Wednesday, 19 July 2023

रानभाजी - सुरण 🍀*

 🪗🪗🪗🪗🪗🪗🪗🪗🪗

      *🍀 रानभाजी - सुरण 🍀*

🪗🪗🪗🪗🪗🪗🪗🪗🪗


*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*


*शास्त्रीय नाव* : Amorphophallus paeoniifolius 

*कुळ* : Araceae

*इंग्रजी* : Elephant foot yam

*स्थानिक नावे* - रानसुरण, जंगली सुरण, अरण्य सुरण.


सुरण ही आशिया खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशा मध्ये उगवणारी कंदमूळ प्रकारातील अळूच्या कुलातील वनस्पती आहे. या वनस्पतीच्या कंदाचा प्रामुख्याने भाजी म्हणून वापर होतो. अर्श म्हणजे मूळव्याध. सुरण मूळव्याधीचा नायनाट करते म्हणून त्यास अर्शोघन म्हणतात. कण्दू म्हणजे खाज. सुरण प्रक्रिया न करता खाल्ले असता घशास खाज सुटते, म्हणून त्यास कण्डूल म्हणतात. तसेच त्याच्या पानाच्या हिरव्या देठावर पांढरे चट्टे असल्यामुळे त्यास चित्रदण्डकही म्हणतात. सुरण हे औषधी गुणांनी युक्त आहे म्हणून त्याची ‘कन्दनायक’ अशी ओळख आहे. ही वनस्पती विदर्भ, कोकण आणि पश्चिम घाटातील जंगलांत आढळते. काही ठिकाणी तिची लागवड सुद्धा करतात. 


सुरणाचा कंद ओबडधोबड, अर्धगोलाकृती, चपटा आणि गर्द तपकिरी रंगाचा असतो. हा कंद म्हणजे सुरणाचे रूपांतरीत खोड असते. ही वनस्पती वर्षातील सुमारे आठ महिने सुप्तावस्थेत असते. पावसाळा आला की तिच्या कंदाला कोंब येतो आणि तिची झपाट्याने वाढ सुरू होते. या वनस्पतीचे वैशिष्ट्य असे की तिला एका वर्षी केवळ एक पान आणि त्याच्या पुढील वर्षी फुले येतात. जमिनीबाहेर सरळ उंच खोडासारखा वाढणारा, पांढरे चट्टे असणारा अवयव म्हणजे सुरणाच्या पानाचा देठ. या देठाच्या वरच्या टोकाला छत्राकार संयुक्त पान असते. पानांद्वारे प्रकाशसंश्लेषण करून सुरण त्याच्या कंदामध्ये स्टार्चच्या रूपात अन्न साठविते आणि पुढील वर्षी याच ऊर्जेचा वापर करून फुलोरा किंवा पुष्पविन्यास तयार करते. मोठ्या कंदावर छोटे छोटे कंद तयार होतात, ज्याचा उपयोग शाकीय अभिवृद्धीसाठी होतो.


सुरणामध्ये पुष्पविन्यास हा स्थूलकणिश प्रकार पाहावयास मिळतो. त्याच्या तळाशी १०.१ - १२.७  इंचाची दोन ते तीन तपकिरी रंगाची शल्कपर्णे असतात. या प्रकारात सहपत्रीचे रूपांतर स्थूलकणिशाला संरक्षण देण्यासाठी चॉकलेटी गुलाबी रंगाच्या मोठ्या पानासारख्या जाड अवयवात अर्थात महाछदामध्ये झालेले असते. यात मध्यभागी सुमारे १ मीटर उंचीचा जाड दंडगोलीय भरीव दांडा असतो. या दांड्याच्या टोकाला कीटकांना आकर्षित करण्यासाठी गडद चॉकलेटी किंवा गुलाबी रंगाचे उपांग असते. त्याखाली पिवळ्या रंगाचा ४-५ इंच लांबीचा नर पुष्पविन्यास आणि थोड्या अंतरावर मादी पुष्पविन्यास असतो. या स्थूलकणिशाला एक मंद प्रकारचा घाण वास असल्याने माश्या आकर्षित होऊन त्या परागीभवनाचे काम करतात.


