Tuesday, 13 June 2023

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी

 सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी


 


            गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.


            राज्य शासनामार्फत ‘सततचा पाऊस’ नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.


            केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल. 


-----

वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणीसाठीच्या वेबपोर्टलचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

 वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणीसाठीच्या वेबपोर्टलचा

वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणीसाठीच्या वेबपोर्टलचा

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

 

               मुंबईदि. 13 : वक्फ मालमत्तांची ऑनलाईन-नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेब-पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. 

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वेबपोर्टलचा शुभारंभ झाला. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांसह खासदार इम्तियाज जलीलफौजिया खानवक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहद मिर्झासदस्य समीर काजीमुदस्सीर लांबे आदी उपस्थित होते.

            महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ हे कार्यालय औरंगाबादला असून राज्यातील वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांच्या अनुषंगाने राज्यभरातील वक्फ संस्थेच्या प्रतिनिधींना औरंगाबाद येथे जावे लागते. ही अडचण दूर व्हावी व वक्फ मालमत्तांशी संबंधित कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्याची सुविधा निर्माण व्हावीया हेतूने एक संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम विभागाने

हाती घेतले. त्यानुसार आता ऑनलाईन-नोंदणी ची सुविधा https://mahawaqf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.

0000


0000

 आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबतराज्य शासनाचा त्रिपक्षीय करार


 


        मुंबई, दि. 13 : गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनि बी प्रा. लि. यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे.


            सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मनि बी प्रा. लि. च्या संचालक शिवानी दानी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य व्यवस्थापक अमिश पटेल, श्रीराम कृष्णन, संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे.


             राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि मनि बी प्रा. लि. यांच्यामार्फत राज्यात आर्थिक साक्षरता विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून हा आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असणार आहे.


            यामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी, आर्थिक गुंतवणुकीची कशी खबरदारी घ्यावी आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


            डिजीटल सिस्टीम सुरक्षितता आणि सायबर हल्ले रोखण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान विद्यार्थ्यांना शिक्षीत आणि प्रशिक्षीत करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.


0000



मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे

 मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे

 

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहितीआमदार भातखळकर यांनी उपस्थित केला प्रश्न 


 

मुंबई : मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतीलअसे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्या कांदिवली पूर्व विधानसभेतील विविध प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. घरा ऐवजी २५ ते ४० लाख रुपयांचा पर्यायही प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

यावेळी आमदार भातखळकर यांनी मतदारसंघातील विविध प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचा प्रश्न उपस्थित केला. विशेष नियोजन आराखड्यातील मागाठाणे-गोरेगाव या १२० फूट रस्त्याबाबतही चर्चा करण्यात आली. हा रस्ता येणाऱ्या एक ते दिड वर्षात पूर्ण करावाअसे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. हा रस्ता पूर्ण होताच वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

 

मतदारसंघातील महत्वाच्या समस्यांचा निपटारा केल्याबद्दल आमदार भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. बैठकीस नगरविकासगृहनिर्माणमहापालिकाम्हाडाझोपडपट्टी पुनर्वसनशिवशाही पुनर्वसन यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.    



बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रेविलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ

 बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रेविलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ


            मुंबई, दि. 12 :- इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दिनांक 18 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही आवेदनपत्रे विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक‍ शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरावी, असे आवाहन शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.


            महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी तसेच आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दिनांक 18 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


            उच्च माध्यमिक शाळांनी/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख सोमवार दिनांक 19 जून 2023 पर्यंत असून विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख मंगळवार दिनांक 20 जून 2023 अशी आहे.


            महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै - ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक‍ शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरावी, असे आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.


००००

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला करपरताव्यापोटी 7472 कोटी रूपये

 केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला करपरताव्यापोटी 7472 कोटी रूपये


 


            नवी दिल्ली, 12 :- केंद्र सरकारने, सर्व राज्यांना 59,140 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून 1,18,280 कोटी रुपये आज वितरित केले असून, महाराष्ट्र राज्याला कर परताव्यापोटी 7472 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे.


            सर्व राज्यांना जून 2023 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला आहे, ज्यामुळे राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, त्यांच्या विकास तसेच कल्याणविषयक खर्चाला वित्तीय सहायता करण्यासाठी आणि महत्त्वाचे प्रकल्प व योजनांसाठी संसाधने उपलब्ध करून देण्यात येत आहे.


        वाटप केलेल्या रकमेचा राज्यनिहाय विभाजन तक्ता जारी करण्यात आला आहे.


००००



 

तांदळाच्या.. पाण्याचे.. पेजेचे.. आरोग्यदायि फायदे*

 *तांदळाच्या.. पाण्याचे.. पेजेचे.. आरोग्यदायि फायदे*



१) तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकुन प्यायल्यास भूक वाढते.

२) तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जि मिळते. थकवा दूर होतो.

३) तांदळाचि पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास

 रक्ताचि कमतरता दूर होते.

४) तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

५) तांदळाच्या पेजेत दहि टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

६) केळे व तांदळाचि पेज एकत्र करून प्यायल्याने जुलाब बंद होतात, 

७) तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.

८) तांदळाच्या पेजेत मीठ व जीरे मिसळून प्यायल्यास

 डायजेशन सुधारते.

९) भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटस् चे प्रमाण अधिक असते त्यामूळे उर्जा मिळते बाहेर जातांना पिउन जावे दिवसभर ताजेतवाने वाटते.

१०) वायरल संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजि पेज घ्यावि, आजारपणात आलेली कमजोरि दूर होते.

११) उच्च रक्तदाब कमी होतो ः। तांदळाचे पाणी घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमि होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.

१२) तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तजेलदार, मूलायम होतो, काळे डाग निघून जातात.

१३) केसांकरता उत्तम टाँनिक आहे. याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो, केस रेशमि, चमकदार, व मजबूत होतात. रूक्षता निघून जाते

 दुतोंडि केसांचि समस्या दूर होते, कारण यात मुबलक विटामिन, मिनरल असतात.

१४) तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कँसरच्या पेशि आटोक्यात राहतात.

१५) तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते, पचनक्रिया सुरळित चालते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.

२६) डायरियात डिहायड्रेशन होते अश्या वेळि तांदळाचि पातळ पेज प्यायला द्यावि. ताकद येते.

१७) सर्दि, पडसे, ताप, वायरल इंनफेक्शन मध्ये

 तांदळाचे पाणि प्यायल्यास प्रतिकारशक्ति वाढून हे आजार दूर होतात.




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





Featured post

Lakshvedhi