Sunday, 9 July 2023

चिरतरुण राहण्यासाठी काही उपयोगी माहिती.*

 *चिरतरुण राहण्यासाठी काही उपयोगी माहिती.*



स्त्री असो की पुरुष कुणालाच म्हातारे होणे आवडत नाही. वाढते वय लपविण्यासाठी म्हणजेच तरुण दिसण्यासाठी त्याची नेहमी धडपड सुरु असते. त्यासाठी तो मिळतील ते सौंदर्य प्रसाधनांचा वापर करुन चेहऱ्यावरील सुरकुत्या लपविण्याचा प्रयत्न करतो. मात्र मिळते ती निराशाच. सौंदर्य प्रसाधनांऐवजी काही घरगुती उपाय केल्यास आपल्या त्वचा चिरतरुण राहण्यास मदत होईल.संतुलित व पौष्टिक आहारआपल्या आहारात नेहमी हिरवा भाजीपाला, ऋतूमानानुसार फळे तसेच दूधाचा समावेश असू द्या. यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळून त्वचेला पोषणही मिळते. व्यायामसुदृढ आरोग्यासाठी जसा शरीराला व्यायाम महत्त्वाचा आहे, तसाच चेहºयाच्या त्वचेसाठीदेखील व्यायाम महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्यायाम करताना इंग्रजी अक्षर इ आणि ओ बोला, म्हणजे चेहऱ्याचा चांगल्याप्रकारे व्यायाम होतो. ही प्रक्रिया ५ ते ७ मिनिट करा यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते.मूग डाळ चेहऱ्याच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी विटॅमिन इ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी सकाळी भिजवलेली मूग डाळी चावून खा. यामध्ये विटामिन इ जास्त प्रमाणात असते. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही बरेच वर्ष तरुण राहू शकताय. आवळ्याचे सेवन त्वचेच्या आरोग्यासाठी विटॅमिन सी देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. विटॅमिन सी चेहरा आणि केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. यासाठी नियमित आवळा खाल्ला पाहिजे. कारण आवळ्यामध्ये विटॅमिन सीचे प्रमाण भरपूर आहे. जे तुम्हाला तरुण ठेवण्यासाठी मदत करते. गुलाब पाणी गुलाब पाण्यासोबत २-३ थेंब ग्लिसरीन, १-२ चमचे लिंबाचा रस मिसळून झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होतेभरपूर पाणी प्या.


दररोजच्या धावपळीत अनेकदा आपले स्वत:कडे लक्ष देणे राहून जाते. मात्र आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. जेवणाच्या वेळा, खात असलेले पदार्थ, अपुरी झोप, प्रदूषण, ताण यांचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम दिसून येतो. त्वचा हे परिणाम दाखविणारा महत्त्वाचा घटक आहे. शरीराचा अतिसंवेदनशील भाग असणाऱ्या त्वचेवरुनही एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचा अंदाज सहज लावणं शक्य होतं. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी जाहिरातींमध्ये दाखवल्याप्रमाणे महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्याची आवश्यकता नसते, तर घरगुती उपचारांनीही त्वचेच्या समस्या दूर होऊ शकतात. त्यासाठी योग्य गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. पाहूयात चिरतरुण राहण्यासाठी त्वचेची कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी…


https://chat.whatsapp.com/HOiEuQyiTqxLY1sb5eVRd1


भरपूर पाणी प्या – दिर्घकालीन डिहायड्रेशन असेल तर तुमची त्वचा लवकर सुरकुतते. उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचा त्रास होतो आणि त्याचाही त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, सरबते, ताक, नारळपाणी पिणे हा त्यावरील उत्तम उपाय ठरतो. पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर तरतरी येते. 

