Friday, 25 August 2023

चांदोबा चांदोबा भागळास का, इस्त्रो chya याणातून येशील का

 🧡🌕🤍


आज सारा देश शांतपणे समाधानाने झोपणार आहे. मुलीच्या लग्नात तिची पाठवणी केल्यावर दिवसभराच्या शिणवट्यातून थकलेला बाप जसा कृतार्थ भावनेतून झोपतो किंवा इंडिया - पाकिस्तानच्या सामन्यात त्यांना हरवल्यावर जल्लोष करून भागलेले जीव जसे निवांत पहुडतात तशी झोप आज लागणार आहे..


का? का वाटत असावं असं.? अब्जाधीश व्यावसायिकांपासून खेड्यापाड्यात राहणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्याला सुद्धा चांद्रयान ३ च लँडिंग बघावस वाटलं अस काय होत त्यात.??

ऑर्बिटर, रोव्हर, लँडर ह्यातला फरक पण न कळणारे ह्या यशासाठी देव पाण्यात घालून बसले होते..!! का.?


कारण स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवसापासून ह्या देशाने केवळ आणि केवळ संघर्ष पाहिला आहे. स्वातंत्र्य मिळालं त्या आधी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की "ह्या अर्धशिक्षित, गरीब..लोकांना स्वातंत्र्य दिले तर काही वर्षातच अराजक निर्माण होईल आणि हा देश गुंड मवाल्यांच्या ताब्यात जाऊन साऱ्यांची दुर्दशा होईल." 


चर्चिल चुकीचा नव्हता..! फुटीरतावादी संस्थांनांचे विलीनीकरण, सर्वांना एका धाग्यात बांधू शकेल अशा संविधानाची निर्मिती, फाळणीतल्या विस्थापितांचे पुनर्वसन, भाषावार प्रांतरचना....ह्या एकेका प्रश्नाची व्याप्ती इतकी होती की देशाच्या पहिल्या काही पिढ्या त्यातच खर्ची पडल्या


फाळणीमुळे सुपीक प्रदेश पाकिस्तानात गेला होता, तर दुसऱ्या महायुध्दात जनता इतकी भरडली गेली होती की सगळी अर्थव्यवस्थाच जेरीस आली होती. त्यात अमेरिका - रशियाच्या शीतयुद्धात कोण्या एकाची बाजू घेतली असती तर स्वावलंबी राष्ट्र बनण्याच्या स्वप्नांना तिथेच सुरुंग लागून देश महासत्तांचे हातचे बाहुले झाला असता त्यामुळे देशाने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.


तेव्हा संपूर्ण जगासाठी भारत एक चेष्टेचा विषय होता. 

१९६२ च्या दुष्काळात अमेरिकेकडे गहू मागितला तर जनावरांना खायला घातला जाईल असा नित्कृष्ट दर्जाचा गहू त्यांनी पाठवून भुकेल्या भारतीयांची चेष्टा केली होती. 

चीनसोबत झालेल्या युद्धात पुरेशा शस्त्र - साधनाअभावी कडाक्याच्या थंडीत भारतीय सैन्य धारातीर्थी पडल होत. अवकाश मोहीम काढायची तरी रशियाची मदत घ्यावी लागे. कित्येक वर्षे ऑलिंपिकमध्ये पदकांचा दुष्काळ होता. मुठभर ७ - ८ देश जो क्रिकेटचा खेळ खेळतात त्यात विश्वविजेते म्हणवून घेताना आपल्यालाच कुठेतरी पटत नव्हत. कारगिलच्या युद्धात बोफोर्स तोफा ३ - ३ दिवस खोळंबून होत्या कारण देशाची स्वत:ची GPS सिस्टीम नव्हती आणि जी होती ती अमेरिकेच्या नियंत्रणाखाली...!!!


पण ह्या देशाच्या मातीत एक गुण आहे. कित्येक संकटे आली तरी पुन्हा शून्यातून उभ रहायचं. देश लढत राहिला. 

ज्या देशात एखाद्या राज्याला त्याच्या शेजारच्या राज्याची भाषा समजत नाही त्या देशात दोघांना एकत्र ठेवणार एक आदर्श संविधान लिहिलं गेलं. जिथे गहू मागायची वेळ आली होती तिथे हरित क्रांती होऊन देश गहू निर्यात करू लागला. शेजारच शत्रूराष्ट्र आम्हाला कमकुवत समजत असताना त्याला ९०००० सैन्यासह शरणागती पत्करायला लावली. 

पाश्चिमात्य देशांनी सुपर कॉम्प्युटर द्यायला नकार दिला तर स्वतः आमच्या तंत्रज्ञांनी परम कॉम्प्युटर घडवला. 


