Friday, 21 July 2023

वेरिकोज व्हेन्स*

 *वेरिकोज व्हेन्स*


 हा पायांचा अशुद्ध रक्तवाहिन्यांचा( नीलांचा) आजार आहे. अत्यंत वेदनादायि, गुंतागुंतिंचा गंभिर आजार आहे. या नीलांचा व फुफ्फूसांचा जवळचा संबंध आहे. फुफ्फूसाकडे रक्तशुद्धि करता नेण्याचि भूमिका या व्हेंस करतात. त्यामुळे पायातिल रक्तवाहिन्या मधलि गुठळि वरच्या बाजुला सरकलि तर, त्यामूळे रक्तवाहिन्या ब्लाँक होउन ही क्रिया शुद्धिकरणाचि बंद पडते.( पल्मोनरि एम्बोलिसम)...


** कारणे***. अत्यंत चुकिचि जीवनशैलिचा आजकाल अवलंब केल्या जातो आहे.. बैठे काम, एका ठिकाणि बसून राहण्याचि सवय, हार्मोनल इम्बँलन्स, सततचा लांबचाप्रवास, रक्त पातळ करणार्या घटकाचि अनियमित पातळी, वाढते वय, .. यामूळे हा आजार बळावतो.


**उपचार योजना**..(१) सेब साईडर व्हिनेगार एक अद्भूत औषध आहे. त्या जागेवर मालिश करा, काहि दिवसातच वेरिकोज व्हेंसचा आकार कमि होतो.


(२) आँलिव्ह आँईल आणि vit. E. आँईल एकत्रित करून हलका मसाज करावा. एक ते दोन महिने.


(३)5,6, लसूण पाकळ्या घेऊन एका जारमद्धे टाकून 3 संत्र्यांचा रस टाकून जार वरखालि ढवळावा, नंतर आँलिव्ह आँईल टाका एक चमचा, 12 तास तसेच ठेवा आणि नंतर 15 मिनिटे जिथे सूज आहे तिथे मालिश करा. काहि महिन्यातच चांगले परिणाम दिसतात.


(४) अक्रोडचे तेल एका सूति कपड्यावर घेउन १,, 2 महिने हळूवार मसाज करा...


(५)झेंडूंच्या फुलांचा रस काढून नसांवर लाउन मसाज करा.(६) एक मूठभर ओवा घेउन एक कप पाण्यां उकळवा, मग थंड झाल्यावर रोज आँईलचे काहि थेंब टाकून कापसाने नसांवर लावा.


(७) अर्जुन व्रुक्षाचि साल गायिच्या दुधात उकळवून प्यावे

  (८) नियमितपणे अर्धा तास भरभर चालावे, जेणेकरून नसातले रक्त पातळ होईल.


(९) झोपतांना पाय उंच करून ठेवा काहि वेळ.. हळूहळू व्हेंसमधले रक्त कमि होते. आहारात धनेमिश्रित पाणी, शहाळ्याचे पाणी, पानकोबि, पालक, हिरव्या भाज्या ठेवा,


(१०) एका बादलित सोसेल ईतके गरम पाणि घेउन पाय बुडवून ठेवावे पंधरा मिनिटे... फळे, व अंकुरित कडधान्ये खावित...


 वरिल उपायांनि हा आजार नक्किच बरा होतो..*******...


 आयुर्वेद अभ्यासक..... सुनिता सहस्रबुद्धे......


_*(

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतफूड पॅकेटस, ब्लॅंकेटस्, कंटेनरसह मदत साहित्याचा ओघ

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतफूड पॅकेटस, ब्लॅंकेटस्, कंटेनरसह मदत साहित्याचा ओघ


जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुविधांसाठी साहित्य इरशाळगड वाडी घटनास्थळाकडे रवाना


            अलिबाग, दि.20 (जिमाका) :- इरशाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्यासाठी शासन यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील असून येथे मदत कामासाठी कार्यरत प्रत्यक्ष मनुष्यबळासाठी व दुर्घटनेतील वाचलेल्या नागरिकांसाठी घटना स्थळावर तात्पुरते निवारे, अन्न, मदत साहित्य यांची तातडीने उपलब्धता केली जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रायगड जिल्ह्यातील उद्योग व संस्था पुढे आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुविधा निर्माण करण्यासाठी साहित्य घटनास्थळाकडे पाठविले जात आहेत.