ताण घेऊ नका – करीयर, नातेसंबंध, कुटुंब, अभ्यास यांसारख्या विविध ताणांचा शरीरावर तसेच त्वचेवर वाईट परिणाम होतो. हा ताण घालविण्यासाठी ध्यान करणे, व्यायाम करणे, छंद जोपासणे असे उपाय करावेत. त्यामुळे तुम्ही आतून फ्रेश व्हाल आणि ताण कमी झाल्याने त्वचाही तुकतुकीत दिसण्यास मदत होईल.

क्लिंझिंग – आपण दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो. त्यावेळी प्रदूषणामुळे हवेतील कण आपल्या चेहऱ्यावर चिकटतात. तसेच घाम आणि इतर गोष्टींमुळे त्वचा खराब होते. त्यामुळे ठराविक वेळाने चेहरा धुणे आवश्यक असते. आता हा चेहरा धुताना कोणताही साबण लावण्यापेक्षा आपल्या त्वचेला सूट होणारे एखादे क्लिंझिंग वापरल्यास जास्त फायदा होतो. त्यामध्ये असणारे घटक चेहऱ्याचे मॉईश्चर टीकवून ठेवण्यास उपयुक्त असतात.

मॉईश्चरायझर वापरा चेहऱ्याची त्वचा चांगली रहावी यासाठी काही उपाय करणे आवश्यक असते. चेहरा धुतल्यानंतर तो काही वेळा कोरडा पडतो. त्यामुळे सुरकुत्या आल्यासारखेही दिसते. त्यामुळे चेहरा धुतल्यावर आपल्याला सूट होईल असे एखादे मॉईश्चर हलक्या हाताने चेहऱ्यावर लावावे. त्याचा त्वचा चांगली दिसण्यास निश्चितच फायदा होतो.जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा आपण खात असलेल्या गोष्टींचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. जास्त मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्यास चेहऱ्यावर फोड येण्याची शक्यता असते. त्यामुळे जंक फूड तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळलेलेच बरे. जंक फूडमध्ये असणाऱ्या पदार्थांमुळे शरीरातील आवश्यक घटक कमी होतात आणि त्याचा विपरीत परिणाम होतो.नक्कीच आवडेल अशी माहिती.

प्रमोद पाठक.



प्रेमस्वरूप मारते आई

 मांजरीचे पिल्लू हरवले होते, ते सापडले तेव्हा आई त्याला रागावून नंतर त्याच्या एक कानफटात मारून घेऊन गेले *मनूष्य असो वा प्राणी, आईची शैली तीच राहते* 🤣


Nail cutter no useful also


 

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी

 दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी


25 लाखांचा निधी देणार - पालकमंत्री दीपक केसरकर


'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात साधला 'महिला व ज्येष्ठ नागरिकांशी सुसंव

          मुंबई, दि. 8 - ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार असून तेथे ने-आण करण्यासाठी बेस्ट मार्फत 10 बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


          बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ - 5 च्या वतीने शनिवारी सायंकाळी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री श्री. केसरकर यांनी दादर परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे शक्य आहे, त्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले. 


          खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.


          मंत्री श्री. केसरकर म्हणाले, नागरिकांना त्यांच्या समस्यांवर तातडीने न्याय मिळावा, ही शासनाची भूमिका आहे. यासाठी मुंबईसह राज्यात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. मुंबईत स्वच्छता राहावी, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, मुंबई सुंदर दिसावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आपला दवाखाना योजनेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी केली जात असून अधिकच्या तपासण्यासाठी फिरती तपासणी वाहने उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


          ज्येष्ठ नागरिकांना धान्य घेण्यासाठी लांब जाण्याची आवश्यकता भासू नये यासाठी 14 वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुंबईतील नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. उद्याने, बाजारपेठांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबादेवी, महालक्ष्मी, हाजीअली, सिद्धीविनायक आदी धार्मिक स्थळांच्या परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्यात येत असून उत्तम फिश मार्केटसह तेथे फूड कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत. कामगारांसाठी असलेल्या कल्याण केंद्रामध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. ड्रग्ज मुक्त मुंबईसाठी उपाय केले जात आहेत. रूग्णांच्या सोयीसाठी जे. जे. रूग्णालयात सुसज्ज वॉर्ड तयार करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.


