Tuesday, 18 July 2023

दही जमा देनें वाला हाबूर_पत्थर -----------

 दही जमा देनें वाला  हाबूर_पत्थर

-----------

दही जमाने के लिए लोग अक्सर जामन ढूंढ़ते नजर आते हैं... वहीं राजस्थान के जैसलमेर जिले में स्थित इस गांव में जामन की जरूरत नहीं पड़ती है...यहां ऐसा पत्थर है जिसके संपर्क में आते ही दूध जम जाता है... इस पत्थर पर विदेशों में भी कई बार रिसर्च हो चुकी है...फॉरेनर यहां से ले जाते हैं इस पत्थर के बने बर्तन....।

स्वर्णनगरी जैसलमेर का पीला पत्थर विदेशों में अपनी पहचान बना चुका है... इसके साथ ही जिला मुख्यालय से 40 किमी दूर स्थित हाबूर गांव का पत्थर अपने आप में विशिष्ट खूबियां समेटे हुए है..इसके चलते इसकी डिमांड निरंतर बनी हुई है...हाबूर का पत्थर दिखने में तो खूबसूरत है ही, साथ ही उसमें दही जमाने की भी खूबी है... इस पत्थर का उपयोग आज भी जिले के ग्रामीण क्षेत्रों में दूध को जमाने के लिए किया जाता है... इसी खूबी के चलते यह विदेशों में भी काफी लोकप्रिय है..इस पत्थर से बने बर्तनों की भी डिमांड बढ़ गई है..।

कहा जाता है कि जैसलमेर पहले अथाह समुद्र हुआ करता था और कई समुद्री जीव समुद्र सूखने के बाद यहां जीवाश्म बन गए व पहाड़ों का निर्माण हुआ.. हाबूर गांव में इन पहाड़ों से निकलने वाले इस पत्थर में कई खनिज व अन्य जीवाश्मों की भरमार है.

जिसकी वजह से इस पत्थर से बनने वाले बर्तनों की भारी डिमांड है। साथ ही वैज्ञानिकों के लिए भी ये पत्थर शोध का विषय बन गया है... इस पत्थर से सजे दुकानों पर बर्तन व अन्य सामान पर्यटकों की खास पसंद होते हैं और जैसलमेर आने वाले वाले लाखों देसी विदेशी सैलानी इसको बड़े चाव से खरीद कर अपने साथ ले जाते हैं...।

क्यों है खास

हाबूर का पत्थर

इस पत्थर में दही जमाने वाले सारे कैमिकल मौजूद है... विदेशों में हुए रिसर्च में ये पाया गया है कि इस पत्थर में एमिनो एसिड, फिनायल एलिनिया, रिफ्टाफेन टायरोसिन हैं... ये कैमिकल दूध से दही जमाने में सहायक होते हैं... इसलिए इस पत्थर से बने कटोरे में दूध डालकर छोड़ देने पर दही जम जाता है…. इन बर्तनों में जमा दही और उससे बनने वाली लस्सी के पयर्टक दीवाने हैं... अक्सर सैलानी हाबूर स्टोन के बने बर्तन खरीदने आते हैं... इन बर्तनों में बस दूध रखकर छोड़ दीजिए, सुबह तक शानदार दही तैयार हो जाता है, जो स्वाद में मीठा और सौंधी खुशबू वाला होता है... इस गांव में मिलने वाले इस स्टोन से बर्तन, मूर्ति और खिलौने बनाए जाते हैं... ये हल्का सुनहरा और चमकीला होता है.. इससे बनी मूर्तियां लोगों को खूब अट्रैक्ट करती हैं..।

कुणाचं नाव चटकन आठवत नाही, कामांचा विसर पडतो? ४ गोष्टी खा, स्मरणशक्ती वाढेल.....*

 *कुणाचं नाव चटकन आठवत नाही, कामांचा विसर पडतो? ४ गोष्टी खा, स्मरणशक्ती वाढेल.....*


कामाच्या व्यापात आपण खूप काही गोष्टी करायला विसरतो. मन स्थिर नसेल, किंवा लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे लागले असेल की, आपल्याकडून नकळत अनेक कामांकडे कानाडोळा होतो. काही लोकं कामाच्या व्यापात इतके गुंतता की स्वतःकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. अशा परिस्थितीत शारीरिक आरोग्यासोबतच बौद्धिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढते.


