सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 11 June 2023
आरोग्य चांगले साठी सर्वसामान्य नियम
नमस्कार 🙏🏻 आरोग्य चांगले साठी सर्वसामान्य नियम
1)तहान लागेल तेव्हाच पाणी प्या.
2)शाबुदाणा,शेंगदाणे,वरी,दही हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ खाऊन उपवास करू नयेत... खरा उपवास म्हणजे लंघन..पोटाला विश्रांती देणे..
3)जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे.
4)दोन्ही जेवणानंतर शत पावली( Actual १०० steps च अपेक्षित आहेत .व्यायाम नव्हे )घालावी. म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते.
5)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत.
6)रात्री च्या वेळी दही खाऊ नये.
7)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.
8)मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.
9)आपण जिथे राहतो तिथे ज्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे..फळे नुसतीच खावीत, दुधात घालून,दह्यात मिक्स करून खाऊ नयेत...फळांची मूळ चव आणि गुणधर्म बदलतात अशाने..
10)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश जरूर असावा.तुपाने कोलेस्टेरॉल वाढत नाही..तूप हे दुधावर अनेक संस्कार केल्यानंतर तयार होते त्यामुळे पचनासाठी चांगले असते..
11)संडास,लघवी ,उलटी ,शिंक या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे.
12)पाळीच्या दिवसात स्त्रियांनी लोणचे खाल्ले तर रक्त स्त्राव वाढण्याची शक्यता असते कारण लोणच्यात तेल,मीठ,तिखट यांचा जास्त वापर असतो आणि त्यामुळे स्त्री शरीरातील पित्त वाढते पर्यायाने रक्त सुध्दा वाढते..म्हणून लोणचे खाऊ नये.
13)दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये..विरुद्ध आहार आहे..त्याचे पचन होत नाही.आणि अनेक आजारांची निर्मिती त्यातून होते.
14)कधीही पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नये..वायू च्या संचरणासाठी पोटात जागा ठेवावी.
15) शिळे अन्न, processed food, preservatives असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत..जितका आहार ताजा खाल्ला जाईल तितके शरीराचे पोषण चांगले होईल...आपल्या शरीराचा संपूर्ण डोलारा हा आपण खात असलेल्या आहारावर च अवलंबून असतो...
16)व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे सगळ्यांना सरसकट एक च औषध लागू पडत नाही..वय,वजन,प्रकृती,रुग्णाची नाडी परीक्षा ,पूर्वी होऊन गेलेले आजार अशा अनेक गोष्टींवर treatment अवलंबून असते..
Health is Wealth
वैद्य स्वप्ना कुलकर्णी
_*(
सामान्य आजारापासून दूर राहण्यासाठी औषधीचा खजिना आहे
आपल्या घरात सर्व सामान्य आजारापासून दूर राहण्यासाठी औषधीचा खजिना आहे. फक्त जरूर आहे ते ओळखुन त्याचा वापर करायचा.
1)3 ग्राम मेथीचे चूर्ण दह्या बरोबर तीन दिवस घेतल्यावर पोटात चुक येत असेल तर त्यात फायदा होतो.
2)खजूरीचे शरबत पिल्याने पोटातील आग दूर होते.
3)दर रोज रात्री कोमात पाण्यात थोडेसे सिंद्धव मीठ टाकून प्यायल्याने डोळ्यातून निघणारे पाणी बंद होते.
4)जांभळाची पाने चावल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते.
5)अडुळश्याची पाने खूप चावून त्याचा रस गळ्यात गेला तर तोंड आलेले असेल तर खूप त्रास कमी होईल.
6)हिरड्या दुखत असतील तर alum म्हणजे फिटकरी चा पावडर घासल्याने दुखणे कमी होईल.
7)सतत उचक्या येत असतील तर बंद करण्यासाठी एक ग्लास कॉमत पाण्यात अर्धा चमचा बडीशोप टाकून ते पाणी प्या.
8)रात्री बरोबर झोप येत नसेल तर तळ पायांना आणि हाताला चांगले तूप घासून घ्यावे. छान झोप येईल.
9)किडनी स्टोन असल्यास मुळच्या रस आणि त्याची पाने चावून खालल्यास 20 दिवसात समस्या दूर होईल.
प्रमोद पाठक.
Saturday, 10 June 2023
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...