            यामध्ये मदत साहित्य व निवाऱ्यासाठी घटनास्थळाच्या बेसकॅम्पकडे २० X १० आकाराचे ४ कंटेनर, ४० X १० चे २ व इतर दोन कंटेनर पाठविण्यात येत आहेत. सदर कंटेनर उरण, जेएनपीटी, रत्नागिरी एमआयडीसी, जेएसडब्लू समूह येथून रवाना झाले आहे. चौक , खालापूर येथील तात्पुरती निवाराव्यवस्था केली जात आहे.


            घटनास्थळ हे उंचावर असून मशिनरी साहित्य पोहचत नसल्याने दरड कोसळल्याने निर्माण झालेले मातीचे ढिगारे दूर करण्यासाठी पनवेल येथून ८० अनुभवी कारागिरांचे पथक अवजारांसह दुपारनंतर घटना स्थळी पोहोचले असून सकाळ पासून मदत कार्यात असलेल्यांना त्यामुळे विश्रांती मिळणार आहे.


            दुर्घटनाग्रस्त भागात विद्युत पुरवठा होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत अभियंता, महावितरण यांचे पथक पाठविण्यात आले आहे. यासह यंत्रणेसाठी तात्पुरती निवारा व्यवस्था, अन्न व पिण्याच्या पाण्‍याचा पुरवठा यादृष्टीने महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता व त्यांची यंत्रणा काम करत आहे. तेथे साहित्य सामुग्री व अति महत्वाच्या व्यक्तींच्या समन्वयन, हेलिपॅड आदी सुविधा तयार केल्या जात आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक अलिबाग यांचे कडून जखमींवर उपचारासाठी सुविधा देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. स्वत: विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. म्हसे दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर रात्री दीड वाजता घटना स्थळी प्रत्यक्षात पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, खालापूर तहसिलदार अयुब तांबोळी यांनी रात्री परिस्थितीचा अंदाज घेत, बचावकार्यासाठी आवश्यक साधन सामग्री, मनुष्यबळ करावयाच्या उपाययोजना यांची तयारी केली.  


            महसूल, जिल्हा परिषद व पोलिस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरी संरक्षण दल मुंबई येथून दोन पथके, एनडीआरएफची चार पथके १५० मनुष्यबळासह घटनास्थळी असून इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य युवा मंडळे, ट्रेकर्स् ग्रुपचे प्रतिनिधी असे दुपारनंतर जवळपास ७०० जण मदत कार्यात सहभागी होते. पुणे येथून एनडीआरएफचे पथक पहाटे ४ वाजता घटनास्थळी पोहाचले होते. नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाचे पथक, पनवेल नगरपालिका येथून 44 अधिकारी कर्मचारी, 2 जेसीबी पाठविण्यात आले तसेच 8 ॲम्बुलन्स, कर्जत येथून कळम, आंबिवली, मोहिल आदी प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय पथके घटनास्थळी पहाटेच पोहोचले होते. त्यानंतर देखील आरोग्य विभागाचे इतर ठिकाणचे वैद्यकिय अधिकारी कर्मचारी यांना पाठविण्यात आले आहे.


            आज भर पावसात मदत कार्य सुरु असून काल सर्वाधिक 198 मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात झाली. यावेळी कोकण विभागाच्या सरासरी 136.7 मि.मी. पाऊस झाला आहे. अशावेळी दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे.


            मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर ३००० फूड पॅकेटस उपलब्ध करण्यात आले आहेत. यासह घटनास्थळावर पाणी बॉटल्स, ब्लॅंकेट्स, टॉर्च, मदत साहित्य, चादरी, बिस्कीट तसेच इतर प्रथम उपचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.


