Thursday, 17 August 2023

लम्पी निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – पालकमंत्री

 लम्पी निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

एक रुपयात शेतकऱ्यांना विमा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहेही अभिमानाची बाब आहे. पशुधनासाठी शासनाने आतापर्यंत १७० कोटी रूपये खर्च केले आहेत. लम्पी निवारणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लम्पी आजारासाठी लागणाऱ्या मदतीसाठी शासन सदैव शेतकऱ्यांशी पाठीशी आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती व हर घर जल  या योजनेत अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे. आजच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात येणाऱ्या सर्वांसाठी जांभळाचे रोप भेट देण्यात आले असून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहनही महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.

सहकारी साखर कारखान्यांना शासनाच्या धोरणामुळे बळ -

 सहकारी साखर कारखान्यांना शासनाच्या धोरणामुळे बळ - उपमुख्यमंत्री अजित पवार

            राज्यातील सहकारी चळवळीला आर्थिक मदत व गती देण्याचे काम केंद्र सरकारच्या धोरणामुळे मिळाले आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा साडेनऊ हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतला. यामुळे जिल्ह्यात साखर कारखान्यांना मोठे बळ मिळाले आहे. साखर कारखान्यांनी आता नुसते साखर उत्पादन न करता इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

            श्री.पवार पुढे म्हणाले कीपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुंबई-शिर्डी वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिग लवकरच सुरू होणार आहे. नागपूर-शिर्डी तसेच शिर्डी ते भरवीर पर्यंत समृध्दी महामार्गाची वाहतूकही सुरू झाली आहे.     

गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठीपश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार

 गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठीपश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


शिर्डी जवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न


 


            अहमदनगर, दि.17 ऑगस्‍ट (जिमाका वृत्तसेवा) : गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते‌. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल, पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार सर्वश्री प्रा.राम शिंदे, सत्यजित तांबे, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, किरण लहामटे, आशुतोष काळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्य शालीनी विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.


            'शासन आपल्या दारी' अभियानात अहमदनगर जिल्ह्यात २४ लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे‌. यापैकी ३० हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आजच्या या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आजपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबविली आहे‌. नागरिकांना चकरा माराव्या लागू नये, यासाठी शासन काम करत आहे. एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात लाभार्थ्यांना ३ हजार ९८२ कोटींचा लाभ देण्यात आला आहे.


            राज्यातील अनेक योजनांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. राज्याच्या विकासासाठी शासन झोकून देऊन काम करत आहे. आजही राज्यातील निम्म्या साखरेचे उत्पादन अहमदनगर जिल्ह्यातून होत आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. समृध्दी महामार्गामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.


  मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आता मोफत उपचार मिळत आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत साडेबारा कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. ५३ वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प मार्गी लावण्याचे काम शासनाने केले आहे. शासनाने ३५ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता नव्याने दिली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. सध्या राज्यात पावसाने ओढ दिली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

- मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले


            मुंबई, दि. 17 : गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. इच्छुक गणेशमंडळांनी 5 सप्टेंबर 2023 पूर्वी mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केले आहे.


            गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करून अभिप्रायासह गुणांकन करून प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडिओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत.


            निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.भोसले यांनी केले आहे.


००

महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्यामहिला परिषदेसमवेत सामंजस्य करार करणार

 महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्यामहिला परिषदेसमवेत सामंजस्य करार करणार


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


             मुंबई, दि. 17 : राज्यातील महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत लवकरच एक कृती आराखडा तयार करून सामंजस्य करार करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.


            मंत्रालयात संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला परिषदेच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील महिला परिषदेच्या समन्वयक सुशान जान फरर्ग्युसन, उपसमन्वयक कांता सिंह, राकेश गांगुली उपस्थित होते.


               मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रत्येक महिला वर्गाला व्हावी, महिलांवरील हिंसाचाराला प्रतिबंधासाठी गाव पातळीवर हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी नव्याने गावपातळीवर गावस्तरीय महिला समित्या नेमणे, महिलांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणे, पर्यटनावर आधारित महिलांसाठी रोजगार निर्मिती करणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिलांसाठी विकासाभिमुख योजना राबविण्याबाबत संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषद समवेत लवकरच राज्य कृती आराखडा तयार करेल. राज्यात तो प्रभावीपणे राबविण्यात येईल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.


******

स्वनाथ’ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लोकहिताचे काम घडत आहे

 स्वनाथ’ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लोकहिताचे काम घडत आहे


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


 


             मुंबई, दि. 17 : स्वनाथ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनाथांसाठी एक चळवळ उभी राहत आहे या संस्थेने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.          


            चेंबूर विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्ट‍िट्यूट येथे स्वनाथ फाऊंडेशन तर्फे 'प्रत्येक बालकाला हक्काचा परिवार' या विषयी नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत जिल्हा संयोजकांकरिता आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापक तथा अध्यक्षा श्रेया भारतीय, मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्ट‍िट्यूटचे संचालक सतीश मोध, स्वनाथ फाऊंडेशनचे विश्वस्त गगन मेहता, सारिका मेहता आदी उपस्थित होते.


               मंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, स्वनाथ फाऊंडेशनने कमी कालावधीत अनाथ बालकांसाठी करत असलेले काम उल्लेखनीय आहे. शासनाकडून या कामासाठी सहकार्य करण्यात येईल. अशा प्रकारे सेवा भावी संस्था समाजात काम करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. याबाबत स्वयंसेवी संस्थाकडून काही सूचना आल्या, तर शासन त्यावर उपाययोजना व नव्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी काम करेल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.


******

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे कामवेळेत पूर्णत्वाचे नियोजन करावे

 राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे कामवेळेत पूर्णत्वाचे नियोजन करावे


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबई, दि. 17 : राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे 12 लाख पुस्तके आहेत. ही ग्रंथसंपदा जतन करण्याबरोबरच भावी पिढीला सहज उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाला गती देऊन कालबद्ध पद्धतीने कामाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


            मुंबई विद्यापीठ कलिना परिसरातील नवीन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाची पाहणी आज मंत्री श्री. पाटील यांनी केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, उपसचिव प्रताप लुबाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. बनगोसावी, ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड, सहायक संचालक डॉ.विजयकुमार जगताप, ग्रंथपाल संजय बनसोड व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीचे प्रलंबित बांधकाम पूर्णत्वास आले असून काही किरकोळ कामे राहिलेली आहेत. ती कालबद्ध पद्धतीने नियोजन करून तातडीने पूर्ण करावीत आणि राज्यातील नागरिक व जगभरातील विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय लवकर उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.


0000

Featured post

Lakshvedhi