म्हैसकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिवमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी जेएन वन या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईलअसे सांगितले.

000000


 

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान

 दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान

- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

            नागपूरदि. 20 : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरीता दूध उत्पादकास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येईलअशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवेदनाद्वारे विधानसभेत दिली.

            त्यांनी केलेल्या निवेदनात म्हणले आहे कीदूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी, पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात. याशिवायदुधाच्या पुष्ट काळातही दुधाचे दर कोसळतात. ही वस्तूस्थिती आहे. तथापिअसे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असूनदूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते. त्यानुषंगाने शासनाने यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे दुध भुकटी व बटरमध्ये रूपांतरण करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता.

            सध्याच्या परिस्थितीत राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित सर्वोच्च स्थानी ठेऊन सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरीता दूध उत्पादकास प्रतिलिटर रुपये पाच इतके अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबविण्यात येईलअसे मंत्री श्री. विखे यांनी सांगितले.

            ते म्हणाले कीयाकरिता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ (SNF) करिता प्रति लिटर किमान 29 रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित ( ऑनलाइन पद्धतीने ) अदा करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये पाच प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील. डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील. ही योजना १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी लागू राहील. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन योजनेस मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. ही योजना आयुक्त (दुग्ध व्यवसाय विकास) यांच्या मार्फत राबविली जाईल. यासंदर्भात शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल, असेही त्यांनी या निवेदनात सांगितले.

मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी शिधापत्रिकेवरील शिधा जिन्नसांचे दर जाहीर

 मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी शिधापत्रिकेवरील शिधा जिन्नसांचे दर जाहीर

 

मुंबईदि.20 : मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत माहे डिसेंबर2023 साठी कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर जाहीर झाले आहेत. ते पुढीलप्रमाणे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंबासाठीचे दर तांदूळ मोफत दराने प्रति व्यक्ती 3 किलोगहू प्रति व्यक्ती 2 किलो असे आहेत. अंत्योदय अन्न योजना - तांदूळ मोफत दराने प्रती शिधापत्रिका 20 किलोगहू मोफत दराने प्रति शिधापत्रिका 15 किलो व रु. 20/- दराने प्रति शिधापत्रिका 1 किलो साखर (सुलभ पॅकिंगसह) असे आहेत.

 बिगर गॅसधारक शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचे दर मुंबई शहर व मुंबई उपनगर (दिनांक 1 डिसेंबर 2023) नुसार रुपये 68.96  ठाणे विभाग (दि. 4 डिसेंबर 2023) नुसार (36/फ) रु. 69.35/-ठाणे (41/फ) रु.69.35/-मुंब्रा (48/फ) रु.69.35/-वाशी (41/ फ) रु. 69.35/-भाईंदर (41/फ) रु.69.35/-कल्याण (38/फ) रु. 69.53/-डोंबिवली (मुख्य) (39/फ ) रु. 69.53/-डोंबिवली (उप) (39/फ) - 69.53उल्हासनगर (मुख्य) (40/फ) रु. 69.61/-उल्हासनगर (उप) (40/फ) 69.61अंबरनाथ (46/फ) रु. 69.61/-बदलापूर (46/ फ) रु. 69.61/-भिवंडी (37/फ) रु. 69.44/- प्रति लिटर या प्रमाणे असून 1 व्यक्ती 2 लिटर2 व्यक्ती 3 लिटर व 3 व्यक्ती व वरील 4 लिटर वाटप करण्यात येईलअसे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांनी कळविले आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ

Featured post

Lakshvedhi