Monday, 17 April 2023

राग! औषध काय

 *राग!!!*


इतकी चिडचिड झालीये ना!

काय डोकं फिरलंय माझं!!

मी तर अशी भडकले होते!

डोकं आउट झालंय!!

अंगाचा नुसता तिळपापड झालाय माझ्या!

राग आलाय मला! 


अशी किती किती वाक्य आपण दिवसातून, आठवड्यातून, महिन्यातून कितीदा म्हणतो...आठवतंय का? तुमच्या पैकी किती तरी जणं आत्ता या क्षणी सुद्धा कोणाचातरी, कशाचा तरी राग आला म्हणुन शांत व्हायला, distraction साठी whatsapp वर आले असतील! आहेत का असे कोणी? आता हे वाचून हसू येत असेल ना? राग हा तर येतोच.. न बोलवता येणारा हक्काचा पाहुणा आहे हो तो. कधी रोज रोज येतो, कधी क्वचितच येतो...तुम्हाला, मला कोणालाही तो कधीही येऊ शकतो! अगदी तान्हूल्या बाळाला पण रागानी लाल बुंद होत टाहो फोडताना पाहिलंय की आपण! बरं रागाची काहीही कारणं असु शकतात. कोणी मनासारखे वागत नाही म्हणून आपण चिडतो, कोणी टोमणे मारतं म्हणून आपण चिडतो,  कधी हट्ट पूर्ण नाही झाला तर चिडतो, कधी कधी ego hurt झाला तरीही चिडतो,पुण्याच्या रस्त्यात गाडी चालवताना तर हमखास चिडतो... भूक लागली म्हणून ही चिडणारे लोक मी बघितलेत. माझा लेक त्यातला एक! कधी समोरचा माणूस इतका बिनडोक कसा, या प्रश्नाने पण राग येतो! वयानुसार, वेळेनुसार, स्वभावानुसार ह्या कारणात थोडाफार फेरफार होतो! कोणी व्यक्ति तापट स्वभावाची...अश्या लोकांना जरा काही मनाविरुद्ध झालं की गेलीच कळ मस्तकात! कोणी आतल्या गाठीचे...राग आल्या क्षणी तो व्यक्त न करता आतल्या आत तो marinate करत ठेवतात आणि वेळ आली की तो राग मस्त गरमागरम बाहेर काढतात! काही लोक short-tempered...माझ्या सारखे...राग येतो ही पटकन, तो express ही होतो पटकन आणि निवळतो ही पटकन! काही लोक hot-tempered...चिडले की काही खरं नसतं समोरच्याचं. 


रागाला जसा स्वभाव असतो ना, तस रागाचं वय ही असतं हां! म्हणजे बघा, baby राग वेगळा, रडून गोंधळ घालणारा, बोलत नाही पण दिसतो मात्रं लाल बुंद, toddler राग सगळ्यात cute. खेळणारा,खेळवणारा, खेळणं तुटलं म्हणून येणारा, खेळणं ऐकत नाही म्हणून पण येणारा! Childhood राग थोडा चिडणारा, थोडा चिडवणारा, कधी मारामारी करणारा, तर कधी फटके खायला लावणारा! या रागाचा climax पण बहुतेक अश्रू रूपात होतो! Teenage रागाचं रूप भयानक, hormones नी ओथंबलेलं, सद्सद्विवेक बुद्धी अजिबात नसणारा,सतत सोबत चालणारा, कधी पटकन आयुष्याचं वाटोळं करणारा! मग मात्रं हळूहळू राग पण mature व्हायला लागतो. यायचा बंद होत नाही, पण control मध्ये मात्र यायला लागतो. 


पण ह्या सगळ्याला exception असणारे, राग न येणारे महाभाग ही आहेत बरेच.  मला त्यांचा फार फार हेवा वाटतो. किती सुखी असतात अहो हे लोक! किती energy save होते यांची रोज! अगदी जवळचं उदाहरण द्यायचं तर आमचे पप्पा, माझे सासरे. 15 वर्षात मी त्यांना चिडताना एकदाही बघितलं नाहीये. आपल्या मेंदू मध्ये वेगवेगळ्या feelings साठी वेगवेगळे compartments असावेत, पण आमच्या पप्पांच्या मेंदूत राग compartment fit करायला बहूतेक देव विसरला असावा . त्यामुळे ते जगातल्या सगळ्यात सुखी माणसांपैकी एक आहेत हे निर्विवाद सत्य आहे. घरात कितीही क्लेश होऊ द्या, कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या, कोणीही काहीही म्हणू द्या... आमचे पप्पा चक्क सगळं सोडून मस्त वामकुक्षी घेऊ शकतात! आम्ही चिडलो बोललो भांडलो, त्यांना काहीही देणंघेणं नसतं. राग येतच नाही कसा त्यांना? मला पडलेलं आयुष्यातलं सगळ्यात मोठं कोडं आहे ते. इकडे मी उगाच छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसवे फुगवे सहन करते, कधी स्वतःचे, कधी समोरच्याचे. त्यात मी किती emotions, time आणि energy invest (का waste?) करत असते,  स्वतःचं B.P. वाढवून घेत असते, serrotonin कमी करून घेत असते! असं जर पप्पां सारख स्थितप्रज्ञ राहता आलं, तर किती extra energy आणि वेळ असेल नाही? त्यामुळे आता माझा तरी life goal आहे की life मधे राग नियंत्रण मोहीम राबवायची! अगदी पूर्ण नाही, पण 80% जरी राग कमी करता आला, तर life will be so much more beautiful! हे राग नियंत्रण म्हणजे राग कंट्रोल करणे नाही बरं का! तर राग येऊच द्यायचा नाही. Prevention is better ना cure पेक्षा, म्हणून! त्यासाठी मी एक stepwise प्रोसेस design करावी असं म्हणतेय. ती केली की मग त्याची trial घेईन. जर ते सफल संपूर्ण झालं, तर सांगेनच तुम्हा सर्वांना! 


तोपर्यंत लक्षात ठेवा "Anger is one letter short of Danger!" त्यामूळे शांत रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा! 


©GG

मेड फॉर इच अदर"*

 *"मेड फॉर इच अदर"*

आपोआप होत नाहीत.

होत जातात. 💞💞


         

कागदावर जुळलेली पत्रिका

आणि

काळजावर जुळलेली पत्रिका यात  अंतर राहतं.


लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.


वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे?


सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे.


सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.


निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं

नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा?. त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं.


*अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.*


कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा..  या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.


लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना कळत जातं.


तेव्हा म्हणाली होती, 'वाचनाचा छंद आहे' पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडलं नाही बयेनं...

जाब विचारू शकतो आपण?


किंवा तो म्हणाला होता - 'प्रवासाची

आवड आहे; जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं - असं स्वप्न आहे!'

पण

प्रत्यक्षात कळतं; कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं.

जेवायला वाढलंय.. हे ही चारदा सांगावं लागतं.

प्रवासाची आवड कसली?

- कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब... वर्षभर सांगतेय, माथेरानला जाऊ तर

उत्तर म्हणून फक्त जांभया देतो.

कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे. उरलेले न जुळलेले ४ कुठले ते कळले असते तर...


मनापासून सांगतो,

त्या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर लग्न होत असतं आपलं.


तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली... नाही जमलं की विस्कटली.


अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला... पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी.


पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना

सांगितलंच जात नाहीये;


नाही जुळलं -मोडा; व्हा विभक्त.


आणि मग करा काय??


आपल्याला 'हवी तशी' व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे.


धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार ?..

एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, ते मी स्वीकारणार आहे का?-

या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी

देऊन मगच संसार मांडायला हवा.


आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या

व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं हे या वाटेवरच पाहिलं पाऊल...

ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की इतर सहा पावलं सहज पडत जातात.. 

आणि मग ती "सप्तपदी" - "तप्तपदी" होत नाही..


ती तृप्तपदी होण्यासाठी हा सर्व ऊपद्व्याप.

हेच संसाराचं खरं मर्म आहे.


आपल्याला ऊदंड वैवाहिक आनंदी आयुष्य लाभो हीच प्रार्थना


संकलक

 *प्रा. माधव सावळे*

Best of Luck👍🏻


┉❀꧁꧂❀┉*

    *‼️🌹शुभ दिवस 🌹‼️*

 🍃🍂🌷🙏🌷🍂🍃

*┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉*

*┊*  *┊*  *┊*  *┊*

*┊*  *┊*  *┊*       🍃

*┊*  *┊*       🍃     ❤️

*┊*       🍃      💚

🍃     🤍

🧡

अनेक प्रकारे फायदेशीर आहेत भोपळ्याच्या बिया !!*

 * अनेक प्रकारे फायदेशीर आहेत भोपळ्याच्या बिया !!* 


भोपळा ही अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. भोपळ्याच्या बियादेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. बहुतेक लोक भोपळा खातात. परंतु त्याच्या बिया फेकून देतात. पण असे केल्याने तुम्ही अनेक प्रकारचे आरोग्य फायदेही काढून टाकता. भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्याने सर्वांनाच फायदा होतो,

परंतु पुरुषांना याचे सेवन केल्याने काय फायदे होतात हे जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे.

◼️भोपळ्याच्या बियांमध्ये असे अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब, कर्करोग, पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

◼️या बियांमध्ये झिंक, फायबर, मॅग्नेशियम, अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, प्रोटीन, ऊर्जा, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेट्स,  सोडियम, थायामिन, फोलेट, फॉस्फरस इत्यादी असतात. ज्यामुळे शरीरातील अनेक समस्या निर्माण होण्यापासून बचाव होतो.


*भोपळ्याच्या बियांचे फायदे -*

◼️भोपळ्याच्या बिया त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात.

◼️यामध्ये फायबर असल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे वजन कमी होते.

◼️पोटात जंत होण्याची समस्या टाळते.

◼️शरीरात रक्ताची कमतरता होऊ देत नाही.

◼️भोपळ्याच्या बिया मेंदूला निरोगी ठेवतात.

◼️युरिन इन्फेक्शन, युरिनरी इन्कॉन्टीनन्स, यूटीआय यासारख्या समस्या दूर करते.

◼️रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया खा.

◼️यामध्ये असलेले काही घटक उच्च रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात.

◼️पचनशक्ती, हाडांना बळ देते.

◼️मूत्राशयात स्टोन होऊ देत नाही.

◼️हे हृदयासाठी आरोग्यदायी आहे.

◼️झोप न येण्याची समस्या दूर होते.


*पुरुषांसाठी भोपळ्याच्या बियांचे फायदे*


◼️प्रोस्टेटचे आरोग्य राखण्यासाठी पुरुषांनी भोपळ्याच्या बियांचे सेवन करणे आवश्यक आहे. प्रोस्टेट ही एक प्रकारची ग्रंथी आहे, जी वीर्य निर्माण करण्यास मदत करते. पुरुषांमध्ये वाढत्या वयाबरोबर प्रोस्टेटचा आकारही वाढतो. मात्र त्याचा आकार जास्त वाढू नये अन्यथा इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत भोपळ्याच्या बियांचे सेवन करून ही ग्रंथी निरोगी ठेवता येते.


◼️ज्यांना अशक्तपणा जाणवतो, त्यांनी भोपळ्याच्या बिया नक्की खाव्या. भोपळ्याच्या बिया खाल्याने शरीर तंदुरुस्त आणि ऊर्जेने भरपूर राहाते. यासाठी भोपळ्याच्या बिया भाजून स्नॅक्समध्ये खाऊ शकता. याच्या वापराने तुमची प्रतिकारशक्ती आणि पचनक्रिया दोन्ही मजबूत राहतात.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️

कराटे



 

Sunday, 16 April 2023

आरोग्यदायी चिंचेच्या पानांचा चहा !!*

 *आरोग्यदायी चिंचेच्या पानांचा चहा !!* 


चिंचेचं साधं नाव जरी काढलं तरी तोंडाल पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. चिंच चवीला खूप आंबट असली तरी ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चिंचेची पाने देखील आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.


चिंचेचा पानांचा चहा खूप आरोग्यदायी असतो. चिंचेचा चहा प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि या चहाच्या साह्याने तुम्ही वजन देखील कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला चिंचेचा चहा कसा तयार करायचा आणि त्यांचे काय फायदे आहेत याची सविस्तर माहिती सांगणार आहोत.


*साहित्य :* 


1) पाणी दोन कप


2) एक मूठभर चिंचेची पाने


3) आले


4) अर्धा चमचा हळद


5) दोन चमचे मध


6) चार ते पाच पुदिन्याची पाने


*कृती :* 


सर्व प्रथम चिंचेची पाने नीट स्वच्छ धुवून घ्यावी. यानंतर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात किसलेले आले, चिंचेची पाने, हळद, पुदिन्याची पाने घालून 7 ते 8 मिनिटे उकळू द्यावे. यानंतर ते गाळून एका कपमध्ये काढा आणि थोडे थंड झाल्यावर त्यात मध मिसळून प्या.


आता बघू या चिंचेचा चहा पिण्याचे फायदे :


1) चिंचेच्या पानांचा चहा प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.


2) शरीरात गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. यातील बॅड कोलेस्ट्रॉलची शरीरातील पातळी वाढली तर हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशावेळी चिंचेच्या पानांचा चहा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.


3) शुगरचा त्रास असलेल्या लोकांसाठी चिंचेचा चहा अतिशय उपयुक्त ठरू शकतो. चिंचेच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स हे घटक आढळतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच चिंचेच्या अर्कामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात.


4) लठ्ठपणाचा सामना करत असलेल्या लोकांसाठी चिंचेचा चहा वरदान ठरू शकतो. बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि धावण्यासारखे मेहनतीचे पर्याय अवलंबतात. परंतु त्यासोबत तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केले तर वजन वेगाने कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. अशा स्थितीत तुमच्यासाठी चिंचेचा चहा खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांनी चिंचेचा चहा नियमित प्यावा.


5) अपचनाच्या समस्येचा सामना करत असलेल्या लोकांसाठी देखील चिंचेचा चहा खूप उपयुक्त ठरू शकतो. चिंचेच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात जे शरीरातील पाचक रसाला उत्तेजित करण्याचे काम करतात. त्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते. चिंचेच्या चहाचे सेवन केल्याने पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*


महाराष्ट्राचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली.

 महाराष्ट्राचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली.


डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला


 - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगात सात आश्चर्ये आहेत. मात्र श्री सदस्यांची ही अलोट गर्दी हे जगातील आठवे आश्चर्य आहे. पैशापेक्षाही खरी श्रीमंती काय हे या श्री परिवाराकडे आणि उपस्थित श्रीसदस्यांकडे बघून समजते. निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा दिली जाते. मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे आहे. विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून धर्माधिकारी कुटुंबीय व प्रतिष्ठान करीत असलेले कार्य महान आहे. वृक्षारोपण, स्वच्छता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, रक्तदान अशा अनेक क्षेत्रात त्यांचे उत्तुंग काम आहे. देश-विदेशातही त्यांचे मोठे सामाजिक कार्य आहे.   


     आपली भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे आप्पासाहेबांच्या माध्यमातून अद्भुतरित्या जतन आणि संवर्धन होत आहे. आप्पासाहेबांना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे महत्व आज निश्चितच वाढले आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस सांगितले.


            सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मनुगंटीवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आप्पासाहेबांच्या निरुपणाचा भक्ती सागर पाहण्याचा योग आज आला. आप्पासाहेब धर्माधिकारी नावाचा जगातील सर्वात मोठा चुंबक आज या व्यासपीठावर आहे. निरुपणाच्या माध्यमातून जसे आप्पास्वारी मन स्वच्छ करतात तसं ते परिसरही स्वच्छ ठेवतात. झाडे लावून पर्यावरणसुद्धा वनयुक्त करता तेव्हा असे कोटीकोटी पुरस्कार दिले तरी त्यांचा गौरव शब्दांने होऊ शकणार नाही. हाताला सेवेचे काम देऊन भविष्य घडविणाऱ्या आप्पासाहेबांना सांस्कृतिक कार्य विभागाचा पुरस्कार देताना प्रचंड स्फूर्ती प्राप्त होत आहे.


            डॉ. सचिन धर्माधिकारी म्हणाले की, मन, मानव व मानवता या विचारातून कार्य सुरू आहे. मनाचे विचार बदलण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून कार्य केले जाते. चांगले संकल्प केले तर मानव व मानवतेचे विचार येऊ लागतात. सत्याचा संकल्प आला तर मानवतेचे दया, शांती, प्रेम हे विचार येऊ लागतात. हे विचार आले नाही तर समाजात हिंसा होते आणि हे समाजासाठी भयानक आहे. मन, मानव व मानवता हे सूत्रच बैठकीत दिले जाते. प्रशासन व सदस्यांच्या समन्वयातून एवढा मोठा कार्यक्रम होत आहे.


रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले.


पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द


कोकण विभागासह राज्यातील विविध भागातून आलेल्या सुमारे 20 लाखाहून अधिक श्री सदस्यांच्या साक्षीने डॉ. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह व पंचवीस लाखांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी डॉ. धर्माधिकारी यांनी पुरस्काराची पंचवीस लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केली.


हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी  


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने यावेळी लाखोच्या संख्येने उपस्थित श्री सदस्यांवर यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.


भव्यदिव्य कार्यक्रम


अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या उत्साहात नवी मुंबईतील खारघर येथील कार्पोरेट पार्कच्या मैदानावर हा भव्य समारंभ संपन्न झाला. समारंभात पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा, वाहनतळ सुविधा, श्री सदस्यांची बसण्याची व्यवस्था आदींचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी शासकीय यंत्रणेसह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी व्यवस्था चोख सांभाळली.


या कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीनशेहून अधिक एकर मैदानात सुमारे 20 लाखाहून अधिक नागरिक, श्रीसदस्य उपस्थित होते. त्यांना कार्यक्रम व्यवस्थित दिसावा यासाठी एकूण 58 भव्यदिव्य असे एलईडी स्क्रिन उभारण्यात आले होते. त्याचबरोबर प्रत्येक सदस्यांपर्यंत कार्यक्रमाचा आवाज पोहचावा, यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा उभारण्यात आली होती.


डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे लेखन प्राची गडकरी यांनी केले होते. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यावर आधारित ध्वनिचित्रफित यावेळी दाखविण्यात आली.


गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केले स्वागत


खारघर गोल्फ कोर्सच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळी आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनीही श्री. शहा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे आदी यावेळी उपस्थित होते.


महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाची क्षणचित्रे


• मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सुरुवात “जय सद्गुरु” म्हणत केल्यावर श्री सदस्यांनी प्रचंड टाळ्या वाजविल्या.


• वीस लाखापेक्षा अधिक श्री सदस्य शिस्तबध्द रितीने बसून होते.


• मुख्यमंत्री यांच्या पत्नी श्रीमती लता शिंदे आणि पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे देखील आपल्या परिवारासह सर्वसामान्य श्री सदस्यांसारखे गर्दीत उन्हात बसून कार्यक्रम पाहत होते.


• कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशातून

ही भाविक या कार्यक्रमासाठी दाखल.  


००००००


१७, १८ एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर

 भारतीय प्रेस परिषदेची शोध समिती

१७, १८ एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर  

 

            मुंबई, दि. १३ : भारतीय प्रेस परिषदेच्या (कौंन्सिल) शोध समितीची बैठक १७ व १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून सह्याद्री अथितीगृहमुंबई येथे होणार आहे. न्यायमूर्ती श्रीमती रंजना प्रकाश देसाई अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत पत्रकारितेशी निगडित विविध ३६ प्रकरणांवर सुनावणी होईल. ही सुनावणी माध्यमे आणि सर्व सामान्य नागरिकांसाठी खुली राहील, असे भारतीय प्रेस परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.


Featured post

Lakshvedhi