Tuesday, 19 December 2023

नेरुळ येथील इमारतींची मुदत संपुष्टात आल्याने महानगरपालिकेची नियमानुसार कार्यवाही

 नेरुळ येथील इमारतींची मुदत संपुष्टात आल्याने

महानगरपालिकेची नियमानुसार कार्यवाही

मंत्री उदय सामंत

            नागपूरदि. 19 :  नेरुळ (नवी मुंबई) येथील महानगरपालिका क्षेत्रातील भूखंडावर बांधण्यात आलेल्या त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स आणि कृष्णा कॉम्प्लेक्स या इमारती रिकाम्या करण्यास रहिवाश्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली सहा महिन्यांची मुदत संपल्याने महानगरपालिकेने यासंदर्भात नियमानुसार कार्यवाही सुरू केल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य रवींद्र वायकर यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

            मंत्री श्री. सामंत यांनी लेखी उत्तरात सांगितले कीनेरूळ (नवी मुंबई) येथील महानगरपालिका क्षेत्रातील भूखंडावर त्रिमूर्ती कॉम्लेक्स व कृष्णा कॉम्प्लेक्स अशा दोन अनधिकृत इमारती उभारल्या असूनया इमारतींचा अनधिकृतपणे रहिवाशी वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

            या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित विकासकास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमनुसार नोटीस देण्यात आली होती. तथापिया इमारतीमधील रहिवाश्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असताप्रथमतः उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरूध्द या इमारतींमधील रहिवाश्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असतासर्वोच्च न्यायालयाने या इमारती रिकाम्या करण्यास सहा महिन्यांची मुदत देऊन याचिका निकालात काढली. ही मुदत संपल्याने महानगरपालिकेने नियमानुसार कार्यवाही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

00000

मोजमाप पुस्तिका गहाळ प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी

 मोजमाप पुस्तिका गहाळ प्रकरणाची

‘एसआयटी’मार्फत चौकशी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            नागपूर दि. 19 :  धाराशिव नगरपालिकेतंर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

            धाराशिव नगरपालिकेतंर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई होत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य नरेंद्र दराडे यांनी सहभाग घेतला होता.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्या प्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई आणि चालढकल होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी केली जाईल.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/


 

वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळशाच्या मागे किमान पाच रोपे लावावीत

 वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळशाच्या मागे

किमान पाच रोपे लावावीत

मंत्री सुधीर मुनगंटीवार

            नागपूरदि १९ : चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळसा उत्खनन केल्यास किमान ५ रोपे लावावीत तसेच खाणी जवळील गावांमधील वीज आणि पाण्याची बिले कंपनीने भरावीतअशा सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

            नागपूर येथे वेस्टर्न कोल फिल्डविषयी विधानभवनात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी वेस्टर्न कोल फील्डचे अधिकारीजमीन अधिग्रहित होणाऱ्या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

            राज्य शासन आणि स्थानिक नागरिक कंपनीला सहकार्य करत असल्याचे सांगून वन मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले ज्या गावांमधील जमीन कंपनी घेत आहेतेथील जमीन अधिग्रहणाबाबत तहसीलदार यांचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय कोळसा मंत्रीकेंद्रीय कोळसा सचिव आणि कोल इंडिया यांना पाठवावा. या अहवालातून अधिग्रहणाविषयीचे गावांचे प्रश्न मार्गी लागतील.

