Wednesday, 26 April 2023

मन की बात’ राष्ट्रीय परिषदेतमहाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग

 मन की बात’ राष्ट्रीय परिषदेतमहाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग.

            नवी दिल्ली, 26 : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विशेष कार्यक्रमाचे 99 भाग पूर्ण झाले असून, येत्या रविवारी 30 एप्रिल रोजी याचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. याचे औचित्य साधून आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन विज्ञान भवनात करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर, विभागाचे सचिव अपूर्व चंद्र व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


            आतापर्यंत प्रसारीत झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात प्रधानमंत्री यांनी 700 पेक्षा अधिक वेळा लोकांशी संवाद साधला आहे. या 300 संघटनाचा उल्लेख केला असून यामधले 37 व्यक्ती आणि 10 परदेशी संस्था आहेत. आजपासून सुरु असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये चार सत्रे असणार आहेत.


             महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर या राष्ट्रीय परिषदेस विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित आहेत. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान, रवीना टंडन, चंद्रकांत दामोदर कुलकर्णी, बंडू सीताराम धोत्रे, सोनाली हेलवी, राजेंद्र यादव, डॉक्टर रोहीदास बोरसे, चंद्रकिशोर पाटील आणि शर्मिला ओसवाल, वेदांगी कुलकर्णी, शैलेश भोसले, डॉ. अन्यया अवस्थी या काही लोकांचा समावेश आहे.


            या राष्ट्रीय परिषदेत, देशाच्या विविध भागातील 100 सन्माननीय नागरिक सहभागी झाले आहेत. या सर्वांचा प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ च्या विविध भागांमध्ये उल्लेख केला आहे. या व्यक्तींनी देश उभारणीत दिलेल्या विशेष योगदानाची दखल प्रधानमंत्री यांनी आपल्या मासिक संवाद कार्यक्रमातून वेळोवेळी घेतली आहे.


            पुण्याचे चंद्रकांत कुलकर्णी यांनी, आपल्या 16,000 रुपयांच्या मासिक निवृत्तीवेतनातून दरमहा 5,000 रुपये, स्वच्छता मोहिमेसाठी देण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपुरचे बंडू सीताराम धोत्रे, ‘पर्यावरण संरक्षण संघटना’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष असून, त्यांच्या संस्थेने, चंद्रपूरचा किल्ला आणि आसपास स्वच्छता मोहीम राबवली. साताऱ्याची सोनाली हेळवी ही महाराष्ट्राच्या 21 वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कर्णधार आहे.राजेंद्र यादव हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी कोविड-19 महामारीच्या काळात त्यांच्या ट्रॅक्टरचा वापर करुन लसीकरणासाठी उपयुक्त वाहन तयार केले. पुण्याचे डॉ.बोरसे हे कोविड योद्धा आहेत.


            चंद्रकिशोर पाटील यांच्या नाशिकमध्ये गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठीच्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता. अलिबागजवळील केनाड येथील रहिवासी असलेल्या शर्मिला ओस्वाल गेल्या 20 वर्षांपासून अनोख्या पद्धतीने भरड धान्यांचे उत्पादन करत असून त्यांना ‘मिलेट्स वुमन’ म्हणून त्यांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.


            उद्घाटन पर सत्रात उपराष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुस्तकांचे अनावरण करण्यात आले. त्यापैकी पहिले पुस्तक “मन की बात @100” हे कॉफीटेबल पुस्तक आहे यामध्ये या कार्यक्रमाची आतापर्यंतची वाटचाल तसेच या कार्यक्रमामुळे प्रधानमंत्री आणि सामान्य नागरिक यांच्या दरम्यानच्या थेट संवादाला उत्तेजन देण्याचे परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित करण्यात आले आहेत.


            दुसरे पुस्तक प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.वेम्पती यांनी लिहिलेले “कलेक्टिव्ह स्पिरीट, काँक्रीट ॲक्शन.” मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांच्या हृदयात असलेल्या ज्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणविषयक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक तसेच तंदुरुस्तीविषयक समस्यांसह विविध संकल्पनांवर चर्चा केली त्यांची माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहेत

.


००००

विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार

 विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार


- मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. २६ : “महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांसोबत १२ उद्योग समूहांनी सामंजस्य करार केल्यामुळे कौशल्य पूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील” अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


            महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे विविध उद्योगसमूहांशी सामंजस्य करार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.


