Thursday, 27 July 2023

दुर्गदुर्गेश्वर किल्ले श्रीरायगडाचा घेरा,अवघे या

 *अवघे अवघे या..🚩*


दुर्गदुर्गेश्वर किल्ले श्रीरायगडाचा घेरा आणि माणगाव तालुक्यातील अपरिचीत ऐतिहासिक स्थळांच्या अभ्यासपुर्ण माहीतीवर मुंबई-दादर महानगरीत पहिले व्याख्यान शिवभुषण श्री रामजी कदम सर यांच्या वाणीतुन ऐकण्याची सुवर्ण संधी सोडु नका...

आपल्या विभागातील शिवव्याख्येते सुपुत्राचे मुंबई पहिले व्याख्यान होणार आहे त्यासाठी मुंबईत वास्तव्यास आसणार्या आपल्या विभागातील सर्व समाजबांधवानी वेळात वेळ काढुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखवावी......


*जय शिवराय ..🙏


🚩*

निसर्गाच्या सानिध्ा हवे आहे मग सहवास पण तितकाच रोमांचकारी, घेवून तर पहा, अनुभव कळवा

 


Wednesday, 26 July 2023

कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते आसामसह अरुणाचल प्रदेशला रुग्णवाहिका भेट

 कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्तेआसामसह अरुणाचल प्रदेशला रुग्णवाहिका भेट

       मुंबई, दि. 26 : कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी आसाम व अरुणाचल प्रदेश राज्य सैनिक कल्याण मंडळांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली. हुतात्मा जवान तसेच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या अथर्व फाउंडेशनच्या वतीने दोन्ही राज्यांना रुग्णवाहिका भेट देण्यात आली.


    देशाचे वीर जवान प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात. अश्यावेळी हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांच्या तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी काम करणे नागरिकांचे कर्तव्य असते असे सांगून राज्यपालांनी अथर्व फाऊंडेशनचे अभिनंदन केले. अथर्व फाऊंडेशन ही संस्था देशाच्या कानाकोपऱ्यातील हुतात्मा जवानांच्या मुला - मुलींच्या शिक्षणासाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.


       कार्यक्रमाला अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष, आमदार सुनील राणे, निमंत्रक कर्नल (नि.) सुधीर राजे, कर्नल एस. चॅटर्जी, डॉ. बालाजी शिंदे व आसाम रायफलचे अधिकारी व जवान उपस्थित होते.


००००

Kargil Vijay Diwas : Maha Governor presents Ambulances to Assam and Arunachal Pradesh Sainik Boards

    Maharashtra Governor Ramesh Bais handed over the keys of 2 Ambulances to the representatives of Assam and Arunachal Pradesh State Sainik Welfare Boards on the occasion of Kargil Vijay Diwas at Raj Bhavan Mumbai on Wed (26 July).




    The Ambulances to be used for the service of ex-servicemen and their families and families of martyrs from the armed forces were gifted by the Atharva Foundation.


    Speaking on the occasion, the Governor applauded the work of Atharva Foundation in the area of educating the children of the martyrs and ex servicemen from the armed forces.


    President of the Atharva Foundation and Borivali MLA Sunil Rane briefed the Governor about the work of the Foundation during the last 15 years. Convenor of the Foundation Col. (retd.) Sudhir Raje, Col. S. Chatterjee, Dr Balaji Shinde and officers and jawans of Assam Rifl

e were present.


0000




पात्र कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्याआस्थापनेवर समायोजन करणार

 पात्र कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्याआस्थापनेवर समायोजन करणार


- मंत्री उदय सामंत


            मुंबई दि. 26 : अकोला महानगरपालिका हद्दवाढीतील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पात्र कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर समायोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.


          अकोला महानगरपालिका हद्दवाढीतील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर समायोजन करण्याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.


         मंत्री श्री. सामंत म्हणाले की, अकोला महानगरपालिकेने एकूण 89 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दस्ताऐवजांची पडताळणी केली असता विभागीय समितीने 31 पात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मूळ नियुक्ती प्रचलित नियमानुसार आहे की नाही याबाबत दिनांक 24 मे 2021 रोजी पुर्नतपासणी केली.


