Thursday, 17 August 2023

सहकारी साखर कारखान्यांना शासनाच्या धोरणामुळे बळ -

 सहकारी साखर कारखान्यांना शासनाच्या धोरणामुळे बळ - उपमुख्यमंत्री अजित पवार

            राज्यातील सहकारी चळवळीला आर्थिक मदत व गती देण्याचे काम केंद्र सरकारच्या धोरणामुळे मिळाले आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा साडेनऊ हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतला. यामुळे जिल्ह्यात साखर कारखान्यांना मोठे बळ मिळाले आहे. साखर कारखान्यांनी आता नुसते साखर उत्पादन न करता इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

            श्री.पवार पुढे म्हणाले कीपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुंबई-शिर्डी वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिग लवकरच सुरू होणार आहे. नागपूर-शिर्डी तसेच शिर्डी ते भरवीर पर्यंत समृध्दी महामार्गाची वाहतूकही सुरू झाली आहे.     

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi