Monday, 25 September 2023

घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का* ?"

 *घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का* ?" 


हे आवश्य वाचा ****


कोणत्याही देवाच्या आरती नंतर एका सुरात व धावत्या चालीत

 *ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे*. 

सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.


*आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया* 

व त्याचा अर्थ समजावून घेऊ.

 ही 

*प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे*.


*वैशिष्ट्ये* :

(१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे 

*रचयिता  वेगवेगळे* आहेत.

(२) ही चारही कडवी 

*वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली* आहेत.

(३) पहिले कडवे 

*मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत* 

भाषेत आहेत.

(४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. 

पण ही 

*सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली* जाते.

(५) यातील एकही कडवे *गणपतीला उद्देशून* नाही.

(६) वेगवेगळ्या कवींची व *वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून*

 ही प्रार्थना बनवली गेली आहे.


आता आपण प्रत्येक कडवे *अर्थासह* पाहूया

१) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे | 

प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन | 

भावे ओवाळीन म्हणे नामा |

*वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे*

अर्थ...

विठ्ठलाला उद्देशुन 

*संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन*. 

माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर 

*तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन*.


२) त्वमेव माता च पिता त्वमेव | 

त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव | 

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव | 

त्वमेव सर्व मम देव देव |

*हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे*. *ते संस्कृत मध्ये आहे*.

 हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.

अर्थ.. 

*तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस*.


(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा | 

बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात | करोमि यद्येत सकल परस्मै |

नारायणापि समर्पयामि ||

*हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे*.

 ते व्यासांनी लिहिलेले आहे.

अर्थ… 

*श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित* 

करीत आहे.


(४) अच्युतम केशवम रामनारायणं | 

कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी | 

श्रीधर माधवं गोपिकावल्लभं | 

जानकी नायक रामचंद्र भजे ||


*वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे*. 

म्हणजेच आठव्या शतकातील आहे.

अर्थ… 

मी *भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या  रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला*.


हरे राम हरे राम | 

राम राम हरे हरे | 

हरे कृष्ण हरे कृष्ण | 

कृष्ण कृष्ण हरे हरे |

*हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरणं' या उपनिषदातील आहे*. 

*कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे*.


*अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे*. 

तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. 

रचना कोणाची असो 

*हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो*.


अर्थ समजून म्हटले तर आरती मध्ये भाव येतात...

🙏🙏🙏🙏🙏 

राम कृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया.

कीर्ती आणि मूल्य चेअत्यूच्य शिखर गाठले कसे?🙏


 Thursday, September 21, 2023

कीर्ती आणि मूल्य

आजच व्हॉटसअप वरती एक पोस्ट वाचनात आली. इस्राएल चा चोवीस वर्षीय युवा गिर्यारोहक नदाव बन येहूदा ह्याने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट अर्थात सागरमाथा सर करायला फक्त तीनशे मीटर बाकी राहीले असताना देखील शिखर सर करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि तरीही आज जगात ही बातमी वाचलेल्या सर्वांच्या कौतुकाचा विषय तो बनून राहिला असेल हे नि:संशय.




कारण नदाव ने दुसऱ्या एका गिर्यारोहकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक विक्रम, कीर्ती, उपलब्धि ह्या गोष्टीना दुय्यम स्थान देत मूल्य आणि मूल्य संस्कार ह्याना श्रेष्ठ मानत "योग्य" गोष्ट केली