०००००

नारायण आयुर्वेद : जश्न अग्निहोत्री बनीं नारायण हेमोबोस्ट की ब्रांड एंबेसडर

 नारायण आयुर्वेद : जश्न अग्निहोत्री बनीं नारायण हेमोबोस्ट की ब्रांड एंबेसडर



बॉलीवुड की मशहूर अभिनेत्री जश्न अग्निहोत्री नारायण हेमोबोस्ट की नई ब्रांड एंबेसडर बनीं हैं। इस मौके पर नारायण हेमोबोस्ट के डायरेक्टर अनिल सिंह ने जश्न अग्निहोत्री की तारीफ की और कहा कि वह एक बहुत ही उम्दा कलाकार हैं। जश्न अग्निहोत्री ने कहा कि वह नारायण हेमोबोस्ट के साथ जुड़कर बहुत खुश हैं। उन्होंने कहा कि हेमोबोस्ट एक बेहतरीन आयुर्वेदिक सिरप है जो शरीर में खून की कमी को दूर करता है। इससे शारीरिक कमजोरी, थकान, एनीमिया, भूख न लगना, चेहरे के दाग-धब्बे और ojas की कमी जैसी समस्याएं दूर होती हैं। जश्न अग्निहोत्री ने कहा कि वह खुद भी हेमोबोस्ट का सेवन करती हैं और उन्हें इसके फायदे महसूस हुए हैं। उन्होंने कहा कि हेमोबोस्ट ने उन्हें थकान और कमजोरी से छुटकारा दिलाया है और उनकी त्वचा में निखार आया है।

 नारायण हेमोबोस्ट एक आयुर्वेदिक सिरप है जो शरीर में खून की कमी को दूर करता है। यह सिरप अश्वगंधा, शतावरी, गिलोय, आंवला और हल्दी जैसी आयुर्वेदिक जड़ी-बूटियों से बना है। इन जड़ी-बूटियों के गुणों से शरीर में खून बनता है और ऊर्जा का स्तर बढ़ता है। जश्न अग्निहोत्री की नियुक्ति से नारायण हेमोबोस्ट को काफी उम्मीदें हैं। कंपनी का मानना है कि जश्न अग्निहोत्री की लोकप्रियता और छवि से कंपनी को अपने उत्पाद को लोगों तक पहुंचाने में मदद मिलेगी। जश्न अग्निहोत्री ने कहा कि वह नारायण हेमोबोस्ट के साथ मिलकर लोगों को खून की कमी जैसी समस्याओं के बारे में जागरूक करने का काम करेंगी। वही इसके प्रचारक ब्रजेश मेहर हैं।

Narayan Ayurveda: Jashn Agnihotri becomes the brand ambassador of Narayan Hemoboost

Famous Bollywood actress Jashan Agnihotri Narayan has become the new brand ambassador of Hemoboost. On this occasion, Narayan Hemoboost Director Anil Singh praised Jashan Agnihotri and said that he is a very good artist.

Jashn Agnihotri said that he is very happy to be associated with Narayan Hemoboost. He said that Hemoboost is an excellent Ayurvedic syrup which removes anemia in the body. This removes problems like physical weakness, fatigue, anemia, loss of appetite, facial blemishes and lack of ojas.

Jashn Agnihotri said that she herself takes Hemoboost and has experienced its benefits. He said that Hemoboost has relieved him of fatigue and weakness and has improved his skin.

Narayan Hemoboost is an Ayurvedic syrup which removes blood deficiency in the body. This syrup is made from Ayurvedic herbs like Ashwagandha, Shatavari, Giloy, Amla and Turmeric. The properties of these herbs produce blood in the body and increase energy levels.

Narayan Hemoboost has high hopes from the appointment of Jashan Agnihotri. The company believes that the popularity and image of Jashn Agnihotri will help the company in reaching its product among the people.

Jashn Agnihotri said that she will work with Narayana Hemoboost to make people aware about problems like anemia. Its promoter is Brajesh Mehar.

 रस्त्यांच्या प्रगतीची माहिती आता पोर्टलवर

- मंत्री रवींद्र चव्हाण

 

      नागपूरदि. १९ : राज्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रगती जाणून घेता यावीयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच पोर्टल सुरू करण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले. जानेवारी महिन्यात हे पोर्टल सुरू होणार असून या माध्यमातून नागरिकांना पारदर्शकपणे कामांची प्रगती पाहता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी रस्त्यांच्या कामाचा दर्जा चांगला राखण्याबाबत लक्षवेधी मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सर्वश्री राम सातपुतेॲड. आशिष जयस्वाल यांनी सहभाग घेतला.

राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागग्रामविकास विभागप्रधानमंत्री सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होत असतात. यांचे निकष आणि नियम देखील त्यानुसार वेगवेगळे असतात. राज्यात प्रलंबित असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांना मागील दीड वर्षात निधी उपलब्ध करून ते विहित कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेथे अडचणी असतील त्या जाणून घेऊन कार्यवाही केली जात आहे. राज्यातील विविध भागात भौगोलिक परिस्थितीनुसार कामे करण्याचे तंत्रज्ञान वेगवेगळे असते. त्यानुसार केवळ काम देऊन न थांबता विभागामार्फत कामाच्या प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवली जात आहे. पूर्ण झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडले असतील अथवा कामात दिरंगाई होत असेलदेखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये दुरूस्ती केली जात नसेल तर अशा कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन सूचना दिल्या जातील. त्यानंतरही दिरंगाई होत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईलअसेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

राज्यातील कामांच्या सद्यस्थितीबाबत माहिती देताना मंत्री श्री. चव्हाण म्हणालेसार्वजनिक बांधकाम विभागाची सुमारे ३०० कोटींची २०० कामे मंजूर असून त्यातील ८२ कामे पूर्ण तर ३९ कामे प्रगतीपथावर आहेत. ७९ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १४७ कामे मंजूर असून ९५ कामे पूर्ण झाली आहेत. ४४ कामे प्रगतीपथावर तर पाच कामे निविदास्तरावर आहेत. प्रधानमंत्री सडक योजनेची १२ कामे पूर्ण झाली असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर २८ कामांपैकी २२ पूर्ण तर सहा कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

00000रस्त्यांच्या प्रगतीची माहिती आता पोर्टलवरp- मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबईच्या डोंगरीतील उपकरप्राप्त इमारत दुरुस्तीची चौकशी

 मुंबईच्या डोंगरीतील उपकरप्राप्त इमारत दुरुस्तीची चौकशी

मंत्री अतुल सावे

          नागपूरदि. १९ : मुंबईतील डोंगरी भागातील उपकरप्राप्त इमारत ६-६अ च्या दुरुस्तीचे काम न करता म्हाडाने बिले अदा केले असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईलअसे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

            या उपकरप्राप्त इमारतीची २०१८ मध्ये दुरुस्ती न करता म्हाडाने कामाची बिले अदा केल्याबाबत सदस्य अमीन पटेल  यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्याला उत्तर देताना ते बोलत होते. या दोन इमारतींच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे.म्हाडाकडे निधी उपलब्ध आहे. रहिवाश्यांनी आर्किटेक्ट सुचवावात्याप्रमाणे दुरुस्तीचे काम केले जाईल. फातिमा मंझील इमारतीबाबतही वास्तुशास्त्रज्ञ सुचवून त्यानुसार काम केले जाईल. तसेच डोंगरी भागातील वार्डात मागच्या पाच वर्षात झालेल्या दुरुस्ती कामाचे अहवाल मागवले जाईल, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

            यापूर्वीच म्हाडाला अर्थसंकल्पात  ७९ कोटी रूपयेपावसाळी अधिवेशनात ९५ कोटी रूपये आणि हिवाळी अधिवेशनात ९८ कोटी रुपये निधी मिळाला आहे. विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही. म्हाडातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. जाहिराती काढण्यात आल्या आहेत. लवकरच पदे भरले जातीलअसे मंत्री श्री. सावे यांनी स्पष्ट केले.

००००

मध्यंतरी एका अंत्यविधी साठी

 ______________________

||◆||  नंदकुमार  सप्रे  ||◆||

================


               मध्यंतरी  एका अंत्यविधी साठी

अमरधाम मध्ये गेलो होतो. जवळचे नातेवाईक आणि

मृताच्या घरचे लोक चितेच्या ओट्याजवळ तयारी करत होते. इतर जे परिचित हजेरी लावण्या साठो आले होते, ते नेहमी प्रमाणे समोरच्या पायऱ्यांवर 

एकमेकांची ख्याली खुशाली विचारत हास्य विनोदात

दंग होते. सर्व विधी पूर्ण झाल्यावर एक गृहस्थ तिथे

आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत 

दोन तीन पाण्याच्या बाटल्या आणि एक थर्मास होता.

मृताच्या घरच्या लोकांना त्याने पाणी पिण्यास दिलं

आणि नंतर पेपर कपमध्ये चहा प्यायला दिला.

