Friday, 10 November 2023

उत्तराखंड समाजाचे राज्याच्या विकासात लक्षणीय योगदान

 उत्तराखंड समाजाचे राज्याच्या विकासात लक्षणीय योगदान







-
 राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्र राजभवन येथे 'उत्तराखंड राज्य स्थापना दिवससाजरा

 

            मुंबई, दि. 9 : उत्तराखंड ही देवभूमी आहेतर महाराष्ट्र ही संत भूमी आहे. या देवभूमीतून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झालेले उत्तराखंडी लोक मृदू स्वभावाचे व मेहनती असून ते महाराष्ट्राच्या भाषा व संस्कृतीशी एकरूप झाले आहेत. महाराष्ट्रातील उत्तराखंडी  समाजाचे राज्याच्या प्रगती व विकासात लक्षणीय योगदान आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. 

            राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे आज  प्रथमच 'उत्तराखंड राज्य स्थापना दिवससाजरा करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.  'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमांतर्गत विविध राज्य व केंद्र शासित प्रदेशांचा सर्व राज्यांमध्ये स्थापना दिवस साजरा करण्याच्या प्रथेप्रमाणे उत्तराखंड राज्य स्थापना दिवस राजभवन येथे साजरा करण्यात आला.

            या राज्याने देशाच्या सैन्यदलामध्ये शेकडो वीर जवान व अधिकारी दिले आहेत. उत्तराखंडच्या अनेक घरांमध्ये एका मुलाला देशसेवेसाठी लष्करात दाखल करण्याची प्रथा असून या भूमीने जनरल बिपीन रावत यांसारखे महान अधिकारी दिले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला 'एक भारतदिला. सर्व नागरिकांनी देशाला 'श्रेष्ठ भारतबनविण्याचा प्रयत्न करावाअसे राज्यपालांनी सांगितले.  

            यावेळी मुंबईतील उत्तराखंडी समाजाच्या 'गढवाल भ्रातृ मंडल', 'हिमालय पर्वतीय संघव 'कौथिग  फाऊंडेशनया संस्थांच्या माध्यमातून उत्तराखंडच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते तिनही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमात उत्तराखंडचे मांगल गीतपूजा नृत्यकुमाऊनी झोडा नृत्यलोकगीतजौनसारी लोकनृत्यएकल नृत्य आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी प्रास्ताविक केले, तर राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांनी आभार प्रदर्शन केले. 

००००

 

Uttarakhand State Foundation Day celebrated in Maharashtra Raj Bhavan

Governor hails the contribution of people of Uttarakhand in progress and development of Maharashtra

      Mumbai Dated 9 : The State Foundation Day of Uttarakhand was celebrated in Maharashtra Raj Bhavan in the presence of Maharashtra Governor Ramesh Bais on Thursday (9 Nov).

            The Uttarakhand State Foundation Day was celebrated in Maharashtra Raj Bhavan as part of the 'Ek Bharat Shreshtha Bharat' initiative of Government of India.

Speaking on the occasion, Governor Ramesh Bais hailed the contribution of the people of Uttarakhand origin to the progress and development of Maharashtra.

            A cultural programme depicting the rich culture and traditions of Uttarakhand was presented on the occasion. The Cultural programme was presented by Garhwal Bhratri Mandal, Himalaya Parvatiya Sangha and Kauthig Foundation. The Governor felicitated the office bearers of the three organisations and the artists.

            Mangal Geet, Puja Dance, Kumauni Jhoda Dance, Jaunsari Folk Dance, Solo Dance and other cultural programmes were presented.

Secretary to the Governor (in charge) Shweta Singhal delivered the welcome speech while Comptroller of the Governor's Households Arun Anandkar proposed vote of thanks.

0000


मुख्यमंत्र्यांनी केली एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

 मुख्यमंत्र्यांनी केली एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार

कर्मचाऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

 

            मुंबईदि. ९:-  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ४२ हजार ३५० रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे सानुग्रह अनुदान सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

मुख्यमंत्री श्री . शिंदे यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने हा निर्णय जाहीर करताना म्हटले आहे कीदिवाळी सणाचा गोडवा द्विगुणित व्हावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएचे कर्मचारी हे एक महत्वाच्या विकास यंत्रणेचे आणि या कुटुंबाचे सदस्य म्हणून काम करतात. या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण होईलम्हणून हा गेल्या वर्षीच्या तुलनेत सानुग्रह अनुदानात १० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा आनंद बहुमोल आहे.वाढीव अनुदान जाहीर केल्याने एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या वाढीव सानुग्रह अनुदानाच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. 

            एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. मुखर्जी यांनी,  सानुग्रह अनुदानाचा हा निर्णय म्हणजे एमएमआरडीएच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची खास भेटच ठरेल. कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंदात जाईलते प्राधिकरणाच्या कामात आणखी उत्साहाने योगदान देत राहतीलअसा विश्वास व्यक्त केला आहे.


Thursday, 9 November 2023

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :

 *🎯प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :📢*

*📄 आवश्यक कागदपत्रे :*

*१.आधारकार्ड*

*२.बॅंकपासबुक झेरॉक्स*

*३.मोबाईल नंबर (आधार लिंक असावे)*

*4 व्यक्ती स्वतः*

*कोणाला लाभ घेता येणार आहे*

*✔️ सुतार*

*✔️ लोहार*

*✔️ सोनार*

*✔️ कुंभार*

*✔️ न्हावी*

*✔️ फुलारी*

*✔️ धोबी*

*✔️ शिंपी*

*✔️ मेस्त्री*

*✔️ चर्मकार*

*✔️ अस्रकार*

*✔️ बोट बांधणारे*

*✔️ अवजारे बनवणारे*

*✔️ खेळणी बनवणारे*

*✔️ चावी बनवणारे*

*✔️ मासेमारचे जाळे विणणारे.*


*काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ?* 

*https://pmvishwakarma.gov.in/*


 *१८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.*


*❇️ योजनेचा उद्धेश ?* 


 *योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी  १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु.  कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह.*


*❇️ या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे :*

*https://pmvishwakarma.gov.in/*


*१.पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना  पाच दिवसीय प्रशिक्षण  दिले जाणार आहे.*

*२.पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे.* 

*३.प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रधान केले जाणार आहे.*

 *४.प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे रुपे कार्ड दिले जाणार आहे.*

**५.प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे.*


*https://pmvishwakarma.gov.in/*

दिवाळीनिमित्त राज्यपालांकडून कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

 दिवाळीनिमित्त राज्यपालांकडून कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप



 

            मुंबईदि. 09 : दिवाळीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील कर्मचारीकंत्राटी कामगार व इतर श्रमिक बांधवांना मिठाई वाटप केले व दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. 

यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपिन कुमार सक्सेनाराज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघलराज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांच्यासह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

0000

 

Maharashtra Governor distributes sweets to staff, workers on Diwali

 

            Mumbai, Nov. ०९ :Maharashtra Governor Ramesh Bais today distributed sweets to the workers, staff and contract workers of Raj Bhavan on the occasion of Diwali. The Governor extended Diwali greetings to all.

            Special Secretary to the Governor Vipin Kumar Saxena, Secretary to the Governor Shweta Singhal, Comptroller of the Governor's Households Arun Anandkar and officers and staff of Raj Bhavan were present.

000


 


ध्वनी, वायू प्रदूषण टाळण्याचे आवाहन’

 ध्वनीवायू प्रदूषण टाळण्याचे आवाहन

दीपावली निमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

 

            मुंबई, दि. 9 : राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

            दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंदसंपन्नता व सुख-शांती घेऊन येवो. हा सण साजरा करताना ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करावाअसे आवाहन करतो व सर्वांना दीपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा देतोअसे राज्यपाल श्री. बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

 

 

Maharashtra Governor Ramesh Bais greets people on Diwali

 

          Mumbai Dated 9 : The Governor of Maharashtra Ramesh Bais has conveyed his greetings to the people of Maharashtra on the occasion of Diwali.  In a message to the people, the Governor has said: “May Deepawali, the festival of lights bring happiness, prosperity and peace in the lives of all. Let us make conscious effort to reduce air and noise pollution. I extend my heartiest greetings to the people on the auspicious occasion of Diwali.”

0000


 

हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे

 हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबई,दि.9 : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळानी तयार केलेल्या विविध साहित्यांच्या स्टॉलचे उच्च, तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात उद्घाटन केले.

            मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात दिवाळी निमित्त वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळांने तयार केलेल्या कापडाचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. 

            मंत्री श्री. पाटील यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

            या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूर (महाहॅण्डलूम) महाराष्ट्रराज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यामुंबई  (महाटेक्स)हिमरू शाल उत्पादकछत्रपती संभाजीनगरआसावली महिला हातमाग विणकर सहकारी संस्था पैठणमहिला बचत गटांनी तयार केलेले दिवाळीनिमित्त सजावट साहित्यफराळसेंद्रिय शेतमाल उत्पादनाच्या साहित्यांचे स्टॉल येथे लावण्यात आले आहेत.

            यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग,उपायुक्त गोरक्ष गाडिलकरउपसचिव श्रीकृष्ण पवारउपसचिव श्रद्धा कोचरेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री सरसावले

 राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री सरसावले

मुंबईतील रस्ते धुण्यासाठी 1000 टॅंकर

रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी विशेष पथके

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

            मुंबईदि. 9 : राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात, असे निर्देश देतानाच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहीम स्वरुपात काम करावेअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरीता 1000 टॅंकर लावावेत. त्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे. एमएमआरडीएची बांधकाम स्थळे धूळमुक्त आणि स्वच्छ करावीत. ॲण्टी स्मॉग गनस्प्रिंकलर्सचा वापर वाढवावाअसे मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना सांगितले.

            वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीमहापालिका आयुक्तपोलिस अधीक्षकमुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य संवादप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहलसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरएमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जीपर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेनगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराजएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मापरिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन आदी यावेळी उपस्थित होते.

प्रदूषण मुक्त मोहीम लोकचळवळ व्हावी

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले कीमुंबईसह महानगरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका तसेच राज्य शासनाच्या विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करावी

            मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामेविकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत. त्याचबरोबर साचलेली धूळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. रस्ते धुण्यासाठी टॅंकरची संख्या 1000 पर्यंत वाढवावीअसेही त्यांनी सांगितले. मुंबईसह महानगर परिसरात एमएमआरडीएमार्फत विकास कामे सुरू आहेत अशा बांधकाम ठिकाणांवर धूळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाण धुळमुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्यांवरून जाताना नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी महानगर आयुक्तांना सांगितले.

मातीडेब्रीज वाहून नेताना ती झाकून न्यावी

            सर्व महापालिकाशहरांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांवर संनियंत्रण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वाहनांमधून रस्त्यांवरील मातीडेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

अर्बन फॉरेस्ट वाढवावे

            राज्यातील महानगरांमध्ये नागरी वन क्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी महानगरपालिकांनी पुढाकार घ्यावा. मेडन मध्ये वृक्षारोपण करावे. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्प्रिंकलर्सचा वापर करा. हवेतील प्रदूषणावर उपाययोजना करताना संनियंत्रण करणे आवश्यक आहे. मुंबईमधील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करावा

            राज्यातील प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आयआयटीच्या तज्ञांनी प्रदूषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी या तज्ञांनी केले.

                                                                        ००००


 

Featured post

Lakshvedhi