Monday, 10 April 2023

जिन्दगी इतफक है










 

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार

 अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            नवी दिल्ली, 9 : प्रभु श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी अयोध्या येथे हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभु श्री रामच्रंद्राच्या जन्मस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

             हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारण्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सकारात्मक भूमिका असल्याचेही श्री शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी यांना निवेदन दिले असल्याची माहितीही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

            मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे घेतलेल्या निणर्यांची माहिती येथील माध्यमांना दिली. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊसामुळे झालेले नुकसान याबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावीयासाठी स्वत: पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अयोध्येतील वातावरण भारावलेले असून राम मंदिराच्या गर्भ गृहातील वातावरण दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे आहे. जानेवारी 2024 मध्ये मंदिरांचे बांधकाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुर्ण होईलअसे ते म्हणाले.

            तत्पुर्वी मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रभु श्री रामचंद्रच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर ज्येष्ठ संत महंतांची भेट घेतली. त्यानंतर मंदीर बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी राज्याचे मंत्रीखासदारआमदार आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

झोप न येण्याची कारणे

 *झोप न येण्याची कारणे*


*मेनोपोज*


झोप न येण्याची समस्या स्त्री व पुरुष दोघांमध्येही आढळते. मात्र मॅनोपॉजच्या दरम्यान स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कारण मॅनोपॉजच्या काळात स्त्रीयांमधील अॅस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते. त्यामुळे झोपेची समस्या निर्माण होते. झोपेच्या समस्येसोबत काही महीलांचे यामुळे वजन देखील वाढते.


*कर्करोग-*


कर्करोगाच्या रुग्णांंमध्ये झोपेची समस्या दिसून येतात. कर्करोगावरील उपचारांची कमतरता,पुन्हा कर्करोग होण्याची भीती, मानसिक अस्वास्थ्य ,कर्करोगामुळे कार्यक्षमता कमी होणे, सुरक्षेच्या समस्या, औषधांचा गैरवापर व दुरुपयोग, नातेसंबधातील ताण, उपचारांसाठी होणारा खर्च यामुळे झोप कमी लागण्याची समस्या निर्माण होते. अनेक संशोधनात निरनिराळ्या कर्करोगाचे निदान होण्यापुर्वी ६ महिने व निदान झाल्यावर १८ महिने कमी झोप व थकवा ही लक्षणे या रुग्णांमध्ये आढळतात.


*शहरी  जीवनशैली-*


कॉर्पोरेट जगातील ताणामुळे देखील तुम्हाला झोप कमी येण्याची समस्या होऊ शकते. दिवसभरातील कामाच्या ठिकाणी असणारा ताण, रात्री उशीरापर्यंत काम करणे, खुप वेळ टीव्ही पहाणे, सकाळी लवकर उठावे लागणे व पुन्हा रात्री एखाद्या पार्टीला जाणे, रात्रभर व्हॉट्सअपवर गप्पा मारणे यामुळे झोप कमी मिळते.


*गाल ब्लेडर सर्जरी-*


गाल ब्लेडर सर्जरी मध्ये पित्ताचे खडे झाल्यास तुमचे गाल ब्लेडर अथवा पित्ताशय काढून टाकण्यात येते. पित्ताशय जड अन्नाच्या पचनासाठी अतिशय उपयुक्त असते.जेव्हा तुम्ही रात्री बराच वेळ उपाशी रहाता तेव्हा पित्ताशय पित्त साठवून ठेवते.पण पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेमुळे हा ताण लहान आतड्यावर येतो.त्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर ब-याचदा झोपेच्या समस्या निर्माण होतात.


*टीथ ग्राईंडींग-*


दात कराकरा वाजवण्याच्या समस्येमुळे रात्री तुमची झोपमोड होऊ शकते. ही समस्या ब-याचदा ताण-तणावामुळे होऊ शकते. या समस्येत दातांवर पडणारा दाब इतका असतो की कधीकधी यामुळे दात तुटू देखील शकतात. यामुळे मज्जासंस्थेवर व तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सवर परिणाम होऊन झोपेची समस्या निर्माण होते.


