सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 23 September 2023
आपल्या घरातील गणपतीवर विश्वास ठेवा*
*आपल्या घरातील गणपतीवर विश्वास ठेवा*
'घरातल्या आणि घरी आणून पूजलेल्या गणपतीला कमी लेखून दुसरे "राजे" पुजायला जाऊ नका.
वाचा आणि सहमत असाल तर अंमलात आणा.
घरात गणपतीची मूर्ती किंवा तसबीर नाही असं आस्तिकाचं एकही घर सापडायचं नाही. पण गणपती जवळ आले की त्या घरातल्या मूर्तीवरचा विश्वास उडतो का काय होतं माहित नाही. पण घरातली मंडळी पहाटे उठून, वशिले लावून, व्हीआयपी दर्शनासाठी पैसे मोजून वगैरे xxxचा राजा, तमुक बादशहा, अमुक सम्राट गणपतीच्या दर्शनाला जातात. का तर म्हणे तो जागरूक आहे.
घरातला गणपती जागरूक नाही.....???
अहो, गणपती म्हणजे देव एकच असतो. जागरूक, निद्रिस्त वगैरे प्रकार का मानता तुम्ही......???
तो एकच आहे. तुमची श्रद्धाही एक असू द्या. जागरूक म्हणून स्पेशल श्रद्धा, घरातला निद्रिस्त म्हणून त्यावरची श्रद्धा गुंडाळायची असं करू नका.
बहुसंख्य मंडळी घरात चांगली मूर्ती आणतात, मनोभावे पूजाअर्चा, आरत्या, नैवेद्य सगळं करतात.
पण
तिथे xxxxच्या राजाच्या माजलेल्या कार्यकर्त्यांकडून डोकं आपटून, त्यांचे धक्के खायला आणि अपमान करून घ्यायला का जातात कळत नाही. तो समोरचा वीस फुटी राजा जागरूक असता तर पहिल्यांदा त्याने त्या माजोरी कार्यकर्त्यांना वठणीवर आणलं असतं.
हे कार्यकर्ते का कोण ते बायकांना ढकलून देतात, पाया पडू देत नाहीत, पुढे चला पुढे चला असं भिकाऱ्यांना हाकलल्यासारखं भक्तांना हाकलतात. तरी लोक तिथे का जातात हा खरच संशोधनाचा विषय आहे.
तुमच्या घरचा गणपती कमी जागरूक समजू नका. त्यावर श्रद्धा ठेवा. पावायचा तर तोही पावेल. उगाच राजाच्या मंडपातली गर्दी, आणि तिथल्या कार्यकर्त्यांचा माज वाढवू नका.
शांतपणे हे सारे मुद्दे लक्षात घ्या. विचार करा.
अहो गणपतीचं आपल्या घरी येतो, मग आपण का जायचे बाहेर.
आमच्या घरचा गणपती बाप्पा आम्हाला पावतो. आमचा विश्वास आहे घरच्या गणपतीवर.
आपल्या घराच्याच गणपतीवर विश्वास ठेऊन,मनोभावे दर्शन घ्यायचे. बघा पावतो का नाहीं. त्याच्यावर अविश्वास दाखवला तर तो कसा पावेल हो.
आवडलं म्हणून पाठवलं ☺️,
Friday, 22 September 2023
जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता
जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता
दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन शासन निर्णय निर्गमित
मुंबई, दि. २२ : राज्यात चालू वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या पीक पाहणी आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारा टंचाईवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दुष्काळी परिस्थितीत जलाशयाखालील आणि तलावाखालील जमिनीचा विनियोग फक्त चारा पिके घेण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
जलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या जलाशयातील जलसंचय बाष्पीभवनामुळे कमी झाल्याने, बुडित क्षेत्रातील जमिनी मोकळ्या/उघड्या होणार आहेत. या जमिनीमधील ओलावा आणि अत्यावश्यक परिस्थितीत जलाशयाद्वारे उपलब्ध होणारी सिंचन व्यवस्था विचारात घेऊन अशा जमिनीवर मोठ्या प्रमाणात चारा पिकांची पेरणी करून चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्य आहे. यास्तव जलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील मोठे प्रकल्प, / मध्यम प्रकल्प / लघु प्रकल्पांच्या जलाशयातील गाळपेरा जमीन फक्त चारा पिकांच्या लागवडीखाली आणण्यासाठी गाळपेरा जमिनीचे वाटप कार्यपद्धतीचे अवलंबन करून ही जमीन फक्त चारा पिकांसाठी वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
गाळपेर जमिनीवर चारा उत्पादन घेऊन चारा टंचाई निवारणाकरिता समिती गठित
गाळपेर जमिनीवर चारा उत्पादन घेऊन चारा टंचाई निवारणाकरिता लाभार्थी निवड, समन्वय आणि सनियंत्रणासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंचन अधीक्षक अभियंता, मृद व जलसंधारण कार्यकारी अभियंता, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे या समितीचे सदस्य, तर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असतील.
राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने काही वेळेस टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते. कमी झालेले पर्जन्यमान अथवा भविष्यात पुरेसा पाऊस न झाल्यास जमिनीत असलेली ओल कालौघात कमी होईल, यास्तव आगामी काळात उद्भवणाऱ्या चारा टंचाईच्या स्थितीवर मात करण्यासाठी व उपलब्ध ओलीचा फायदा घेण्यासाठी चारा पिकांची लागवड करण्याची हीच योग्य वेळ आहे. मूरघास हा चारा प्रकार इतर चाऱ्यांपेक्षा जास्त पौष्टिक असून, मूरघासाच्या वापरामुळे पशुंची उत्पादन क्षमता व प्रजनन क्षमतेत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय मुरघासाची हवाबंद स्थितीत साठवणूक केल्यास त्याचा वापर दीर्घ काळासाठी होतो व दीर्घ काळानंतरही हिरवा चारा उपलब्ध झाल्यामुळे दूध उत्पादनावर फारसा परिणाम न होता चारा टंचाईवर प्रभावीरित्या मात करणे शक्य होईल यास्तव वाटप करण्यात येणाऱ्या गाळाच्या जमिनीत मका व ज्वारी यासारख्या मूरघासासाठी उपयुक्त असलेल्या चारा पिकांची लागवड करण्यात यावी.