अति व्यापामुळे मेंदूलाही थकवा जाणवतो. जर मेंदूला तीक्ष्ण करायचे असेल तर, आहारात या ३ गोष्टींचा समावेश करा. यासंदर्भात, एमडी एमईडी, डीएम न्यूरोलॉजी डॉक्टर प्रियांका शेरावत सांगतात, ''मेंदूची कॉग्नीटिव स्किल वाढवायची असेल तर, आहारात काही बदल करणे गरजेचं आहे. काही पदार्थ आजपासून खाण्यास सुरुवात करा. ज्यामुळे मेंदूला नवीन चालना मिळेल, व फ्रेश वाटेल''


*स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खा हे पदार्थ...*


*ओमेगा-३...*

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ओमेगा-३ व फॅटी ऍसिडयुक्त पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात करा. डॉक्टर प्रियांका यांच्या मते, ''दिवसाची सुरुवात नेहमी २ बदाम आणि २ अक्रोडने खाऊन करा. हे पदार्थ मेंदूचे कार्य आणि विकास दोन्ही सुधारतात.''


*व्हिटॅमिन सी फळे...*

फळांचे सेवन करण्यासाठी उन्हाळा हा उत्तम ऋतू आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी फळांचे सेवन करा. यासाठी आहारात संत्री, किवी, हंगामी फळांचा समावेश जरूर करावा. जे आरोग्यासाठी व मेंदूसाठी एक उत्तम आहार आहे.


*झिंक समृद्ध पदार्थ...*

डॉक्टरांच्या मते, ''अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले की, मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी आहारात झिंकचा समावेश हवाच. हे पोषण संपूर्ण धान्य, शेंगा इत्यादींमध्ये आढळते.


*फ्लेक्स सीड्स आणि डार्क चॉकलेट...*

अनकेदा मूडचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो. ते वाढवण्यासाठी डार्क चॉकलेटचा आहारात समावेश करा. त्यात ओमेगा-३, फॅटी एसिड्स आढळते. ज्यामुळे अधिक कॅलरीज वाढत नाही, यासह फ्लॅक्स सीड्स खाणेही फायदेशीर ठरते.


*©कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार, 


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

जीवनसत्त्वे आणि त्यांचे महत्व.*

 *जीवनसत्त्वे आणि त्यांचे महत्व.*

*आपल्या शरीरासाठी लागणारा सर्वात आवश्यक असा घटक आहे.*



 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजारांचा  सामना करावा लागू शकतो. जीवनसत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ते शरीराच्या प्रत्येक कार्याला चालना देताता. प्रत्येक जीवनसत्त्वाचे कार्य वेगवेगळे असते. जर तुमच्या शरीरात एखाद्या जीवनसत्त्वाचा अभाव असेल तर तुम्हाला त्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उदा: जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमी असेल तर तुम्हाला, हाडे दुखणे, थकवा येणे, कामात उत्साह न वाटणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीरात जीवनसत्त्वांची पातळी योग्यप्रमाणात राहण्यासाठी तज्ज्ञांकडून आहारात विविध पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात येतो. तुमच्या शरीरासाठी कोणते जीवनसत्त्वे आवश्यक आहे, त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.


व्हिटॅमिन ए


रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, दृष्टी दोष दूर होण्यासाठी तसेच त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन एची आवश्यकता असते. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन एची कमतरता असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. तसेच डोळ्यांशी संबंधित विविध समस्या देखील निर्माण होऊ शकतात.


व्हिटॅमिन बी


व्हिटॅमिन बी मध्ये B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 अशा आठ प्रकारांचा समावेश होतो. हे सर्व व्हिटॅमिन शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. व्हिटॅमिन बी

हे तुमच्या मज्जासंस्थेसाठी अत्यंत गरजेचे असते. दही, दूध, केळी आणि मशरूमच्या सेवनातून तुम्हाला व्हिटॅमिन बी मिळू शकते.