फुलांमध्ये दल किंवा निदल नसून ती सूक्ष्म आणि जवळ जवळ एकवटलेली असतात. नर फुलांमध्ये २-४ अवृंत पुंकेसर असतात. तर मादी फुलामध्ये १-४ कप्पी स्त्रीकेसर असते. कुक्षीपुंज आखूड असून कुक्षी साधी किंवा खंडित असते. परागीभवनानंतर मादी पुष्पविन्यासामध्ये फलधारणा अर्थात कणीस तयार होते. फळ लाल रंगाचे अनष्ठिल प्रकारचे असून त्यात दोन ते तीन बिया असतात. बिया अभ्रूणपोषी असून बृहत अधोबीजपत्री असतात. सुरणाच्या कंदाची आणि पानांची भाजी तसेच काप कटलेटस सुद्धा करतात. सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचा आहारात वापर करतात. त्याच्या कंदात कॅल्शियम ऑक्झॅलेट असल्याने खाज येते. हा खाजरेपणा घालविण्यासाठी त्याचे तुकडे चिंच किंवा आमसुलाच्या पाण्यात भिजत ठेवतात किंवा उकडतात.


*औषधी उपयोग व गुणधर्म*

* सुरण रूक्ष, तुरट, तिखट गुणधर्मांचे आहे. भूक व चव वाढविते. दमा, श्वासनलिकेचा दाह, वांती, पोटदुखी, मूळव्याध, रक्तविकार, हत्तीरोग यांवर उपयुक्त आहे.

* सुरणाचा ताजा कंद क्रियाशील व उद्दीपक, कफोत्सारक असून पुनः बलस्थापित करण्याची क्षमता त्यात आहे.

* सुरणात अ, ब तसेच क ही जीवनसत्त्वे आहेत.

* सुरणाचा कंद लोणच्याच्या स्वरूपात वायुनाशी समजला जातो.

* सुरण अरुची, अग्निमांद्य, दमा, खोकला, जंत, यकृताचे व प्लीहेचे विकार यांवर गुणकारी आहे.

* संधिवातात कंद व बियांचा लेप लावल्यास सूज कमी होते.

* सुरणाच्या कंदाची भाजी मूळव्याधीवर गुणकारी आहे. अर्शातील रक्तवाहिन्याचे संकोचन होते, म्हणून रक्त वाहणाऱ्या अर्श रोगांत सुरण हितावह आहे.

* सुरणाच्या कंदाची भाजी खाल्ल्याने यकृताची क्रिया सुधारते आणि शौचास साफ होते तसेच बद्धकोष्ठता कमी होते.

* आतड्यांच्या तक्रारींवर सुरणाची भाजी खाणे हितकारक असते. तो कृमींचा नायनाट करतो, म्हणून तो कृमिघ्नही आहे.

* आयुर्वेद औषधांमध्ये सुरणाच्या कंदाची पावडर मोठ्या प्रमाणात वापरतात. सुरणापासून बृहतसुरणकबाय आणि सुरानादिवटक हे कल्प तयार केले जातात.


*समीक्षक – बाळ फोंडके*


*पाककृती - सुरण फ्राय*

* साहित्य - अर्धा किलो सुरण, अर्धी वाटी तांदूळ पीठ, पाव वाटी रवा, ५-६ कोकम, पाव कप तेल, १ टिस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, चवी पुरते मीठ.

* कृती - सुरणाचे त्रिकोणी तुकडे करून घेणे. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद व कोकम टाकून दहा मिनिटे शिजवून घेणे. रवा तांदूळ पीठ मसाले एकत्र मिक्स करून घ्या. सुरणाचा प्रत्येक काप वरील मिश्रणामध्ये घोळवून घ्या. तव्यावर तेल टाकून ते चांगले गरम होऊ द्या. त्यात घोळवलेले सुरणाचे काप फ्राय करून घ्या. गरमा गरम काप चपाती सोबत किंवा असेच खाऊ शकता.

*पाककृती - सुरण मसाला*

* साहित्य - अर्धा किलो सुरण, २ कांदे, २ टोमॅटो, ८ लसणाच्या पाकळ्या, १ इंच आलं, पाव वाटी कोथिंबीर, २ टीस्पून संडे स्पेशल मसाला, पाव चमचा हळद, १ चमचा तिखट, २ टीस्पून धणे जीरे पावडर, १० कढीपत्त्याची पाने, टेबलस्पून तेल, चवी नुसार मीठ, सुपारी एवढा गुळाचा खडा, अर्धा चमचा मोहरी, चिमुटभर हिंग.

* कृती - प्रथम सुरणाची सालं काढून त्याच्या बारीक फोडी कराव्या. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. आलं लसूण बारीक ठेचून घ्यावं. कोथिंबीर बारीक कापून घ्यावी. भाजीचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावं. तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग व मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आलं व लसूण ठेचलेलं घालून छान परतावं. त्यामध्ये हळद, तिखट, मसाला, गूळ मीठ, धने, जीरे पावडर सगळं घालून छान परतावं. झाकण ठेवून त्याला तेल सुटू द्यावं. मग त्यामध्ये थोडे पाणी घालून झाकण ठेवावं व मसाला छान परतून घ्यावा. मग सुरणाच्या फोडी धूउन त्यामध्ये घालाव्या व एकजीव करावे. थोडे पाणी घालावे व झाकण लावून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या कराव्या. कुकर थंड झाला कि कोथंबीर घालून भाजी चपाती भाकरी भाताबरोबर खाऊ शकतो. 


