Monday, 5 June 2023

अशीही एक वटपौर्णिमा

 अशीही एक वटपौर्णिमा

   चित्रा अविनाश नानिवडेकर. सफाळे 


आज तन्वी च्या डोळ्यातून सतत पाणी येत होतं. लग्नानंतर ची पहिलीच वटपौर्णिमा. आठवड्यापासून तिची तयारी चाललीय. आईने दिलेली गर्भरेशमी हिरवी पैठणी, सासूबाईनीं आठवणीने काढून आणलेल्या गोठ पाटल्या, पहिल्या वटपौर्णिमे साठी म्हणून मुद्दाम तिने आणि तनिष ने खरेदी केलेला लफ्फा, झालंच तर नथ वगैरे काढून ठेवली…तिला लहानपणापासून हया सणाचं खूप अप्रूप होतं…छान ताट सजवून घ्यायचं त्यावर स्वतः विणलेला क्रॉशाचा रुमाल घालायचा पाच सवाष्णी बरोबर वडाच्या पारावर जायचं…मनोभावे पूजा करून नाजूक हाताने वडाला दोरा गुंडाळत एकीकडे "जिवाच्या सख्या "कडे पाहायचं…लौकरच मनात धरलेलं स्वप्नं सत्यात येणारं हे धरूनच तिची तयारी चालली होती. सासूबाई आणि तनिष हळूच तिची फिरकी घेत होते परवा पासून

"अगं.. तूझं तबक धुवायचे राहिले…किंवा साडी चा ब्लाउज आणायचा राहिला…आणि हो त्या दिवशी कडक उपास असतो बरं…फक्त शहाळ नि केळं खायचं "

मंद हसून ती त्यांना दाद देत होती. लग्नानंतर येणारी पहिली वटपौर्णिमा मनात रंगवत रात्री तिने तनिष ला न विसरता बजावलं

"फोटो काढण्यात कंजूस पणा करू नकोस उदया. मला स्टेटस ला भरपूर फोटो टाकायचे आहेत."


…. आणि सकाळीच तिला मेट्रन चा फोन आला. हॉस्पिटल मध्ये अपघाताच्या केसेस आल्यात तुझी सुट्टी कॅन्सल. ताबडतोब जॉईन हो. खूप इमर्जन्सी आहे. सासूबाईनीच फोन घेतला त्या आणि तनिष दोघेही म्हणाले..

 "जा… तन्वी वटपौर्णिमा परत सुद्धा साजरी करता येईल पण आत्ता हॉस्पिटल मध्ये खरी तुझी गरज आहे. आम्ही समजू शकतो "

डोळ्यातलं पाणी परतवून तिने युनिफॉर्म चढवला. हॉस्पिटल कंपाउंड मध्येच रहात असल्यामुळे पाचव्या मिनिटाला ती इमर्जन्सी वॉर्डात दाखल झाली.

खरंच रोड अपघातात सापडलेली संपूर्ण फॅमिली, ड्रायवर, चिमुकली दोन मुलं. नशिबाने त्यातील एक तरुणी दाराच्या बाहेर फेकली गेली होती म्हणून थोडक्यात खरचटलं आणि पायावर फ्रॅक्चर वर निभावलं.

तन्वी च्या टीम ने भराभर सगळ्यांना ईलाज सुरू केले. डॉक्टर्स ऑर्डर देत होते. आणि सगळ्या त्या प्रमाणे ट्रीटमेंट देत होत्या. त्या तरुणीच्या मिस्टर ना जेंव्हा आय. सी. यू. मध्ये हलवले…तिने तन्वी चा हात घट्ट पकडत डोळ्यातून पाणी काढून म्हटलं.

"सिस्टर…माझ्या साठी तुम्ही आज सावित्रीचं रूप आहात…माझ्या.. माझ्या सत्यवानाला प्लिज प्लिज यमाच्या दारातून बाहेर आणा…मी.. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन."

तन्वी च्या अंगावर सर्रकन काटा आला. तिला धीर देत तन्वी म्हणाली "हो.. काळजी नको करुस. आम्ही सगळे प्रयत्न करू. हे बघ माझ्या हातात त्यांचेच ब्लड सॅम्पल आहे.2..3.. बॉटल रक्त लागेल द्यायला. तेंव्हा ते नक्कीच शुद्धीवर येतील. विश्वास ठेव आम्ही सर्व जण शर्थीचे प्रयत्न करू. तू पण देवाला प्रार्थना करत राहा "


अक्षरशः रात्री आठ वाजता त्या तरुणी च्या मिस्टरांनी ट्रीटमेंट ला प्रतिसाद दिला तेंव्हाच तन्वी आय सी यू च्या बाहेर आली.