त्याच्याच शब्दात सांगायचे तर "एव्हरेस्ट वरील माझ्या चढाई च्या मार्गात मला दोन मृतदेह दिसले की जे गिर्यारोहक नुकतेच मृत झाले असावेत. मी ज्या दोराच्या आधाराने चढत होतो त्यालाच ते लटकलेले होते. अंगातील त्राण संपल्यामुळे आहे तिथेच स्वतःला anchor करून ते तिथे थांबले आणि कदाचित कोमात जाऊन मृत झाले. त्यांना पार करून सर्व पुढे जात होते. आणि नंतर मला तो दिसला - तुर्कस्तानचा आयदिन इरमाक. आम्ही खाली कॅम्प मध्ये भेटलो होतो आणि आता तो हेल्मेट नाही, ऑक्सिजन मास्क नाही, ग्लोव्हज नाहीत अशा परिस्थितीत शेवट होण्याची वाट पहात होता. इतर काही गिर्यारोहक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. मात्र मी दुर्लक्ष करू शकलो नाही, आणि मी वैयक्तिक विक्रम आणि दुसऱ्या एका मनुष्याचे प्राण ह्यात दुसऱ्या गोष्टीची निवड केली."




नदावने हा निर्णय घेतला खरा; पण तो अमलात आणणे हे तितकेच कठीण काम होते. बेशुद्ध पडलेल्या आयदिन ला उचलून खाली आणणे कर्मकठीण होते कारण त्याचे आणि स्वत:चे दोघांचे ओझे सांभाळत उतरायचे होते. आयदिन बेशुद्ध असल्यामुळे जास्त भारी वजनाचा भासत होता. अधून मधून त्याला शुद्ध यायची पण त्यात तो वेदना असह्य होऊन ओरडायचा. अशा परिस्थितीत खाली येताना नदाव चा स्वतः चा ऑक्सिजन मास्क फाटला. ग्लोव्हज काढावे लागले. त्यामुळे त्याला स्वतः ला बोटाना हिमदंश झाला. वाटेत त्याला अजून एक मलेशियन गिर्यारोहक भेटला की जो सुद्धा मरण्याच्या मार्गावर होता. वर जाणाऱ्या काही climbers कडून नदाव ने त्या दोन अत्यवस्थ climbers साठी ऑक्सिजन सिलिंडर मिळवली आणि नऊ तासांच्या भगीरथ यत्नानंतर त्या दोघांना घेऊन कॅम्प पर्यंत पोचण्यात तो यशस्वी झाला. तेथून हेलिकॉप्टरने त्यांना काठमांडू येथे नेऊन इस्पितळात दाखल केले आणि उपचार सुरू झाले. दोन जीव वाचवण्यात नदाव यशस्वी झाला.




जीवनात काही असे परीक्षेचे क्षण येतात जिथे तुम्ही कशा प्रकारचे मनुष्य आहात, तुमची मूल्य व्यवस्था कशी आहे आणि त्या मूल्यांसाठी तुम्ही किती मोठा त्याग करू शकता वा किंमत देऊ शकता हे स्वतः शीच नक्की करावं लागतं. अशा परीक्षेच्या क्षणी नदाव ने, एव्हरेस्ट सर्वकरणारा सर्वात कमी वयाचा इस्रायली गिर्यारोहक ह्या सन्मान व कीर्तीचा त्याग करत मानवतेच्या सर्वोच्च मूल्याला प्राथमिकता दिली आणि जगासाठी एक धडा दिला. गिर्यारोहणाच्या धाडसी खेळातील अत्युच्च मूल्य ओळखून त्याप्रमाणे वागत एक अनोखे धैर्य दाखवले. 




एकीकडे मानसन्मान, वैयक्तिक महत्वाकांक्षेची पूर्तता, सर्वोच्च शिखर सर करण्याची वैयक्तिक स्वप्नपूर्ती हे सारे आणि दुसरीकडे दुसऱ्या मनुष्याचा जीव वाचवण्याचा अशक्यप्राय प्रयत्न ज्यात वरील मानसन्मान, कीर्ती, स्वप्नपूर्ती, महत्त्वाकांक्षा पूर्ती ह्या गोष्टींच्या त्यागावरोबरच एक अजून भयंकर शक्यता होती आणि ती म्हणजे स्वतः चा जीव गमावण्याची. पण नदाव नियतीने पुढे वाढून ठेवलेल्या अती कठीण परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि with flying colors he passed.




