Saturday, 22 July 2023

आरोग्याबाबत सांगायचे झाले तर

 आरोग्याबाबत सांगायचे झाले तर पोटाशी संबंधित समस्या उद्भवल्यानंतर नैसर्गिक उपाय म्हणून काळे मीठ, जिरे पावडर आणि लिंबू रस मिक्स करून चाटण तयार करून दिलं जातं. आरोग्यासाठी पोषक असणाऱ्या घटकांचा लिंबूमध्ये समावेश आहे. लिंबूच्या सेवनामुळे आपल्या शरीराला कोणते लाभ मिळू शकतात.

लिंबू पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू पाण्याचे बरेच फायदे आपल्या आरोग्याला होतात. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून दररोज पिले पाहिजे. कोमट लिंबू पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे शरीरास बर्‍याच रोगांशी लढायला मदत करते. सकाळी लिंबाचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी नेमके कोणते फायदे होतात हे आपण बघणार आहोत. 

वजन कमी होते – झटपट वजन कमी करण्यासाठी आपण कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्या. हे पेय सकाळी आपल्या पाचन तंत्राचे निराकरण करून पचन प्रक्रिया सुधारते. लिंबू शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकते. हे तुमची पाचक प्रणाली निरोगी ठेवते.

सकाळी लिंबाचे पाणी पिणे हा स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. गरम पाण्यात लिंबू घालून पिल्याने त्याची चव वाढते. जर आपण त्यात एक चमचा मध घातला तर ते केवळ चवच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

त्वचेसाठी फायदेशीर – लिंबाच्या पाण्यात असलेले व्हिटॅमिन सी तुमची त्वचा आंतरिकरित्या निरोगी ठेवते. हे सुरकुत्या होण्यापासून प्रतिबंधित करते. एका अभ्यासानुसार, जे लोक व्हिटॅमिन सी समृध्द अन्न खातात. त्यांना सुरकुत्या होण्याची शक्यता कमी असते. आहारात लिंबू पाण्याचा समावेश केल्याने त्वचा नेहमीच हायड्रेट राहते. लिंबाचे पाणी पिल्याने यकृताचे कार्य सुधारते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. हे यकृत पेशींना मूलभूत नुकसानीपासून प्रतिबंधित करते. यासाठी एक कप पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये मध मिक्स करून प्या.

हे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवते. हे आपल्या शरीरास सर्दी आणि संसर्गापासून वाचविण्यात मदत करते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. नियमितपणे कोमट लिंबू पाणी प्यायल्याने हृदयरोग, मूत्रपिंडातील दगड आणि त्वचा संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. हे आपल्या पाचन तंत्रास देखील दुरुस्त करते. निरोगी ठेवते.



उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि घरगुती उपाय –*

 *उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि घरगुती उपाय –*


*©️ डॉ. सतीश उपळकर*



आपली उंची ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. प्रामुख्याने उंची ठरवण्यासाठी 60 ते 80 टक्के जेनेटिक फॅक्टर आणि अनुवांशिक घटक जबाबदार असतात. तर उंचीसाठी आहार पोषण, व्यायाम यासारखे घटक 40 ते 20 टक्के घटक जबाबदार असतात.


साधारणपणे वयाच्या पहिल्या वर्षांपासून ते पौगंडावस्था सुरू होण्यापूर्वी आपली उंची वर्षाला 2 इंच प्रमाणे वाढत असते. तर पौगंडावस्था (puberty) सुरू झाल्यानंतर तेच प्रमाण वर्षाला 4 इंच इतके होते. पौगंडावस्था झाल्यानंतर म्हणजे वयाच्या 18 ते 20 वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबली जाते.


*उंची वाढवण्याचे हे आहेत उपाय :*


आपली उंची कशी वाढवावी असा अनेकांचा प्रश्न असतो. उंची वाढवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम यांचे नियोजन ठेवणे आवश्यक असते. यासाठी येथे उंची वाढीसाठी कोणता काय खावे, काय खाऊ नये व कोणता व्यायाम करावा याविषयी माहिती खाली दिली आहे.


*उंची वाढीसाठी योग्य आहार घ्या –*

वाढत्या वयामध्ये शरीराला अनेक पोषकघटकांची गरज असते. यासाठी प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम व खनजतत्वे युक्त असा योग्य आहार घेणे गरजेचे असते. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, धान्ये, कडधान्ये, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश असावा.


कॅल्शियम व व्हिटॅमिन D –

उंची वाढण्यासाठी कॅल्शियम व व्हिटॅमिन-D चे महत्वही जास्त असते. हाडांमधील density कमी झाल्याचा परिणाम उंची कमी होण्यावर होत असतो. यासाठी आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ असावेत. यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी यांचा आहारात समावेश असावा. तसेच आहारातून घेतलेले कॅल्शियम हाडांमध्ये जाण्यासाठी व्हिटॅमिन-D ची गरज असते. व्हिटॅमिन-D साठी सकाळच्या कोवळ्या उन्हात दहा ते 15 मिनिटे बसावे.