*संदर्भ : मराठी विश्वकोश*

अलिबाग जिल्हा रुग्णालयासाठीनवीन अद्ययावत इमारत उभारणार

 अलिबाग जिल्हा रुग्णालयासाठीनवीन अद्ययावत इमारत उभारणार


- रवींद्र चव्हाण


 


            मुंबई, दि. १८ : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९८०-८१ मध्ये करण्यात आले आहे. या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले असून त्याची दुरूस्ती आणि पुनर्बांधणी आवश्यक आहे. यामुळे रूग्णालयाची सहा मजल्यांची नवीन इमारत उभारण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.


            मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, जिल्हा रुग्णालयाच्या जागेतच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. महाविद्यालय प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयात झालेल्या करारानुसार तीन वर्षापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाला रुग्णालयातील रुग्णसेवा, पायाभूत सुविधा उपयोगात आणता येणार आहेत. कराराच्या तीन वर्षानंतर वैद्यकीय महाविद्यालय उसर येथे होईल. तोपर्यंत रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


            संरचनात्मक परीक्षणानुसार इमारतीचे डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. इमारतीच्या 58 खांबांपैकी 17 खांब काढून पूर्णपणे नवीन करण्यात आले आहेत. इतर खांबांचे काम पुढील काळात करण्यात येणार आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सहा मजल्यांची इमारत बांधण्यात येईल, अशी माहितीही मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.


            या चर्चेत सदस्य जयंत पाटील, प्रवीण दरेकर, डॉ.मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्टगावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार

 पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्टगावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार


- मंत्री उदय सामंत


 


            मुंबई, दि. 18 : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


            पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नांदेड किरकीटवाडी व नांदोशी या गावांना 3 हजार मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या नांदेड विहीर येथे पाणी आणून या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचे द्रावण टाकून या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


             तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरू आहे.


             या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.


००००

भुसावळ बस पोर्टबाबत वस्तुस्थिती तपासून कार्यवाही

 भुसावळ बस पोर्टबाबत वस्तुस्थिती तपासून कार्यवाही


- मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि. 18 : भुसावळ हे रेल्वेचे मोठे जंक्शन असून याठिकाणी असणाऱ्या बस स्थानकावरही प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने याठिकाणी बस पोर्ट उभारण्याबाबत वस्तुस्थिती तपासून कार्यवाही केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले.


            सदस्य संजय सावकारे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते.


            राज्यात सध्या एकूण 598 बसस्थानके आहेत. त्यापैकी 109 बसस्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. सध्या 63 कामे सुरु असून 97 कामे प्रस्तावित आहेत. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. बसस्थानके चांगली करणे आणि त्याठिकाणी आवश्यक सोयीसुविधा देण्यावर राज्य शासनाचा भर आहे. भुसावळ येथेही बस पोर्ट उभारण्याबाबत यापूर्वी काही कार्यवाही झाली असेल तर ती वस्तुस्थिती तपासून त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल.


            राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रीक बसेस दाखल होतील. त्यातील काही बसेस भुसावळ येथे उपलब्ध करुन देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करु, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य बळवंत वानखेडे यांनीही सहभाग घेतला. 

मुंबई महानगरपालिकेच्यारुग्णालयांचे फायर ऑडिट करणार

 मुंबई महानगरपालिकेच्यारुग्णालयांचे फायर ऑडिट करणार


- उद्योग मंत्री उदय सामंत


             मुंबई, दि. 18 : मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयांचे लवकरच फायर ऑडिट करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


             मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने धोका निर्माण झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री सुनील राऊत, अमित देशमुख, सुनील प्रभू, अमिन पटेल, आशिष शेलार, राम कदम, राजेश टोपे, अजय चौधरी, रवी राणा यांनी उपस्थित केला होता.


               मंत्री श्री. सामंत म्हणाले, मुंबई महानगरपालिका अंतर्गत असलेल्या विविध रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. ज्या रुग्णालयांचे फायर ऑडिट राहिले आहे. किंवा काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या लवकर पूर्ण करून अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आणि फायर ऑडिट प्रक्रिया ९० दिवसात करण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल,असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.