त्या तरुणीला व्हील चेअर वर घेऊन तन्वी ने तिच्या नवऱ्याच्या बेडजवळ नेलं.नवऱ्याचा हात हातात घेऊन ती तरुणी भरभरून रडत म्हणाली…

"वटसावित्री आज तुमच्या रूपाने फळाला आली सिस्टर तुम्ही होतात म्हणून. मला समजलं आज स्वतः ची पहिली पूजा सोडून इमर्जन्सी मध्ये आलात . पण ड्युटीवर आल्या पासून जरा ही खंत न करता तुम्ही सगळी परिस्थिती शांतपणे हाताळली.मी मनापासून प्रत्येक वर्षी वटसावित्री दिवशी एक सौभाग्य वाण तुमच्यासाठी देणार. आज तुमच्यामुळे माझं सौभाग्य मला सहिसलामत मिळतं आहे."


तन्वी चे सुद्धा डोळे भरून आले. तिच्या पाठीवर थोपटून तन्वी म्हणाली "अगं…मेडिकल मधले सगळेच ह्यासाठी झटले.. म्हणून ह्या अपघातातले सगळेच वाचले. चल मी निघू? उदया येईनच ड्युटीवर "


व्हरांड्यात तनिष ला बघून तिला आश्चर्य वाटले. "अरे…इकडे कसा काय? मी येतच होते घरी "

"बाईसाहेब…वटपौर्णिमा काय तुम्ही एकट्याने पुजायचा मक्ता घेतलाय? मी पण अशी कर्तव्यदक्ष बायको सातजन्म मिळावी म्हणून उपास करून होतो."

"म्हणजे? मी नाही समजले "

तेवढ्यात एक म्हातारे आजोबा जवळ येऊन तनिष च्या पाठीवर थोपटत म्हणाले

"बाळा.. किती रे धावपळ केलीस माझ्या मुलाला ब्लड मिळवण्यासाठी, नातवंडाना दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलास. हिला तूझ्या आईने बळजबरी जेवू घातलं…खूप सेवा केलीत. हया परक्या ठिकाणी आम्हाला तुमचा खूप आधार वाटला रे. तुमच्या रूपाने देव भेटला…!"

तन्वी चे डोळे कृतज्ञतेने भरून आले.

अश्या तऱ्हेने तिची वटपौर्णिमा साजरी झाली.


©® चित्रा अविनाश नानिवडेकर. सफाळे पालघर.

स्त्रीसखी - शतावरी*

 *स्त्रीसखी - शतावरी*


*मूळ संस्कृत शब्द शतवीर्या. वीर्य म्हणजे ताकद किंवा कार्यशक्ती. म्हणून माणसाची कार्यशक्ती शतपटीने वाढविते अशी ही वनस्पती.*


*◼️ गुणधर्म*


१. मधुर व कडू रस, स्निग्ध व थंड, त्यामुळे पित्तशामक.

२. डोळे, हृदय व शुक्रधातूला हितकर आणि गर्भपोषक.

३. सप्तधातूंचे पोषण करणारे उत्तम रसायन (इथे रसायन याचा अर्थ 'केमिकल - लॅबोरेटरीत बनवता येते ते ' असा नाही, तर रसायन म्हणजे सप्तधातूचे पोषण करणारी द्रव्ये). त्यामुळे बुद्धिवर्धन, बलवर्धन व रोगनाशन यांचे सामर्थ्य मिळते.

४. बुद्धिवर्धक, बलवर्धक व रोगनाशक.

५. शरीरघटकांचा लवकर नाश होऊ देत नाही; परिणामी, वृद्धत्व लांबवते.


*◼️ उपयोग*


१. गर्भपोषक - स्त्री-पुरुषातील वीर्य वाढवते व गर्भधारणेसाठी योग्य स्थिती निर्माण करण्यास मदत करते. भूक सुधारते. त्यामुळे गर्भारपणातील अशक्तपणा लवकर जातो. गर्भाचे योग्य पोषण करते. बाळंतपणानंतर अंगावरील दूध वाढविते व सूज कमी करते.

२. मधुमेह - रक्तातील साखर व चरबी कमी करते. लघवीला साफ होते. यामुळे मधुमेह व कोलेस्टेरॉल वृद्धीवर उपयोगी.