          श्री. केसरकर म्हणाले, मंत्री हा नागरिकांचा प्रतिनिधी असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी रहिवाशांच्या समस्या जागेवरच सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात जाऊन जनतेशी सुसंवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागरिकांमध्ये जाऊन आणि त्यांच्या समस्या जाणून त्या तातडीने सोडविण्यात येत आहेत.


          खासदार राहुल शेवाळे म्हणाले, राज्य शासनाने हाती घेतलेल्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात सुमारे 45 लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. मुंबईत पालकमंत्री दीपक केसरकर हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाऊन त्यांना दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आपला लोकसभा मतदारसंघ हा सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


          आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी परिमंडळ 5 या पोलीस विभागाने चोरीचा मुद्देमाल कौशल्याने शोधून काढल्याबद्दल त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. तर आमदार कालिदास कोळंबकर यांनी पोलिसांचा घरांचा विषय अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगून शासनाने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकमंत्री मंत्री श्री. केसरकर यांच्याकडे केली.


          यावेळी मंत्री श्री केसरकर यांच्या हस्ते पोलीस तपासात परत मिळविलेला 40 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. यामध्ये कुर्ला पोलीस स्टेशन हद्दीतील मनोज जैन यांचे 28 लाखांचे दागिने, धारावी हद्दीतील तीन लाख रुपयांची कार यांसह दादर, माहीम आदी पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले अथवा चोरीला गेलेले विविध दागिने, मोबाईल, घड्याळ, वाहने आदी मुद्देमालाचा समावेश होता. सुमारे दोन कोटींहून अधिकचा मुद्देमाल आतापर्यंत परत करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी प्रास्ताविकात दिली. पोलीस विभागाच्या या कामगिरीची मंत्री श्री केसरकर यांनी प्रशंसा केली.


          या सुसंवाद कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, स्वच्छता, वाहतुकीच्या समस्या, कचरा निर्मूलन, फेरीवाले, पार्किंग आदींचा समावेश होता. या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


 


000

अनेक प्रकारे फायदेशीर आहेत भोपळ्याच्या बिया !!*

 *अनेक प्रकारे फायदेशीर आहेत भोपळ्याच्या बिया !!* 


भोपळा ही अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. भोपळ्याच्या बियादेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. बहुतेक लोक भोपळा खातात. परंतु त्याच्या बिया फेकून देतात. पण असे केल्याने तुम्ही अनेक प्रकारचे आरोग्य फायदेही काढून टाकता. भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्याने सर्वांनाच फायदा होतो,

परंतु पुरुषांना याचे सेवन केल्याने काय फायदे होतात हे जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे.

◼️भोपळ्याच्या बियांमध्ये असे अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब, कर्करोग, पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

◼️या बियांमध्ये झिंक, फायबर, मॅग्नेशियम, अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, प्रोटीन, ऊर्जा, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेट्स, सोडियम, थायामिन, फोलेट, फॉस्फरस इत्यादी असतात. ज्यामुळे शरीरातील अनेक समस्या निर्माण होण्यापासून बचाव होतो.


*भोपळ्याच्या बियांचे फायदे -*

◼️भोपळ्याच्या बिया त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात.

◼️यामध्ये फायबर असल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे वजन कमी होते.

◼️पोटात जंत होण्याची समस्या टाळते.

◼️शरीरात रक्ताची कमतरता होऊ देत नाही.

◼️भोपळ्याच्या बिया मेंदूला निरोगी ठेवतात.

◼️युरिन इन्फेक्शन, युरिनरी इन्कॉन्टीनन्स, यूटीआय यासारख्या समस्या दूर करते.

◼️रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया खा.

