Saturday, 15 July 2023

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना दुःख

 ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना दुःख

            मुंबई, दि.15: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


            'रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून महाजनी यांनी चित्रपटात केलेली आपली कारकीर्द मराठी रसिकांच्या निश्चितच लक्षात राहण्यासारखी आहे. त्यांच्या निधनाने एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली’,असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे



रवींद्र महाजनी यांच्या निधनानेएक रुबाबदार अभिनेता गमावला


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, 15 : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील एक रुबाबदार अभिनेता हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, रवींद्र महाजनी यांचे झुंज, मुंबईचा फौजदार, लक्ष्मीची पाऊले यांसारख्या चित्रपटात केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांना आणि त्यांच्या अभिनयाला देखणा हे विशेषण शोभून दिसायचे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर कुटुंबियांना देवो, हीच प्रार्थना.


0000


ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली


            मुंबई, दि.15:- मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने दमदार अभिनय असणारे रुबाबदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली अर्पण केली. 


            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, देखणे व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशके अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रवींद्र महाजनी यांच्या अभिनयाने मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने एक देखणा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचे निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


*****

रवींद्र महाजनी यांची ‘एक्झिट’ वेदनादायी

                                                  : सुधीर मुनगंटीवार


            मुंबई : 'झुंज' या चित्रपटातून 1975 साली मराठी चित्रपट सृष्टीतून कारकीर्द सुरू करणारे चतुरस्त्र अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट व कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांची एक्झिट अतिशय वेदनादायी आहे, अशी शोकभावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.


            रवींद्र महाजनी हे त्यांच्या देखण्या आणि भारदस्त व्यक्तीमत्वामुळे 1980 च्या दशकात 'चॉकलेट हिरो' म्हणून प्रसिद्ध होते. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, दुनिया करी सलाम अशा चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. त्यांची देऊळबंद चित्रपटातील संत श्री गजानन महाराज यांची भूमिका छोटी पण लक्षात राहणारी आहे.


            रवींद्र महाजनी यांच्या निधनाने त्यांचा चाहता वर्ग, मराठी चित्रपट सृष्टी आणि त्यांचा परिवार सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी या गुणवान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


000

दिलखुलास, 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या

 दिलखुलास, 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या


आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांची मुलाखत


 


            मुंबई, दि. 14 : पावसाळ्यात मुंबई मध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच पावसाळ्यातील आपत्कालिन परिस्थितीवर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत विविध यंत्रणांशी समन्वय करून नियोजन करण्यात आले असल्याचे संचालक महेश नार्वेकर यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले आहे.


            आपत्कालीन व्यवस्थापन हा आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख भाग असून यामध्ये बचाव, शोध आणि शून्य मृत्यू हे महत्वाचे उद्दिष्ट आहे. पीडितांना आपत्कालिन काळात मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन दलाकडून त्वरित प्रतिसाद देण्यात येतो. त्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येतो. शासन-प्रशासन यंत्रणेच्या जोडीने मुंबई महापालिकेमार्फत आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान आणि आपत्ती पश्चात सूक्ष्म नियोजन करून कोणकोणती कामे करण्यात येतात तसेच कोणती खबरदारी घेण्यात येते, याबाबतची सविस्तर माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि.15, सोमवार दि.17 आणि मंगळवार दि. 18 जुलै 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. 18 जुलै 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे. 


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक


 ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR  


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASH

TRADGIPR


0000


गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर

 गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर

- दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. १४ : राज्यात दूधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा महत्वपूर्ण शेतकरी हिताचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.  

            राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधींसोबत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्त्वाची बैठक झाली.



             सहकारी आणि खासगी दूध संघांचा परिचालन खर्च, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा, या अनुषंगाने दूध दर निश्चितीसाठी शासन निर्णयान्वये समिती गठित करण्यात आली होती. सहकारी व खासगी दुग्ध क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश असलेल्या या समितीने शासनास केलेल्या शिफारशीनुसार राज्यात गायीच्या दुधासाठी (३.५/८.५) गुणप्रतिकरिता किमान खरेदी दरास मान्यता देतानाच दर विनाकपात दूध उत्पादक शेतकऱ्यांना अदा करणे अभिप्रेत राहील, असा निर्णय शासनाने घेतल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


            दुधाला रास्त भाव मिळावा यासोबतच देशातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर ३ महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करावी. विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास, शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार ३ महिन्याच्या आतही समितीने दूध दराबाबत शासनास शिफारस करावी, किमान दूध दराची अंमलबजावणीबाबत जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांच्यामार्फत शासनास दरमहा अहवाल सादर करावा असे निर्देश समितीला देण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिली आहे.






०००००

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर    

 

            मुंबईदि.१४ : सन 2019-20,2020-21 व 2021-22 असे तीन वर्षांचे एकूण ११७ क्रीडा पुरस्कार क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज सेवासदन या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

            शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार सन २०१९-२० श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे), सन २०२०-२१  दिलीप बळवंत वेंगसरकर आणि सन २०२१-२२ आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावेक्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षीमार्गदर्शकखेळाडूंच्या कार्याचा  गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.

करपट ढेकरा सारख्या येतात.* *मग हे करून पहा*

 *करपट ढेकरा सारख्या येतात.* *मग हे करून पहा*


१) विकारात सोडा पिणे फायदेशीर आहे. सोडा असॅडिक असल्यामुळे गॅसपासून मुक्ती मिळते.

 

 २)काही न मिसळता ताज्या लिंबाचे रस प्यावं.

 

 ३)आल्याचा चहा पिण्याने किंवा आल्याचा रस मध मिसळून पिण्याने फायदा होतो.

 

 ४)सतत ढेकर येत असल्यास तोंडात एक लवंग ठेवून चोखावी.