            या 31 पात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपैकी 5 कर्मचाऱ्यांच्या दस्तऐवजांमध्ये त्रुटी आढळून आल्याने प्राथमिक स्तरावर 26 कर्मचारी पात्र दर्शविण्यात आले आहेत. अपात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर येथे दाखल केलेल्या रिट पीटिशन क्र.1889/2021 मध्ये मा. न्यायालयाने दिनांक 28 जून 2021 रोजी स्थगिती आदेश दिले होते. सदर आदेश दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी उठविण्यात आले आहेत. अकोला महानगरपालिकेच्या 1509 पदांच्या आकृतिबंधास मंजूरी देण्यात आली असून, सेवाप्रवेश नियम अंतिम करण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.


          या चर्चेत सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, अभिजीत वंजारी, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.


0000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील पूरपरिस्थितीचाविभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत आढावा

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील पूरपरिस्थितीचाविभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत आढावा


 


            मुंबई, दि 26 :- अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नियमाचा बाऊ न करता, वेळ पडली तर प्रसंगी, ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन काम करावे लागले, तर त्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यावा. जनहिताच्या प्रत्येक कार्यात शासन तुमच्यासोबत आहे. आपत्ती निवारण, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यस्तरीय विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत दिली. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत सतर्क राहून काम करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.


            राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती व अवर्षण परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडुन दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य मुख्य सचिव नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, आपत्ती नियंत्रण कक्षाचे संचालक आप्पासो धुळाज, आपत्ती नियंत्रण कक्षाचे उपसचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल आमदार संजय कुटे उपस्थित होते.


आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार


            पूरामुळे गावात घरात, रस्त्यावर गाळ साचला असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी ‘राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधी’ तसेच जिल्हा परिषदेतील निधीचा उपयोग करावा. प्रत्येक जिल्ह्याला दिलेला ३० लक्ष रुपयांचा आगाऊ निधी वापरावा. निधी कमी पडल्यास तातडीने निधीची मागणी करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.


नदी,नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरु राहण्यासाठी नदी,नाल्यांमधील अतिक्रमण काढावे


            उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यात अनेक भागात नदी, नाले, ओढ्यात अतिक्रमण झाले आहे. नदी, नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी नदी, नाल्यातील अतिक्रमण काढण्याचे काम प्राधान्याने व कठोर भूमिका घेऊन पार पडावे. नदी, नाल्यातील गाळ काढण्याचे काम करण्यासाठी कंत्राटदारांची यंत्रसामुग्री व प्रशासनाकडून डिझेलची व्यवस्था करावी. १५ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करावी. तसेच गाळ काढल्यानंतर तो पुन्हा नदी, नाल्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी.


दरडप्रवण भागातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करुन


पुनर्वसनासाठी ठोस आराखडा सादर करावा


            दरडप्रवण भागात ईरशाळवाडी, तळीये सारख्या घटना घडू नयेत, यासाठी अशा डोंगरी-दुर्गम भागातील दरडप्रवण आदिवासी तांडे, पाडे यांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अशा धोकादायक गावांची माहिती सर्वेक्षणाद्वारे एकत्रित करावी. पुनर्वसन करण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था, गावकऱ्यांची उपजिविका या सर्व बाबींचा विचार करून आराखडा तयार करण्याच्या सूचना सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.


अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


            पूर परिस्थितीवेळी धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत. ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखिल पंचनामे त्वरित सुरु करावेत. खरडून गेलेल्या जमिनी पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा तयार करावा, तसेच दुबार पेरणी करण्याची गरज असल्यास त्याचा आराखडा करावा, बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने त्याच दिवशी होईल याकरिता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा. ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले असेल त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी. रोगराई पसरु नये, याकरिता स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. ज्या ठिकाणी पाणी दूषित झाले आहे, त्याठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात. गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी. पूरामुळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे, त्यांना शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन द्यावे, आदी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना दिल्या.