*उंची वाढण्यासाठी असा करा व्यायाम –*

नियमित व्यायामाचे फायदे अनेक आहेत. वाढत्या वयामध्ये नियमित व्यायाम केल्यामुळे वजन आटोक्यात राहते आणि ग्रोथ हार्मोनची (HGH) निर्मितीही होण्यास मदत होते. वाढत्या वयाच्या मुलांनी व्यायामासाठी किमान एक तास दिला पाहिजे. यामध्ये विविध मैदानी खेळांचा अंतर्भाव करता येईल. उंची वाढवण्यासाठी दोरीउड्या, स्ट्रेचिंग व्यायाम, पुलअप्स, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग, सूर्यनमस्कार, योगासने. हे व्यायाम प्रकार करणे गरजेचे असते. रोज सकाळी धावण्याचा व्यायाम केल्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.

*योग्य स्थितीची सवय लावून घ्यावी –*

चुकीच्या पद्धतीने खूप वेळ बसणे, वाकून चालणे यामुळे पाठीला बाक किंवा कुबड येण्याची समस्या अनेकांना होत असते. पाठीला बाक आल्यामुळे त्याचा परिणाम उंचीवर होत असतो. यासाठी पाठीला बाक येऊ नये म्हणून लहानपणापासूनच योग्य स्थितीत बसण्याची, ताट समोर बघत चालण्याची सवय (Practice good posture) लावून घ्यावी. चालताना पाठीचा कणा ताट व मान सरळ समोर असावी. यासाठी स्ट्रेचिंग, योगासने यासारखे व्यायाम करावेत यामुळेही पाठीच्या कण्याची लवचिकता वाढण्यास मदत होते. 


*पुरेशी झोप घ्यावी –*

उंची वाढण्यासाठी पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे असते. पुरेशी झोप घेण्यामुळे human growth hormone (HGH) ची योग्य प्रकारे निर्मिती होण्यास मदत होते.


*वयानुसार झोप पुढीलप्रमाणे असावी –*

▪️ 3 ते 5 वर्षे वयाच्या मुलांसाठी – 10 ते 13 तास झोप आवश्यक

▪️6 ते 13 वर्षे वयाच्या मुलांसाठी – 9 ते 11 तास झोप आवश्यक

▪️14 ते 17 वर्षाच्या पौगंडावस्थेतील मुलांसाठी – 8 ते 10 तास झोप आवश्यक

▪️18 वर्षांपासून पुढे – 7 ते 8 तास झोप आवश्यक असते.


*उंची वाढवणारे सप्लिमेंट्स उपयोगी पडतात का..?*


उंची वाढवणाऱ्या height growth supplement मध्ये उपयुक्त पोषकघटक प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम, खनिजे दिली जातात. या Horlicks, Bournvita अशा supplements चा मुलांना उपयोग होऊ शकतो. मात्र अशी supplements सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.


*योग्य उंची वाढीसाठी अशी घ्यावी काळजी :*


▪️ मुलांना सतत अभ्यासाला बसवणे टाळावे. कारण मुलांचा बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकास होणे गरजेचे असते.

▪️ शाळकरी मुलांच्या पाठीवर दफ्तराचे वजन जास्त प्रमाणात असू नये.

▪️ चुकीच्या पद्धतीने खूप वेळ बसणे, वाकून चालणे टाळावे.

▪️ स्मार्टफोन, टीव्हीचा अतिरेक टाळावा.

▪️मुलांना मैदानी खेळ खेळण्यास आणि व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यावे.

▪️वारंवार फास्टफूड, जंकफूड, स्नॅक्स, चिप्स, कोल्ड्रिंक्स यासारखे unhealthy foods खाणे टाळावे. मुलांना योग्य पोषकघटकांनी युक्त असणारा संतुलित आहार द्यावा.आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये, विविध फळे, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस-मासे यांचा समावेश असावा.


*उंची वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय :*


▪️योग्य आहार, नियमित व्यायाम या बरोबरच खालील काही उपाय उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

▪️देशी गाईचे दूध उंची वाढविण्यासाठी फायदेशीर असते. रोज रात्री ग्लासभर देशी गाईचे दूध प्यावे.

▪️रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे अश्वगंधा चूर्ण ग्लासभर दुधातून पिणे उंची वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. उंची वाढीसाठी हा उपयुक्त आयुर्वेदिक उपाय आहे.

▪️ दररोज दोन काळी मिरी थोड्याशा लोण्यासोबत खाणेसुद्धा उंची वाढवण्यासाठी उपयोगी ठरते.