            मंत्री श्री.लोढा म्हणाले की , उद्योजकता आणि नावीन्यता विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या मुळ उद्देशाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना केली असून, हे विद्यापीठ सातत्याने प्रगती करीत आहे. पाच कौशल्य प्रशाला, एकवीस नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासन अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. याच माध्यमातून अनेक उद्योगसमूहाशी सामंजस्य करार देखील करण्यात आले आहेत. संस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, जागतिक दर्जाच्या शिक्षणातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. यासाठी या सर्व उद्योगसमूहांचे सहकार्य मिळेल. मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारे प्रशिक्षित करून देशात आणि परदेशातही उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळतील. डिजिटल व्हिडिओ प्लॅटफॉर्म, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शिकवणे यातून कौशल्ययुक्त विद्यार्थी घडण्यास मदत होणार असल्याने, या सर्व उद्योगसमूहांचे त्यांनी आभार मानले.


जागतिक दर्जाच्या शिक्षणातून रोजगाराच्या संधी : अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक


             अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून, यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. शिक्षण घेणारा तरुण हा कौशल्ययुक्त असावा यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. आरोग्य, हॉटेल, औद्योगिक क्षेत्र, आयटी क्षेत्र यामध्ये उच्च तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन शासनाने आज विविध बारा उद्योग समूहांशी सामंजस्य करार केले आहेत. या सामंजस्य कराराच्या उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी मदत होईल


            यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, यासह सॅप इंडिया, रेडहंट, मायक्रोसॉफ्ट, सेर्टी पोर्ट ,एमईडीसी, मॅक, एनआरएआय, संचेती, सीएसडीसीआय यासह विविध उद्योगसमूहांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

###बाभळिच्या ###शेंगांचे औषधिय..व गुणकारी.. फायदे*

 *####बाभळिच्या ###शेंगांचे औषधिय..व गुणकारी.. फायदे* 👇


... आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभुळिच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे 👇

  ..... (१)..गुडघेदुखित बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे.. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळिसिनंतर चालू होते. तेव्हा. या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे हे चूर्ण कोणत्याही आयुर्वेद शाॅपला नक्कीच मिळेल, याने काही दिवसांतच ,, गुडघेदुखी,, समूळ नष्ट होते..


....(२).. डोकेदुखी दूर होते.. वाढता ताण-तणाव, चिंता, धावपळ, यामुळे. सतत डोकेदुखी असणं ही समस्या घरोघरी आढळून येते, अशा वेळी बाभुळ शेंगाचि पावडर कोमट पाण्याबरोबर घ्यावी, लगेच आराम मिळतो..


....(३) स्त्रियांसाठी शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे... आजकाल बहुतेक महिलांना ल्यूकोरिया चा त्रास होतो, श्वेतप्रदर,. . पांढरे पाणी जाणे, हि समस्या बहुतेक महिलांना होतो. तेव्हा. या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने आराम मिळतो नक्कीच..


......(४).. पुरुषांसाठी या शेंगांचे चूर्ण फायदेशीर ठरते.. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पुरुषांना देखील फायदेशीर आहे. ज्यांना धातूक्षयाचा त्रास असेल. त्यांनी हि पावडर. नियमितपणे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास फायदा होतो.. वंध्यत्व दूर होते..


.......(५).. पाठदुखी कंबरदुखी या त्रासात आराम देण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे.. एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे पाठदुखी कंबरदुखी चा त्रास होतो, आजकाल बहुतेक लोक बसून काम करतात त्यामुळे पाठदुखी देखिल सामान्य समस्या आहे, तेव्हा हि पावडर उपयुक्त ठरते, जेवणानंतर एक चमचा भरून चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने छान आराम मिळतो नक्कीच.. जमल्यास हि पावडर दूधासोबत घेतल्यास स्नायू बळकट होतात..


..... जूलाबाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे.. बरेच वेळा , बाहेरच्या खाण्यामुळे, पोट खराब होऊन पातळ जुलाब होतात, अतिसार होतो, गळल्यासारखे होते,. यांच्यावर शेंगांचे चूर्ण हे रामबाण औषध आहे, थोडं चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो


...(७). . अशक्तपणा, कमजोरी वाटणे, यावर..जर तुम्ही शारिरीक दृष्ट्या अशक्त असाल तर , तुम्ही. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पाण्यात किंवा दुधात मिसळून रोज एक वेळा सेवन करू शकता. आणि वाटलं तर मधात मिसळून चाटण म्हणून घ्या.. 


..... तेव्हा वरिल फायदे बघता .. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण.. अतिशय मौल्यवान औषध आहे.. आणि सहज आयुर्वेद दुकानात मिळतं.. जरुर हि पावडर घरात असू द्यावि..


.........###आयुर्वेद##अभ्यासक....... सुनिता सहस्रबुद्धे... निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार!!!


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

 जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले जनतेचे अभिनंदन


 


            मुंबई, दि. 26 :- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.


            या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होतो. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. 2018-19 या वर्षात ही गणना करण्यात आली होती. या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत.