व्हिटॅमिन सी


व्हिटॅमिन सीला एस्कॉर्बिक ऍसिड असेही म्हणतात. व्हिटॅमिन सी हे सर्वात महत्वाच्या जीवनसत्त्वांपैकी एक आहे. हे केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही तर त्यात अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. ते शरीराला हानी पोहोचवणारे मुक्त रॅडिकल्स रोखण्यात मदत करतात. हे तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.


व्हिटॅमिन डी


कॅल्सीफेरॉल सामान्यतः व्हिटॅमिन डी म्हणून ओळखले जाते. व्हिटॅमिन डी हा एक महत्त्वाचा पोषक घटक आहे. कारण ते हाडे आणि दात निरोगी ठेवण्यास मदत करते. इतकेच नाही तर व्हिटॅमिन डी मेंदूच्या कार्याला देखली चालना देते. कवळे ऊन हा व्हिटॅमिन डीचा उत्तम स्त्रोत आहे.


व्हिटॅमिन ई


व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसाच्या उत्तम आरोग्यसाठी गरजेचे असते. व्हिटॅमिन ईमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ई मुळे चयापचयाची प्रक्रिया अधिक गतीमान होते. शेंगादाने हा व्हिटॅमिन ईचा उत्तम स्त्रोत आहे.


व्हिटॅमिन के


व्हिटॅमिन के हे तुम्हाला विविध प्रकारच्या कर्करोगापासून दूर ठेवण्याचे कार्य करते. विविध प्रकारच्या पालेभाज्या तसेच मासे हे व्हिटॅमिन केचे उत्तम स्त्रोत आहेत.

प्रमोद पाठक.


_*(

बळीराजासह जनसामान्यांच्या शासन पाठीशी

 बळीराजासह जनसामान्यांच्या शासन पाठीशी


-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


          मुंबई, दि. 16: राज्यातील जनतेला मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून बळीराजासह जनसामान्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


             विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर तसेच संबंधित मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पावसाळी अधिवेशनाकडून सामान्य जनतेच्या अपेक्षा आहेत याची जाणीव ठेवून या अधिवेशनातून सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने शासन गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवत असून ‘शासन आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जनसामान्यांना सुलभतेने योजनांचे लाभ मिळवून देत आहे. या उपक्रमात आतापर्यंत 70 लाख लोकांना लाभ मिळाला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर असून मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत 86 कोटी रुपयांचे वितरण गरजूंना करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जनतेला 5 लाखापर्यंतचा उपचार मिळणार आहे. राज्यात सातशे ठिकाणी ‘बाळासाहेब आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. ‘लेक लाडकी’ योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन तर महिलांना एसटी प्रवासामध्ये 50 टक्के सवलतीचा निर्णय तसेच 75 वर्षावरील जेष्ठ नागरीकांना मोफत एसटी प्रवास ही योजनाही लक्षणीय प्रमाणात यशस्वी झाली आहे. मूलभूत सोयीसुविधांच्या सक्षमीकरणासोबतच राज्याच्या गतीमान विकासाठी अनेक पायाभूत प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहेत. सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक होतील याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यासोबत राज्यात जास्तीत जास्त प्रकल्प आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विधीमंडळाच्या सभागृहात जे जे प्रश्न उपस्थित होतील, त्यांना योग्य न्याय देण्याचे काम शासन करेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


 


 


परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            सन 2022-23 मध्ये परकीय गुंतवणूकीत (एफडीआय) महाराष्ट्रामधील गुंतवणूक 2.38 लाख कोटींवर गेली असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठीच्या उद्योजकांच्या विश्वासाला अधोरेखित करणारी ही बाब आहे. राज्यात आतापर्यंत समाधारकारक पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. या सर्व गोष्टींवर सरकारचे लक्ष असून त्यादृष्टीने अधिवेशन काळात चर्चा केल्या जाईल असे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अधिवशेनात राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यत येईल. तसेच विरोधकांद्वारे विविध आयुधांच्या माध्यमातून मांडण्यात येणाऱ्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिल्या जातील. बळीराजासाठी योग्य ते सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असल्याची ते म्हणाले.