३. स्नायूंच्या समस्या - स्नायूंची लवचिकता वाढते. स्नायूंच्या वेदना व सूज कमी करते आणि मांसाचे पोषण करते. आंत्रवण किंवा अल्सरमध्ये अंत:त्वचेला मऊपणा येतो. शतावरी तेल चोळून लावल्यास स्नायू कणखर बनतात; त्यांचा स्टॅमिना वाढतो.


*◼️ वापरण्याची पद्धती*

शतावरी कल्प २ चमचे, एक कप दुधात टाकून, सकाळी व रात्री झोपताना घ्यावे किंवा शतावरी चूर्ण अर्धा ते एक चमचा + दूध १ कप उकळून, साखर - घालून प्यावे - (मधुमेहींनी साखर घालू नये.) रोज दोन वेळा.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



Sunday, 4 June 2023

कंबर दुखी*

 *कंबर दुखी*


शहरी लोकांच्या रोजच्या अति शीघ्र जीवनशैलीमुळे त्यामना व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. रोजची दगदग, धावपळ, उठबस म्हंणजे व्यायाम नव्हे. व्यायाम न करण्याचे परिणाम म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार हे केवळ वाढत्या वयातच होणारे आजार न राहता ते तरुण आणि अगदी लहान वयातही होणे.


मणक्यांमध्ये नैसगिकत: चार वेगवेगळे बाक असतात. मानेला पुढच्या दिशेने (सर्व्हायकल स्पाईन), पाठीला मागच्या दिशेने (थोरॅसिक स्पाईन), कंबरेला पुढच्या दिशेने आणि माकडहाडाला मागच्या दिशेने बाकाला लंबर असे म्हणतात. मणक्यांच्या मधून मज्जारज्जू जात करत असल्याने मणक्यांना इजा झाल्यास मज्जारज्जूवर परिणाम होऊन 'कंबरदुखी/पाठीचे दुखणे/मणक्याचे आजार सुरू होतात .

***

*मणक्याचा आजार होण्याची कारणे*

***

लहान वयात खूप जास्त वजनदार दप्तराचे पाठीवर घेतलेले ओझे,

खुर्चीत जास्तीत जास्त वेळ बसणे, किंवा बसण्याची मुद्रास्थिती चुकीची असणे,

संगणकावर सतत काम करणे,

कोणत्याही वाहनातून प्रवास करताना खाच-खळगे, खड्ड्यांमुळे मणक्याला मार बसणे,

नेहमी पोट साफ न होणे,

रात्री जागरण होणे,

चिंता, शोक, क्रोध,

व्यायमाचा अभाव,

स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा, इ.मुळे पाठीचा मणका गॅप किंवा कंबरदुखी उद्भवते.

***

*मणक्याच्या आजारांची लक्षणे*

****


अस्थिक्षय किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाठीचा मणका कमजोर होणे,

हाता-पायामध्ये मुंग्या येणे, कंप येणे,अवयव बधीर होणे, त्यांच्यात कळा येणे,

कंबरेत दुखणे,सकाळी उठताना त्रास होणे,

कुशीवर वळताना त्रास होणे,किंवा पाठीच्या मणक्यातून कूस बदलताना कड कड आवाज येणे,कूस बदलताना पाठीचा मणका एकदम अवघडल्यासारखं होणे,

चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे, कंबरेच्या मागील बाजूने पायाच्या तळव्यापर्यत्न शीर दुखणे,मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे,पायाच्या पंजाची ताकद कमी होणे, पायातील स्पर्शज्ञान कमी होणे,

शौचाला बसता न येणे,चक्कर येणे,नसांवरील असह्य़ दबावामुळे लघवीचे नियंत्रण जाणे, असे काही भयप्रद परिणामही प्रसंगी दिसून येऊ शकतात.

***


*मणक्याचे आजार झाल्यास पाळावयाचे पथ्य*

****

वांगे, बटाटा, हरबऱ्याची डाळ, वाटाणे, चवळी, वाल, अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावेत.

अति परिश्रमाची कामे टाळावीत, जड वजनाच्या वस्तू उचलू नये.

जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा.

