Tuesday, 20 June 2023

सांस्कृतिक कार्य विभागात आता शंभर टक्के ई-ऑफिस;प्रशासन होणार पारदर्शी आणि गतिमान

 सांस्कृतिक कार्य विभागात आता शंभर टक्के ई-ऑफिस;प्रशासन होणार पारदर्शी आणि गतिमान


            मुंबई, दि. 19 : राज्य शासनाने मंत्रालयातील विविध विभागात प्रत्यक्ष फाईल्सचा होणारा प्रवास, त्यासाठी नागरिकांना वारंवार मारावे लागणारे हेलपाटे आदी बाबींतून मुक्त होऊन ही प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ होण्यासाठी सर्व पत्रव्यवहार ई-ऑफिस प्रणालीमार्फत करण्याचा निर्णय घेतला. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आता सांस्कृतिक कार्य विभागात शंभर टक्के ई-ऑफीसचा वापर सुरु करण्यात आला आहे. यामुळे आता सर्व प्रत्यक्ष स्वरुपातील फाईल्स आणि टपाल बंद करण्यात आले असून आता ते केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच हाताळले जात आहे.


            सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयीन सर्व विभागांना ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनावश्यक पत्रव्यवहार टळावा, विभागांतर्गत विविध फाईल्सचा जलद निपटारा व्हावा, नागरिकांकडून विविध विषयांवर आलेल्या पत्रव्यवहारांबाबत गतीने निर्णय व्हावेत, या उद्देशाने ई-ऑफिस प्रणाली सुरु करण्याच्या सूचना होत्या. सांस्कृतिक कार्य विभागाने यासाठी पुढाकार घेतला. याबाबत ई-ऑफिस सुरु करण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून प्रधान सचिव विकास खारगे यांनी विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. सांस्कृतिक कार्य विभाग ई-ऑफिस सुरू करण्यात आघाडीवर ठरला आहे.


            सांस्कृतिक कार्य विभागाकडे आलेल्या विविध पत्रव्यवहारांचे स्कॅनिंग करुन ती विषयवार संबंधित कक्ष अधिकारी, त्यानंतर उपसचिव, सहसचिव अशा पद्धतीने ई- प्रणालीद्वारे संबंधितांच्या टिपणीसह पुढे पाठवली जाते. यामुळे संबंधित विषयांवर निर्णयातील दिरंगाई आता पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे. सर्व प्रत्यक्ष (फिजीकल स्वरूपातील) फाईल्स व टपाल बंद केले असून आता ते केवळ इलेक्ट्रॅानिक पध्दतीनेच हाताळण्यात येते. ई-ऑफिसमुळे कोणत्याही ठिकाणाहून कॅाम्प्यूटर, लॅपटॅाप अथवा मोबाईल फोनवरून ई-फाईल्स व ई-टपाल हाताळता येते. यामुळे प्रशासन पारदर्शी व गतिमान होण्यास मदत होणार असल्याचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही प्रणाली राबविण्यात सक्रिय सहभाग घेतल्याने शंभर टक्के ई-ऑफिस करणे शक्य झाले आहे.


            यापूर्वी प्रधान सचिव श्री. खारगे यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक असताना तो विभाग राज्यातील पहिले शंभर टक्के ई-ऑफिस केले होते. त्या अनुभवाचा फायदा सांस्कृतिक कार्य विभागात ई-ऑफिसचे काम करताना झाल्याचे श्री. खारगे यांनी सांगितले.  


0000

२६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणाउभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता

 २६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणाउभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता


कोकण पाटबंधारे विकास महामंडळ नियामक मंडळाची बैठक


 


            मुंबई दि. १९ :- उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८४व्या बैठकीत कोकण प्रदेशातील पूरनियंत्रणासाठी माहिती संपादन प्रणाली (Real Time data Acquisition system) ची सर्व २६ नदी खोऱ्यात उभारणी करण्यासाठी १२ कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            या बैठकीत कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी ३६ विषयांबाबत चर्चा होऊन मान्यतेचे निर्णय घेण्यात आले. गडनदी, गडगडी, तिलारी प्रकल्पांच्या भूसंपादन व प्रकल्पग्रस्तांना अनुदान, पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांची दुरुस्ती कामांना मान्यता देण्यात आली. पाली-भूतावली, कोर्लेसातंडी, तिडे बेर्डेवाडी इत्यादी प्रकल्पाच्या कामांवरील वाढीव आर्थिक दायित्व सुमारे ९० कोटी रुपयास मान्यता देण्यात आली.