            यावेळी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.


*****

काळजी स्त्रियांच्या आरोग्याची*

 *काळजी स्त्रियांच्या आरोग्याची*


प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील. हल्लीच्या काळातील नोकरदार महिला व कुटुंबाचा डोलारा सांभाळणाऱ्या महिलांसाठी खास हा लेख.



जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी’ अशी एका म्हण पूर्वापार काळापासून आहे. प्रत्येक कुटुंबातील स्त्री स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेते; पण स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील. हल्लीच्या काळातील नोकरदार महिला व कुटुंबाचा डोलारा सांभाळणाऱ्या महिलांसाठी खास हा लेख.

प्रत्येक स्त्रीला स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य यांमध्ये समतोल राखता आले पाहिजे. मुलगी जन्माला आल्यापासून तिचे आरोग्य, चांगले शिक्षण, आहार व व्यायाम याकडे स्त्रीने लक्ष दिले पाहिजे. मुलगी सुदृढ झाल्यावरच तिचे लग्न झाले पाहिजे. लहान वयात तिचे लग्न करू नये, याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. लग्न झाल्यावर पहिल्या अपत्यासाठी घाई करू नका. नवीन वातावरणात मुलीला रुळू द्या.

वीस ते तीस वर्षे हे वय हा पहिल्या अपत्यासाठी योग्य काळ आहे. गरोदर राहिल्यावर कोणताही त्रास जाणवत नसला तरीही गरोदर महिलेने प्रत्येक महिन्यात स्त्री रोग तज्ज्ञाकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. गरोदर स्त्रीने सकस आहार घेतला पाहिजे. प्रसूती शक्यतो हॅास्पिटलमध्येच जाऊन करावी. ग्रामीण भागात हॅस्पिटल नसल्याने प्रशिक्षित दाईकडूनच करून घ्यावी. माता व बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपान अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ते बाळासाठी अमृतासमान आहे. त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते. त्याशिवाय बाळाचे आईशी भावनिक नातेही जुळते.

दोन अपत्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेने वयाच्या पस्तीशीनंतर स्वतःची काळजी घ्यावी. या वयात प्रत्येक स्त्रीने पॅप स्मिअर चाचणी करणे आवश्यक आहे. कोणताही त्रास नसला तरी ही चाचणी करणे आवश्यक आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये ही चाचणी मोफत होते. या चाचणीमुळे पिशवीचा व योनीमार्गाचा कॅन्सर झाला असेल किंवा पुढील पाच वर्षात होणार असेल तर आधीच समजतो. त्यासाठी ही चाचणी आवश्यक आहे.


चाळीशीत आल्यावर तिला पाळीचे विकार येतात. रक्तस्त्राव जास्त होत असेल किंवा महिन्यातून दोनदा पाळी येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मासिक पाळी बंद झाल्यावर स्त्रियांमध्ये वजन वाढण्याची व हार्ट अॅटॅकची समस्या वाढते. अशावेळी वार्षिक आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.


डॅा. रेखा डावर, स्त्री रोग विभागप्रमुख (जे.जे. हॅास्पिटल)

पोस्ट केवळ माहीती साठी



*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*



प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनीपर्यावरणपूरक सण साजरे करावेत

 प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनीपर्यावरणपूरक सण साजरे करावेत


- मंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि. २५ : नागरिकांनी पर्यावरणपूरक सण साजरे करून, प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीचे जलस्रोतांमध्ये विसर्जन करू नये याबाबत महानगरपालिकांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            यासंदर्भात सदस्य जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.


             मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, सार्वजनिक सणांच्या वेळी होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. पर्यावरणविषयक विविध कायदे व त्या कायद्यांची अंमलबजावणी व्यापक जनहितार्थ असून त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.


            महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांसाठी प्राधान्य तत्वावर जागा उपलब्ध करून द्यावी व त्याचबरोबर त्यांना काही प्रमाणात शाडूची माती उपलब्ध करून देता येईल का याची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत, असेही मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.


            या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.


****



Featured post

Lakshvedhi