Friday, 26 May 2023

चेहऱ्यावरचे तिळ कमी करण्याचे काही घरगुती उपाय...

 *चेहऱ्यावरचे तिळ कमी करण्याचे काही घरगुती उपाय.....*    


*कोथिंबीरच्या काही पानांची पेस्ट करा. ही पेस्ट काही दिवस तुम्हांला नको असलेल्या तिळावर नियमित लावा. 

 

*एरंडेल तेलाच्या मॉलिशमुळेदेखील तिळापासून सुटका मिळू शकते. हळूहळू तीळ कमी होण्यास सुरूवात होईल.  


*मध आणि सूर्यफूलाच्या बीयांच्या तेलाचे मिश्रण करा. या मिश्रणाचा तीळावर पाच मिनिटं मसाज करा. यामुळे त्वचा तजेलदार होईल सोबतच तिळ कमी होण्यास मदत होईल.  


*कपभर अननसाचा रस आणि पाव कप सैंधव मीठ एकत्र करा. या मिश्रणाने स्क्रब केल्यास चेहर्‍यावरील तिळ कमी होण्यास मदत होईल. 


*लसणाची पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी तिळावर लावा. त्यावर बॅन्डेज लावा. सकाळी उठल्यावर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा प्रयोग नियमित केल्यास तिळाचा त्रास कमी होण्यास मदत होईल.  


*काही आल्याचे तुकडे ठेचून तिळाच्या जागी लावा. त्यावर कपडा बांधून झोपा. या उपायानेही तिळ कमी होण्यास मदत होते. 


व्हिटॅमिन सीची एक गोळी बारीक कुटा. रात्री ही पेस्ट तिळावर लावून, त्यावर बॅन्डेज लावून झोपा. 


*व्हिनेगरचा वापर करूनदेखील तिळ हटवला जाऊ शकतो. सुरूवातीला चेहरा गरम पाण्याने धुवा. कापसाच्या बोळ्याने व्हिनेगर तिळावर लावा. 10 मिनिटांनंतर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवावा.


*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


कोबीच्या रसाचे फायदे !!

 *कोबीच्या रसाचे फायदे !!* 


अनेकदा प्रत्येकजण जेवणात हिरव्या भाज्यांचे सेवन करण्यास सांगतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात असलेले पोषक घटक. कोबी यापैकी एक आहे, विशेषतः आजकाल सॅलड्स आणि भाज्यांमध्ये आणि चायनीज फूडमध्ये त्याचा वापर झपाट्याने वाढला आहे. कोबी खाण्यात जितका फायदेशीर आहे तितकाच त्याचा रस देखील फायदेशीर आहे.

कोबीमध्ये व्हिटॅमिन सी, ई, के, बी6, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त, मॅंगनीज, कोलीन, रिबोफ्लेविन आणि थायामिनसह अनेक पोषक घटक असतात. वजन कमी करण्यासोबतच हा रस बीपी नियंत्रित करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. 


*चला तर मग कोबीच्या रसाचे फायदे जाणून घेऊयात -* 


*1. वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे :-* 


जर तुम्हीही तुमच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कोबीचा रस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्ही रिकाम्या पोटी या रसाचे सेवन केले तर त्याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसून येतो.


*2. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते प्रभावी आहे :-* 


कोबीचा रस रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. व्हिटॅमिन सी पासून ते कोबीमध्ये आढळणारे इतर पोषक घटक देखील खूप फायदेशीर आहेत. जर तुम्ही याचे रोज नियमित सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.


*3. रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो :-* 


कोबीमध्ये आढळणारे पोटॅशियम आपल्या शरीरातील वाढलेले सोडियम कमी करण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो.


*4. हार्मोन्स संतुलित करते :-* 


कोबीचा रस शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्याचे काम करतो. हे थायरॉईड ग्रंथीसह हार्मोन्सचे उत्पादन वाढवते. हा रस शरीरातील आयोडीनची कमतरता देखील पूर्ण करतो आणि हायपोथायरॉईडीझमच्या शक्यतेवर देखील काम करतो.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



खेळ आमच्या वेळेस नव्हता , कितीतरी उघडे पडले असते

 

*

Jai Hind


 

नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा


नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 25 : यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केलात्या हेतूची जनजागृती करणारा गणेशोत्सव असावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई गणेशोत्सव पूर्व तयारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला आमदार आशिष शेलारसांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेउपसचिव विद्या वाघमारेमुंबई महानगर पालिकेचे उपयुक्त रमाकांत बिरादारमुंबई शहर अप्पर जिल्हाधिकारी रवी कट्टकधोंडआदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले कीसांस्कृतिक कार्य विभागाकडून यावर्षीही गणेशोत्सवात स्पर्धा घेण्यात येतील. यावर्षी साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी बैठक घेतलेली आहे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार चार फुटाच्या आतील गणपती मूर्ती मातीच्या व चार फुटावरील मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा मातीच्या बनविण्यात याव्यात. त्याबाबत न्यायालयाने दिलेले निर्देश पाळावेत. याबाबत मूर्तीकार बांधवांची पर्यावरण विभागासोबत बैठक घेण्यात येईल. महापालिकेने मूर्ती बनविणेमूर्तींचे विसर्जनमूर्तीकारांना देण्यात येणारी जागा याबाबत सुलभ कार्यप्रणाली तयार करावी. ध्वनी क्षेपकाव्यतिरिक्त रात्री १० वाजेनंतर मंडपात करण्यात येणाऱ्या गणपती आरत्यांना परवानगी बाबत सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. या प्रकरणात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाहीयाची काळजी घ्यावी. गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नयेयाबाबत पोलीस विभागाने दक्ष असावे. त्यासाठी कडक बंदोबस्त ठेवावा. महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजने'ची अंमलबजावणी करावीअसेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

            बैठकीला पोलीसमहापालिकासांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी व मूर्तिकार बांधव उपस्थित होते.


Thursday, 25 May 2023

हळद*..एक गुणकारि औषध...

 *हळद*..एक गुणकारि औषध...


 माहिती आवडली तर नक्की शेअर करा 📲


 हळदीमुळे अन्नाला रूची तर येतेच, पण हळद हि आमदोष पचवण्याकरता मदत करते, आव होणे, जुलाब, याकरता हळद गुणकारि आहे. जंतावर ते एक प्रभावि औषध आहे. ः। रोज सकाळि १/२ चमचा हळद व १/२ चमचा वावडिंग हे मिश्रण मधासोबत घेतले तर, आणि शेवटि एंरडेल तेलाचा एनिमा घेतला तर संपूर्ण जंत निघून जातात.

           🌾. अति रक्तस्राव होतो जेव्हा जखमेतून.,,हळद,, दाबून ठेवलि तर बंद होतो. संसर्ग न होता जखम पूर्ण बरि होते. डोळे येतात, तेव्हा हळदिच्या पाण्याने धुवावे. डोळ्यांचि आग, लालसरपणा, सूज, डोळ्यातून येणारा स्राव बंद होतो. 

      शरिराच्या कुठल्याहि भागाला जर मूका मार लागला, पाय ,हात लचकला, तर हळकुंड व आंबेहळद उगाळून लेप लावावा.


🌾.. चेहर्यावर पिंपल, पुरळ, काळे डाग येत असल्यास, हळद व चंदन उगाळून लेप लावावा. भारतिय संस्क्रुतीत लग्नाच्या आधि वर वधुच्या अंगाला हळद लावण्याचा प्रघात आहे. म्हणून ऐरविसुद्धा साबण न वापरता। हळद+साय+ दहि+ मसूरिच्या डाळीचे पिठ या मिश्रणाने स्नान करावे कायम.


🌾 रोज रात्रि झोपण्यापूर्वि हळद गरम पाण्यातून घेतल्यास चरबि कमि होते., खोकला असतांना, कफ पडत नसेल तर, झोपण्यापूर्वि हळकुंडाचा तुकडा भाजून घेउन, चावून रस गिळावा. आराम होतो.. स्रियांच्या डिलिव्हरिनंतर, गर्भाशय संकुचित होण्याकरता, गर्भाशयाचि ताकद वाढवण्याकरता, जंतु संसर्ग होउ नये यासाठी, बाळंतिणिच्या आहारात हळद समाविष्ट करतात.


🌾ः कानांतून पाणि जात असेल तर, हळद. वावडिंग, वेखंड याची धुरि देतात., अग्निमांद्य, झाल्यास, ओलि हळद, आले, लिंबूरस, व सैंधव मीठ, याचे लोणचे उपयुक्त आहे.. मधुमेहि रूग्णांनि १/२ चमचा हळद, आवळयाचा रस, व मधासोबत घेतल्यास शुगर नियंत्रित राहते.