            जलयुक्त शिवार आणि अन्य जलसंवर्धनाच्या योजनांना लोकचळवळ बनविणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, सामाजिक संघटनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले असून, या कार्यात सहभागी सर्वांचे आभार सुद्धा मानले आहेत. हे आपल्या सर्वांचे सामूहिक यश आहे. आता जलयुक्त शिवार 2.0 अभियान सुद्धा असेच सर्वांनी यशस्वी करावे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

जागतिक हिवताप दीन

 

रायगड अलिबाग, जिल्हा हिवताप कार्यालय 

उशीरासव....*खास, वाळा औषधी महत्त्व

 *उशीरासव....*


...*उशीर*.. याचा .. आयुर्वेद शाब्दिक अर्थ...खस..वाळा.. असा आहे.. अर्थात. हे सायरप. मूत्रपिंडाचा आजार,,. बरं करते.. तसेच. सर्व प्रकारचे पित्त विकार बरे होतात.आधी बघू या याचे घटक.. कारण. .खस हि वनस्पती प्रमुख असलि तरी, यात सहाय्यक वनस्पती देखील आहे.


  उशीर, पित्त पापडा, मोचरस, वडाचि साल, गूलरचि साल, जांभूळ झाडाचि साल, गुळ, मनुका, कांचनार झाडाचि साल, पडवळाचि पाने, धात फूलं, मंजिष्ठा चिरायता, टाका, पद्म काष्ठ, कमळ, नीलकमल, पांढरे कमळ, गंभारि, नेत्रबाला, नीलोत्पल, प्रियंगू,..


... सर्व वयोगटातील व्यक्तींना हे आसव निर्धोकपणे देता येत.. उशिरा सव. हे गुणधर्माने थंड असल्यामुळे. उन्हाळ्यात युरिनचि जळजळ होणे, तहान तहान लागणं, यावर,. रोज दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर द्या,. फार लवकर फरक पडतो.व बरं वाटतं.

..प्रमेह या आजारांत आणि. स्त्रियांच्या अंगावर जाणं, श्वेतप्रदर, मासिक पाळीत होणारे त्रास. या सर्व त्रासांवर. उशिरा सव. चांगले काम करते. किमान एक महिना हे आसव घेतल्यास. स्त्रियांचे सर्व त्रास दूर होतात.


. लहान मुलांना नेहमीच. जंताचा त्रास होतो, अगदि रात्रभर जागे राहतात, आणि अंग धरत नाही,. अशा वेळी यांना. रोज दहा थेंब उशिरासव समभाग पाण्यात मिसळून जेवणानंतर द्या. काही दिवसांतच मुलं धष्टपुष्ट होतात.. तळपायाची आग, होणं, शरिरात उष्णता वाढते, डोळ्यांची आग होणे, हे सर्व पित्त विकार आहे. आणि .उशीरासव दिल्यास शरिरात थंडावा तयार होतो, आणि वरील सर्व त्रास बरे होतात.


..भगंदर, मुळव्याध फिशर, हे सर्व उष्णता निर्माण झाल्याने होतात. रुग्णांना खुप त्रास होतो, पण उशिरा सव काही दिवस दिल्यास रुग्ण बरा होतो.. उशिरा सव तुमचे अशुद्ध रक्त शुद्ध करते. अनुषंगाने मग

. त्वचेचे विकार..जसे. नायटा खरुज, गजकर्ण, इसब होत नाही. आणि झाल्यास. रोज दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर द्या. काही दिवसांतच विकार बरे होतात.. हे आसव घेतल्यास

... तारुण्य पिटिका, पिंपल्स, मुरुमे, येत नाही व नियमित पणे सेवनाने चेहर्यावर ग्लो येतो......


    . अंगावर येणाऱ्या गांधी, पित्त प्रकोप, वारंवार ढेकर येतात, जीव घाबरतो, या सर्व त्रासांवर.. उशिरा सव द्यावे. उष्णता बाहेर पडते व बरं वाटतं.. तेव्हा या सर्व लहान लहान त्रासांवर आपण. हे आसव घेऊन. लगेच दवाखान्यात जाण्याची आवश्यकता राहत नाही.. 


.... आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे


*⭕️

मत भवताल

 नमस्कार,


भवताल वेळोवेळी आपल्या सभासदांकडून त्यांचे मत विचारात असते. आणि ते विचारात घेऊन आपले उपक्रम राबवत असते.


असेच आपले मत जाणण्यासाठी आम्ही हा एका छोटासा पोल तयार केला आहे. आपले मत जरूर कळवा

 

मत देण्यासाठी पिढीला लिंकवर क्लीक करा.: https://forms.gle/qVSfpnHi3TjSxm3z6


-----



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bh

avatal@gmail.com

Featured post

Lakshvedhi