आणि आता ज्या मित्रराष्ट्राची अंतराळ मोहीम अपयशी होताना दिसली होती त्याच्याच समोर आपण अनुभव कमी असताना यशस्वी होताना दिसत आहोत हे यश खूप बोलके आहे. इंटरस्टेलर सारख्या साय - फाय सिनेमाच्या बजेटपेक्षा कमी बजेट मध्ये ही मोहीम आखण्यात आली होती.


चार वर्षांपूर्वी डॉ.सिवन रडले तेव्हा सगळा देश हळहळला होता. कारण त्यांच्या अश्रुंच्या मागे मोठा इतिहास आहे.

आज उदयोन्मुख महासत्ता असताना सुद्धा हा खर्च वारंवार परवडणारा नाही. त्यामुळे अपयश म्हणजे काय ह्याचा अर्थ त्यांना माहीत होता. त्यांचं यश - अपयश प्रत्येकाला आपलस वाटल कारण फक्त पैसाच नाही तर आपल्या गेल्या कित्येक पिढ्या हा दिवस बघायला खर्ची पडल्या आहेत ह्याची जाणीव सगळ्यांना आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच पृथ्वीची क्षितिजे पार करत एका दुसऱ्या भौगोलिक रचनेवर भारताची मोहोर उमटली जात आहे. हा प्रसंगच अभूतपूर्व आहे.


आज इस्रोचा तो प्रवास आठवतोय. 

दुसरी कोणतीच सोय नसल्याने सायकल, बैलगाडी वर लादलेले स्पेअर पार्टस, एका चर्चच्या आवारात सुरू केलेलं प्रक्षेपण केंद्र, बिशपच्या घरातच मांडलेल वर्कशॉप, हे घडवण्यासाठी परदेशातील मोठ्या पगाराच्या नोकऱ्या नाकारून भारतातच थांबलेले वेडे देशभक्त संशोधक, विन्स्टन चर्चिलच भाषण, पाश्चिमात्य कार्टूनिस्टनी इस्रोची उडवलेली खिल्ली, चांद्रयान २ च्या वेळेस पाकिस्तानी मंत्र्यांनी केलेले उपहासात्मक ट्विट........सगळ डोळ्यासमोर तरळल आहे.!!


आज झोपी जाताना रात्री दूर त्या चंद्राकडे पाहताना विलक्षण समाधान वाटत आहे. प्रज्ञान रोव्हर आता तिथे कामाला लागला असेल....आणि काळाच्या पटलावर कधीही पुसली जाणार नाही अशी भारताची मोहोर तिथे उमटली जाणार आहे..!!! जय हो इस्रो..!! 🇮🇳💐


-- Saurabh Ratnaparkhi

घसादुखणे, खवखवणे, आग होणे, सूजणे, इन्फेक्शन यावर सोपे घरगुती उपाय.....*

 *घसादुखणे, खवखवणे, आग होणे, सूजणे, इन्फेक्शन यावर सोपे घरगुती उपाय.....*


*१) ७/८, मिरे कुटून एक ग्लास दुधात मंद आचेवर उकळावे मग अर्धा टि स्पून हळद, टाकून उकळून, गाळून घ्यावे. याने घसा सुटतो व दुखणं थांबेल.

   

*२) मेथीचे दाणे पाण्यात उकळून थंड करून प्यावे, मध तुम्ही चमचा भरून घ्या. घश्याची खवखव बंद होईल.

 

*३) लसुण खाल्ल्यास घशाला आराम मिळतो, कारणं यात प्रतिजैविके आहे.

 

*४) वेलदोडे दाणे व‌ साखर एकत्र चघळावे, हळद व गूळ एकत्र करून खावे.

  

*५) संशमनि वटि चघळावी, एक पेला भर पाण्यात तिन चार कडुनिंबाची पाने उकळून थंड करून त्यात एक चमचा भरून मध मिसळून याने गुळण्या कराव्यात. लगेच आराम मिळतो.

   

*६) पाण्यात बडिशेप उकळून, गाळून, मग मध मिसळून घ्यावे.

  

*७) मधात काही लवंगा टाकून, मग थोड्या वेळाने हे चाटण घ्यावे, घसा दुखणं थांबेल.

  

*८) घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेवून चघळावा. याने जंतुसंसर्ग जातो.

 

*९) घसा खवखवत असल्यास खडिसाखर व चिमूटभर काथ जिभेवर ठेवून चघळावे, त्याने खुपचं आराम मिळतो.


*१०) त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळून थंड करून प्यावे.

 

*११ मध, ज्येष्ठमध पावडर हळद व कोरफड गर एकत्र मिसळून हे चाटण दिवसभर थोडे थोडे घ्यावे.


*१२) खदिरादि वटि, एलादि वटी चघळावी. याने घसा दुखणं थांबेल.


*१३ आंब्याची पाने पाण्यात उकळून मग गुळण्या कराव्यात.


*१४) कोमट पाण्यात मीठ घालून याने गुळण्या कराव्यात.


*१५)एक प्रभावी काढा...