कोणी नातेवाईक असावेत असं मला वाटलं.

या घटने नंतर बऱ्याच दिवसांनी मी नोबल हॉस्पिटलमध्ये कोणालातरी भेटायला गेलो होतो.

ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बरेच लोक बसले होते.

बहुधा त्यांच्या कोणा नातेवाईकांचं आत ऑपरेशन चालू असावं. आणि अचानक बघितलं तर त्या दिवशी

अमरधाम मध्ये दिसलेले ते गृहस्थ इथं देखील त्या

बसलेल्या लोकांना चहा देत होते. आता माझी उत्सुकता वाढली. 

               थोड्या वेळाने सर्वांना चहा देऊन ते थोडे

बाजूला आले, मी ताबडतोब त्यांच्या जवळ गेलो. 

" नमस्कार!" मी म्हंटल. त्यांना हे अपेक्षित नसावं

ते कावरे बावरे होऊन माझ्याकडं बघू लागले. मी

पुन्हा नमस्कार केला, या वेळी त्यांनी फक्त मान

हलवली. " आपलं नाव काय?" मी विचारलं. त्यांचा

पुन्हा प्रश्नार्थक चेहरा. यावेळी कपाळावर आठया देखील.  "तुमचं नाव सांगा." त्यांनी तुटकपणे

मलाच उलटा प्रश्न केला. आता मी त्यांच्या जवळ

गेलो, त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो

" अहो महाराज, माझं नाव प्रशांत कदम. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून नाव विचारलं.

आपण दोन मिनिटं बोलू शकता का?"

"नाही." समोरून फटकन उत्तर आलं. आता मला

धक्के पचवायची सवय झाली होती.

"नाही म्हणजे आत्ता नाही कारण आत्ता मला आणखी

बऱ्याच ठिकाणी जायचंय. आपण नंतर कधीतरी

भेटू. आणि माझं नाव नंदू... म्हणजे नंदकुमार सप्रे."

एवढं बोलून ते तरा तरा चालायला लागले. मी

त्यांच्या पाठमोऱ्या छबी कडे बघतच राहिलो.

साधारण साडेपाच फूट उंची,  मध्यम किंवा त्यापेक्षा

बारीक शरीरयष्टी, अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा,

पायात चपला. अहो हा माणूस बोलायला तयार नाही.

पण एक गोष्ट लक्षात आली. याला कुठंतरी काहीतरी

दुःख आहे, वेदना आहेत. आणि त्या दिवसापासून

माझा त्याच्यातील इंटरेस्ट वाढू लागला. आता याला

पुन्हा एकदा भेटलं पाहिजे.


               आणि तो दिवस लौकरच आला. मी

कुठंतरी चाललो होतो आणि हे महाराज रस्त्याच्या

कडेला सायकल हातात धरून उभे होते. बहुधा

कोणाची तरी वाट पहात असावेत. मी ड्रायव्हरला

गाडी बाजूला घ्यायला संगितली आणि पटकन

खाली उतरून सप्रेच्या समोर जाऊन उभा राह्यलो.

"सप्रे कोणाची वाट बघताय?" मी.

"नाही वाट नाही बघत, सायकल पंक्चर झालीय."

"अरेच्चा, थांबा आपण पंक्चर काढायची व्यवस्था

करू." मी ड्रायव्हरला बोलावून सायकल पंक्चर

काढायला पाठवलं.

"अहो तुम्ही कशाला त्रास घेता, मी आणली असती

करून." सप्रे कसनुसा चेहरा करून म्हणाले.

"असू द्या हो सप्रे, चला आपण तो पर्यंत गाडीत बसून

बोलू."  सप्रे अक्षरशः बळजबरीने गाडीत येऊन बसले.

अतिशय अस्वस्थ झाले होते. मी बोलायला सुरुवात

केली, "सप्रे ही चहाची काय भानगड आहे? जरा सांगता का? सप्रे गप्प. मला कळेना हा माणूस

असा का वागतोय, धड बोलत देखील नाही.

