Wednesday, 1 November 2023

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

 मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

राज्यात शांतताकायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 1 :- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नयेराज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावीअसे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावेअसे आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणमंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटीलचंद्रकांत पाटीलछगन भुजबळदिलीप वळसे-पाटीलगिरीश महाजनदादाजी भुसेविधान परिषदेचे  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेविधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारविविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री जयंत पाटीलनाना पटोलेसुनील तटकरेअनिल परबसुनील प्रभूआशिष शेलारराजेश टोपेसदाभाऊ खोतजोगेंद्र कवाडेसुलेखा कुंभारेबच्चू कडूशेकापचे जयंत पाटीलराजू पाटीलकपिल पाटीलसदाभाऊ खोतराजेंद्र गवईडॉ.प्रशांत इंगळेकुमार सुशीलबाळकृष्ण लेंगरे आदी उपस्थित होते. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिकमहाधिवक्ता बिरेंद्र सराफसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेइतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            या ठरावात पुढे असे म्हटले आहे कीमराठा आरक्षणाविषयी कायदेशीर कार्यवाही  शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्रत्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहेहे आंदोलकांनीही समजून घ्यावे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून आम्ही त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नयेराज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावीअसे आवाहनही करण्यात आले आहे.

कुणबी प्रमाणपत्रांबाबत तातडीने अंमलबजावणी सुरु - मुख्यमंत्री श्री. शिंदे

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विषयक घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले कीसरकार प्राधान्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकडे लक्ष देत असूनमहाराष्ट्रात जाती-जातींमध्ये सलोख्याची संस्कृती टिकवणे महत्वाचे आहे. आपल्या सगळ्यांचा उद्देश मराठा समाजाला आरक्षण देण्याचा असूनसर्व पक्ष संघटनांनी आपापल्या भागात या विषयी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले पाहिजे. एकीकडे आपण सर्वोच्च न्यायालयात क्युरिएटेव्ह याचिकेद्वारे राज्य शासनाची भूमिका भक्कमपणे मांडत आहोत. त्यासाठी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ नियुक्त केले आहे. दुसरीकडे आपण मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे निर्देशही दिले आहेत.

पूर्वीच्या त्रुटी दूर करून टिकणारे आरक्षण देणार

            मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी ज्या कारणांमुळे आणि त्रुटींमुळे रद्द केले होतेतसेच जी निरीक्षणे नोंदविली होती. त्या त्रुटी आता नव्याने माहिती (डाटा) गोळा करताना होणार नाहीतयाची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. या पावलांमुळे न्यायालयात टिकणारे असे आरक्षण मराठा समाजाला मिळू शकेलअशी खात्री आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर तत्काळ या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला असून सर्व जिल्हाधिकारीतहसीलदार यांना कालच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कुणबी नोंदी असलेल्यांना तातडीने प्रमाणपत्रे देण्याचे निर्देश दिले आहेत. मोडी लिपीतील आणि ऊर्दू भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करूनडिजीटाईझ करण्यासाठी व पब्लिक डोमेनवर आणून त्याआधारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.

            यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येतील. तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून त्रुटी नसलेलापरिपूर्ण डाटा विहित कालावधीत गोळा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

            यावेळी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती दिली. प्रारंभी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी न्या. संदीप शिंदे समितीने आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी व सर्व तहसीलदार यांना कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे सांगितले. बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते श्री.दानवेविधान सभेतील विरोधी पक्ष नेते श्री.वड्डेटीवार तसेच इतर उपस्थित पक्षांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचना मांडल्या.