एक पेला भर पाण्यात लवंग, ज्येष्ठमध, काळे मिरे, हळद, दालचिनी, केशर, आले, गुळ, हे सर्व पदार्थ एकत्र टाकून अर्धं उकळावे. व गरम गरम, शेकत प्यावे. याने घशाची सूज, वेदना, जंतूसंसर्ग, जातो.


 वरील सर्व प्रकारचे उपाय करावेत. आराम पडेल नक्कीच...


*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



रोजगार


 

आरोग्यं संपदा

 


महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 ची9.79 टक्के दराने परतफेड

 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 ची9.79 टक्के दराने परतफेड


            मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या कर्जरोख्यांची 9.79 टक्क्याने 24 सप्टेंबरपर्यंतच्या देय व्याजासह 25 सप्टेंबर 2023 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.


            शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल.


            दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.


            नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 9.79 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2023 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत.


            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत.


            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमूद केले आहे.


*****

महिला बचतगटांच्या राखी विक्री स्टॉलचेमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

 



महिला बचतगटांच्या राखी विक्री स्टॉलचेमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

        मुंबई, दि. 25 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचतगटांनी राख्या तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलची मांडणी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात केली आहे. या स्टॉलचे महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी बचतगटांच्या महिला सदस्यांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदू जाखड यावेळी उपस्थित होत्या.


        महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, घाटकोपर, मुंबई व अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत तनिष्का लोकसंचलित साधन केंद्र, धारावी यांनी राख्या, पर्स, बॅग आणि बांबू संशोधन केंद्र व प्रशिक्षण केंद्र स्थित चिचपल्ली, तालुका पोंभुर्णा, जिल्हा चंद्रपूर यांनी तयार केलेल्या राख्यांचे दोन स्टॉल मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन मंगळवार दि. 29 ऑगस्ट पर्यंत सुरु राहील.

भवताल

 तर ‘व्वा, क्या कहने...’ इतका व्हायब्रंट लोगो उतरवणं ही कमालच! हा लोगो पाहायला आकर्षक आहेच, पण नीट वाचला तर तो किती अर्थपूर्ण आहे याची कल्पना येते.


विशेषत: ‘भ’ आयकॉन. मूळ अक्षराचा रंग काळा आणि या अक्षराच्या दोन गाठींमध्ये दोन हलकीशी पानांची जागा, त्याला प्रभाकरने दिलेला पोपटी-शेवाळी रंग. रंगांची संगती उत्तम बनतेच, त्याच्या जेडीने लोगो कोणत्या विषयाच्या मंचाचा आहे, हेही नकळत समजून जाते. त्यासाठी फार काही मुद्दाम किंवा भडक करावे लागत नाही.


आणखी एक बाब आवर्जून सांगावी लागेल. हा लोगो करताना ‘भ’ आयक़ॉनचा शेवटचा भाग किंवा शेपटी... मला वाटत होते- ती ‘भ’ च्या उभ्या रेषेला चिकटलेली असावी. त्यामुळे लोगोला अधिक गोलाई येईल, ह माझी कल्पना. पण प्रभाकरने ती ‘भ’ च्या उभ्या रेषेला न चिकटवता खुली ठेवली. त्यामागचे त्याचे तत्त्व असे की, ती मुक्त असल्याने खुलेपणा दर्शवते. त्याचबरोबर रचना म्हणूनही आयकॉनला अधिक खुलवते.


‘ल’ या अक्षराबाबतही असेच. या अक्षराला दोन कळ्या. त्याची मोठी कळी उजवीकडे असावी, असे मल वाटत होते. पण कलाकाराची नजर आणि सौंदर्यदृष्टी वेगळी. प्रभाकरने ती तशी ठेवली. आता त्याकडे पाहताना तो कसा नजरेत भरतो, याची प्रचिती येते. ‘ल’ च्या कळीला असलेली लय तर लाजवाब! एखादी उत्तम कलाकृती कलाकाराच्या हातून कशी घडते, याचा अनुभव या लोगोच्या वेळी घेतला.


हा लोगो ‘भवताल’ ला अधिक अर्थपूर्ण बनवणारा आहे. त्याचे मोल करता येणार नाही. त्यामुळेच असेल कदाचित, प्रभाकरने या लोगोसाठी पैसेही घेतले नाहीत. भवताल लाही अशा कलाकाराच्या आणि त्याच्या कलाकृतीच्या ऋणात राहणे पसंत आहे.


- अभिजित घोरपडे

संस्थापक - संपादक, भवताल


भवताल दिवाळी अंकाच्या गोष्टी

(‘भवताल’ ची जडणघडण आणि प्रवासाबाबत वाचकांना माहिती देण्यासाठी हा उपक्रम...)


क्रमश:


Bhavatal logo (s).jpg


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9

545350862 / bhavatal@gmail.com

Featured post

Lakshvedhi