आणि माझं लक्ष्य त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं, अहो

हा माणूस रडत होता. त्याच्या दोन्ही डोळ्यातून

अश्रूच्या धारा वहात होत्या. मला एकदम अपराधी

असल्या सारखं वाटलं. मी दोन्ही हातांनी सप्रेना धरलं

"सप्रे मला माफ करा. तुम्हाला दुखवायचा माझा हेतू

नव्हता. जाऊ द्या, मला काही सांगू नका पण

कृपा करून तुम्ही शांत व्हा. पुन्हा मी तुम्हाला

असले प्रश्न विचारणार नाही. I am sorry."

दोन तीन मिनिटांनी सप्रे शांत झाले आणि त्यांनी

बोलायला सुरुवात केली. "प्रशांतजी, आज पर्यंत

या विषयावर मी कोणाशी बोललो नाही पण आज

मी तुम्हाला सगळं सांगणार, याचं कारण अस आहे की, फक्त तुम्ही एकट्यानेच हा प्रश्न मला विचारला.

मी आणि माझी पत्नी दोघेही सरकारी अधिकारी.

मुलगा आणि सून दोघेही अमेरिकेत. तीन वर्षांपूर्वी

पत्नीचे कोविड मध्ये निधन झाले. आम्ही दोघेही

बाधित होतो. मला हॉस्पिटल मिळालं, तिला खाजगी

हॉस्पिटल मिळालं नाही म्हणून सरकारी दवाखान्यात

ऍडमिट केलं आणि चौथ्या दिवशी ती गेली. 

इथं मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही, कारण

परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिची वेळ

भरली होती, त्यामुळे ती गेली, एवढंच सत्य आहे.

आणि मुळातच एकदा माणूस गेल्यावर त्याची

कारणमीमांसा तपासत बसू नये असं मला वाटतं.

तिला चहा फार आवडायचा, दिवसातून चार

पाच वेळा तरी ती चहा घेत असे. दुर्दैवाचा भाग असा

की तिला हॉस्पिटलमध्ये चार दिवसात एकदाही

चहा मिळाला नाही. आणि या गोष्टीचं मला

सगळ्यात जास्त वाईट वाटलं आणि त्याच वेळी

मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं. 

माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक

जास्त दुःखी असतात. आणि त्यांना काही हवंय

का? हे देखील कुणी विचारत नाही. म्हणून मी थेट

स्मशानभूमीत जाऊन ही सेवा देतो. त्यांच्या

समाधानी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा

दिसतो. हॉस्पिटल मध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक

अतिशय तणावात असतात. त्यांना मी जाऊन भेटतो.

चहा देतो, चौकशी करतो आणि दिलासा देतो.

थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटतं.

मी रिटायर असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ आहे.

सुदैवाने आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मोठा

बंगला आहे आणि मी एकटाच आहे. म्हणून तिथं

पंधरा अनाथ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलीय."

मी प्रचंड भारावून गेलो होतो. काय बोलावे हे

देखील मला कळत नव्हते. "सप्रे तुम्ही फार मोठं

काम करताय, You are great." एवढंच मी बोलू

शकलो. सप्रेची सायकल तयार होऊन आली होती.

सप्रे गाडीतून उतरले, मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड

दिलं आणि ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या

आकृतीकडे बघत मी फक्त नतमस्तक झालो.

त्यानंतर सप्रेची आणि माझी गाठ भेट नाही.

एक दिवस कोणीतरी सप्रे गेले अस सांगितलं.

मी सप्रेच्या घरी गेलो. बंगल्याच्या गेटवर मोठा बोर्ड

होता "मालती सप्रे मेमोरियल ट्रस्ट" आत एक जोशी

नावाचे मॅनेजर होते. त्यांनी सांगितलं इथं राहणारे

विद्यार्थीच आता सप्रेचं काम करतात.

मला आनंद चित्रपटातला शेवटचा प्रसंग आठवला.

राजेश खन्ना मरतो आणि नंतर अमिताभ तिथं

येतो. त्यावेळी तो दोन वाक्य बोलतो.

"आनंद मरा नहीं,  आनंद मरते नहीं।


सुनील होरणे

९८२२११६६३६

E-mail : horanesunil@gmail.com

Featured post

Lakshvedhi