            यावेळी राज्य शासनाच्या वतीने पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येनिमित्त आयोजित चहापान कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह मंत्रीमंडळातील इतर मंत्री, विधीमंडळ सदस्य उपस्थित होते.


महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन-2023


विधान परिषदेत प्रलंबित विधेयके -1


संयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयक -1


पूर्वीचे प्रलंबित विधेयके एकूण -2


प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त)- 10


एकूण -14


पटलावर ठेवावयाचे अध्यादेश -6


(1) सन 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 1.- महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, 2023 (ग्राम विकास विभाग) (सन 2023 चा महा. अध्या. क्र.1) (जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत देणे)


(2) सन 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक.2.-महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अध्यादेश, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग) (सन 2023 चा महा. अध्या. क्र.2) (सदस्यांच्या सक्रीय सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठीची तरतूद)


(3) सन 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 3.- महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना (सुधारणा ) अध्यादेश, 2023 (नगर विकास विभाग) (नियोजन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे विकास योजनेचा मसूदा सादर करण्याचा कालावधी वाढविण्याची तरतूद करणे) (नगर विकास विभाग)


(4) सन 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 4.- महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा अध्यादेश, 2023 (उद्योग उर्जा व कामगार विभाग) (महाराष्ट्र राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्यची गरज लक्षात घेता, राज्यात अधिकाधिक गुंतवणुक आकर्षित करणेसाठी तसेच राज्यामध्ये व्यवसाय सुलभीकरण करण्यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेले परवाने, संमती विहीत वेळेत मिळवण्यासाठी तसेच त्याद्वारे उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी एक खिडकी योजनेला वैधानिक दर्जा मिळवण्याची तरतुद करण्याकरिता)


 (5) सन 2023 चा महा. अध्या. क्र.5- महाराष्ट्र सहकारी संस्था (दूसरी सुधारणा) अध्यादेश, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग).


(6) सन 2023 चा महा. अध्या. क्र.6- महाराष्ट्र (ग्रामपंचायतींच्या, जिल्हा परिषदांच्या व पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणूकांकरिता) वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे अध्यादेश, 2023 (ग्राम विकास विभाग).


विधान परिषदेत प्रलंबित विधेयके


(1) स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


संयुक्त समितीकडे प्रलंबित


(1) महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग)


प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त)


 (1) महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, 2023 (ग्राम विकास विभाग) (अध्या. क्र. 1 चे रुपांतरीत विधेयक) (जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत देणे)


(2) महाराष्ट्र सहकारी संस्था (दूसरी सुधारणा) विधेयक, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग) (अध्या. क्र. 2 चे रुपांतरीत विधेयक) (सदस्यांच्या सक्रीय सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठीची तरतूद करणे)


(3) महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना (सुधारणा) विधेयक, 2023 (नगर विकास विभाग) (नियोजन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे विकास योजनेचा मसूदा सादर करण्याचा कालावधी वाढविण्याची तरतूद करणे) (अध्या. क्र. 3 चे रुपांतरीत विधेयक)


(4) महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक, 2023 (उद्योग उर्जा व कामगार विभाग) (अध्या. क्र. 4 चे रुपांतरीत विधेयक) (महाराष्ट्र राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्यची गरज लक्षात घेता, राज्यात अधिकाधिक गुंतवणुक आकर्षित करणेसाठी तसेच राज्यमध्ये व्यवसाय सुलभीकरण करण्यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेले परवाने, संमती विहीत वेळेत मिळवण्यासाठी तसेच त्याद्वारे उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी एक खिडकी योजनेला वैधानिक दर्जा मिळवण्याची तरतुद करण्याकरिता विधेयक)


(5) महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग) (अध्या. क्र. 5 चे रुपांतरीत विधेयक) 


(6) महाराष्ट्र (ग्रामपंचायतींच्या, जिल्हा परिषदांच्या व पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणूकांकरिता) वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविने विधेयक, 2023 (ग्राम विकास विभाग) (अध्या. क्र. 6 चे रुपांतरीत विधेयक) 


(7) महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) (सुधारणा) विधेयक, 2023. (लॉकिंग पिरेड कमी करणे) (गृहनिर्माण विभाग)


(8) महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (कृषि व पदुम विभाग)


(9) महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2023 (वित्त विभाग).


