Saturday, 15 July 2023

गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर

 गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर

- दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. १४ : राज्यात दूधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा महत्वपूर्ण शेतकरी हिताचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.  

            राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधींसोबत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्त्वाची बैठक झाली.



             सहकारी आणि खासगी दूध संघांचा परिचालन खर्च, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा, या अनुषंगाने दूध दर निश्चितीसाठी शासन निर्णयान्वये समिती गठित करण्यात आली होती. सहकारी व खासगी दुग्ध क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश असलेल्या या समितीने शासनास केलेल्या शिफारशीनुसार राज्यात गायीच्या दुधासाठी (३.५/८.५) गुणप्रतिकरिता किमान खरेदी दरास मान्यता देतानाच दर विनाकपात दूध उत्पादक शेतकऱ्यांना अदा करणे अभिप्रेत राहील, असा निर्णय शासनाने घेतल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


            दुधाला रास्त भाव मिळावा यासोबतच देशातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर ३ महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करावी. विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास, शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार ३ महिन्याच्या आतही समितीने दूध दराबाबत शासनास शिफारस करावी, किमान दूध दराची अंमलबजावणीबाबत जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांच्यामार्फत शासनास दरमहा अहवाल सादर करावा असे निर्देश समितीला देण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिली आहे.






०००००

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर    

 

            मुंबईदि.१४ : सन 2019-20,2020-21 व 2021-22 असे तीन वर्षांचे एकूण ११७ क्रीडा पुरस्कार क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज सेवासदन या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

            शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार सन २०१९-२० श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे), सन २०२०-२१  दिलीप बळवंत वेंगसरकर आणि सन २०२१-२२ आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावेक्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षीमार्गदर्शकखेळाडूंच्या कार्याचा  गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.

करपट ढेकरा सारख्या येतात.* *मग हे करून पहा*

 *करपट ढेकरा सारख्या येतात.* *मग हे करून पहा*


१) विकारात सोडा पिणे फायदेशीर आहे. सोडा असॅडिक असल्यामुळे गॅसपासून मुक्ती मिळते.

 

 २)काही न मिसळता ताज्या लिंबाचे रस प्यावं.

 

 ३)आल्याचा चहा पिण्याने किंवा आल्याचा रस मध मिसळून पिण्याने फायदा होतो.

 

 ४)सतत ढेकर येत असल्यास तोंडात एक लवंग ठेवून चोखावी.

*निरामय आयुर्वेद प्रचार.तुमच्या आरोग्यासाठी निस्वार्थी सेवा.*

 

५)उचकी किंवा ढेकर येत असल्यास गार दूध पिण्याने फायदा होतो.

६)ढेकर येत असल्यास कोथिंबीरची दंडी चावावी.


 ७)सतत ढेकर येत असल्यास घुट घुट गार पाणी प्यावं.


८)सुतशेखर रस दोन गोळ्या घ्या ढेकरा येणे थांबेलच.


निरामय आयुर्वेद प्रचार


वैद्य. गजानन

मानसिक आणि शारीरिक आरोग्य.*

 *मानसिक आणि शारीरिक आरोग्य.* 


आरोग्याचे दोन सर्वात वारंवार चर्चा केलेले प्रकार आहेत.

आध्यात्मिक, भावनिक आणि आर्थिक आरोग्य देखील एकूण आरोग्यासाठी योगदान देते. वैद्यकीय तज्ज्ञांनी याचा संबंध कमी तणाव पातळी आणि सुधारित मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी जोडला आहे.

चांगले आर्थिक आरोग्य असलेले लोक, उदाहरणार्थ, आर्थिक बाबतीत कमी काळजी करू शकतात आणि त्यांच्याकडे अधिक नियमितपणे ताजे अन्न खरेदी करण्याचे साधन असू शकते. चांगले आध्यात्मिक आरोग्य असलेल्यांना शांततेची आणि उद्देशाची भावना वाटू शकते ज्यामुळे चांगले मानसिक आरोग्य मिळते.


आरोग्य विषमता आपल्या सर्वांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करते. आरोग्यामधील सामाजिक विषमता आणि त्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही काय करू शकतो याच्या सखोल माहितीसाठी .


शारीरिक स्वास्थ्य

ज्या व्यक्तीचे शारीरिक आरोग्य चांगले असते त्याच्या शारीरिक कार्ये आणि प्रक्रिया त्यांच्या शिखरावर कार्यरत असण्याची शक्यता असते.


हे केवळ रोगाच्या अनुपस्थितीमुळेच नाही. नियमित व्यायाम, संतुलित पोषण आणि पुरेशी विश्रांती या सर्व गोष्टी चांगल्या आरोग्यासाठी योगदान देतात. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा संतुलन राखण्यासाठी लोक वैद्यकीय उपचार घेतात.

शारीरिक आरोग्यामध्ये रोगाचा धोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे समाविष्ट आहे. शारीरिक तंदुरुस्ती राखणे, उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासाची आणि हृदयाची कार्यक्षमता, स्नायूंची ताकद, लवचिकता आणि शरीराची रचना यांच्या सहनशक्तीचे संरक्षण आणि विकास करू शकते.


शारिरीक आरोग्य आणि तंदुरुस्तीची काळजी घेणे यात दुखापत किंवा आरोग्य समस्यांचा धोका कमी करणे देखील समाविष्ट आहे, 

कामाच्या ठिकाणी धोके कमी करणे

प्रभावी स्वच्छता सराव

तंबाखू, अल्कोहोल किंवा बेकायदेशीर औषधांचा वापर टाळणे

प्रवास करताना विशिष्ट स्थितीसाठी किंवा देशासाठी शिफारस केलेल्या लसी घेणे

एखाद्या व्यक्तीचे एकूण जीवनमान सुधारण्यासाठी चांगले शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्यासोबत काम करू शकते


मानसिक आरोग्यमानसिक आरोग्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचे भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्य. पूर्ण, सक्रिय जीवनशैलीचा भाग म्हणून मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे.


शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्याची व्याख्या करणे कठिण आहे कारण अनेक मनोवैज्ञानिक निदान व्यक्तीच्या त्यांच्या अनुभवाच्या आकलनावर अवलंबून असते.


तथापि, चाचण्यांमधील सुधारणांमुळे, डॉक्टर आता सीटी स्कॅन आणि अनुवांशिक चाचण्यांमध्ये काही प्रकारच्या मानसिक आजारांची काही शारीरिक चिन्हे ओळखण्यास सक्षम आहेत.जीवनाचा आनंद घे

कठीण अनुभवांनंतर परत या आणि प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घ्या

कौटुंबिक आणि वित्त यांसारख्या जीवनातील विविध घटकांमध्ये समतोल राखणे

सुरक्षित आणि सुरक्षित वाटत

त्यांची पूर्ण क्षमता साध्य करा

शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा मजबूत संबंध आहे. उदाहरणार्थ, एखाद्या दीर्घकालीन आजारामुळे एखाद्या व्यक्तीची नियम 

Friday, 14 July 2023

महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांचीबालसुधार गृहास अचानक भेट देत पाहणी

 महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांचीबालसुधार गृहास अचानक भेट देत पाहणी   


            मुंबई, दि.१४:- पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) पुणे (येरवडा)येथील केंद्राला महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवारी रात्री अचानक भेट देत बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली.


            भेटी दरम्यान मुलांची निवासाची सुविधा, त्यांना देण्यात येणारे भोजन यासह अन्य सुविधांसह सरकारकडून देण्यात येणारी मदत आणि बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती डॉ. नारनवरे यांनी घेतली.


            बालसुधारगृहातील २२ विधि संघर्षग्रस्त मुलांशी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. तसेच ज्या ठिकाणी मुले राहतात त्यांचे लॉकर्स, स्वच्छतागृहाची तपासणी केली. याशिवाय स्वयंपाकगृहाची पाहणी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी केली.


            यावेळी बालविकासचे उपायुक्त राहुल मोरे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) केंद्राचे अधीक्षक दत्तात्रय कुटे, उपअभियंता नितीन पवार उपस्थित होते.

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

 राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाही


            मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.


            मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग .


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.


            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.


इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे: 


छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.


दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील –सहकार.  


राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास.


सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय.


हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य.


चंद्रकांतदादा बच्चू पाटील –उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य.


विजयकुमार कृष्णराव गावित – आदिवासी विकास.


गिरीष दत्तात्रय महाजन – ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन.


गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता.


दादाजी दगडू भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).


संजय दुलिचंद राठोड – मृद व जलसंधारण.


धनंजय पंडितराव मुंडे – कृषि.


सुरेशभाऊ दगडू खाडे – कामगार.


संदीपान आसाराम भुमरे– रोजगार हमी योजना व फलोत्पादन.


उदय रवींद्र सामंत –उद्योग.


प्रा.तानाजी जयवंत सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.


रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).


अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन.


दीपक वसंतराव केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा.


धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन.


अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण.


शंभूराज शिवाजीराव देसाई – राज्य उत्पादन शुल्क.


कु. अदिती सुनील तटकरे – महिला व बालविकास.


संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे.


मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

.


अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.


०००००



4 हजार 277 खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई

 4 हजार 277 खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई ;


1 कोटी 83 लक्ष रूपयांची वसूली


            मुंबई, दि. 14 : राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांतील ‘वायुवेग’ पथकांमार्फत 14 हजार 161 खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 4 हजार 277 खाजगी बसेस नियम मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने या बसेसना तपासणी प्रतिवेदने जारी करुन प्रकरणे नोंदवित कारवाई करण्यात आली आहे. विविध कार्यालयांमार्फत 1 कोटी 83 लक्ष तडजोड शुल्काचा दंड वसूल करण्यात आला आहे.


            तपासणी दरम्यान रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादी गुन्ह्यांसाठी सर्वात जास्त 1702 बसेस वर कारवाई करण्यात आली. विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणाऱ्या 890 बसेसवर; योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेली 570 खाजगी बसेसवर, तर 514 बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आले असून त्यावर कारवाई करण्यात आली.


            शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची व इतर गुन्ह्यांबाबत तपासणी करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी 16 मे ते 30 जून 2023 दरम्यान विशेष मोहिम राबविली. सदर तपासणी माहिमेमध्ये बसेसची तपासणी करतांना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादींमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकरणे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालीन परिस्थितीत निर्गमन दर आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत काय आदी बाबींची राज्यभर व्यापक तपासणी करण्यात आली. त्यानंतर उक्त नमूद विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या बसेसवर कारवाई करण्यात आली.


विविध गुन्ह्यांसाठी कारवाई


                 मोटार वाहन कर न भरणाऱ्या 485 बसेस, आपत्कालीन दरवाजा कार्यरत स्थितीत नसणाऱ्या 293 बसेस, अवैधरित्या व्यवसायिक पद्धतीने माल वाहतुक करणाऱ्या 227 बसेस, आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतुक करणाऱ्या 147 बसेस, वेग नियंत्रक बसविणे व ते कार्यरत असणे आवश्यक असतांना वेग नियंत्रक नसणारी 72 बसेस, जादा भाडे आकारणी करणाऱ्या 40 बसेस व इतर गुन्ह्यांमध्येसुद्धा विशेष तपासणी मोहिमेच्या कालावधीत खाजगी बसेसवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा या दृष्टीकोनातून सदर व्यापक मोहिम राबविण्यात आली.


********

Featured post

Lakshvedhi