*निरामय आयुर्वेद प्रचार.तुमच्या आरोग्यासाठी निस्वार्थी सेवा.*

 

५)उचकी किंवा ढेकर येत असल्यास गार दूध पिण्याने फायदा होतो.

६)ढेकर येत असल्यास कोथिंबीरची दंडी चावावी.


 ७)सतत ढेकर येत असल्यास घुट घुट गार पाणी प्यावं.


८)सुतशेखर रस दोन गोळ्या घ्या ढेकरा येणे थांबेलच.


निरामय आयुर्वेद प्रचार


वैद्य. गजानन

मानसिक आणि शारीरिक आरोग्य.*

 *मानसिक आणि शारीरिक आरोग्य.* 


आरोग्याचे दोन सर्वात वारंवार चर्चा केलेले प्रकार आहेत.

आध्यात्मिक, भावनिक आणि आर्थिक आरोग्य देखील एकूण आरोग्यासाठी योगदान देते. वैद्यकीय तज्ज्ञांनी याचा संबंध कमी तणाव पातळी आणि सुधारित मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी जोडला आहे.

चांगले आर्थिक आरोग्य असलेले लोक, उदाहरणार्थ, आर्थिक बाबतीत कमी काळजी करू शकतात आणि त्यांच्याकडे अधिक नियमितपणे ताजे अन्न खरेदी करण्याचे साधन असू शकते. चांगले आध्यात्मिक आरोग्य असलेल्यांना शांततेची आणि उद्देशाची भावना वाटू शकते ज्यामुळे चांगले मानसिक आरोग्य मिळते.


आरोग्य विषमता आपल्या सर्वांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करते. आरोग्यामधील सामाजिक विषमता आणि त्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही काय करू शकतो याच्या सखोल माहितीसाठी .


शारीरिक स्वास्थ्य

ज्या व्यक्तीचे शारीरिक आरोग्य चांगले असते त्याच्या शारीरिक कार्ये आणि प्रक्रिया त्यांच्या शिखरावर कार्यरत असण्याची शक्यता असते.


हे केवळ रोगाच्या अनुपस्थितीमुळेच नाही. नियमित व्यायाम, संतुलित पोषण आणि पुरेशी विश्रांती या सर्व गोष्टी चांगल्या आरोग्यासाठी योगदान देतात. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा संतुलन राखण्यासाठी लोक वैद्यकीय उपचार घेतात.

शारीरिक आरोग्यामध्ये रोगाचा धोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे समाविष्ट आहे. शारीरिक तंदुरुस्ती राखणे, उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासाची आणि हृदयाची कार्यक्षमता, स्नायूंची ताकद, लवचिकता आणि शरीराची रचना यांच्या सहनशक्तीचे संरक्षण आणि विकास करू शकते.


शारिरीक आरोग्य आणि तंदुरुस्तीची काळजी घेणे यात दुखापत किंवा आरोग्य समस्यांचा धोका कमी करणे देखील समाविष्ट आहे, 

कामाच्या ठिकाणी धोके कमी करणे

प्रभावी स्वच्छता सराव

तंबाखू, अल्कोहोल किंवा बेकायदेशीर औषधांचा वापर टाळणे

प्रवास करताना विशिष्ट स्थितीसाठी किंवा देशासाठी शिफारस केलेल्या लसी घेणे

एखाद्या व्यक्तीचे एकूण जीवनमान सुधारण्यासाठी चांगले शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्यासोबत काम करू शकते


मानसिक आरोग्यमानसिक आरोग्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचे भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्य. पूर्ण, सक्रिय जीवनशैलीचा भाग म्हणून मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे.


शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्याची व्याख्या करणे कठिण आहे कारण अनेक मनोवैज्ञानिक निदान व्यक्तीच्या त्यांच्या अनुभवाच्या आकलनावर अवलंबून असते.


तथापि, चाचण्यांमधील सुधारणांमुळे, डॉक्टर आता सीटी स्कॅन आणि अनुवांशिक चाचण्यांमध्ये काही प्रकारच्या मानसिक आजारांची काही शारीरिक चिन्हे ओळखण्यास सक्षम आहेत.जीवनाचा आनंद घे

कठीण अनुभवांनंतर परत या आणि प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घ्या

कौटुंबिक आणि वित्त यांसारख्या जीवनातील विविध घटकांमध्ये समतोल राखणे

सुरक्षित आणि सुरक्षित वाटत

त्यांची पूर्ण क्षमता साध्य करा

शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा मजबूत संबंध आहे. उदाहरणार्थ, एखाद्या दीर्घकालीन आजारामुळे एखाद्या व्यक्तीची नियम 

Friday, 14 July 2023

महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांचीबालसुधार गृहास अचानक भेट देत पाहणी

 महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांचीबालसुधार गृहास अचानक भेट देत पाहणी   


            मुंबई, दि.१४:- पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) पुणे (येरवडा)येथील केंद्राला महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवारी रात्री अचानक भेट देत बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली.


            भेटी दरम्यान मुलांची निवासाची सुविधा, त्यांना देण्यात येणारे भोजन यासह अन्य सुविधांसह सरकारकडून देण्यात येणारी मदत आणि बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती डॉ. नारनवरे यांनी घेतली.


            बालसुधारगृहातील २२ विधि संघर्षग्रस्त मुलांशी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. तसेच ज्या ठिकाणी मुले राहतात त्यांचे लॉकर्स, स्वच्छतागृहाची तपासणी केली. याशिवाय स्वयंपाकगृहाची पाहणी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी केली.


            यावेळी बालविकासचे उपायुक्त राहुल मोरे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) केंद्राचे अधीक्षक दत्तात्रय कुटे, उपअभियंता नितीन पवार उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi