Saturday, 15 April 2023

आतड्यांमध्ये जमलेली घाण झपाट्याने बाहेर काढतील 'हे' ज्यूस !!*

 *आतड्यांमध्ये जमलेली घाण झपाट्याने बाहेर काढतील 'हे' ज्यूस !!


अन्नातून शरीराला ऊर्जा मिळते आणि अन्नातून पोषक तत्वे शोषून घेण्यात पचनसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. पचनक्रिया सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोलन, ज्याला मोठे आतडे देखील म्हणतात, हा पचन तंत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे.


योग्य पचनासाठी मोठ्या आतड्याचेपाणी निरोगी असणे आवश्यक आहे. शरीराचा हा अंतर्गत भाग स्वच्छ ठेवणे आणि रोगांपासून संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे शरीराच्या बाहेरील भाग स्वच्छ करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे शरीराच्या आतील भागाची स्वच्छता करणे आवश्यक आहे.


मोठ्या आतड्याची स्वच्छता करणे म्हणजे त्यातून टॉक्सिन काढून टाकणे. अनेक संशोधनात हे समोर आले आहे की मोठे आतडे स्वच्छ ठेवल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि कोलन कॅन्सरचा धोकाही कमी होतो. आता प्रश्न पडतो की आतडे स्वच्छ करण्यासाठी काय करावे.


आतडे साफ करणे म्हणजे आहारात अशा पदार्थांचे सेवन करणे, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातील आणि शरीरही निरोगी राहतील. काही ज्यूसचे सेवन आतडे स्वच्छ करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होते. हा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया निरोगी राहते. मोठे आतडे स्वच्छ करण्यासाठी कोणते ज्यूस सेवन करावे ते जाणून घेऊया.


*सफरचंद :* 

सफरचंदाचा रस प्यायल्याने आतडे निरोगी राहतील. सफरचंदाचे सेवन आरोग्यासाठी जितके फायदेशीर " आहे, तितकाच त्याचा रस देखील फायदेशीर आहे. सफरचंदाच्या रसाचे सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत होते. पोटात साचलेली घाण आणि विषद्रव्ये मलमार्गे शरीरातून बाहेर पडतात. सफरचंदाचा रस आतडे डिटॉक्ससाठी खूप फायदेशीर आहे.


*भाज्या :* 

भाज्यांचा रस प्या, आतडे स्वच्छ होतील. आतड्यांच्या आरोग्यासाठी भाज्यांचे रस सेवन करा. भाज्यांच्या ज्यूसमध्ये पालक, टोमॅटो, गाजर, फ्लॉवर, ब्रोकोली आणि कारल्याचा रस घ्या. हे रस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि कोलन स्वच्छ करतात. हे रस तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सेवन करू शकता.


*मीठाचे पाणी :* 

पाण्यात सैंधव मीठ मिसळून प्या. सैंधव मीठ मिसळलेले पाणी प्यायल्याने आतडे चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात. सैंधव मीठ मिसळलेले पाणी पिण्याने आतडे स्वच्छ होण्यास मदत होते. एक ग्लास कोमट पाण्यात दोन छोटे चमचे सैंधव मीठ मिसळून ते सेवन करा, आतड्यांची स्वच्छता चांगली होईल. हे पाणी हळूहळू सेवन करा.


*लिंबाचा रस :* 

लिंबाचा रस सेवन करा. लिंबाचा रस, व्हिटॅमिन सी समृद्ध, आम्लता दूर करते आणि पचन सुधारते. हा रस पोटात लपलेले हानिकारक बॅक्टेरिया मारते. याचे सेवन केल्याने आतडे चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



ये है इंडिया


 

Friday, 14 April 2023

अग्निशमन सेवा सप्ताहाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

 अग्निशमन सेवा सप्ताहाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

राज्याला सुसज्जप्रशिक्षित व आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक

 

            मुंबईदि. १४ : शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई शहर ऊर्ध्व दिशेने वाढत आहे. उद्योगविश्व देखील झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्जपुरेसे मनुष्यबळ असलेले व प्रशिक्षित असे आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. 

            महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह तसेच अग्निसेवा दिनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 14) राजभवन येथे झालेत्यावेळी ते बोलत होते. 

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुंबई फायर ब्रिगेड तसेच राज्य अग्निशमन सेवेतील 13 अधिकाऱ्यांना व जवानांना 'राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदकेप्रदान करण्यात आलीतसेच अग्निशमन कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

            एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झालीत्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ 10-12 लाख होती. आज शहराची लोकसंख्या किमान पंधरा पटीने वाढली आहे. मुंबईची लोकसंख्या आज अनेक देशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शहराला सशक्त व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्निशमन दल असणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

 

सोसायटी व उद्योगांचे नियमित 'फायर ऑडिटकरण्याची सूचना

 

            मुंबईसारख्या शहरांमध्ये आगीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांना तसेच गृहनिर्माण संस्थांना सहभागी केले पाहिजे तसेच गृहनिर्माण संस्था व उद्योग संस्थांचे नियमित 'फायर ऑडिटकेले गेले पाहिजेत असेही राज्यपालांनी सांगितले.

 

अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला योगदान देण्याचे राज्यपालांचे आवाहन

 

            समाजाच्या विकासामध्ये अग्निशमन सेवा दलाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून राज्यपालांनी राज्यातील नागरिकांना अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले. या निधीचा उपयोग अग्निशमन सेवा कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी करण्यात येतो. 

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांचेसह देवेंद्र पोटफोडेमुख्य अग्निशमन अधिकारीपुणे महानगर पालिकाप्रशांत रणपिसेमाजी मुख्य अग्निशमन अधिकारीपुणे महानगरपालिकाकिरण गावडेमाजी मुख्य अग्निशमन अधिकारीपिंपरी-चिंचवड महानगरपालिकायशवंत जाधवउपमुख्य अग्निशमन अधिकारीमुंबई अग्निशमन दलकैलास हिवराळेमाजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी मुंबई अग्निशमन दलविजयकुमार पाणिग्रहीमाजी उपमुख्य अग्निशमन अधिकारीमुंबई अग्निशमन दलसंजय पवारप्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारीमालेगाव महानगरपालिकानाशिकधर्मराज नाकोड,सहायक स्टेशन अधिकारीनागपूर महानगरपालिकाराजाराम केदारीलिडिंग फायरमनपुणे महानगरपालिकासुरेश पाटीललिडिंग फायरमनमुंबई अग्निशमन दलसंजय म्हामुणकरलिडिंग फायरमन मुंबई फायर ब्रिगेड व चंद्रकांत आनंददासफायरमनपुणे महानगरपालिका यांचा 'राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदकदेऊन सत्कार करण्यात आला.

            सुरुवातीला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांच्या पोशाखावर अग्निशमन सेवा चिन्ह अंकित केले. त्यानंतर राज्यपालांनी अग्निशमन कर्मचारी कल्याण निधीला आपले योगदान देऊन अग्निशमन सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन केले.  मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी आभारप्रदर्शन केले.

000

Maharashtra Governor launches Fire Services Week; appeals people to donate to Fire Services Personnel Welfare Fund

 

            The Governor of Maharashtra Ramesh Bais inaugurated the Fire Service Week and launched  the Maharashtra Fire Services Personnel Welfare Fund Raising Campaign by making his donation to the Flag Fund at Raj Bhavan Mumbai on Fri (14 April).

            The Governor also presented the President's Fire Service Medals and Scrolls to 13 Fire Officers and leading firemen from Mumbai and other parts of the State on the occasion.

            Speaking on the occasion the Governor stressed the need to create a modern, well-equipped, well-staffed and modern Fire Fighting Force for Mumbai and the State. The Governor also called for conducting regular fire audits of housing societies and industrial establishments.

            The Governor appealed to the citizens to donate generously to the Fire Services Personnel Welfare Fund which is used for the welfare of family members of fire services personnel.

            Director of Maharashtra Fire Services Santosh Warick affixed the Fire Service Flag on the apparel of the Governor. 

            The Governor presented the President's Fire Service Medals to Sanjay Manjrekar, Chief Fire Officer from Mumbai Fire Brigade, Devendra Potphode, Chief Fire Officer from P.M.R.D.A. Pune, Prashant Ranpise, Ex.Chief Fire Officer, Pune Municipal Corporation, Pune, Kiran Gawde, Ex. Deputy Chief Fire Officer, Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Yeshwant Jadhav,Dy.Chief Fire Officer Mumbai, Kailash Hiwrale, Ex.Dy.Chief Fire Officer Mumbai Fire Brigade, Vijaykumar Panigrahi, Ex.Dy.Chief Fire Officer, Sanjay Pawar, In Charge Chief Fire Officer, Malegaon Municipal Corporation, Dharmaraj Nakod, Assistant Station Officer from Nagpur Municipal Corporation, Rajaram Kedari, Leading Fireman Pune Municipal Corporation, Suresh Patil, Leading Fireman Mumbai Fire Brigade, Sanjay Mhamunkar, Leading Fireman Mumbai Fire Brigade, and Chandrakant Anandas, Fireman, Pune Municipal Corporation. CFO Mumbai Fire Brigade Sanjay Manjarekar proposed vote of thanks.

            The Fire Service Day is commemorated on 14th April to remember the fire services personnel who lost their lives in the devastating fire caused by the explosions in the Mumbai Dock Explosion in the year 1944.

000

 

 

 


महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ व १६ एप्रिल रोजी खारघरमधील वाहतुकीत बदल ठाणे, दि. १४: नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. १५ एप्रिल २०२३ रोजी १४.०० वाजेपासून ते दि. १६ एप्रिल २०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत खारघरमधील ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमणी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतचा रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना घेवून येणारे वाहन - बस यासाठी हा रस्ता खुला राहणार असून इतर वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे. अ) प्रवेश बंद:- दिनांक १५/०४/२०२३ रोजी १४.०० वाजे पासून ते दिनांक १६/०४/२०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमानी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतच्या रस्त्यावर नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे. ब) पर्यायी मार्ग:- २) ग्रामविकास भवन ने ग्रीन हेरीटेज चौक ते मुर्ती चौक, विनायक सेठ चौक मार्गे पापडीचा पाडा, तळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील. २) आरएएफ तळोजा कडून पापडीचा पाडा मार्गे, विनायक सेठ चौक, मुर्वी गांव चौक मार्गे इन्च्छीत स्थळी जातील. (३) ओवेगावातील रहिवाशी ओवेगाव चौक ते पापडीचा पाडा मार्गे तळोजा किंवा खारघर येथून इच्छित स्थळी जातील. ही अधिसूचना कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना येवुन येणारी वाहने / बस या करिता खुला राहील अशा वाहनांना लागू असणार नाही. तसेच अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असे श्री काकडे यांनी कळविले आहे नवी मुंबईत 15 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंतजड अवजड वाहनांना प्रवेश बंद ठाणे, दि. 14: नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनामार्फत रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल ते 16 एप्रिल या काळात नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना या काळात प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे. नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्हयातून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी याकरीता दि. 15 एप्रिल 2023 रोजी दु. 14.00 वा. ते दि. 16 एप्रिल 2023 रोजी रात्रौ 23.00 वा. पर्यंतच्या कालावधीत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड - अवजड वाहनाच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतुक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे. वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे दि. १५ एप्रिल २०२३ रोजीच्या दु. १४.०० वाजेपासून ते दिनांक १६ एप्रिल २०२३ च्या रात्री २३.०० वा. पर्यंत नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खालील नमुद मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. १. ठाणे जिल्ह्यातून ऐरोली टोल नाका, तसेच विटावाकडुन ठाणे बेलापुर रोडने तसेच शिळफाटयाकडुन महापे व तळोजा कडुन जुना मुंबई पुणे महामार्गाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. २. मुंबई शहराकडून सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका व पूर्व द्रुतगती मार्गानि ऐरोली टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ३. गोवा महामार्गाने खारपाडा टोलनाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड- अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ४. पुणे मुंबई महामार्ग व पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने कोनफाटा पळस्पे सर्कल शेडुग टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ५. जेएनपीटी बंदर, उरण पनवेल येथील सर्व सीएफएस एमटीयार्ड, व इतर आस्थापना यांच्याकडुन गव्हाणफाटा, दास्तानफाटा तसेच पनवेल टी पॉईट मार्गाने सायन-पनवेल मार्गावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ६. नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांवर जड अवजड वाहनाना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. तसेच सदरची वाहतुक नियंत्रण अधिसुचना ही अत्यावश्यक सेवेतील जट-अवजड वाहनाना लागू असणार नाही, असे श्री काकडे यांनी कळविले आहे. 0000 महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित 15 व 16 एप्रिल रोजी नवी मुंबईतील कोपरा ब्रिजजवळील वाहतुकीत बदल नवी मुंबई, दि. 14 : नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजेपासून ते दि. 17 एप्रिल 2023 च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत खारघर येथील कोपरा ब्रिज खालील अंडर पासमधून स्वर्ण गंगा चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने हिरानंदानी ब्रिज सिग्नल वरुन युटर्न घेऊन कोपरा ब्रिज जवळील कटने डावीकडे वळून स्वर्णगंगा चौकातून पुढे से.35 कडील नियोजित वाहनतळाकडे जातील, असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे. वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे अ) प्रवेश बंद:- दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजे पासून ते दिनांक 17 एप्रिल 2023 च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत मुंबई –पुणे मार्गावरील कोपरा अंडर पास वरुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा रस्ता नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे. ब) पर्यायी मार्ग:- 1) पुणे- मुंबईकडुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रिज चढून हिरानंदानी ब्रिज खालील सिग्नल येथून यु टर्न घेऊन परत कोपरा ब्रिजकडे जावून कोपरा ब्रिज जवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकाकडे जावून पुढे इच्छित स्थळी जातील. ही अधिसूचना अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू

 महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ व १६ एप्रिल रोजी खारघरमधील वाहतुकीत बद

ठाणे, दि. १४: नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. १५ एप्रिल २०२३ रोजी १४.०० वाजेपासून ते दि. १६ एप्रिल २०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत खारघरमधील ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमणी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतचा रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना घेवून येणारे वाहन - बस यासाठी हा रस्ता खुला राहणार असून इतर वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.

अ) प्रवेश बंद:-

दिनांक १५/०४/२०२३ रोजी १४.०० वाजे पासून ते दिनांक १६/०४/२०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमानी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतच्या रस्त्यावर नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.

 ब) पर्यायी मार्ग:-

२) ग्रामविकास भवन ने ग्रीन हेरीटेज चौक ते मुर्ती चौक, विनायक सेठ चौक मार्गे पापडीचा पाडा, तळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील. २) आरएएफ तळोजा कडून पापडीचा पाडा मार्गे, विनायक सेठ चौक, मुर्वी गांव चौक मार्गे इन्च्छीत स्थळी जातील.

(३) ओवेगावातील रहिवाशी ओवेगाव चौक ते पापडीचा पाडा मार्गे तळोजा किंवा खारघर येथून इच्छित स्थळी जातील.

ही अधिसूचना कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना येवुन येणारी वाहने / बस या करिता खुला राहील अशा वाहनांना लागू असणार नाही. तसेच अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असे श्री काकडे यांनी कळविले आहे

नवी मुंबईत 15 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंतजड अवजड वाहनांना प्रवेश बंद

ठाणे, दि. 14: नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनामार्फत रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल ते 16 एप्रिल या काळात नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना या काळात प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्हयातून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी याकरीता दि. 15 एप्रिल 2023 रोजी दु. 14.00 वा. ते दि. 16 एप्रिल 2023 रोजी रात्रौ 23.00 वा. पर्यंतच्या कालावधीत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड - अवजड वाहनाच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतुक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे

            दि. १५ एप्रिल २०२३ रोजीच्या दु. १४.०० वाजेपासून ते दिनांक १६ एप्रिल २०२३ च्या रात्री २३.०० वा. पर्यंत नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खालील नमुद मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

१. ठाणे जिल्ह्यातून ऐरोली टोल नाका, तसेच विटावाकडुन ठाणे बेलापुर रोडने तसेच शिळफाटयाकडुन महापे व तळोजा कडुन जुना मुंबई पुणे महामार्गाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

२. मुंबई शहराकडून सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका व पूर्व द्रुतगती मार्गानि ऐरोली


टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

३. गोवा महामार्गाने खारपाडा टोलनाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड- अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

४. पुणे मुंबई महामार्ग व पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने कोनफाटा पळस्पे सर्कल शेडुग टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ५. जेएनपीटी बंदर, उरण पनवेल येथील सर्व सीएफएस एमटीयार्ड, व इतर आस्थापना यांच्याकडुन गव्हाणफाटा, दास्तानफाटा तसेच पनवेल टी पॉईट मार्गाने सायन-पनवेल मार्गावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

६. नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांवर जड अवजड वाहनाना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे

            तसेच सदरची वाहतुक नियंत्रण अधिसुचना ही अत्यावश्यक सेवेतील जट-अवजड वाहनाना लागू असणार नाही, असे श्री काकडे यांनी कळविले आहे.

0000

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित 15 व 16 एप्रिल रोजी नवी मुंबईतील कोपरा ब्रिजजवळील वाहतुकीत बदल


नवी मुंबई, दि. 14 : नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त

दि. 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजेपासून ते दि. 17 एप्रिल 2023 च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत खारघर येथील कोपरा ब्रिज खालील अंडर पासमधून स्वर्ण गंगा चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने हिरानंदानी ब्रिज सिग्नल वरुन युटर्न घेऊन कोपरा ब्रिज जवळील कटने डावीकडे वळून स्वर्णगंगा चौकातून पुढे से.35 कडील नियोजित वाहनतळाकडे जातील, असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.


वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे


अ) प्रवेश बंद:-




दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजे पासून ते दिनांक 17 एप्रिल 2023 च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत मुंबई –पुणे मार्गावरील कोपरा अंडर पास वरुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा रस्ता नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.

 ब) पर्यायी मार्ग:-

1) पुणे- मुंबईकडुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रिज चढून हिरानंदानी ब्रिज खालील सिग्नल येथून यु टर्न घेऊन परत कोपरा ब्रिजकडे जावून कोपरा ब्रिज जवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकाकडे जावून पुढे इच्छित स्थळी जातील.




ही अधिसूचना अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू 

व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प राबविणार

 व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प राबविणार


                                                                                                -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


हत्ती संवादकाची मदत घेणार


            मुंबई, दि. 14 : राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धन करण्यात येणार आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी राज्यातील वन्य हत्ती नियंत्रणासाठी हत्ती संवादकाची मदत घेण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला.


            कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात वन्यजीवांच्या वाढत्या उपद्रवासंदर्भात चर्चा करण्यासाठी काल सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर , वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, वनबलप्रमुख वाय. एल.पी.राव, प्रधान मुख्यवनसंरक्षक महिप गुप्ता, गुरुप्रसाद आदी अधिकारी उपस्थित होते.


            या बैठकीत वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान यावर सविस्तर चर्चा करताना श्री. मुनगंटीवार म्हणाले की, या समस्येवर केवळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हा उपाय नाही. वन्य प्राण्यांना विशेषतः हत्तींना गावापर्यंत, शेतांपर्यंत येण्यापासून रोखण्यासाठी काय योजना करता येतील याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी हत्ती संवादकाची मदत घेता येईल, असेही त्यांनी सूचविले. यावेळी देशातील नऊ राज्यात वन्य हत्तींशी संवाद साधून त्यांना नियंत्रित करणारे प्राणी संवादक आनंद शिंदे यांच्या कामांविषयी सादरीकरणही करण्यात आले.


            हत्तींना गावापर्यंत येण्यास रोखण्यासाठी ‘एलिफंट प्रूफ फेन्स’ अर्थात एपीएफकरिता मनरेगा योजनेतून निधी मिळावा या दृष्टीने केंद्राकडे पाठपुरावा करण्यात यावा.पर्यावरण व वन्यजीव संवर्धनासाठी देशातील उद्योग जगताकडून मिळणाऱ्या सामाजिक उत्तर दायित्व (सीएसआर) निधीपैकी शून्य पूर्णांक पाच टक्के निधी देणे बंधनकारक करावे अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात येईल, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.


            जंगलातील झाडे कटाईबाबत परवानगी देताना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि ऑफलाइन परवानगी बंद करण्याचे निर्देश वनमंत्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. कोल्हापूर जिल्ह्यात गवा या प्राण्यांचा उपद्रव गंभीर असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त करुन लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांशी संवाद वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

🌹हे करून पहा✍🌹 आरोग्य संदेश

 🌹हे करून पहा✍🌹


१)उन्हाळी लागल्यास गोखरू काढा तीन वेळा रोज

२)दुर्वांचा रस एक चमचा तीन वेळा अंगाचा दाह,पोटातील उष्णता कमी होते.

३)लहान मुलांना उन्हाळी लागल्यास साळीच्या लाह्या कपभर पाण्यात.

४)तोंड आल्यास ताकाच्या गुळण्या करून ते पिणे

५)पेरुची कवळी पाच पान खाल्यास तोंड ,तोंडातील फोड जातात,पोटातील जळजळ बंद होते.

६)जाईच्या पानांचा रस एक चमचा मधात तोंडाला लावा तोंड येणं बंद होतं.

७)अंगात चमक,छातीत दुखणे,छाती जड होणे ,भरणे, छोट्या पाकळ्या चार लसूण रोज चावून खा.

८)उच्च रक्तदाब लसूण चावून खा रोज चार पाकळ्या लहान. नियंत्रणात येईल

, ब्लाँकेज जातील.

९)लिबाचा रस खोबरेल तेलाचा घालून अंगावर लावल्यास खाज कमी येते.डोक्यावर लावल्यास केस गळण बंद होतं.कोंडा, रुसी जाते.

१०)हातापायाची सुज येत असल्यास आघाड्याची झाडे मुळासकट जाळून राख गोमुत्रात एकत्र करुन रोज दोन वेळा एक चमचा घ्या सूज जाईल.

११)अंगावर पित्त उठल्यावर झेंडूची पाने,फुल यांचा रस अंगाला लावा.

१२)पित्ताचा गाठी आल्यास कांद्याचा रस शरीरावर लावा.

१३)अंगाला मुंग्या, झोकांड्या जाणे,अंग जड होत असल्यास.विड्याच्या पानांचा रस दोन चमचे,गाईच तूप एक चमचा,व किंचीत हिंग घालून घ्यावा.

१४)ब्लिडींग खूप होत असल्यास एक पिकलेल्या केळ्यात आवळ्याचा रस घालून कुस्करून मध व अर्धा चमचा साखरेत खा हेवी फ्लो कमी होतो.

१५)कडुलिंबाचा पाला आंघोळीच्या पाण्यात टाकून पाने खालल्यास अँलर्जी सह त्वचा रोग दुर पळतात.

१६)कानात मधाचे दोन थेंब व गोमूत्र दोन थेंब टाकल्यास कानात होणारे फोड व पू येणं बंद होतं

१७)कंबरदुखी असल्यास,जाँईन पेन,अंगदुखी, स्नायू दुखी असल्यास शेवग्याच्या पानांची भाजी एक दाणा चुना घालून खा.

१८)शेवग्याची साल ठेचून गरम करून दुखर्या भागावर लेप दिल्यास आराम पडतो.

१९)गजकर्ण, इसब,नायट,खरुज झाल्यास पारिजातकांचा पानांचा रस काढून त्यात कच्चा शेंगदाणा उगाळून लावा फरक पडतो.

२०)चंदन पावडर ओरिजिनल अथवा चंदन उगाळून, धने,वाळा,गुलाब पाण्यात वाटून लावल्यास घामोळे व उन्हाळ्यातील त्वचा रोग आटोक्यात येतात.

२१)जखम भरण्यासाठी हळदीत कडूनिंबाच्या पानांचा रस घाला जखम अथवा घाव भरतो.

२२)जखमेवर काताची पावडर टाकल्यास जखम बरी होते.

२३)जिर्याची पावडर,वावडींग पावडर,दुप्पट गुळा तून दिल्यास जंत पडतात.

२४)वावडींगाची पावडर फडक्यात बांधून ती किडलेल्या दाताखाली धरल्यास किड पडते,फडक्यास किड चिकटलेली दिसते.लाळ मात्र गिळू नये.

२५)झोप येत नसल्यास एक वाटी गरमपाण्यात मध व मेथीचे दाणे भीजवून पाणी प्या दाणे खा .झोप छान येईल.

  हे करून पहा निश्चित फरक पडेल च.

गजानन



आली शासकीय योजनांची जत्रा’एकाच ठिकाणी मिळणार विविध योजनांचे लाभ

 आली शासकीय योजनांची जत्राएकाच ठिकाणी मिळणार विविध योजनांचे लाभ

२७ लाख नागरिकांना लाभ देणारा हा अभिनव उपक्रम यशस्वी करा

                                             - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

            मुंबई, दि. १४: आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५  हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा उद्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. १५ जून पर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर २७ लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

             "जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची असे हे  अभियान असून त्याचे समन्वयन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे.

कमीत कमी कालावधीत विविध योजनांचा लाभ

             जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात येतात. मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणेयोजनांची माहिती घेणेआवश्यक दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणेकागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते. दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते. कित्येक वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्ण होत नाही. यावर पर्याय म्हणून चाळीसगावजामनेरमुरबाडकल्याण इत्यादी ठिकाणी "जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाचीनावाचा अभिनव व पथदर्शी उपक्रम  राबविण्यात आला आहे. या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यात आला आहे.

एकाच छताखाली विविध विभाग

             या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. या उपक्रमाची पूर्वतयारी १५ एप्रिल २०२३ ते १५ मे२०२३ या कालावधीत  करण्यात येईल. या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणेप्रस्तावित लाभार्थ्यींची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येतील.

            प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान ७५ हजार लाभार्थ्यींना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असेल. लाभार्थ्यींना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर / तालुकास्तरावर दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

मंत्रालय ते विविध यंत्रणांसाठी एसओपी

            केंद्र व राज्यशासनाच्या योजनांचा आढावा घेऊन या उपक्रमांतर्गत राबवावयाच्या योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरविण्यात येईल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना  स्वयंस्पष्ट सूचना दिल्या जातील. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घेतले जाईल. महानगरपालिकांकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांबाबत संबंधित विभागीय आयुक्त व महानगरपालिका आयुक्त वेळोवेळी मार्गदर्शन करतील. या अभियानाच्या आयोजनासाठी निधी उपलब्धतेबाबतही शासन निर्णयात तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयस्तर ते तालुकास्तर व विविध यंत्रणांसाठी कार्यपद्धतीही एसओपी’ निर्धारित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने विविध स्तरावरील जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले आहे.योजनेची माहिती पोहचवूनअर्ज भरून घेणे ते लाभार्थ्यींची निवड आणि प्रत्यक्ष लाभ देणे इथपर्यंत कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे.

            या अभियानाचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षांना मुख्यमंत्री सचिवालयातील जनकल्याण कक्षास सादर करावा लागणार आहे.

Featured post

Lakshvedhi