◼️यामध्ये असलेले काही घटक उच्च रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात.

◼️पचनशक्ती, हाडांना बळ देते.

◼️मूत्राशयात स्टोन होऊ देत नाही.

◼️हे हृदयासाठी आरोग्यदायी आहे.

◼️झोप न येण्याची समस्या दूर होते.


*पुरुषांसाठी भोपळ्याच्या बियांचे फायदे*


◼️प्रोस्टेटचे आरोग्य राखण्यासाठी पुरुषांनी भोपळ्याच्या बियांचे सेवन करणे आवश्यक आहे. प्रोस्टेट ही एक प्रकारची ग्रंथी आहे, जी वीर्य निर्माण करण्यास मदत करते. पुरुषांमध्ये वाढत्या वयाबरोबर प्रोस्टेटचा आकारही वाढतो. मात्र त्याचा आकार जास्त वाढू नये अन्यथा इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत भोपळ्याच्या बियांचे सेवन करून ही ग्रंथी निरोगी ठेवता येते.


◼️ज्यांना अशक्तपणा जाणवतो, त्यांनी भोपळ्याच्या बिया नक्की खाव्या. भोपळ्याच्या बिया खाल्याने शरीर तंदुरुस्त आणि ऊर्जेने भरपूर राहाते. यासाठी भोपळ्याच्या बिया भाजून स्नॅक्समध्ये खाऊ शकता. याच्या वापराने तुमची प्रतिकारशक्ती आणि पचनक्रिया दोन्ही मजबूत राहतात.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



अक्रोड (वाँलनट)*

 *अक्रोड (वाँलनट)*


विविध प्रकारच्या ड्राय फ्रुटमधले हे एक दर्जेदार, पौष्टिक फळ आहे, अक्रोडात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरिराचि रोगप्रतिकारकशक्ति वाढवण्यासाठि हे अतिशय फायदेशीर आहे.

     अक्रोडला 'ब्रेन फूड' असे म्हणतात. अक्रोडात खुप प्रकारचे विटामिन असतात, जसे कि, विटामिन A, B,C, vitB12, विटामिन D, म्हणूनच याला विटामिनचा राजा म्हणतात. 

 

अक्रोड आपल्या मेंदूसाठी खुपच फायदेशीर आहे. हे जवळपास मानवी मेंदू सारखेच दिसते, याच्या सेवनाने मानसिक ताण दूर होतो, मन प्रसन्न होते, बौद्धिक पातळी वाढते (I. Q.) स्मरणशक्ति वाढते, अक्रोडात शक्तिशाली न्यूरो प्रोटेक्टिव कंपाउंड सारखे विटमिन E. Omega_3 fatty acid व एंटि आँक्सिडंट असतात. ज्यामूळे मेंदूला सुरक्षा मिळते.


अक्रोड हे ह्रुदयासाठीही लाभदायक आहे. याच्या सेवनाने शरिरातील चरबी कमी होते, कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहते. कारण ओमेगा-3 फँटि ॲसिड जे हार्टकरता उपयोगी आहे, ते विपुल आहे, अक्रोडात Polyphenols या कँसरविरोधी घटकाचे प्रमाण जास्त असते त्यामूळे दररोज अक्रोड खाल्लयामूळे ब्रेस्ट, कँसर, प्रोस्टेट कँसर, व मलाशयाचा कँसर होण्याचा धोका कमी होतो,


अक्रोड खाण्यामुळे भूक कमी लागते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो, व याच कारणामूळे डायबेटिस-2 आटोक्यात राहतो, अक्रोडामूळे साखर रक्तातली नियंत्रित राहते. ऊच्च रक्तदाब आटोक्यात राहतो. अक्रोड हा दुर्बल, अशक्त व्यक्तिंकरता खूपच लाभदायी आहे, सकाळी उठून २-३ अक्रोडाचे सेवन करावे, वरून एक कप दूध घ्यावे..