            जिल्ह्याच्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्यात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. मदतीसाठी शासकीय विभागांची, संघटना व स्वयंसेवी संस्थांची मदत पथके रवाना झाली. यामध्ये पुणे, अलिबाग, खोपोली, कर्जत, लोणावळा, पनवेल, वाशी, मुंबई व येथील सहभाग आहे.


            विविध शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा, एनडीआरएफ टीम, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यांच्याकडून मदत कार्य करण्यात येत आहे .


००००



 

इरशाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार


 इरशाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यास प्राधान्य


 


            अलिबाग, (जिमाका) दि. 20 :- बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यास प्राधान्य दिले जात असून नियोजन झाले आहे. कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भात देखील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इरशाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याला मार्गदर्शन व गती देण्याचे काम त्यांनी केले.


            बचाव कार्यात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सतत पाऊस होत असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. अवजड यंत्रसामुग्री व अवजारे पोहोचण्यात अडचणी येत आहेत. दोन हेलिकॉप्टर तैनात केले होते, परंतु ते खराब हवामानामुळे येथे पोहोचू शकलेले नाहीत, असे यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले


            ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित असून अधिकारी, रेस्क्यू टीम ही यांच्या संपर्कात रात्रीपासून होती, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले .


            ते म्हणाले, बचाव कार्य करताना स्वतःचे जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करत आहेत. इथे मदत आणि बचावकार्य अवघड आहे, यात सहभागी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तरीसुद्धा पाऊस असताना जे लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत त्यांना बाहेर सुरक्षित काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सां

गितले.


00000

Thursday, 20 July 2023

सुयोग्य आहारात धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल, तूप या सर्व गोष्टी दर २४ तासाला घ्यायला हव्या.*

 *सुयोग्य आहारात धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल, तूप या सर्व गोष्टी दर २४ तासाला घ्यायला हव्या.*


 दिवसभरातून त्या विभागून घ्याव्यात. दुपारी व रात्री चौरस आहार तर सकाळी, संध्याकाळी हलका नाश्ता, दूध असणे महत्त्वाचे. हे सर्व घेऊनही अन्नघटकांची कमतरता होतेच.संतुलित आहार हे सर्व पुरवतो: तुम्हाला दिवसभर सक्रिय राहण्यासाठी ऊर्जा आवश्यक आहे. तुम्हाला वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले पोषक, तुम्हाला मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत करतातसंतुलित आहार म्हणजे सकस आहार, शरिराला पोषक आहार. यामध्ये प्रोटिन्स, व्हिटामिन्स तसेच शरिराला गरजेचे 

शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे.कारखान्यात यंत्रांनी तयार केलेला नसावा.


जो आहार आपल्याला शारीरिक मानसिक, बौद्धिक व रोगप्रतिकारक शक्ती; चपलता, स्मरणशक्ती, सौंदर्य, व्यक्तिमत्त्व, दीर्घायुष्य देतो, तोच सकस आणि योग्य आहार होय. आजचा आपला आहार या गोष्टी द्यायला असमर्थ आहे. कारण रोग्यांची आणि रोगांचीही संख्या वाढताना दिसत आहे.

प्रमोद पाठक.



अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीची चौकशी करणार

 

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीची चौकशी करणार

- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील


            मुंबई, दि. 20 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत अकोला जिल्ह्यातील आलेल्या तक्रारीबाबत चौकशी करण्यात येईल. राज्यभरात असे काही प्रकार घडले असल्यास त्याचीही चौकशी करण्यात येईल, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.


       अकोला जिल्ह्यातील 2 हजार 337 शेतकऱ्यांचे 112 सहकार सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांचे संमती पत्र न घेता परस्पर पीक कर्जांचे पुनर्गठन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही. याबाबतीत सहकारी सोसायटी बरखास्त करून त्यावर प्रशासकीय मंडळ स्थापन करावे याबाबत लक्षवेधी विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी मांडली. त्याला उत्तर देताना मंत्री दिलीप वळसे- पाटील बोलत होते.