००००

विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद

 विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

प्रभावी कामगिरी केलेल्या स्वच्छता मॉनिटर्स’ विद्यार्थ्यांचा गौरव

            मुंबईदि. 31 : विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद असते. स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ते सिद्ध केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वच्छतेचे स्वप्न विद्यार्थी प्रत्यक्षात आणत आहेतअशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वच्छता मॉनिटर्स’ बनून उत्कृष्ट कार्य केलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

            मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते लेटस् चेंज अभियानांतर्गत स्वच्छता मॉनिटर्स’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा गौरव सोहळा तसेच दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ सोहळा आज येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित करण्यात आला. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओलसहसचिव इम्तियाज काझीज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्राप्रकल्प संचालक रोहित आर्यागांधीजींची वेशभूषा करून स्वच्छता मॉनिटर्स प्रकल्पाला पाठिंबा देणारे शरद नयनपल्ली यांच्यासह राज्यात प्रभावी कामगिरी केलेल्या 100 शाळांमधील 300 विद्यार्थीउत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यांचे समन्वयक आणि शिक्षणाधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाचा दुसरा टप्पा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

            मंत्री श्री. केसरकर म्हणाले कीभारत हा तरुणांचा देश आहे. आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून विद्यार्थ्यांना जगभराचे क्षीतिज मोकळे झाले आहे. भविष्यात याच विद्यार्थ्यांनी जगाचे नेतृत्व करावेअशी इच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली असून राज्यात स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावी कार्याद्वारे आपली क्षमता सिद्ध केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीचे पत्र उत्कृष्ट कार्य केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जाणार असल्याचे सांगून दुसऱ्या टप्प्यासाठी मंत्री श्री.केसरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

            ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी परिसर स्वच्छ राखण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यांचा झाला गौरव

            मंत्री श्री.केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पात उत्कृष्ट कार्य केलेल्या बुलढाणाजालनामुंबई उपनगरसातारासोलापूर आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या समन्वयक आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील प्रभावी कामगिरी केलेल्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलअंकुशनगरजि.जालनामत्स्योदरी विद्यालयअंबडजि.जालनायुगधर्म पब्लिक स्कूलबुलढाणाआदर्श जि.प. स्कूलबोरखेडीजि.बुलढाणाएन.व्ही. चिन्मया विद्यालयशेगाव आणि जनता हायस्कूलजालना या शाळांच्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

उपक्रमाविषयी : महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या 'स्वच्छता मॉनिटरप्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्स बनून स्वच्छता राखण्याबाबत नागरिकांची न कळत होणारी चूक दाखवून देऊ लागले. यावर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आला. यात राज्यातील 64,198 शाळांमधून 59,31,410 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून समाज माध्यमांतून यासंदर्भातील 15 लाखांहून अधिक व्हीडिओ शेअर झाले आहेत.

            प्रकल्प संचालक श्री. आर्या यांनी प्रास्ताविकाद्वारे उपक्रमाची माहिती दिली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/


नटसम्राट सारखी अवस्था नाट्यगृहाची दामोदर नाट्यगृह परल हॉ या, कोणी जिवदान देता का हो या नाट्यगृहा


या हॉ या, कोणी जिवदान देता का हो या नाट्यगृहा ला 

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार

 राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार

            राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.

            राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.

            आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली.  यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत. 

            राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत, अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.


(The 99 Club ) चे मेंबर व्हाच

 (The  99  Club )

                                                                                                    डॉ. स्वाती गानू     

      

  एक अत्यंत धनाढ्य राजा साऱ्या सुखसुविधा , संपत्ती असूनही आनंदी नव्हता, समाधानी नव्हता. एके दिवशी त्याने आपल्या सेवकाला आनंदाने गाणं गात काम करताना पाहिलं . राजाला आश्चर्य वाटलं की मी ह्या देशाचा राजा असूनही मी दुःखी, उदास आणि तो गरीब सेवक मात्र इतक्या आनंदात कसा? शेवटी त्याने सेवकाला विचारलंही तू इतका आनंदी कसा काय? तेव्हा तो म्हणाला," महाराज, मी एक अगदी सामान्य माणूस आहे पण आम्हाला फार काही लागत नाही . डोक्यावर छत आणि पोट भरेल इतकं अन्न मिळालं की आम्ही समाधानी असतो. पण राजाला आपल्या त्या सेवकाचे उत्तर पटले नाही म्हणून त्याने आपल्या विश्वासू  मंत्र्याला विचारले. राजाची शंका आणि त्या सेवकाची गोष्ट ऐकल्यावर तो मंत्री म्हणाला," मला वाटतं तो सेवक ‘99 Club’ चा भाग झाला नसावा अजून.