चारा बियाणे वाटपासाठी केंद्र/राज्य शासनाच्या योजनांद्वारे उपलब्ध होणारा निधी तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वैरण व पशुखाद्य कार्यक्रम शेतकऱ्याच्या शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी बियाणे वाटप या योजनेअंतर्गत मका व ज्वारी या वैरण पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील. भविष्यात टंचाईसदृश्य काळात चारा टंचाई उदभवू नये यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांनी जलस्त्रोतांचे व चारा निर्मिती स्रोतांचे मॅपिंग करुन तंत्रशुध्द पध्दतीने चारा उत्पादनाचे नियोजन करण्यात यावे. तसेच, जिल्हानिहाय / प्रकल्पनिहाय उपलब्ध गाळपेर क्षेत्र, चारा पिकाखाली घेण्यात आलेले क्षेत्र, चाऱ्याचे होणारे अंदाजित उत्पन्न याची आकडेवारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी पशुसंवर्धन आयुक्तांना द्यावी, असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई - सेंट पीटर्सबर्ग सिस्टर सिटी संदर्भातीलसामंजस्य करारामुळे उभय देशातील मैत्रीसंबंध दृढ होणार
मुंबई - सेंट पीटर्सबर्ग सिस्टर सिटी संदर्भातीलसामंजस्य करारामुळे उभय देशातील मैत्रीसंबंध दृढ होणार
- अध्यक्ष राहुल नार्वेकर
मुंबई, दि. २२ : भारत - रशियामध्ये राजकीय आणि वैचारिक नाते आहे. याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या शहराला सिस्टर सिटीची परंपरा लाभली आहे. या सिस्टर सिटी संदर्भात भविष्यात होणाऱ्या सामंजस्य करारामुळे रशिया आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील असे, विधानसभेचे अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
विधिमंडळात रशियाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. मुंबई-सेंट पीटर्सबर्गमधील प्रस्तावित सामंजस्य करारासंदर्भात विचार विनिमय या भेटीदरम्यान करण्यात आला.
अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले की, मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या दोन्ही शहरांना सिस्टर सिटीची ५५ वर्षाची परंपरा आहे. या सिस्टर सिटी संदर्भातील सामंजस्य करारामुळे दोन्ही शहरांसह देशांतील नागरी, कृषी, व्यापार संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी सहकार्य लाभणार आहे. रशिया भारताचा जुना मित्र देश असून, संसदीय, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पद्धतीच्या देवाणघेवाणीमुळे उभय शहरासह देशांमध्येही नाते वृद्धिंगत होणार आहे. करारावर चर्चा करण्यासाठी भारतास भेट दिल्याबद्दल अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी यावेळी शिष्टमंडळाचे आभार मानले.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, उभय देशांत वैचारिक, राजकीय संवाद आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशियासोबत मैत्रिपूर्ण संबंध अधिक दृढ केले आहेत. भविष्यातही व्यापार, तंत्रज्ञान, शाश्वत विकास, कृषी क्षेत्रातील संशोधन, राजकारण, साहित्य यासंदर्भात विचारांची देवाण-घेवाण करून प्रगतीसाठी संयुक्तिकरित्या प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उभय देशाच्या प्रगतीसाठी रशियाने संसदीय कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी भारत भेट दिली याचा आनंद झाला असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
सेंट पीटर्सबर्ग विधानसभेचे अध्यक्ष अलेक्झांडर बेलस्की यांनी मुंबई शहराच्या संस्कृती, पर्यटन, पायाभूत सुविधा, दळणवळण, पाणीपुरवठा, चित्रपटसृष्टी व्यवस्थानाबाबत कौतुक केले. तरूणांना शिक्षणासाठी पिटर्सबर्ग येथे पाठविल्यास आम्ही शैक्षणिक सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विधिमंडळाचे आमदार रईस शेख, अमिन पटेल, सचिव जितेंद्र भोळे यांच्यासह सेंट पीटर्सबर्ग विधानसभेच्या युनायटेड रशिया पक्षाच्या प्रमुख पावेल कुरपिंक, सेंट पीटर्सबर्गच्या विधानसभेच्या संपादकीय कमिटीचे उपाध्यक्ष ओलेगा मीयुता, सेंट पीटर्सबर्गच्या विधानसभेच्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्यक्ष श्रीमती आखो दोवा नर्गिस, रशियन फेडरेशन संघाचे महावाणिज्यदूत एच. इ. आलसकी सुरोस्तव, मुंबई रशियन हाऊसचे उप-वाणिज्य दूत तथा संचालक डॉ. एलिना रेमजोव्हा, रशियन फेडरेशनच्या वाणिज्यदूत जोरजी डेरे इर, वाणिज्यदूत येलेक्सी कलगीन, मुंबईच्या रशियन फेडरेशनचे उपवाणिज्यदूत ॲलेक्स क्री सिलिनिकोव यावेळी उपस्थित होते.
या शिष्टमंडळाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला भेट दिली आणि कामकाजासंदर्भात माहिती जाणून घेतली.
०००
श्रद्धा
मेश्राम/स.सं
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...