0000

अंधेरीतील मोगरा नाल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार

 अंधेरीतील मोगरा नाल्यावरील

अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार

मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 18 : अंधेरी (पश्चिम) 'केप्रभागातील मोगरा नाल्यावर अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईलअसे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

            मुंबईतील अंधेरी (पश्चिम) 'केप्रभागातील मोगरा नाल्यावरील अनधिकृत बांधकामाबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री रणजित कांबळेअशोक चव्हाणयोगेश सागरअमित साटमनाना पटोलेसुनील प्रभूडॉ.भारती लव्हेकरआशिष शेलारराम कदमवर्षा गायकवाडयांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीमोगरा नाल्यावर झालेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून या परिसरात पाणी साचणार नाही. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील.

0

कृषी विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या राज्यपालांच्या सूचना

 कृषी विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या

राज्यपालांच्या सूचना

 

            मुंबई, दि. 18 : कृषी हा देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्याच्या कृषी विकासात कृषी विद्यापीठांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांच्या विविध समस्यांचे निराकरण प्राधान्याने करून विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे दिल्या. 

            राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राजभवन येथे संपन्न झालीत्यावेळी ते बोलत होते. 

            बैठकीला  कृषी  विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमारवित्त विभागाचे (व्यय) अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्तामहाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

            विद्यापीठांच्या कुलगुरूंना विद्यापीठांमध्ये बांधकाम करण्यासाठी तसेच यंत्रसामग्री खरेदीसाठी ठरवून दिलेली निधीची कमाल मर्यादा फार पूर्वी ठरविण्यात आली असून कुलगुरुंचे वित्तीय अधिकार वाढवून देण्यासाठी शासन स्तरावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना राज्यपालांनी या बैठकीत केल्या. राज्यपालांनी सर्व कृषी विद्यापीठांमध्ये रिक्त असलेल्या अध्यापक तसेच बिगर शिक्षकांच्या पदांचा आढावा घेतला व रिक्त जागा भरण्याबाबत विद्यापीठ तसेच शासनातर्फे केल्या जात असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.  

कृषी विद्यापीठांच्या जमीन वापराबाबत लवकरच धोरण – अनुप कुमार

            राज्यातील कृषी विद्यापीठांकडे उपलब्ध असलेल्या जमिनींसंदर्भात विविध घटकांकडून मागणी होत असते. यासंदर्भात एक समग्र 'जमीन वापर धोरणतयार करण्याबाबत शासन विचार करीत असल्याची माहिती कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार यांनी बैठकीत दिली.  जागतिक हवामान बदलांमुळे राज्यात अतिवृष्टी व अनावृष्टीची वारंवारता वाढली आहे असे नमूद करून कृषी विद्यापीठांनी या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी लागवडीबाबत मार्गदर्शक प्रणाली तयार करावी अशी सूचना त्यांनी केली.    

            बैठकीत उच्च कृषी शिक्षण कायद्याची अंमलबजावणी करणेकृषी वैज्ञानिक व विद्यार्थ्यांना विदेश दौऱ्यावर पाठविण्यासाठी कुलगुरूंना प्राधिकृत करणेनोकरीत असलेल्या उमेदवारांना अध्ययन रजा देण्याबाबत अधिकार कुलगुरुंना देणेखासगी कृषी महाविद्यालयांचे व्यवस्थापन सुधारणेविद्यापीठांचा आकस्मिकता निधी वाढवणेइत्यादी विषयांवर चर्चा झाली. 

            महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटीलडॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शरद गडाखवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणि व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय भावे यांनी बैठकीत आपापल्या विद्यापीठांच्या समस्या मांडल्या.

००००


 

Maharashtra Governor presides over meeting of Agri Universities

      Maharashtra Governor Ramesh Bais presided over a meeting of vice chancellors of agricultural universities in the State at Raj Bhavan Mumbai on Tue (18 July).

      The meeting discussed the issues of increasing financial powers of vice chancellors, filling of vacant teaching and non teaching posts in universities, implementation of Model Act for Higher Agricultural Education in India, Empowerment of Vice Chancellors to depute scientists to proceed on foreign tours, restoring Contingency Grants to universities and others.

      Additional Chief Secretary Agriculture Anoop Kumar, Additional Chief Secretary Finance (Expenditure) O.P. Gupta, DG, MCAER Raosaheb Bhagde and officials were present.

      Vice Chancellor of Dr Panjabrao Deshmukh Krishi Vidyapith Dr Sharad Gadakh, Vice Chancellor of Vasantrao Naik Marathwada Agricultural University Dr Indra Mani, Vice Chancellor of Mahatma Phule Agricultural University Dr P G Patil and Vice Chancellor of Dr Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dr Sanjay Bhave raised the issues concerning their universities.

००००


 

Featured post

Lakshvedhi