Friday, 6 October 2023

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचे

 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचे


नाशिकला 6 व 7 ऑक्टोबर रोजी आयोजन

            मुंबई, दि. 5 : ग्रामीणस्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देशात सुमारे दीड लाखांहून अधिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या निर्देशानुसार पश्चिम विभागातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची (सीएचओ) दुसरी प्रादेशिक परिषद ६ आणि ७ ऑक्टोबर २०२३ असे दोन दिवस नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.


            केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेला सुरुवात होणार आहे.


            महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, दादरा-नगर हवेली, आणि दमण-दीव या सहभागी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे २०० समुदाय आरोग्य अधिकारी या परिषदेत सहभागी होणार आहेत. आतापर्यंत देशात एकूण १ लाख ६१ हजारांपेक्षा अधिक आरोग्य सेवा केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. प्रत्येक उपकेंद्रातील प्राथमिक आरोग्य पथकात एक महत्त्वाची भर म्हणून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. देशात सुमारे १ लाख ३० हजारांहून अधिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.


              या परिषदेला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी, आयुष मंत्रालयाचे अधिकारी, राज्य अधिकारी, राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ, आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राला मदत करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक, आयुष संचालक आदी उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठीकोल्हापूरातील मध्यवर्ती जागा निश्चित करावी

 आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठीकोल्हापूरातील मध्यवर्ती जागा निश्चित करावी


- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 5 :- कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान विषयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील किंवा शहरात मध्यवर्ती ठिकाणची अन्य जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्या उपस्थितीत उपकेंद्रासाठी जागेची पाहणी करावी. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार उपकेंद्रासाठी जागा अंतिम करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर येथील उपकेंद्रास जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकुलगुरू डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. एम. शिंदे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.   


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, कोल्हापूर येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रास जागा मिळाल्यास कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विविध आरोग्य अभ्यासक्रम सुरु करता येतील. आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कामासाठी वारंवार नाशिकला जाण्याची गरज राहणार नाही. यातून वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होईल. या पार्श्वभूमीवर आरोग्य विज्ञान विद्यापीठ उपकेंद्रासाठी आवश्यक असलेली तीन एकर जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी. आवश्यक असलेल्या जागेची पाहणी वैद्यकीय शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी संयुक्त करून जागा निश्चित करावी. ही जागा योग्य नसल्यास अन्य पर्यायी जागेची उपलब्धता करून द्यावी. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

गेंड्यासारखे प्राणी कोकणातील कातळशिल्पांवर कसे?

 गेंड्यासारखे प्राणी कोकणातील कातळशिल्पांवर कसे?



- "गेंडा व कोकण" हे कोडं सोडवायचं कसं?

कोकणातील कातळशिल्पांमध्ये अनेक प्राणी पक्षी दिसतात. गेंडा, पानघोडा हे त्यापैकी विशेष आणि आश्चर्यचकित करणारे. कारण हे प्राणी कोकणात, महाराष्ट्रात किंवा जवळपासच्या प्रदेशात सध्या आढळत नाहीत. मग ते कातळशिल्पांवर कसे? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण या प्राण्यांमुळे ही शिल्पे कोणत्या काळात खोदली गेली यावर प्रकाश पडतो.
गेंडा-पानघोडा हे प्राणी फार पूर्वी महाराष्ट्रात होते. पण हवामान बदलले तसे साधारणपणे वीसेक हजार वर्षांपूर्वी ते येथून नामशेष झाले. हा संदर्भ पाहिला तर कोकणातील कातळशिल्पांचा काळ नक्कीच २० हजार वर्षांपर्यंत मागे नेता येतो.

कातळशिल्पांना असे अनेक पैलू, कंगोरे आहेत. त्यामुळे ती तज्ञांसोबत पाहायला आणि समजून घ्यायला हवी.
ही संधी "भवताल" उपलब्ध करून देत आहे, १३ ते १५ ऑक्टोबर २०२३ या काळात.
त्यात जरूर सहभागी व्हा.