          मंत्री श्री. वळसे -पाटील म्हणाले, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जबाबतची वस्तुस्थिती पडताळून पाहण्यात येईल. त्याचबरोबर राज्यात अशाप्रकारे काही घटना घडल्या असल्यास त्याची देखील चौकशी करण्यात येईल. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व मान्यता घेऊन या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री श्री. वळसे -पाटील यांनी दिली.


0000





 


पाणीपट्टी आकारण्याबाबतचा निर्णयउच्च न्यायालयाकडूनच होणार

 पाणीपट्टी आकारण्याबाबतचा निर्णयउच्च न्यायालयाकडूनच होणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून राज्यात घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीत केलेली वाढ 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात आली आहे यामध्ये बदल केला जावा यासाठी काही संस्था उच्च न्यायालयात गेल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

            डिस्टलरी उद्योगात पाणी वापर हा थेट कच्च्या मालासाठी होत नसून तो प्रक्रियेसाठी होत असल्याने म्हणजेच औद्योगीकरणासाठी होत असल्याने डिस्टलरी युनिटसाठी औद्योगिक पाणी वापर दरानुसार पाणी पट्ट्या आकारण्यासाठी शासनाने करावयाच्या कार्यवाही याबद्दल विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला राज्यात घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीचे दर ठरविण्याचे अधिकार आहेत. या दराबाबतीत कोणाच्या काही सूचना असल्यास त्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणडे येतात. मात्र या दरवाढीविरुद्ध काही संस्थानी उच्च न्यायालयात अपील केले आहे. यावर लवकरच सुनावणी होणार आहे. यामध्ये राज्य सरकार कोणत्याही प्रकारचा कायदेशीर दृष्ट्या निर्णय घेऊ शकत नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी लागेल असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मूळव्याध* मुळापासून घालवा

 *🌵मूळव्याध*



*पिव्वर घरगुती तूपात अर्धा चमचा हळद घालून लावल्यास मुळव्याधीत आराम मिळतो.*


 इप्सम सॉल्ट आणि ग्लीसरीन दोन दोन चमचे एकत्रित करून दिवसात चार पाच वेळेस कापसाने कोंबाला लावत जा कोंब सुकायला लागतील मुळव्याधीत आराम मिळेल.


*मोहरीचे तेल सकाळी आणि संध्याकाळी कोंबावर लावा. कोंब 4-5 दिवसात कोरडे होऊन सुकतील 10 दिवसातच आराम मिळेल.


* सोसेल एवढे गरमपाणी घेऊन त्यात मुठभर मीठ घालून रोज तो भाग शेकला जाईल या हिशोबाने त्या पाण्यात बसा मुळव्याधीचे कोंब सुकायला लागतील.


*रात्री झोपताना कुमकुमादी तैलात एक कापसाचा बोळा बुडवून तो गुदद्वाराच्या जागेवर ठेवा दहा पंधरा दिवसांत कोंब सुकायला लागतील.


* पांढरे तीळ चमचाभर आणि तूप चमचाभर एकत्रितपणे रोज सकाळी व रात्री खात जा मुळव्याधीच एक दोन महीन्यात समुळ उच्चाटन


होईल.


* चमचाभर मुळ्याचा रस त्यात चमचाभर मोहरीच तेल एकत्र करून रोज खात जा मुळव्याध आठ ते दहा दिवसात ठीक होईल. * दालचीनीच तेल व मोहरीच तेल एकत्रित करून कोरफडीचा गर आणि हळद आणि चिमुटभर सैंधव मीठ एकत्रित करून क्रीम तयार करा हे क्रीम कापसाला लावून मुळव्याधीच्या कोंबावर ठेवा मुळव्याधीचे कोंब सुकायला लागतील



Featured post

Lakshvedhi