ते ऐकल्यावर आश्चर्याने राजाने मंत्र्याला विचारलं ‘99 Club’? म्हणजे नेमकं काय?


 महाराज आपण ९९ मोहरा भरलेली थैली त्याच्या घराबाहेर ठेवा . राजाने तसे करवून घेतले. जेव्हा त्या सेवकाला ती थैली आपल्या घराबाहेर दिसली तेव्हा त्याने ती आत नेली. त्यातील सुवर्णमुद्रा पाहून तो हर्षभरित झाला.मोहरा मोजल्यावर त्या ९९ भरल्या. शंभरावी सुवर्णमुद्रा गेली तरी कुठे म्हणून तो शोधायला लागला. खूप शोधल्यावरही ती सापडेना म्हणून थकून तो विचार करायला लागला की कोणी ९९ सुवर्णमुद्रा कशा काय ठेवेल? पण शंभरावी नाहीये हे ही खरं . त्याने ठरवलं की कठोर परिश्रम करायचे म्हणजे शंभरावी सुवर्णमुद्रा घेता येईल.


त्या दिवसापासून त्या सेवकाचं आयुष्यच बदललं . तो अक्षरशः यंत्राप्रमाणे , रात्रंदिवस झपाटल्यासारखा काम करायला लागला. कुटुंबातल्या सगळ्यांनी त्याला मदत करायलाच पाहिजे म्हणून ओरडाआरड करायला लागला. काम करताना त्यांचं गाणं म्हणणं ऐकू येईनासं झालं . राजानेही ते पहिले . त्याच्यातला हा बदल पाहून  राजाने मंत्र्याला कारण विचारलं तेव्हा मंत्र्याने उत्तर दिले की आता तो सेवक '‘99 Club’ 'चा मेंबर झालाय.


ही कथा वाचनात आली आणि वाटलं सध्याच्या काळात आपल्यापैकी खूपच जण '99 Club’ 'चे मेंबर झालो आहोत. प्रत्येकाला त्याच्याजवळ जे आहे त्यापेक्षा अधिकच भूक आहे. पैसे सगळ्यांजवळ आहेत . आपल्या गरजाही भागताहेत. सुखासमाधानाने जगतोय पण यापेक्षा जास्त श्रीमंत व्हायचंय . पुरेसं होईल असं घर आहे पण प्रशस्त तीन-चार बेडरूमचं घर हवंय. घरात बऱ्यापैकी मोठा टी.व्ही आहे पण सोनीचा सगळ्यात मोठा टी. व्ही हवाय. ब्रँडेड म्युझिक सिस्टीम , फ्रीज , झुळझुळीत पडदे, ए.सी , महागडी कार , परफ्यूमस, कपडे, हॉटेलिंग , मोबाईल मिळवण्यासाठी ह्या  ‘99 Club’ च्या मेंबर्सची रात्रंदिवस धावपळ चाललीये. पैशाबरोबरच ऑफिसमध्ये , राजकारणात अधिक उच्च पदं, अधिक सत्ता ह्या हव्यासाचा कडेलोट होतोय.

मुलांना शंभरपैकी ९९ मार्क मिळाले तर एक मार्क नेमका कुठे गेला हे शोधायला ९९ मार्क मिळाल्याचा आनंद पालक हरवून बसताहेत. जे आहे त्यापेक्षा जे कमी वाटतंय ते मिळवण्याच्या मागे आपण काय गमावतोय याचं भानच उरलेलं नाही. आपल्याजवळ असणारं घर, घरातली माणसं, वस्तू, पैसा, समाजातली प्रतिष्ठा , नावलौकिक , यश ह्याच्यात दडलेलं असतं समाधान. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आणखी जास्त मिळवायचंय असा विचार करणारे लोक आनंदाच्या शोधात असतात मात्र समाधान हाताच्या ओंजळीतून निसटून जातं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आपण ९९ सुवर्णमुद्रा असल्या तरी शंभराव्या नाण्याचा शोध घेण्यासाठी तळमळत राहतो. स्वतःला सांगत राहतो की ते शंभरावं नाणं एकदा का मला मिळालं की मग मी कायमचा आनंदी, सुखी होईन आणि असं तो आयुष्यभर म्हणतच राहतो . आपली रात्रीची झोप , आपला आनंद सारं घालवून बसतो. जे हवं ते मिळवण्याची अभिलाषा अशी की जवळच्यांची मनंही दुखावताहेत. आपल्या गरजा, इच्छा वाढताना आपण ह्या  ‘99 Club’ चे मेंबर कधी होतो ते आपल्याला कळतही नाही.

