Friday, 21 April 2023

हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी सकारात्मक कार्यवाही करा

 हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी सकारात्मक कार्यवाही करा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि.21: “हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी,” असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले. जिल्ह्याला पाणी मिळणे महत्त्वाचे असून त्या दिशेने प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.


            हिंगोली जिल्हा अनुशेष निर्मूलनाबाबत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजी माने, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यावेळी उपस्थिती होती.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत असणारे विविध प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे आवश्यक आहेत. यासंदर्भात ज्या तांत्रिक बाबी पूर्ण करणे अपेक्षित आहेत, त्यांची पूर्तता करावी. हिंगोली जिल्ह्यास पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे.


            बंधारे बांधण्यासाठी मापदंड शिथिल करावेत, उच्च पातळीचे बंधारे बांधण्यास तत्वतः मंजूरी द्यावी, साफळी धरणाचे शिल्लक पाणी हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनासाठी मिळावे आदी बाबी आमदार श्री.बांगर आणि श्री. माने यांनी म्हणणे मांडल्या. त्यावर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले की, तांत्रिक बाबीसंदर्भात जलसंपदा विभाग निर्णय घेईल. बंधाऱ्यांचे बॅरेजस मध्ये रुपांतर करण्याचे धोरणही लवकरच निश्चित करण्यात येत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.


0000

राज्यस्तरीय ( ऑनलाईन ) "मूल्य शिक्षण व बालसंस्कार वर्ग"*

 *खुशखबर..! खुशखबर..! खुशखबर..!*

=========================

*मराठी देवदूत एज्युकेशन अकॅडमी, पुणे*

संपूर्ण महाराष्ट्रातील समस्त बालमित्रांसाठी घेऊन येत आहे..


*राज्यस्तरीय ( ऑनलाईन ) "मूल्य शिक्षण व बालसंस्कार वर्ग"*


*वयोगट :* वय 6 वर्षे ते 16 वर्षे ( इयत्ता 1 ली ते 11 वी )


*वर्गातील समाविष्ट गोष्टी :*

1. सुविचार, बोधकथा, संस्कारकथा तसेच इतर वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून नैतिक मूल्यशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास

2. अनेक थोर आणि महान व्यक्तींची ओळख व त्यांच्या जीवनचरित्रांचा अभ्यास

3. चांगल्या, प्रभावी व संपूर्ण जीवनासाठीच अत्यंत उपयुक्त सवयींबाबत मार्गदर्शन

4. लहान मुलांचे मोबाईलचे व्यसन, वर्तणूक समस्या किंवा इतर कोणत्याही समस्या सोडविण्यासंदर्भात योग्य व प्रभावी मार्गदर्शन

5. वैयक्तिक आरोग्य मार्गदर्शन

6. करिअर निवड मार्गदर्शन


*वर्गाची रूपरेषा :*

➡️ रोज 1 तास

➡️ प्रत्येक महिन्यात 20 दिवस ( मंगळवार ते शनिवार )

➡️ प्रत्येक दिवसाचे रेकॉर्डिंग उपलब्ध 


*भव्य शुभारंभ :*

"महाराष्ट्र दिन" : सोमवार - दिनांक 1 मे, 2023 पासून

🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️


*वर्गाची फी :*

₹ 1000/- फक्त

( 2023-24 या संपूर्ण शैक्षणिक वर्षाकरिता )


*अधिक माहितीसाठी व या वर्गाकरिता आपल्या पाल्याची नाव नोंदणी करण्यासाठी आम्हाला त्वरित संपर्क करावा..*

किंवा खालील गुगल फॉर्म लिंक ओपन करून आपले नाव, पाल्याचे नाव, वय, मोबाईल नंबर इत्यादी बेसिक माहिती भरल्यास, आमचे प्रतिनिधी आपल्याला संपर्क करतील :

👇👇👇👇👇👇👇👇


https://tinyurl.com/yp23dxyf


👆👆👆👆👆👆👆👆

*सूचना :*

वरील गुगल फॉर्म लिंक हायलाईट होत नसल्यास,

*हा मेसेज याच किंवा इतर कोणत्याही नंबर / ग्रुपवर त्या मेसेज मध्ये ही लिंक हायलाईट होईल. तिथून आपण लिंक ओपन करू शकता.*


=========================

*अधिक माहितीसाठी संपर्क :*

मराठी देवदूत एज्युकेशन अकॅडमी, पुणे

*CALL / WHATSAPP :*

*7038987501*

*9763168157*

महिलांसाठीच्या योजनांची माहिती देणाऱ्या फिरत्यावाहनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 महिलांसाठीच्या योजनांची माहिती देणाऱ्या फिरत्यावाहनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


 


             मुंबई, दि. 21 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) उपक्रमांतर्गत महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या फिरत्या वाहनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. यावेळी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव उपस्थित होते.


              दि.१९ एप्रिल पासून ते ३१ मे पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबईत ‘सरकार आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू असलेल्या महापालिका वॉर्डमध्ये फिरणार असून, या वाहनावरच्या एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.