(10) महाराष्ट्र महानगरपालिका (सु

धारणा) विधेयक, 2023.


00000


 


राज्यपालांची युद्धनौकेला भेट; पाणबुडीची देखील केली पाहणी

 राज्यपालांची युद्धनौकेला भेट; पाणबुडीची देखील केली पाहणी


            मुंबई, दि. १७ : राज्यपाल रमेश बैस यांनी आज भारतीय नौसेनेच्या आयएनएस विशाखापट्टनम या युद्धनौका व आयएनएस वेला या स्कॉर्पियन पाणबुडीला भेट देऊन पाहणी केली. 


            नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला व आयएनएस विशाखापट्टनमचे कमान अधिकारी कॅप्टन अशोक राव यांनी राज्यपालांचे स्वागत केले व त्यांना युद्धनौकेची माहिती दिली.


            आयएनएस वेलाचे कमोडोर श्रीराम अमूर व कमान अधिकारी मिथिलेश उपाध्याय यांनी राज्यपालांना आयएनएस वेला पाणबुडीची माहिती दिली.


००००


Maharashtra Governor visits Warship; also inspects Submarine


      Mumbai, 17th July : Maharashtra Governor Ramesh Bais inspected the warship INS Visakhapatnam and Scorpion Submarine INS Vela in Mumbai.


            Chief of Staff, Western Naval Command Vice Admiral Sanjay Bhalla, NM and Commanding Officer Capt Ashok Rao apprised the Governor about the Warship.


            The visit to the Submarine INS Vela was conducted by Commodore Sriram Amur and Commanding Officer Mithilesh Upadhyay.


0000

मंत्री संजय बनसोडे यांनी घेतलाक्रीडा विभागाच्या कामाचा आढावा

 मंत्री संजय बनसोडे यांनी घेतलाक्रीडा विभागाच्या कामाचा आढावा


            मुंबई, दि. 17 : राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खेळाडूंना प्रशिक्षण, मार्गदर्शनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे देण्यास प्राधान्य असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.


            मंत्रालयात क्रीडा व युवक कल्याण विभागाचा सविस्तर आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, ऑलिम्पिक आणि आशियायी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना सर्व प्रकारचे मार्गदर्शन, सहकार्य उपलब्ध करण्यात करून देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबविण्यात येतील. सर्वस्तरावरील व सर्व खेळ प्रकारातील खेळाडूंना शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधा नियमितपणे व वेळेत देण्यात येतील.


            नुकतेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार लवकरात लवकर प्रदान करण्यात येईल.


            केंद्र व राज्य शासनाच्या खेळाडूंसाठीच्या विविध योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात बाल हक्क संरक्षण अधिनियमाचीप्रभावी अंमलबजावणी करणार

 राज्यात बाल हक्क संरक्षण अधिनियमाचीप्रभावी अंमलबजावणी करणार


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


             मुंबई, दि. 17 : राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक बालकाच्या व्यक्त‍िमत्वाचा सर्वांगीण विकासावर भर देण्यात येईल. बालहक्क संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.


            राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड. सुशिबेन शहा यांनी विधानभवन येथे दिलेल्या भेटीवेळी मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.


              महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास करून त्यांच्या व्यक्त‍िमत्वाचा संपूर्ण क्षमतेने विकास करण्यासाठी महिला व बालविकास विभाग विविध योजना राबवित आहे. या योजनांना गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कुपोषण मुक्तीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, बालकांचे संगोपन, सुरक्षित व योग्य रित्या होण्यासाठी काळजी घेण्यात येईल. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून बालकांच्या विकासासाठी व जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची जास्तीत जास्त माहिती पोहोचवावी. कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या बालकांना विशेष संरक्षण आणि मदत मिळण्याचा हक्क देण्यासाठी ही महिला व बालविकास अनेक योजना राबवित आहे. या योजनांना अधिक गती देण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


            राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती आयोगाच्या अध्यक्ष अॅड. शहा यांनी दिली.


*****

Featured post

Lakshvedhi