आज भले नदावला सागरमाथा सर करता आला असेल. भविष्यात तो हे लक्ष्य गाठेल किंवा नाही गाठू शकणार. मात्र तो कायम स्वतः ला ताठ मानेने आरशात बघू शकेल, त्याच्या कुटुंबीयांना, मित्रांना डोळ्याला डोळा भिडवून भेटू शकेल आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे जे अलौकिक समाधान आहे ते कायम त्याच्या उराशी असेल.




आज सागरमाथा सर न करता सुद्धा, नदाव बन येहुदा सर्व जगातील लोकांच्या मनात सर्वोच्च शिखरावर विराजमान झाला असेल ह्यात शंका नाही

Sunday, 24 September 2023

शेअर by मृणाल फिल्से, महाड

 



गणेश पूजनादरम्यान वापरल्या जाणाऱ्या २१ प्रकारच्या पानाबद्दल काय म्हणते आयुर्वेद? ◆

 गणेश पूजनादरम्यान वापरल्या जाणाऱ्या २१ प्रकारच्या पानाबद्दल काय म्हणते आयुर्वेद?


◆अगस्ती(हादगा)

प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व 'अ' हे दृष्टीला पोषक असते. अ जीवनसत्त्वाचे वनस्पतिज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात, म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.


◆अर्जुन

अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. 'अर्जुनारिष्ट' हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणाऱ्या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात, अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.


◆आघाडा

आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर, विशेष उपयुक्त असे आहेत.


◆कण्हेर

कण्हेर हिचा उपयोग तारतम्याने करतात, कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.


◆केवडा

केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.


◆जातिपत्र

जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.


◆डाळिंब

चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे; विशेषत टेपवर्मचा (चपटय़ा कृमीं) त्रास याने नाहीसा होतो.


◆डोरली

डोरलीसारखे रूप असणाऱ्या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.


◆तुळस

तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.


◆दूर्वा

गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.


◆देवदार

चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेसुद्धा म्हटले जाते.


◆धोत्रा

धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.


◆पिंपळ

पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे; ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.


◆बेल

बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी.


 ◆बोर

बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.


◆मरवा

मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणाऱ्या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणाऱ्या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असे आयुर्वेद म्हणतो.


◆मधुमालती

मधुमालती म्हणजे मालती ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.


◆माका

भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म'. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.


◆रुई

अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.


◆विष्णूक्रान्ता

विष्णूक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.


◆शमी

शमी हा शब्द 'शमयति रोगान् इति' म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे.


     संकलन: नितीन जाधव  स्रोत:- आयुर्वेदम्

        !!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!

-----------------

*ज्ञान ,मनोरंजन, माहिती, यासारख्या update मिळविण्यासाठी join करा..*

*सहेली.. शब्द प्रांगण Whatsapp group 3*


https://chat.whatsapp.com/EuwJswnmmQz0ViF1KrByT7

*किंवा* 

*सहेली.. शब्द प्रांगण Whatsapp Group 2:*


https://chat.whatsapp.com/KDdHQJXdx4H7wK41nRyUDM


*किंवा*

*सहेली.. शब्द प्रांगण*

*WhatsApp Group 1*:

https://chat.whatsapp.com/I7EOMYxcLeg9V5EOqzNR54

नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

 नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

 



 दहा हजार घरांचे नुकसान

 घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य भिजले 

 

 नागपूर दि. 24 : नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी  नागरिकांना मदत करण्यात येईलतसेच नुकसानीसंदर्भात पंचनाम्याला दुपारी सुरुवात करून तत्काळ मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

     शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चार तासात जोरदार पावसामुळे अंबाझरी परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे अन्नधान्यासह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी श्री. फडणवीस यांनी केली. डागा लेआउटकार्पोरेशन कॉलनी, शंकर नगरसह इतर वस्त्यांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली.