आंबट


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*(

मी कशाला आरशात पाहू ग

अक्षरा jetesh 
Age 3yeas


जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शहर नगर

 ---------------------------------------------

आज दिनांक 04 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दिन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब कार्यक्रमानिमित्त शहरात येणार असल्याने त्यांच्या स्वागताच्या पूर्वतयारी साठी, तसेच नगर येथे होणाऱ्या सभेच्या पूर्वतयारी च्या अनुषंगाने राष्ट्रवादी भवन येथे सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वर्धापनदिन निमित्ताने ध्वजारोहण व इतर कार्यक्रमाचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली.
यावेळी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेले आम् आदमी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि पूर्व शहर कार्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील ह्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्याकडे शहर जिल्हा मुख्य सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली.  ख्वाजा शराफोद्दिन यांच्या मार्गदर्शनाखाली  नेतृत्वाखाली आणि रघुनाथदादा पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक नवीन कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
यावेळी पक्षाचे सुरजीत सिंग खुंगर, सलीम पटेल वाहेगावकर, अयुब खान, मेहराज बेगम, मुन्ना भाई,  म. गयास बागवान, अंकुश आगे, आशिष शिसोदे, रवींद्र जायभाये, मंगेश तिळवे, अनिल डोंगरे, कन्हैयालाल मिसाळ, प्रशांत मोतीलाल जगताप ,सुभाष जाधव, फुलचंद जाधव, विठ्ठलराव जाधव, आश्रफ पठाण, सलीम शेख, विलास डंगारे, आर. बी. पाटील, मोहम्मद रफी,  इरफान शेख, पठाण इब्राहिम साहेब, आप्पा पगारे, फैयाज रशीद, सय्यद रियाज, भिकन शाह, जहीर केसरी, शेख अनवर शेख कैसर ,शेख जफर शेख गफार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपालांच्या उपस्थितीत अश्वमेध महायज्ञासाठी भूमिपूजन संपन्न

 राज्यपालांच्या उपस्थितीत अश्वमेध महायज्ञासाठी भूमिपूजन संपन्न


            मुंबई, दि.4 : २३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत खारघर येथे होणाऱ्या ४८ व्या अश्वमेध महायज्ञानिमित्त भूमीपूजनाचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. ४) मध्यवर्ती मैदान, खारघर येथे संपन्न झाला. अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


            अश्वमेध यज्ञ हे केवळ धार्मिक अनुष्ठान नाही, तर त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक व आध्यात्मिक महत्व आहे. सर्व समाजाला एकत्र घेऊन यज्ञ करीत असल्यामुळे त्यातून मतभेद मिटून एकात्मतेची भावना वाढते असे राज्यपालांनी सांगितले.  


       आज पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याला धक्का लावणाऱ्या घटना घडत आहेत. अश्यावेळी अश्वमेध यज्ञाच्या माध्यमातून समष्टी, सद्भावना व मांगल्याची पुनर्स्थापना होण्याला मदत होईल, असे राज्यपालांनी सांगितले.  


       जागतिक हवामान बदलांचे परिणाम तीव्र होत असून अलीकडच्या काळात राज्याने वारंवार दुष्काळ व पूरस्थिती अनुभवली आहे असे सांगून पर्यावरण व विकास यामध्ये यांचा समतोल साधण्याची आवश्यकता आहे असे राज्यपालांनी सांगितले.  


       विश्वकल्याणाच्या उद्देशाने अश्वमेध महायज्ञाचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी अखिल विश्व गायत्री परिवाराचे अभिनंदन केले.  


            यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, देव संस्कृती विश्व विद्यालयाचे प्र-कुलगुरू चिन्मय पंड्या, अखिल विश्व गायत्री परिवाराचे संचालक मनुभाई पटेल, उद्योजक डॉ निरंजन हिरानंदानी, राधिका मर्चंट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


 


Governor Bais performs Bhumi Pujan for Ashwamedh


Maha Yagya in Mumbai

Maharashtra Governor Ramesh Bais attended the Bhumi Pujan ceremony for the hosting of the 48th Ashwamedh Mahayagya at Central ground, Kharghar, Navi Mumbai on Sunday (4 June). 


     The Maha Yagya is being organised by the Gayatri Parivar, Shanti Kunj Haridwar from 23 to 28 January 2024.


      Minister of Culture Sudhir Mungantiwar, Pro Vice Chancellor of Dev Sanskti Vishwa Vidyalaya Chinmay Pandya, Director of the Akhil Vishwa Gayatri Parivar Manubhai Patel, business leader Dr Niranjan Hiranandani, Radhika Marchant and others were present.