विदर्भातील 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता

 विदर्भातील 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता


विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाची बैठक

            मुंबई, दि. 19 :- उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाच्या 83 व्या बैठकीत 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सचिव आणि कार्यकारी संचालक रा. द. मोहिते, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            बैठकीत एकूण 73 विषय मंजूर करण्यात आले. तसेच रु. 240.02 कोटीचे १२ दायित्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 8 सिंचन प्रकल्प सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी रु. 681.68 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सिंचन प्रकल्पांतर्गत विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंमत 3.79 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. प्रकल्पाच्या भूसंपादन निवाड्यामधून सुटलेल्या मालमत्तांची मूल्यांकन रक्कम तसेच फळझाडे व वनझाडांचा मोबदला तसेच पूनर्वसनबाधीत कुटुंबांना मोबदल्यातून सुटलेल्या, मालमत्तांचे मोबदला रक्कम १४८.४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. असे एकूण 5273.69 कोटी रूपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.  

Monday, 19 June 2023

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अनियमिततेची चौकशीकरण्यासाठी विशेष चौकशी समिती मुख्यमंत्र्यांची मान्यता

 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अनियमिततेची चौकशीकरण्यासाठी विशेष चौकशी समिती

मुख्यमंत्र्यांची मान्यता


            मुंबई, दि. 19 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

            महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये रुपये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते.

            यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.




०००

बटाटवड्याचे एव्हढे अप्रतिम वर्णन आज पर्यंत कोणी केले नसेल

 


बटाटवड्याचे एव्हढे अप्रतिम वर्णन आज पर्यंत कोणी केले नसेल 


🤣😛❤️😋


*फक्त तुझ्या गंधाने* 

*मम मोह अनावर होतो*

*रसनेचा लगाम सुटतो* 

*मी सहज ओढला जातो।*  


*पाहुन पिवळी तव कांती*

*मी अति भुकेला होतो* 

*हातात यायच्या आधी* 

*नजरेने खाऊन घेतो।* 


*मग पाव पांघरूनी वरती* 

*लसणीची चटणी भरूनी*  

*तळल्या मिरचीच्या संगे*

*मी तुजला उचलून घेतो।* 


*प्रकृती स्वास्थ्य वाद्यांचा*

*किती विरोध झाला तरीही* 

*हे प्रेम न माझे घटते* 

*आस्वाद तुझा मी घेतो।*

Washing machine invention

Great Indian invention, that's going to change all homes in this world. Central govt has released the patent rights to this inventor, under skill developments ministry.🤔 Waterless Washing Machin

e

 

मुळव्याध✍* मोड येणे

 *मुळव्याध✍*


गुदद्वाराच्या आतील बाजूस अगर काठावर असणाऱ्या शिरा फुगतात. त्यास मोडा सारखा आकार येतो.यालाच मुळव्याध म्हणतात. व मोडातून क्वचित प्रसंगी रक्त स्त्राव होऊन प्रचंड वेदना होतात. मोडामध्ये दाह व ठणका येतो.अनेक वेळा शौचास साफ न झाल्याने कुथावे लागते.व ही शिर अथवा चुंबळच बाहेर येऊन लोंबकळत

 उपाय-

१)नारळाच्या शेंडीची राख व्हँसलिन मध्ये कालवून आतील भागास बोटाने लावणे.

२)नारळाच्या शेंडीची राख एक चमचा व साखर दिवसातून ३वेळा रक्त थांबते.

३)लिंबा वर खायचा सोडा व सेंधव टाकून पुर्ण लिंबू चोखणे रक्त पुर्णपणे थांबतेच.

४)१/२चमचा जीरे,१/२ओवा पावडर रोज गरमपाण्यात

५)अक्रोडाच्या तेलात बारीक कापडाचा काकडा भिजवून गुदद्वाराच्या आत सरकवावा रोज ऐक महीने करा मोड गळून पडेल.

६)डिकेमली व पिंपळीची मुळी उगाळून रोज मोडास लावली असता मोड गळून पडतो.

७)सुरण सुकवून चुर्ण करावे व रोज गाईच्या दुधात घ्यावे.

८)गुदद्वाराच्या आत गाईचे जुनाट तुप लावावे.

९)रोज मुळा खावा दहादिवस रिलिफ मिळतो.

१०)अर्शकुठार १गोळी,गंधक रसायन एक गोळी ,आरोग्यवर्धिनी गोळी १गोळी रोज घेणे.

११)कण्हेरीचे मुळ मोडावर उगाळून लेप द्या.

१२)रोज सकाळ संध्याकाळ गरम पाणी घ्या.रात्री झोपताना त्रिफळा चुर्ण लावा.

१३)सकाळी उठल्यावर तोंडातील लाळ व गोमूत्र दुखर्या भागास लावावे त्रास बरा होईल.

वरील उपाय करून मुळव्याधीतून कायमस्वरूपी मुक्त व्हा.

गजानन.


Featured post

Lakshvedhi