संपर्क:
9545350862 / 9922063621

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी:

- भवताल टीम

--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत कामे गतीने पूर्ण करावेतश्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा

 रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत

कामे गतीने पूर्ण करावेत

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. 5 : रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत श्रीवर्धनम्हसळातळामाणगावरोहा येथील विविध  विकास कामे  सुरू असून  यासाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद आहे.  ही कामे  विहित वेळेत प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

             श्रीवर्धन मतदार संघातील प्रादेशिक पर्यटन विकास कामांबाबत मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टमोडपर्यटन विभागाच्या सहसचिव उज्ज्वला दांडेकरउपवनसंरक्षक (रोहा) अप्पासाहेब निकतमुख्याधिकारी (म्हसळा) विठ्ठल राठोड आदी उपस्थित होते.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीसार्वजनिक बांधकाम विभागनगरपालिकारायगड पाटबंधारे विभागजिल्हा परिषदग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि पर्यटन संचालनालय यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रादेशिक पर्यटनाच्या विकास कामांना गती द्यावी.

            दिवेआगार येथे कासव संवर्धन प्रकल्प उभारणेपर्यटन मार्केट सुविधा तयार करणेतळा महादेव तलाव परिसराची पर्यटनदृष्ट्या सुधारणा करणेमोरबा येथील गाव तलावाचे सुशोभीकरण करणेरोहा नगरपरिषद हद्दीतील मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणेश्रीवर्धन समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर सुशोभीकरण करणेरोहा येथील ग्रामपंचायत पाटण - सई हद्दीतील कामेजोगेश्वरी मंदिर परिसर सुशोभीकरणमौजे नागोठाणे येथील सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुरातन निवासस्थान सुशोभीकरण,   रोहा नगरपरिषद हद्दीतील हनुमान टेकडी परिसर सुशोभीकरणतळघर येथील तलावाचे संवर्धन करणे  अशी रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत सन २०२१-२२ मधील श्रीवर्धनम्हसळातळामाणगावरोहा येथील विविध  ४४ कोटी ७९ लाख रुपयांची कामे प्राधान्याने पूर्ण करावेत.

            श्रीवर्धन शहरातील पर्यटक निवासी इमारतींचे नूतनीकरणतलाव कुंडाचे नूतनीकरण,म्हसळा येथील जानसई नदी सुशोभीकरण कामेश्रीवर्धन येथील मंदिर विकासाची कामेरोहा नगरपरिषद हद्दीतील शिवसृष्टी परिसर सुशोभीकरणरोहा येथे शिवसृष्टी शिल्प तयार करणेतळा येथील कुडा लेणी येथे पर्यटनाच्या मूलभूत सुविधा निर्माण करणे, अशी सन 2022 -23 मधील बारा कामे १२ कोटी ५१ लाखांची असून  सर्व यंत्रणांनी हे कामे गतीने पूर्ण करावेत, असेही निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

*****

कोल्हापूरच्या शेंडापार्क येथील आयटी पार्कसा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा

 कोल्हापूरच्या शेंडापार्क येथील आयटी पार्कसा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. ५ :- कोल्हापुरात संगणक, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे. शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठास त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी शहरालगतची ५० हेक्टर जागा द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोल्हापूरच्या शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (व्हीसीद्वारे), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा (व्हीसीद्वारे) आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, कोल्हापूरची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा वेग लक्षात घेता येथील विद्यार्थी, युवकांना स्थानिक परिसरात रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील शेंडा पार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा आयटी पार्क साठी उपलब्ध करुन द्यावी. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आयटी पार्कसाठी कृषी विद्यापीठाची मोकळी ३० हेक्टर जागा देताना, विद्यापीठाला पर्यायी ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. शहरातील या क्षेत्रापासून विमानतळ आणि पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुण्यानंतर कोल्हापूर हा चांगला पर्याय आहे. आयटी पार्कची उभारणी निश्चित कालमर्यादेत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोल्हापूर शहरात असलेले शासकीय आयटीपार्क पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी येथे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन*

 *दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी येथे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन*


परळी( प्रतिनिधी) दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी येथे 7 व 8 ऑक्टोबर रोजी बीड जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 


      दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर क्रिडा तसेच इतर सर्वांगिण विकासाचे माहेरघरच. दरवर्षी तालुका/ जिल्हास्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन शाळेमध्ये केले जाते. विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनात दि.7 व 8 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 


