Friday, 16 June 2023

शीतपीत्त अर्टिकेरीया,*

 *शीतपीत्त अर्टिकेरीया,*

उर्टिकरिता

आयुर्वेदामध्ये, अर्टिकेरियाचे वर्णन शीतपीत नावाने केले आहे शीतपीत्त हा शब्द शीत आणि पीत्त या दोन शब्दांपासून बनलेला आहे, ज्यामध्ये पित्त म्हणजे उष्णता आणि शीत म्हणजे थंड

प्रामुख्याने थंड हवामानात जास्त प्रमाणात अंगाला पित्त उठत असल्याने या समस्येला 'शीतपित्त' असे नाव दिलेले आहे.आयुर्वेदा नुसार या आजारात वाताचे आधिक्य जास्त असते म्हणून यास शीतपित्त म्हणतात.तर या आजारात कफाचे आधिक्य असेल तर उदर्द म्हणतात.

   शीतपित्ताला आधुनिक वैद्यकीय भाषेत अर्टिकेरिया असे म्हणतात तर बोलीभाषेत 'अंगावर पित्त उठणे' असे म्हंटले 

काही वर्षांपूर्वी हा आजार उन्हाळ्यातून पावसाळ्यात प्रवेश करताना तसेच पावसाळ्यातून थंडीत प्रवेश करतानाच होत असे. परंतु, गेल्या दशकात याचे प्रमाण खूपच वाढले असून प्रमुख त्रास देणाऱ्या आजारांमध्ये आज याचा समावेश झाला 


*आधुनिक वैद्यकीय भाषेत का होतो हा आजार*

      त्वचेतील केशिका (सूक्ष्म रक्तवाहिन्या) हिस्टामीन या द्रव्यामुळे आणि रोहिणिका (रोहिणीपेक्षा लहान पण केशिकेपेक्षा मोठ्या रक्तवाहिन्या) ॲसिटिलकोलीन या द्रव्यामुळे एकदम प्रसारित होऊन त्यांच्यातून रक्तरस (रक्त गोठल्यावर उरणारा पिवळसर व न गोठणारा पेशीरहित द्रवपदार्थ) बाहेर पडून त्वचेच्या वरच्या वा आतल्या भागात साठतो, ही या रोगाची संप्राप्ती (कारणमीमांसा) आहे. गांधी उठण्याला अनेक कारणे असली, तरी त्या सर्वांचे मूळ कारण म्हणजे शरीरातील ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांमध्ये) विशिष्ट पदार्थांविरुद्ध अधिहर्षता (ॲलर्जी) उत्पन्न होणे हे आहे.


*लक्षण

 अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रुग्णाच्या शरीराच्या एखाद्या भागावर किंवा संपूर्ण शरीरावर लाल गांधी उठतात आणि खूप खाज सुटते. या गांधीगुलाबी किंवा त्वचेचे रंगाचे असू शकतात.

गाठी असलेली त्वचा जेव्हा दाबून सोडली जाते तेव्हा पांढरेपण दिसून येते,शरीरातल्या नवीन भागांमध्ये शीतपित्त सहजपणे दिसू लागत आणि अदृश्य देखील होत.मुख्य म्हणजे त्वचेवर आग होत असली तरी अंगात मात्र बारीक थंडी वाजत असते. ताप नसला तरी तोंडाला चव नसते. मळमळून उलटी देखील काही रुग्णांत होते. या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प्रमाणात आढळून येते


*कारणे ः *अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठींच्या संभाव्य कारणांमध्ये खराब पचन, औषधांच्या प्रतिक्रिया, झोप न लागणे, रात्री उशिरा झोपण्याची सवय किंवा दिवसा झोपताना, जास्त खारट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले अन्न सेवन, थंड पदार्थांचे सेवन, थंड प्रदेशात किंवा हवामानात राहणे, थंड वाऱ्याचा संपर्क या गोष्टी कारणीभूत आहेत.

*कशामुळे त्रास होऊ शकतो*ः

काही जणांना विशिष्ट पदार्थ खाल्यानंतर असा त्रास होऊ लागतो. यामध्ये अंडी, शेंगदाणा, काजू, मासे, ,मांसाहार, स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा डाळ, तूर डाळ वैगेरे खाद्यपदार्थ यापैकी कशाचीही ऍलर्जी असू शकते. असा पदार्थ खाण्यात आल्यास त्यांच्या अंगावर पित्त उठते.विशिष्ट औषधे घेत असल्यासही असा त्रास होऊ शकतो. यामध्ये अँटीबायोटिक्स किंवा वेदनाशामक औषधे यांची ऍलर्जी असू शकते. घरातील कुत्री, मांजरी, घोडे इत्यादी पाळीव प्राण्यांच्या केसांची ऍलर्जी असल्यास त्यामुळे अंगावर पित्त उठू शकते.

थंड वातावरण, थंड पदार्थ यामुळे अंगावर पित्त उठू शकते,सूर्यप्रकाश, उष्ण वातावरण, उष्ण पदार्थ यांची ऍलर्जी असल्यास त्यामुळेही अंगावर पित्त येते.


्धूळ, धूर, हवेतील प्रदूषण, परागकण, केमिकल्स यांच्या संपर्कात आल्यामुळे, टेरेलीन, टेरीकाट अशा कपडांची ऍलर्जी असल्यास शितपित्त होऊ शकते.


तसेच पोटामध्ये कृमी व जंत झाल्याने, कीटक चावल्याने किंवा सर्दीसारखे इन्फेक्शन झाल्यामुळेही अंगावर पित्त उठू शकते.


*आहार*ः

अशा परिस्थितीत आपल्या नकळत आपण चुकीचा आहारही घेतो. तिखट चमचमित खाणे, ठेचा वापरणे, जागरण करणे आणि चहा पिणे, आंबट ताक- दही वारंवार खाणे यामुळे पित्तप्रकोप होतो आणि त्वचेवर लालसर रंगाची आग होणारी मंडले निर्माण करतो.


*काय आहार घ्यावा.*

आजाराचे मूळ खाण्यात आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. बदलत्या वातावरणाप्रमाणे बदलता पथ्यकर आहार ही व्याधी मुळासह नष्ट करण्यास सहाय्य ठरतो. तात्पुरत्या बरे वाटणाऱ्या इतर औषधांना पथ्याची जोड दिल्यास फायदा होतो.

शीतपित्ताचा त्रास असताना मुगाचे काढण व मसुराची डाळ अत्यंत गुणकारी ठरते. तुरीची डाळ व मटकीसारखी डाळसुद्धा पथ्यकर असून या दोन्हींनीही शीतपित्त वाढत नाही,जायफळ व केशर ही द्रव्ये ,गायीचे दूध,आल्याचा रस घ्यावा,वरचेवर शीतपित्ताचा त्रास होत असल्यास आहारात *तूप घालून वरण भात खावा*. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा यामध्ये खूप चांगला उपयोग होतो.


शीतपित्त असताना आवर्जूनह. सेवन करावीत. फायदा होतो.


उपचार ः

* गिलोय, हळद, आवळा आणि कडुलिंब एकत्रित करून काढा बनवा. 

*कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ करू शकता.

*खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल संपूर्ण शरीरावर लावल्याने फायदा होतो.

* समस्या दीर्घकाळ असेल तर तुम्ही पंचकर्माची मदत घेऊ शकता 

 *3 ग्रॅम (1/2 चमचे) हळद आणि एक काळी मिरीची पावडर एक ग्लास दूध किंवा पाण्यासोबत दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे


*काळी मिरी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. काळी मिरी बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात तूप मिसळा आणि ती पेस्ट खाज, पुळ्यावर लावा. ह्याने बरं वाटेल.


*अंगावर पित्त झाल्यावर तेथे एलोवेरा जेल लावल्याने आराम मिळतो.


*तुळशीच्या सेवनाने थंडीत शीतपित्ताने होणाऱ्या समस्येवर मात करता येते. अशा स्थितीत तुळशीची पाने नीट धुवून त्याचा चहा तयार करा. आता ह्या चहाचे सेवन केल्याने केवळ रक्त शुद्ध होत नाही तर शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.


*अंगावर पित्त आल्यावर तेथे हळदीचा लेप लावल्यास होणारी खाज कमी होऊन आराम पडतो.


3-4 आमसुले पाण्यात भिजत घालावीत व ते पाणी अंगाला लावावे.


*खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून लावल्यासही फायदा होतो. हळदीपासून बनवलेले हरिद्राखंड हे औषध या गांधींवर उत्तम कार्य करते.


*,आयुर्वेदिक उपाययोजना


*सुतशेखर वटी, कामदुधा वटी ,आरोग्यवर्धीनी, परिपाठादी काढा,रक्तदोषांतक, महामंजिष्ठादी काढा,कायाकल्प वटी. यांसारखी अनेक औषधे उत्तम कार्य करतात फक्त तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावी.


*पोट साफ राहील याकडे लक्ष द्यावे. एरंडेल तेल चमचाभर रात्री झोपताना घेतल्यास पोट साफ राहण्यास मदत होते.

*अंगाला खाज येऊन पित्त उठल्यास अंगाला करंज तेल चोळावे. ज्यामुळे त्वचा कोरडी राहत नाही आणि खाज कमी होते.


*लेख आवड्याल शेअर करा*

वैद्य गजानन



श्रावण आला रे

 


कंबर दुखी*

 कंबर दुखी* उपाय करा घरीच


*१. बाभळीची साल*

 १.१ बाभळीची साल काढायची.

 १.२ पाण्यात टाकुन कडक उकळवा.

 १.३ त्या पाण्याने गुढघे किंवा पाय दुखत असेल तिथून धुवून टाखा. १० मिनटात फरक पडतो. 


*२. जवस* 

 २.१ रोज सकाळ संद्याकाळी बडी सौफ झाल्यासारखे जेवण झाल्यावर जवस खा.

 २.२ जवस शरीरातील वंगण सारखे काम करते, गुडखे दुखी ला खूप फरक पडतो.


३. *पांढरे तीळ* खात जा, हाडे मजबूत होतात.


*४. एरंडेल तेल*

 ४.१ भाकरीचा गोळ्यात अर्धा चमचा एरंडेल तेल घाला.

 ४.२ त्याची भाकरी १५ दिवस रोज रात्री जेवताना खा.

 ४.३ पंधरा दिवस करा हे, याने गुढघे दुखी, कंबर दुखी बरी होते.


*५ तिळाचे तेल*

 ५.१ गुडखे फारच दुखत असतील तर, तिळाचे तेल सकाळ - संद्याकाळ प्या.

 ५.२ त्या वर कोमट पाणी प्या.

 ५.३ पंधरा दिवसात गुडखे दुखी थांबते.



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




युरीक असिड च्या त्रासातून मुक्त* *होण्यासाठी घरगुती उपाय*

 *युरीक असिड च्या त्रासातून मुक्त* *होण्यासाठी घरगुती उपाय*


पूर्वी ५० - ६० वयाच्या लोकांमध्ये यूरीक ॲसिडची समस्या पाहिली जात होती, तर आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणही यामुळे पीडित आहेत. तणाव, अल्कोहोल-सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, व्यायमाचा अभाव, पाणी कमी पिणे आणि चुकीचे खानपान यामुळे यूरीक ॲसिड वाढते व त्याचा त्रास होतो.


*यूरीक ॲसिड म्हणजे काय ?* 


कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचे मिश्रण करून कंपाऊंड तयार होते, जे अमीनो ॲसिडच्या रूपात शरीराला प्रोटीनमधून प्राप्त होते त्याला युरीक ॲसिड म्हणतात.


 त्यामुळे यूरीक ॲसिड वेळेवर नियंत्रित न केल्यास त्यामुळे गठीया (Gout) आणि संधिवात देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत काही होम टिप्स आहेत, जेणेकरून तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता.


◼️ *भरपूर लिक्विड आहार घ्या* 

यूरीक ॲसिड नियंत्रित ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. आहारात फळांचा रस, नारळपाणी आण ग्रीन टी सारख्या द्रवपदार्थाचे सेवन करत रहा.


◼️ *सर्व रंगांच्या भाज्या* 

प्रत्येक रंगाची भाजी आपल्या आहाराचा एक भाग बनवा. आपल्याला हिरव्या, लाल, केशरी रंगाच्या भाज्यांमधून सर्व पोषकद्रव्ये मिळतील, जे केवळ ॲसिडवर नियंत्रण ठेवत नाहीत तर इतर समस्या देखील टाळतील.


◼️ *सिट्रस फ्रूट* (सायट्रिक ॲसिडयुक्त फळे)

सिट्रस फ्रूट युरीक ॲसिड क्रिस्टल्सला वितळवून यूरीक ॲसिड पातळी कमी करतात. असे फ्रूट आहारात जरूर घ्या, परंतु मर्यादित प्रमाणात.


◼️ *छोटी वेलची* 

पाण्यात मिसळून छोटी वेलची खाल्ल्याने यूरीक ॲसिडचे प्रमाण कमी होईल आणि कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होईल


◼️ *बेकिंग सोडा*

१ ग्लास पाण्यात १/२ चमचा बेकिंग सोडा मिसळून पिल्यास युरीक ॲसिड नियंत्रणात येण्यास मदत होते.


◼️ *ओवा* 

ओवा यूरीक ॲसिडसह शरीरातील सूज कमी करते. यूरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी, एका दिवसात २-३ चमचे ओवा खावा.


◼️ *दररोज सफरचंद खा* 

सफरचंद मध्ये उपस्थित ॲसिड यूरिक ॲसिडला न्यूट्रीलाईज करते.


◼️ *लिंबाचा रस* 

लिंबू यूरीक ॲसिडला नियंत्रित करते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबूचा रस पिल्याने आपला फायदा होईल. तसेच दिवसातून चार-पाच वेळा लिंबू-पाणी प्या.


◼️ *चेरी* 

चेरी आणि डार्क चेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे घटक असतात, जे यूरीक ॲसिड कमी करण्यास मदत करतात. सूज आणि कडकपणा दूर ठेवते.


 *योग देखील फायदेशीर* 

दररोज व्यायाम करा आणि निरोगी राहा. वजन नियंत्रित ठेवा. असे म्हणतात की फॅटी टिश्यूमुळे यूरीक ॲसिड उत्पादन देखील वाढते.


❌ *या गोष्टी टाळा* 

मद्य आणि बिअर मध्ये यीस्ट मोठ्या प्रमाणात असते म्हणून ते टाळावे. दही, राजमा, चणे, अरबी, तांदूळ, मैदा, लोणचे, कोरडे फळे, मसूर, पालक, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅक फूड, मांस, मासे, पेस्ट्री, केक्स, पॅनकेक्स, मलई बिस्किटे, तळलेल्या अन्नापासून दूर रहा.


❌ *रात्री या गोष्टी खाऊ नयेत* 

प्रोटीनयुक्त आहार युरीक ॲसिड नियंत्रणात येईपर्यंत कमी खा, शक्यतो टाळा. झोपेच्या वेळी दूध किंवा डाळ घेऊ नका. तरी तुम्हाल डाळ घेण्याची इच्छा असल्यास साल असलेली डाळ तीही थोडी खावा. तसेच, जेवण करताना पाणी पिऊ नका. अन्न खाण्यापूर्वी आर्धा-पाऊण तास आणि नंतर तास-दिड तासाने पाणी प्यावे.


डॉ. प्रमोद ढेरे,


_

माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच'ज्युनिअर आणि सीनियर केजी'चे वर्ग

 सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच'ज्युनिअर आणि सीनियर केजी'चे वर्ग


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


 


            मुंबई, दि. १५ : शिशूवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशूवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.


            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले.


            या सोहळ्याला स्थानिक आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आदी मान्यवरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले, “आज शाळेचा पहिलाच दिवस आणि आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह शाळेच्या नवीन वास्तूत शिक्षण घेता येणार आहे. या गोष्टीचा मनस्वी आनंद होत आहे. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले आहे. त्यांना वह्या मोफत दिल्या असल्या तरीही त्या शाळेत न आणता त्यांचा घरीच अभ्यास करायचा आहे. दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेले एकच पुस्तक आणायचे आहे. याच पुस्तकात धडा संपल्यानंतर वह्यांची कोरी पाने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे धडा समजून घेतल्यानंतर त्या विषयाचे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी लिहू शकतील. अशा प्रकारची चार पुस्तके वर्षभरासाठी देण्यात आली आहेत”, असे त्यांनी नमूद केले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच रोबोटिक, विज्ञान आणि भाषा विषयासंदर्भातील प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरात ज्या-ज्या ठिकाणी शाळांची गरज असेल त्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रस्ताव तयार करावा, त्याला मंजुरी देण्यात येईल, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले. दहिसर परिसरात सातवीपर्यंत असलेल्या शाळा लवकरच आठवी ते दहावीपर्यंत सुरू करण्यात येतील, असे श्री. केसरकर यांनी सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.


‘व्यावसायिक शिक्षणासह परकीय भाषादेखील अवगत करावी’


            मंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले, “जगातील अनेक देशांमध्ये मातृभाषेतच शिक्षण दिले जाते. ठराविक देश वगळता इतर ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी आवर्जून शिकावी. त्यासोबतच इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन, रशियन अशा परकीय भाषांचेही आवश्यक ज्ञान घ्यावे. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जगभरात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तसेच अभ्यास करत असतानाच गणित, विज्ञान आणि व्यावसायिक शिक्षणावरही भर द्यावा”, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी विद्यार्थी व पालकांना केले.


            उपशिक्षणाधिकारी श्रीमती संगीता तेरे यांनी प्रास्ताविक केले. आमदार मनीषा चौधरी यांनी दहिसर परिसरातील विकासकामांची माहिती देताना दहिसर नदी स्वच्छता व संवर्धनाची माहिती दिली.


चार हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ


            आर/उत्तर विभागातील सखाराम तरे मार्ग महानगरपालिका शाळेची स्थापना सन १९५७ मध्ये झाली. या इमारतीमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती माध्यमाच्या शाळा असून सुमारे ४ हजार विद्यार्थी या संकुलात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्या सतत वाढत असल्याने, तसेच वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याने प्रशासनाने या इमारतीच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेतला. आधीच्या इमारतीची रचना तळ मजला अधिक २ मजले अशी होती. पुनर्बांधणीनंतर इमारतीची रचना तळमजला अधिक ६ मजले प्रस्तावित करण्यात आली. दिनांक १४ मार्च २०२० रोजी या इमारतीची पुनर्बांधणी सुरू झाली होती.


दुसऱ्या टप्प्याचेही काम लवकरच


            दोन टप्प्यामध्ये या इमारतीची पुनर्बांधणी प्रस्तावित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये तळमजला अधिक सहा मजले इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीमध्ये विज्ञान प्रयोगशाळा वाचनालय, सभागृह, विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवीन इमारतीत जुन्या इमारतीतील विद्यार्थ्यांना स्थलांतरीत करण्यात येणार असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येईल.


शाळेच्या पहिल्याच दिवशी भारावले विद्यार्थी


            बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे मागील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये 'मिशन अॅडमिशन' या उपक्रमांतर्गत १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात आले. तसेच यंदाच्या २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरिता व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी 'मिशन मेरीट' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दहिसर येथील मुंबई स्कूलच्या नवीन इमारतीत शाळेच्या पहिल्याच दिवशी बसायला मिळणार असल्याने विद्यार्थी भारावले होते. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मंत्री श्री. केसरकर यांनी शाळेच्या नवीन इमारतीची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार

 आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती व प्रसारणमंत्र्यांचे मानले आभार


            मुंबई, दि. 15 : आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने आज जारी केले आहे, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत.


            पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग १९ जूनपासून बंद करण्याचे आदेश प्रसारभारतीने काढले होते. या आदेशाविरुद्ध सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या अपर मुख्य सचिवांना सूचना देऊन केंद्रातील अधिकाऱ्यांकडे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरू ठेवावा, अशी विनंती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामागणीवर सकारात्मक निर्णय घेत प्रसारभारतीने यापुढे पुणे प्रादेशिक वृत्त विभागातूनच बातमीपत्र प्रसारित होतील, असे आदेश आज काढले आहेत.


            सकाळी ७.१०, ८, ८.३०, १०.५८, ११.५८ वाजताचे आणि सायंकाळी ६ वाजेचे बातमीपत्र यापुढेही पुणे केंद्रावरुनच प्रसारित होणार आहेत.



००००



 


अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील

 अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील.


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गिरणी कामगारांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप


            मुंबई, दि. १५ : गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा व मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या पात्र १६२ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्या व वितरणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी श्री. शिंदे बोलत होते.


            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला कामगार मंत्री सुरेश खाडे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) अरुण डोंगरे आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आजचा दिवस आमच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस असून गेली अनेक वर्षे गिरणी कामगारांना घरे मिळणार अशी फक्त चर्चा होत होती. आज प्रत्यक्षात गिरणी कामगारांना चाव्या आणि पत्र दिले जात आहेत. सन २०२० मधील गिरणी कामगार सोडतीतील उर्वरित सुमारे ३५०० यशस्वी गिरणी कामगार/वारसांना येत्या तीन महिन्यांत सदनिकांचा ताबा देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. सदनिकेच्या चाव्या मिळत असलेल्या गिरणी कामगारांना सदनिका विक्री किंमतीचा भरणा उशिरा केल्याबद्दल लावलेला दंड माफ करून दि. ०१ जुलै २०२३ पासून सदनिकेसाठीचा देखभाल- दुरुस्ती खर्च आकारण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. कायदे हे सर्वसामान्यांसाठी असावेत, ही शासनाची भूमिका असून योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना शासनाकडे येण्याची वेळ येवू नये, यासाठी 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम राबवित आहोत. आतापर्यंत राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. गिरणी कामगारांना सदनिका खरेदी करण्यासाठी मुंबई बँकेने कर्ज दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी बँकेचेही आभार मानले.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गिरणी कामगारांची सन २०२० मध्ये सोडत काढण्यात आली. मात्र, आतापर्यंत केवळ २६ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांची पात्रता निश्चित होऊन विक्री किंमतीचा भरणा केलेला होता. सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/ वारसांच्या पात्रतेविषयक कामाला गती मिळून त्यांना सदनिकेचा लवकरात लवकर ताबा मिळावा, यासाठी आमदार सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती तयार केली. समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे कमी कालावधीत जवळपास १६२ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांची पात्रता निश्चित झाली. येत्या तीन महिन्यात उर्वरित सुमारे ३५०० गिरणी कामगार/ वारसांची पात्रता पूर्ण करुन त्यांना सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन श्री.फडणवीस यांनी दिले. गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगार/ वारसांची पात्रता निश्चितीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन इतरही गिरणी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. शेवटच्या पात्र कामगाराला सदनिकेचा ताबा मिळत नाही, तोपर्यंत हे काम सुरु राहील. सदनिका मिळण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व १ लाख ५० हजार गिरणी कामगारांना घर उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे लवकरच एक मोहीम सुरू करण्यात येणार असून विशेष कक्ष स्थापन केला जाणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            श्री. राणे म्हणाले की, मार्च-२०२० मध्ये मुंबईतील बॉम्बे डाईंग मिल, बॉम्बे डाईंग टेक्सटाइल मिल आणि श्रीनिवास मिलमधील ३८९४ सदनिकांसाठी म्हाडातर्फे सोडत काढण्यात आली. या सोडतीमधील यशस्वी गिरणी कामगार/ वारसांपैकी एकूण १४१२ यशस्वी गिरणी कामगार वारसांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठीचे तात्पुरते देकार पत्र (Provisional Offer Letter) देण्यात आले असून उर्वरित २४८२ गिरणी कामगार/ वारसांची पात्रता निश्चित करून व सदनिकीच्या विक्री किंमतीचा भरणा केल्यानंतर त्यांना चाव्यांचे वाटप तत्काळ केले जाणार आहे.

Featured post

Lakshvedhi