🌾.. तसेच पाव चमचा हळद, पाव चमचा दालचिनिचे चूर्ण, हापण उपचार आहे मधुमेहावर. वारंवार आवाज बसणे, घसा बसणे, कफाचि सर्दि यावर हळद+दूध कोमट करून पिणे.. हळद भूक वाढवते, पोटातला अग्नि प्रज्वलित करते.. हळदीत,,करक्युमिन,, रसायन असते जे कँसर रोगावर काम करते पेशिंचि वाढ बंद करते.

     गुडघेदुखि बंद करते. , संधिवाताकरता खुप गुणकारि आहे..

         🌾🌾🌾🌾


   सुनिता सहस्रबुद्धे..... 






एलबीटीसंदर्भात व्यापाऱ्यांवर कुठलीही अन्यायकारक कारवाई होणार नाही

 एलबीटीसंदर्भात व्यापाऱ्यांवर कुठलीही अन्यायकारक कारवाई होणार नाही


- विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाला ग्वाही


 



नाशिक : एलबीटी संदर्भात असेसमेंट प्रलंबित असलेल्या व्यापाऱ्यांना नोटिस काढण्याच्या हालचाली सुरु झाल्यामुळे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त तथा प्रभारी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महानगरपालिकेतर्फे एलबीटी कर निर्धारण संदर्भात प्रलंबित असलेल्या 24 हजार व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली.


            विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एलबीटी कर संदर्भात कुठल्याही प्रकारच्या नोटिसा व्यापाऱ्यांना दिल्या नसून व्यापाऱ्यांवर कुठलीही अन्यायकारक कारवाई होणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले व तसे आदेश मनपा उपायुक्त (कर) श्रीकांत पवार यांना दिले. महाराष्ट्र चेंबर व महानगरपालिका कर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच व्यापाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, मनपा उपायुक्त (कर) श्रीकांत पवार, महाराष्ट्र चेंबरचे ललित गांधी व शिष्टमंडळाने केले आहे.


निवेदनात महाराष्ट्र सरकारने दिनांक 31 ऑगस्ट 2015 रोजी स्थानिक संस्था कर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 50 कोटी पेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांचा एलबीटी रद्द करण्याचा निर्णय शासनाने 31 जुलै 2017 रोजी घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व महापालिकेस दिनांक ८ मार्च 2017 रोजी परिपत्रक काढून अभय योजनेमध्ये सहभागी असलेल्या व्यापारी उद्योजकांना नोटीसा पाठवून बोलावलं जाऊ लागले. त्याची तक्रार व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडून 12 ऑक्टोबर 2018 रोजी एक परिपत्रक काढून अभय योजनेत सहभागी व्यापारी व उद्योजकांना महानगरपालिकेने स्थानिक संस्था कराचे असेसमेंट पूर्ण करण्याविषयी नोटीस पाठवू नये व त्याची मुदत 31 मार्च 2018 रोजी संपली आहे अशा सूचना केल्या. तसेच स्थानिक संस्था कर कायदा कलम क्रमांक 33.4 (2) 7 नुसार स्थानिक संस्था करदात्यांची कर निर्धारणा ५ वर्षाच्या आत करणे बंधनकारक होते, तो ५ वर्षाचा कालावधी संपलेला आहे त्यामुळे कर निर्धारण करू शकत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. गेली दोन वर्ष महापूर व ३ वर्ष करोनामुळे महामारीमुळे व्यापारी हैराण झालेला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना कोणत्या नोटीसा न पाठवता वरील कलमाधारे कर निर्धारण करता येत नसल्याने स्थानिक संस्था कर विभाग बंद करून व्यापाऱ्यांवरील कारवाई रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


            याप्रसंगी शिष्टमंडळात महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन कांतीलाल चोपडा, को-चेअरमन संजय सोनवणे, युथ विंगचे चेअरमन संदीप भंडारी, उत्तर महाराष्ट्र व्यापार समितीचे चेअरमन प्रफुल संचेती, कार्यकारणी सदस्य व्हीनस वाणी, नेमीचंद कोचर, नाशिकरोड किराणा घाऊक संघटनेचे अध्यक्ष राजन दलवानी, पेट्रोल डिलर्स मर्चंट संघटनेचे सदस्य नाना नगरकर, नाशिकरोड किराणा घाऊक संघटनेचे अजित करवा उपस्थित हो

ते.


 


Featured post

Lakshvedhi