000


 


 


वृत्त क्र. 1793


 


पर्यावरण दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साधणार 'वनवार्ता' कार्यक्रमातून संवाद


आकाशवाणीवरून सोमवारी सकाळी ८.४० वाजता होणार प्रसारण


 


            मुंबई, दि. 04 - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार, ५ जून रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार “वनवार्ता” कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी केंद्रावरून सकाळी ८-४० वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. सध्याच्या काळाची गरज बघता पर्यावरण रक्षणाचे गांभीर्य, त्यासाठी करावयाची उपाययोजना व संविधानात नमूद प्रत्येक नागरिकांच्या या पर्यावरणीय कर्तव्यांविषयी जनसामान्यांना समजेल अशा सहज सोप्या भाषेत व स्वत:ला त्या गोष्टी कृतीत उतरवता येतील अशा पध्दतीने पर्यावरणविषयक बाबींची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंत्री श्री. मुनगंटीवार देणार आहेत.


            एकविसाव्या शतकात जागतिक तापमान वाढ, प्रदुषण, अवकाळी होणारा पाऊस, दुष्काळ यासारख्या मोठया समस्यांना आपण सामोरे जात आहोत. पर्यावरणाच्या या समस्या सोडविणे हे काम कुठल्याही एका विभागाचे अथवा समुहाचे नसून त्यात प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जनसामान्यांना पर्यावरण विषयक असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून देणे, त्यांना पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहित करणे यासाठी हा कार्यक्रम असणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनीता सिंग यांनी दिली.


            वननिती नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% वनाच्छादन असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने राज्यातील वनक्षेत्र वाढावे यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केला. सन 2016 ते सन 2019 मध्ये झालेल्या 50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमामध्ये लोकसहभाग घेतला. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील वनाच्छादन, मॅन्युव्ह इत्यादींच्या टक्केवारीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.


            "वनवार्ता “ कार्यक्रमाच्या माध्यमातून वनांविषयी कुतूहल, गंमतीजमती, रंजक गोष्टींपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पर्यावरण विषयक चर्चा व महत्त्वाच्या बाबी, त्यावरील उपाय, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव पर्यटन, हरित सेना (इको क्लब), वृक्ष लागवडी संदर्भात मंत्री श्री. मुनगंटीवार माहिती देणार आहेत.


            05 जून 2023 रोजी सकाळी 8.40 वाजता जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी वनवार्ता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम 15 मिनिटांचा असून पुढील सत्रांचे नियोजन ४ महिन्यांकरिता दर 15 दिवसांनी रविवारी (दि. 18/06/2023 पासून पुढे) सकाळी 7.25 वाजता आकाशवाणी वरुन प्रसारित होणार आहे.


            या कार्यक्रमाद्वारे वने व सामान्य नागरिक 

यांचे नाते सुदृढ होण्यास मदत होणार आहे. 


000


 


आंघोळीच्या पाण्यात टाका लिंबाचा रस टाकण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्.....*

 *आंघोळीच्या पाण्यात टाका लिंबाचा रस टाकण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्.....*


उन्हाळा सुरू झालाय, अशात लिंबाच्या रसाचे काय काय फायदे होतात हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. लोक गॅस दूर करण्यासाठी किंवा थकवा घालवण्यासाठी लिंबाच्या रसाचं सेवन नेहमी करतात. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी लिंबाचा रस किती फायदेशीर आहे हेही सगळ्यांना माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नाही की, लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यात टाकल्यावर त्याचे काय फायदे होतात. चला जाणून घेऊ याचे फायदे....


*शरीराची दुर्गंधी होते दूर...*

वाढत्या वयासोबत वाढत्या वजनाचा संकेत तेव्हा मिळतो जेव्हा तुमच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते. जर कुणाच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते तेव्हा समजून घ्या की, भविष्यात तुम्ही एखाद्या गंभीर आजाराचे शिकार होणार आहात. पण अनेकदा घामामुळेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. अशात तुम्ही आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर करावा.


*सुरकुत्यासाठी होतील दूर...*

आपलं शरीर एका गाडीप्रमाणे आहे. जसे आपण एखादी गाडी खरेदी करतो, तेव्हा ती सुरूवातीला चांगला मायलेज देते आणि वेळेनुसार तिच्याकडे लक्ष दिलं नाही तर ती खराब होते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेचं आहे. वाढत्या वयासोबत जेव्हा आपण आपल्या शरीराला चांगलं पौष्टिक जेवण देत नाही तर त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ लागतात. या ठीक करण्यासाठी तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकू शकता.


*त्वचेसाठी फायदेशीर...*

हा एक आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोक हा उपाय वापरतात. जो शरीरासाठी फायदेशीर मानला जातो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे याने त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. अशात केमिकलयुक्त साबणाऐवजी लिंबाच्या रसाच्या रसाचा वापर करू शकता. 


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺

Featured post

Lakshvedhi