ज्या पुरूषांमध्ये शुक्रजंतू कमी असतात, ज्यामूळे ते प्रजोत्पादन करू शकत नाही, अशानी नियमित अक्रोडाचे सेवन केल्यास फायदा होतो, अक्रोड हे वातघ्न असल्याने संधिवात, सायटिका, सांधेदुखी, आमवात, या आजारावर चांगले परिणाम देते ज्यांना गुडघे दुखीचा तीव्र स्वरूपात त्रास आहे त्यांनी सकाळी उठुन ३-४ अक्रोडाचे सेवन करावे.

अक्रोडाचे तेल नियमित सेवन केल्यास, आतड्यातील क्रुमि नाश पावतात. व शौचावाटे बाहेर पडतात. अक्रोड हे सारक गुणधर्माचे असल्याने बद्धकोष्ठ, मलावरोध असणाऱ्यांनी अक्रोडाचे नियमित सेवन करावे, यात फायबर विपुल असल्याने वरिल त्रास होत नाही.

अक्रोड वनस्पतीची साल, व पाने गंडमाळा, पुरळ, उपदंश, व त्वचारोग आदि रोगावर उपयोगी आहे. अक्रोडाचि पाने क्रूमिनाशक आहे.


चेहऱ्यावरील काळे वांग, पिगमेटेशन, पुरळ असणाऱ्यांनी, अक्रोड बारिक वाटुन त्याचा लेप लावावा, चेहरा सुंदर होतो, अक्रोड बीज तेल हे साबण, व सौंदर्यवर्धक गोष्टित वापरतात, सहसा जेवणानंतर अक्रोड खावा, यामूळे जेवणाचे पचन चांगले होते. अकाली केस पांढरे होणे, केस गळणे या तक्रारींवर, अक्रोड सिद्ध तेल वापरल्यास केस काळेभोर, व दाट होतात, .


 तेव्हा अशा या भरपूर गुणांनी युक्त सुक्या मेवाला आपल्या दैनंदिन आहारात जरूर, सामिल करावे.


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





शासन आपल्या दारी’

                                                                                                                                                                                        

गडचिरोलीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’


जिल्ह्यात ६.९७ लाख लाभार्थ्यांना ६०१ कोटी रुपयांच्या योजनांचा लाभ


शासन आपल्या दारी उपक्रमास राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


गडचिरोलीमध्ये स्टील सिटी उभारण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


प्रस्तावित विमानतळ व समृद्धीमुळे जिल्ह्यात विकासाचा वेग वाढेल- उपमुख्यमंत्री अजित पवार

निवासी शाळा, वसतीगृह, आयसीयूसह पोलीस प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

            गडचिरोली, दि.८: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या दारी शासनाच्या योजना पोहोचल्या असून राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले असून जिल्ह्याच्या ११ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथे आज जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमास मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, पद्मश्री परशुराम खुणे, विधानसभा सदस्य देवराव होळी, विधानसभा सदस्य कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासनाच्या एक वर्षपूर्तीनंतर पहिलाच कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित केला आहे. ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना सर्वसामान्यांसाठी आहे, लोकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये यासाठी सरकारने हा उपक्रम सुरु केला. जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख असून जवळपास ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना सुमारे ६०१ कोटी रुपयांच्या विविध योजनांचा जिल्हा प्रशासनाकडून लाभ दिला जात आहे. शासन प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत, अधिकारी आता गावागावात जात असल्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे अशी प्रचिती जनतेला येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगार मेळाव्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे. लोकहितासाठी आतापर्यंत राज्य सरकारने ४०० पेक्षा अधिक धोरणात्मक निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. 