*उंची आणि वजन कमी असण्याची समस्या :*


अनेकदा वजन कमी असणे ही उंची कमी असण्याचे कारण असू शकते. यासाठी वजनसुद्धा योग्य प्रमाणात असले पाहिजे. अनेकांचे वजन फारचं कमी असते.


आजादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमाची पूर्व तयारी बैठक

 आजादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमाची पूर्व तयारी बैठक

            मुंबई, दि. 22 : केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमासंदर्भात पूर्व तयारी करण्याविषयी केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गोबा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे सर्व राज्याचे मुख्य सचिव यांची बैठक घेण्यात आली.


            यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, कौशल्य विकास विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन गद्रे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, वन विभागाचे प्रधान सचिव वी. वेणुगोपाल रेड्डी, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाचा समारोप “मेरी माटी मेरा देश”, मिट्टी को नमन, विरोंका वंदन, ही संकल्पना घेऊन संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मार्च 2021 पासून सूरु झालेला या उपक्रमाचा ऑगस्ट 2023 अखेर समारोप होणार आहे. या समारोप उपक्रमात विविध विभागांच्या वतीने अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.  


0000

बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार -केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी

 बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार -केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी


            मुंबई, दि.22 : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध करून देईल अशी घोषणा केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री श्रीमती स्मृती जुबिन इराणी यांनी केली.


            षण्मुखानंद ऑडिटोरियम, सायन पूर्व मुंबई येथे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग भारत सरकार व महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “वत्सल भारत” या विभागीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री श्रीमती स्मृती इराणी बोलत होत्या. या कार्यक्रमास महाराष्ट्र सह गुजरात, आंध्रप्रदेश, गोवा, दादरा नगर हवेली, दमन, दिव राज्यातील सदस्य सहभागी झाले होते.


            केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या, 'चाइल्ड ट्रॅकिंग' या सिस्टम च्या माध्यमांतून जी मुले हरवली होती अशी देशातील चार लाख मुले शोधली आहेत आणि त्या मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं आहे. 2 हजार 500 मुलं ही दत्तक घेतली गेली आहेत. पोक्सो अंतर्गत महिलांना भारत सरकार पूर्णपणे मदत करणार असून त्यांचा कायदेशीर दृष्ट्या येणारा आर्थिक भार देखील भारत सरकार उचलणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अवैध मानवी तस्करी रोखण्यासाठी युनिट बनवलेले आहे, यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या जरूर आम्हाला कळवाव्यात. प्रत्येक गावागावाच्या बाल सुरक्षा समित्या कार्यरत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर एखाद्या बालकाला जर मदतीची आवश्यकता असले तर त्याची माहिती भारत सरकारला कळवावी, आम्ही त्याच्यासाठी नक्की मदत करू.


            प्रत्येक जण आप आपल्या परीने स्वताच्या राज्यातील वेगवेगळ्या शासकीय व निम शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लहान मुलांची बालकांची काळजी समर्पित भाव ठेऊन सेवा देत आहात याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे. शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन पूर्णपणे प्रयत्न करेल असेही मंत्री श्रीमती स्मृती इराणी म्हणाल्या.


            यावेळी केंद्रीय महिला बालविकास विभागाचे अतिरिक्त सचिव संजीव कुमार चड्ढा यांनी बाल हक्क अधिनियम कशाप्रकारे लागू केला जात आहे, वत्सल भारत योजनेबाबत माहिती दिली. यावेळी सहसचिव इंद्रा मालो यांनी वत्सल भारत योजनेसाठी सर्व राज्यांचे सहकार्य मिळत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच मिशन वस्तूंचे ते पोर्टल देखील लॉन्च केले असल्याची माहिती यावेळी दिली.


            केंद्रीय बाल संरक्षण बालसुरक्षा आणि बाल कल्याण विभागाच्या सदस्य सचिव रूपाली बॅनर्जी, महाराष्ट्र राज्याचे महिला बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल मोरे, बापूराव भवाने, जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, शोभा शेलार आणि अब्दुल चौधरी यासह राज्यातील जिल्हा महिला बालविकास अधिकारी उपस्थित होते.


0000

महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ

 महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ


                                                                      - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री यांनी घेतली सहकुटुंब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट


            नवी दिल्ली, दि. 22 : राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली. 


            आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. श्री. शिंदे यांनी त्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व त्यांची पत्नी वृषाली शिंदे, नातु रूद्रांश यांच्या समवेत भेट घेतली.