*****

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कंपनी महाराष्ट्रात करणार80 हजार कोटींची गुंतवणूक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कंपनी महाराष्ट्रात करणार80 हजार कोटींची गुंतवणूक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस                

यांच्याशी कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा

            मुंबई, दि. 21 : अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी आणखी 80 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली.


            महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची कंपनीने इच्छा व्यक्त केली. यासाठी पाच हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. शिवाय बीकेसी बांद्रा येथे कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याची विनंती केली.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वता मान्यता दिली. याबाबत जागा निश्चिती, उर्वरित जमीन आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधींनी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घ्यावा. कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यातील हजारो तरूणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.


            उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. रंजन धर यांनी कंपनीची गुंतवणुकीविषयीची माहिती दिली. ही कंपनी आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देणारी असून कंपनीने कोविडमध्ये लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला होता. भारतात स्टील उत्पादन वाढीसाठी कंपनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. खोपोली, तळेगाव, सातारडा (सिंधुदुर्ग) येथे कंपनीमध्ये हजारो तरूणांना रोजगार मिळाला आहे. आणखी हजारो तरूणांना रोजगार मिळणार असून कंपनी शिक्षण, आरोग्य, विमानतळाच्या पायाभूत सुविधामध्येही काम करणार असल्याचे श्री. धर यांनी सांगितले.


            बैठकीला वाहतूक आणि बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह कुशवाह, अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. चे विक्री संचालक आलेन लेगरीस, रंजन धर, ऋषिकेश कामत, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, कंपनीचे राजेंद्र तोंडापूरकर आदी उपस्थित होते.


000

Bhaktimay नृत्य कला ही सादर



ना.मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत मे महिन्यात बैठक

 पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या अंतर्गत सहा राज्य येतात. यात राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांचा तसेच दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. त्यामुळे ना. मुनगंटीवार यांना सर्व सहा राज्यांमधील लोककलावंतांसाठी काम करण्याची उत्तम संधी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून महाराष्ट्रातील लोककलांना राष्ट्रीय पातळीवर अधिक मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यावरही ना. मुनगंटीवार यांचा भर असणार आहे.


ना.मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत मे महिन्यात बैठक


पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालकांनी नियुक्तीच्या संदर्भातील पत्रात आगामी बैठकीचेही निमंत्रण दिले आहे. २०२३-२०२४ या वर्षात आयोजित करावयाच्या कार्यक्रमांचे नियोजन या बैठकीत होईल. ही बैठक ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत मे महिन्यात होणार आहे.

एरंडेल तेल*

 *एरंडेल तेल*



एरंडेल तेलाला आयुर्वेदात अमृताची उपमा देण्यात आली आहे. एरंडेल तेलाचे आरोग्यविषयक अनेक उपयोग आहेत ते कोणते ते आपण पाहूया.


१. पोट साफ होण्यासाठी


एरंडेल तेल घेतल्याने पोटात न दुखता जुलाब होऊन पॉट साफ होते. वृद्धांच्या पोट साफ न होण्याच्या तक्रारीतही हे रोज घेता येते. सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात एक चमचा एरंडेल तेल घ्यावे.


२. डोळ्यांच्या विकारांवर


रांजणवाडी किंवा डोळ्याच्या इतर तक्रारींवर यासाठी एरंडेलाचा थेंब बोटावर घेऊन तो काजळासारखा पापण्याच्या आत फिरवावा. तसेच एरंडेल तेल पापण्यांना लावल्याने पापण्यांची देखील दाट होतात.


३. आमवात आणि सांधेदुखी


युरिक ऍसिड वाढणे आमवात, सायटिका, गाऊट, गुडघेदुखी हे हल्लीच्या तरुण वयात देखील होऊ लागले आहेत. ज्यांना या समस्या आहेत त्यांनी आहारात रोज सकाळी रात्री थोडं तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. ८-१५ दिवस करून पाहावे. दुखऱ्या सांध्यांना सुंठ पावडर एरंडेलचा लेप लावल्यास आराम पडतो.


४. लहान मुलांसाठी


लहान मुलांना मधातून किंवा कणकेची पोळी करताना त्यात एरंडेल व चिमूटभर सुंठ पावडर टाकून ती द्यावी. हे असे महिन्यातून किमान एकदा तरी मुलांना द्यावे. पूर्वी नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही मध एरंडेलाचे चाटण देण्याची पद्धत होती.


५. गर्भवतींसाठी


गर्भवतींनी ‘सिझेरियन’ टाळायचे असेल तर नववा महिना लागताच रोज एक चमचा एरंडेल घ्यावे.( हे घेताना एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.


६. रक्तदोषात गुणकारी


अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे.


७. उत्तम झोपसाठी  


अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. सतत विचार सुरु राहणे यामुळे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे नक्कीच गुण येतो.




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




Featured post

Lakshvedhi