जिल्हास्तरीय बास्केटबॅाल स्पर्धेत विविध तालूक्यातून ३९ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धा आयोजित करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कुल मध्ये उपलब्ध आहेत. यामुळे जिल्हाक्रीडा यावर्षीच्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी शाळेला प्राप्त झालेली आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठीची सर्व तयारी जिल्हा क्रीडा अधिकारी देशमुख मॅडम, परळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कनाके सर, दिल्ली वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य विठ्ठल तुपे सर, क्रीडा शिक्षक संजय देशमुख सर आदि करत आहेत. 


बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 7 ऑक्टोबर 2023 ते 8 ऑक्टोबर २०२३ वार शनिवार, रविवार या दिवशी करण्यात आले आहे. परळी परिसरातील जास्तीत जास्त शाळांनी व क्रीडा प्रेमींनी जिल्हास्तरिय स्पर्धांचा आनंद व लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले 

आहे.


भावंडामध्ये असलेले प्रेम शेवटपर्यंत टिकवता आले तर ते जीवन किती आनंदमय असेल याची कल्पना जरी केली तरी आतुन

 भावंडामध्ये असलेले प्रेम शेवटपर्यंत टिकवता आले तर ते जीवन किती आनंदमय असेल याची कल्पना जरी केली तरी आतुन आनंद आणि समाधान उसळी मारते. ज्यांना हे प्रत्येक्षात उतरवता आले ती भावंडे आणि त्यांना जन्म देणारे आईवडील खरोखरच भाग्यवान आहेत.

पोटचे आले की पाठच्याचा विसर पडतो आणि ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांची परवड सुरू होते.असे चित्र सर्रास पहायला मिळत आहे, याचे कारण आपली कुटुंब व्यवस्था पूर्ण कोलमडून गेली आहे, संवाद संपला आहे.

आपले दुःख व्यक्त करायला जवळचे कोणीच नाही, असा भाव तयार होऊ लागला आहे. यामुळे माणूस एकलकोंडा होऊन मनोरूग्ण बनू लागला आहे,

याचा शेवट आनंद हरवून फक्त नैराश्य उरले आहे. आणि

मी काय मिळविले? याचे उत्तर शून्य आहे. हे शून्य मोठे असले काय आणि छोटे असले काय त्याचे मुल्य समान आहे. आपण जसा कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, तसा भावंडांनाही वेळ दिला पाहिजे.

: स्वतःला प्रश्न विचारून पहा.

कोणतेही काम नसताना आपण आपल्या बहिणीकडे किंवा भावाकडे सहज भेटायला किती वर्षे गेलो नाही. मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही.

खाऊच्या एका घासासाठी पाठीत धपाटा मारणारी मोठी बहीण, चिमटा काढून पळून जाणारी धाकटी बहीण आपण बाहेरून आलो तर काहीतरी आणले असेल म्हणून खिशाकडे हाताकडे पाहणारा धाकटा भाऊ, आजही तसेच आहेत फक्त आपला भाव आणि स्वभाव बदलला.

वय कितीही होऊ द्यात.

👉थोरल्याने अधिकार गाजवलाच पाहिजे

👉आणि धाकट्याने हट्ट केलाच पाहिजे.

आपण जेथे असू तेथे आपली भूमिका आपल्याला पार पाडता आली पाहिजे.

हे शक्य आहे त्यासाठी वर्षातून किमान एकवेळ पूर्ण एक दिवस सर्व भावंडांनी एकमेकासाठी द्या.त्यादिवशी आपले आईवडील आणि आपली भावंडे मिळून एक दिवस एकत्र येऊन, एक दिवसाची सहल आयोजित करा, कुवत असेल त्याने सर्व खर्च करा, कुवत

नसेल तर तो एक दिवस सुट्टी घेऊन फक्त सर्व

भावंडे आईवडीलांसोबत रहा आणि अनुभव

घेऊन पहा. 

हा अनुभव आईवडील व

भावंडांच्या चेहऱ्यावरील समाधान शब्दात व्यक्त न करता येणारा आहे,

🙏🌹

Featured post

Lakshvedhi