            या भेटी दरम्यान कुटुंबियांची प्रधानमंत्री यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली असल्याचे भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासोबतच राज्याच्या सर्वंकष विषयांवर चर्चा करून राज्यात सुरू असलेल्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पाठबळ असल्याचे आश्वासक आश्वासनही यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिले असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इरशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून दुर्घटना घडली होती. या घटनेबाबत सहवेदना प्रधानमंत्री श्री. मोंदी यांनी व्यक्त करत या दुःखाच्या समयी केंद्र सरकार खंबीरपणे पाठीशी उभे असल्याच्या भावना प्रधानमंत्री यांनी यावेळी व्यक्त केल्या असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी सुरू असलेले बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबतची माहिती जाणून घेतली.


            धारावी प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावेल त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. त्याचबरोबर मुंबईतील पुनर्विकासांचे रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची चर्चा यावेळी झाली. यासोबतच प्रत्येक कुटुबांला हक्काचे घर मिळावे, असे केंद्र शासनाचे धोरण असून राज्य त्या दिशेनेही काम करीत असल्याचे समाधान प्रधानमंत्री यांनी व्यक्त केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            राज्यातील रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावावेत. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे राज्यातील असे सर्व प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशाही सूचना प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी केल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासह राज्यात वांरवार होणारी अतिवृष्टी त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचे होणारे नुकसान याबाबतही प्रधानमंत्री यांनी विचारपूस केली. कोकणात येणारा उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळविता येईल, यावर भविष्यात काही उपाययोजना आखता येतील का याबाबतही चर्चा करण्यात आली. मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनेबाबतची माहिती प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी घेतली. यासह राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा याबाबतही विचारणा केली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यां

नी सांगितले.


महिला उद्योजिका स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र चेंबरचे नेहमीच पाठबळ : संगीता पाटील

 महिला उद्योजिका स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र चेंबरचे नेहमीच पाठबळ : संगीता पाटील


महाराष्ट्र चेंबरची महिला समिती आणि मुंबई जिल्हा सहकारी बँकेतर्फे व्याख्यान संपन्न


मुंबई : `मूळत: उद्यशील स्वभाव असलेल्या महिलांनी उद्योजिका होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले पाहिजे. महिला सक्षम आहेतच, त्यांनी उदयोग क्षेत्रात आपला ठसा उमटविला पाहिजे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे पाठबळ कायम राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर, महिला उद्योजकता समिती व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित `आंतरराष्ट्रीय व्यापार व महिला उद्योजकांसाठी भांडवल उभारणी `या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. मुंबई फोर्ट येथील डॉ. डी. एन. रोडवरील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित येथील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, महिला उद्योजकता समितीच्या को-चेअरपर्सन कविता देशमुख, महाराष्ट्र चेंबरचे सहकार्यवाह सागर नागरे यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम झाला.

या वेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र चेंबरच्या महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील म्हणाल्या, `महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र चेंबर अंतर्गत महिलांसाठी धोरण आखले गेले आहे. ३६ जिल्ह्यासाठी हे धोरण आहे. महिला या मुळातच उदयोजक, उत्तम प्रशासक असतात, मात्र अनेकदा ते घरापुरतं मर्यांदित राहतं. घराबाहेरच्या विशाल जगात त्या गुणांचं सार्थक व्हावे, म्हणून उद्योजिका होण्याचे स्वप्न महिलांनी प्रत्यक्षात आणायला हवे. त्यासाठी महाराष्ट्र चेंबर महिलांसाठी दीपस्तंभाचे काम करीत असून महिलांना सातत्याने पाठबळ देत राहणार आहे.

चेंबरतर्फे राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्र चेंबरने महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच पाठबळ दिले आहे. केवळ वर्कशॉप, सेमिनार एवढाच उद्देश महाराष्ट्र चेंबरचा नसून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वोतोपरी मदत करते. महिलांनी उद्योग जगतात पाऊले ठेवायला हवीत. परंतू, नवीन उद्योग स्थापन करताना महिलांसमोर भांडवल हा विषय असतो. त्यामुळे आपल्या बँकेतर्फे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असेही समितीच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी आवाहन केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईच्या संचालिका रुपा नाईक यांनी `आंतरराष्ट्रीय व्यापार` या विषयावर मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी काय करावे, महिलांसाठी उपलब्ध असलेल्या संधी, केंद्र आणि राज्य सरकारच्या उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय सरव्यवस्थापक समीर महापुष्पे, संदीप सुर्वे यांनी `महिला उद्योजकांसाठी भांडवल उभारणी` या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी मुंबई बँकतर्फे महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली. महिलांसाठी विशेष कर्ज योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

 *हे एक जुने मराठी गाणे आहे, यात जवळ जवळ 25-30 म्हणी आहेत. सध्या अभावानेच या म्हणींचा वापर होतो पण आजच्या परिस्थितीत हे


गाणं चपखल बसतं.. ऐका, जुन्यांची नक्की आठवण येईल. 👇👇

Featured post

Lakshvedhi