आपण आयुष्यात उच्च ध्येय ठेवणं चुकीचं नाही मात्र शिखरावर पोचताना ध्येयापेक्षा त्या प्रवासाला अधिक महत्व असतं हे लक्षात ठेवायला हवं. आपण लोभ,मोह याच्यामागे झपाटल्यासारखं लागलो तर कायमच असमाधानी राहू यात शंकाच नाही. अशा ‘99 Club’ ‘चा मेंबर होण्यासाठी फी शून्य लागते पण त्यातून बाहेर पडण्याची मात्र फार मोठी किंमत चुकवावी लागते. म्हणूनच म्हणतात नं की Life is a journey not a destination. आपण समाधान मिळवण्याचा प्रवास करायचा आहे आणि आनंद प्राप्तीच्या मोहाने ‘99 Club’ चे मेंबर तर आपण होत नाही आहोत ना याचं भान राखायचं आहे.

Tuesday, 31 October 2023

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

-  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

            मुंबईदि. 31 : अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच खरेदीसाठी ११ हजार ८०० रुपयेअंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा हप्ता शासन भरणार असून अंगणवाडी सेविकांच्या अन्य मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            मंत्रालयात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कृती समितीची बैठक आज झाली. त्यावेळी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारीमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे एम.ए.पाटीलशुभा शमीमभगवान देशमुखसुवर्णा तळेकरसरिता मांडवकर उपस्थित होते.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीकेंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने झालेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी विविध घोषणा केल्या आहेत केंद्राच्या सूचना प्राप्त होताच त्याची राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येईल. यामध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच घेण्यासाठी ११ हजार ८०० रुपयेअंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा हप्ता शासन भरणार असून३००० अंगणवाडी सेविकांना लवकरच पदोन्नतीही मिळणार आहे. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीविषयक लाभ ही बाब धोरणात्मक असून त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हा विषय सादर करण्यात येईल. अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच तारखेच्या आत मानधन मिळावे आणि इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मंत्री कु. तटकरे यांनी कृती समितीला दिली.

******

मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया सुलभरित्या राबवावी

 मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची

प्रक्रिया सुलभरित्या राबवावी

- महसूल विभाग अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा

 

            मुंबईदि. 31 : मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी यांनी सुलभरित्या राबविण्याच्या सूचना महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी दिल्या.

            मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील प्रक्रिया राबविण्याबाबत छत्रपती संभाजीनगर विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी यांची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगेमहसूल विभागाचे उपसचिव संतोष गावडेछत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी श्री.देवरा म्हणाले कीमराठवाड्यातील निजामकालिन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला आहे. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या असून 13 हजार 498 जुन्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या कुणबी नोंदी तपासून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा कराव्यात. या कागदपत्रांचे भाषांतर करुन जतन करण्यासाठी डिजिटलायझेशन करुन पब्लिक डोमेनवर उपलब्ध करुन द्यावी. जात प्रमाणपत्र सुलभरित्या उपलब्ध करुन देण्यासाठीच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच उपलब्ध कागदपत्रे हे मोडी व ऊर्दू लिपी मध्ये असल्याने त्याचे भाषांतर करताना काळजीपूर्वक करण्याच्या सूचनाही श्री. देवरा यांनी यावेळी दिल्या.

            सचिव श्री. भांगे म्हणाले कीमराठा -कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला असून  जात प्रमाणपत्र वितरणाबाबतची कार्यवाही नियमावली तातडीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र वितरण कार्यवाही नियमाच्या आधारे मिशन मोडवर राबवावी, असेही त्यांनी सांगितले.

००००

Featured post

Lakshvedhi