झालेल्या नुकसानीसंदर्भात नागरिकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले असून या नुकसानीसंदर्भात नागरिकांना संपूर्ण मदत करण्यात येईल. जास्तीत जास्त मदत करण्याची ग्वाही यावेळी श्री. फडणवीस यांनी दिली.

    नाग नदीला आलेल्या पुराची तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनेची संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी घेतली. एका तासात 109 मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नदीचे पात्र  कमी पडल्यामुळे इतर वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यापुढे अशी घटना घडणार नाही, याची दखल घेण्यात आली असून पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाहीयादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. भविष्यात अशा घटना टाळण्यात येतील, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

    पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे  सर्वत्र चिखल साचला आहे. तसेच घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री  
श्री. फडणवीस यांनी दिले.

 

 उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सकाळी अंबाझरी तलावनाग नदी तसेच कार्पोरेशन कॉलनी, डागा लेआउट, शंकर नगर आदी सर्व भागांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी माजी महापौर संदीप जोशी, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला उपमुख्यमंत्री पवार यांची भेट

 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला उपमुख्यमंत्री पवार यांची भेट


 


पुणे, दि. 24: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केली.


 


यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय चौबे, सुनील नहार आदी उपस्थित होते.


 


श्री.पवार यांनी सदनिकातील सुविधा, सौर उर्जेची व्यवस्था, सुरक्षा, देखभाल आणि स्वच्छता, परिसरातील वृक्षारोपण, जलपुनर्भरण आदीविषयी माहिती घेतली. परिसरात स्वच्छता राखावी, प्रकल्पातील विविध सेवांसाठी स्थानिकांना संधी द्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.


 


श्री.पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन झोपडीधारकांना सदनिकांचे हस्तांतरण केले. इमारतीत चांगल्या सुविधा देण्यात आल्या असून त्याचा वापर नीटनेटका करावा, घरासोबत इमारतही स्वच्छ व सुंदर राहील, असा सर्वांनी प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. मेट्रो सुविधा निगडीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.


 


महानगरपालिका आयुक्त श्री.सिंह यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.


 


श्री मोरया गोसावी समाधी मंदिराला भेट


उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी श्री मोरया गोसावी समाधी मंदिराला भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले आणि

श्री गणेशाची आरती केली. त्यांनी पिंपरी चिंचवड येथील विविध गणेश मंडळांना भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले.


 

गणपतीनंतर काय, गूढ कातळशिल्प की प्राचीन जलव्यवस्था?

 



गणपतीनंतर काय,

गूढ कातळशिल्प की प्राचीन जलव्यवस्था?


गणेशोत्सवानंतर बाहेर पडून काही तरी आगळं-वेगळं अनुभवायचंय? मग ठरवा काय पाहायचंय, गूढ कातळशिल्प की पाण्याच्या ऐतिहासिक व्यवस्था?

"भवताल" ने या दोन अनोख्या इकोटूर आखल्या आहेत. एक पुणे-सातारा परिसरातील प्राचीन जलव्यवस्थांचा अनुभव देणारी, तर दुसरी कोकणातील कातळशिल्पांच्या गूढ विश्वात नेणारी! अर्थातच, हे सारं चांगल्या पद्धतीने उलगडून दाखवणाऱ्या तज्ज्ञांसोबत...


ऐतिहासिक जलव्यवस्था:

३० सप्टेंबर - १ ऑक्टोबर २०२३ (शनिवार - रविवार)


लिंक:

https://bhavatal.com/Ecotour/Watersystems2

........


कातळशिल्पांच्या गूढविश्वात :

१३ ते १५ ऑक्टोबर २०२३ (शुक्रवार - शनिवार - रविवार)


लिंक:

https://bhavatal.com/Ecotour/Katalshilp


संपर्क:

9545350862 / 992

2063621


- भवताल टीम

Featured post

Lakshvedhi