गडचिरोलीमध्ये स्टील सिटी उभारण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            जनतेपर्यंत शासन पोहोचले पाहिजे या संकल्पनेतून शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना निवडायचे उद्दिष्ट होते. मात्र गडचिरोलीने सर्व रेकॉर्ड तोडून जवळपास ७ लाख लोकांना लाभ दिला आहे. विशेष म्हणजे यापैकी ५० टक्के लाभार्थी हे अति दुर्गम भागातील आहेत असे सांगून छत्तीसगड, झारखंडच्या धर्तीवर गडचिरोलीमध्येही स्टील सिटी उभी करण्याचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.


            मी मुख्यमंत्री असताना येथील खनिज प्रकल्पाला चालना दिली. येथेच गुंतवणूक, येथेच रोजगार आणि नफा सुद्धा गडचिरोलीमध्येच हे धोरण अवलंबिले. ३० हजार कोटींची गुंतवणूक गडचिरोलीसाठी मंजूर करण्यात आली असून यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी देण्यात आल्या आहे. शासकीय वैद्यकी






य महाविद्यालयाला मान्यता देवून कृषी विद्यालयाची जागा उपलब्ध करून दिली आहे असे ते म्हणाले. तसेच गडचिरोलीमध्ये मोठे विमानतळ होण्यासाठी १४६ हेक्टर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे मोठे उद्योगही येथे येण्यास मदत होईल. जिल्ह्यातील एकही आदिवासी घरकुलापासून वंचित राहणार नाही, सर्वांना योजनेतून घरकुल उपलब्ध करुन देण्याची ग्वाहीही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.


प्रस्तावित विमानतळ व समृद्धीमुळे जिल्ह्यात विकासाचा वेग वाढेल- उपमुख्यमंत्री अजित पवार


            जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ आणि समृद्धी महामार्ग यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्यामुळे विकास कामांना गती मिळेल अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यातील युवकांना जास्तीत- जास्त रोजगार मिळाल्यास इतर घटकांकडून होणारा त्रास होणार नाही. तसेच लोकांच्या डोक्यातून नक्षलवादही संपेल असेही ते म्हणाले.


            मंत्री धर्मराव आत्राम यानीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर स्थानिक युवकांनी रेला हे पारंपारीक नृत्य सादर केले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री यांनी युवकांबरोबर नृत्यात सहभाग घेतला.

योजनांच्या लाभ वितरणासह विविध मान्यवर, युवकांचा सन्मान


            ‘शासन आपल्या दारी’ निमित्त आयोजित महाशिबिरादरम्यान मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील पद्मश्रीप्राप्त जेष्ट कलाकार परशुराम खुणे यांचा सन्मान करण्यात आला. १० मीटर शुटींगमध्ये राष्ट्रीय विजेता महेश ठवरे, सिकई मार्शल आर्टमधील एंजल देवकुले यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजनांमधील लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांचे लाभही प्रातिनिधिक स्वरुपात वितरीत करण्यात आले. यात जानु मट्टामी (शबरी आवास), राजेश मडावी (गोडावून अंतर्गत चेक वाटप), नंदा सयाम (मानव विकास-वाहन), तानुबाई गावडे (श्रावणबाळ पेंशन योजना) राधा तुमरेडी (संजय गांधी निराधार) यांना योजनांचा लाभ देण्यात आला. विविध योजनांमधून लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, सायकल, रिक्षा, घंटागाडी, शेतीपयोगी यंत्रसामुग्री, दिव्यांगांना सायकली आदी साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


 


निवासी शाळा, वसतीगृह, आयसीयू, पोलीस प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण


            मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, गडचिरोली मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (गुणवंत), गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चामोर्शी या दोन वसतीगृह व एक शासकीय निवासी शाळा या इमारतींचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.


            जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत ४२ खाटांचे पेडियाट्रिक मॉड्युलर आयसीयू, कोविड-१९ कार्यक्रम कृती आराखड्यांतर्गत ५० खाटांचे मॉड्युलर आयसीयूचेही यावेळी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. पोलीस विभागाच्या मुरूमगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.                                                             


000


 

Featured post

Lakshvedhi