*विटामिन्स-*


आपण निरोगी रहाण्यासाठी अनेक विटामिन्स घेतो पण आश्चर्याची बाब म्हणजे या विटामिन्स मुळे तुम्हाला झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. स्लीप मेडीसिन या जर्नल मध्ये छापून आलेल्या एका संशोधनानूसार एक किंवा अधिक विटामिन घेतल्याने तुम्हाला झोपेची समस्या, झोपमोड होणे अथवा निद्रानाश होऊ शकतो. झोप येणे अथवा जाग येणे यावर आपल्या मज्जासंस्थेचे नियंत्रण असते.पण विटामिन घेतल्याने हे संतुलन बिघडते व झोपमोड होते.


तुमच्या झोपमोडीचे कारण वर दिलेल्या कारणांपैकी एखादे असेल तर तुमच्या डॉक्टरचा सल्ला जरुर घ्या


 🎯स्मार्टफोनमुळं जागी राहत आहेत किशोरवयीन मुलं


किशोरवयीन मुलांना किमान दहा तासांची झोप आवश्यक आहे. पण, 50 टक्के मुलांना ती मिळत नाही असं एनएचएसनं म्हटलं आहे. खरंतर बेडरुममध्ये आराम करायला हवा पण त्या ठिकाणी लॅपटॉप, मोबाइल यांचं वास्तव्य असतं.


त्यामुळं किशोरवयीन मुलं रात्रभर जागतात. पूर्वीच्या तुलनेत आपल्याकडं आता मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या उपकरणांतून परावर्तीत होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे झोपण्याची इच्छा कमी होते आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर चॅट करत असतो तेव्हा आपला मेंदू सक्रिय होतो त्यामुळे देखील झोप उडते.


*अधिक माहितीसाठी संपर्क*

डॉ समता गोर्हे

8657875568


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



गुलाबी सौंदर्य

 *प्रेमाचं प्रतिक असलेल्या गुलाबाचा असाही वापर; वाढवा त्वचेचं सौंदर्य, असा तयार करा 'रोझ फेसपॅक'.....*


काल अनेक कपल्स   व्हॅलेंटाईन डे (Valentines Day)  साजरा केला. प्रेमीयुगुल हे एकमेकांना वेगवेगळे गिफ्ट देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. या दिवशी बरेच लोक आपल्या पार्टनरला गुलाब भेट म्हणून देतात. प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या गुलाबाचा वापर विविध फेसपॅक तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. गुलाबाचा वापर करुन फेसपॅक (Beauty Tips) कसा तयार करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या रोज फेस पॅक तयार करायची सोपीपद्धत...


*गुलाब पेस्ट तयार करण्याची सोपी पद्धत...*

गुलाबाचे विविध फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुलाबाची पेस्ट तयार करावी लागेल. ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि त्या पाण्यानं स्वच्छ करा. या पाकळ्या मिक्समध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. या पेस्टचा वापर तुम्ही विविध फेसपॅक तयार करण्यासाठी करु शकता. 


*गुलाब हनी फेस पॅक(Honey And Rose Facepack)...*

तयार केलेल्या गुलाबाच्या पेस्टचा वापर करुन तुम्ही गुलाब हनी फेस पॅक तयार करु शकता. यासाठी गुलाबपेस्टमध्ये गुलाब पाणी आणि मध मिक्स करा. हा पॅक चेहऱ्याला 20 मिनिटे लावा. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा हायड्रेट राहिल. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील या फॅसपॅकमुळे कमी होतील.


*गुलाब चंदन फेसपॅक(Sandalwood And Rose Facepack)...*

गुलाबा पेस्टमध्ये चंदन पावडर मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणात थोडे एक किंवा दोन चमचे दूध टाका. हा पॅक चेहऱ्यावर लावताना मसाज करा. हा पॅक जवळपास दहा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्याचे स्क्रबिंग होते. त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते. 


*कोरफड जेल आणि गुलाबाचा पॅक (Aloe Vera And Rose Facepack)...*

गुलाबाच्या पेस्टमध्ये  कोरफड जेल मिक्स करून  चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी चेहरा धुवा. या पॅकमुळे स्किन टायनिंग होते. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील जातात. 


*कुमार चोप्रा,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

Sunday, 9 April 2023

आरोग्य दाई बीट

 *आरोग्य दाई बीट*


भाज्यांमध्ये बीट सर्वात फायदेशीर मानली जाते. त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ते शरीरात हिमोग्लोबिन बनविण्याचे कार्य करतात. बीट रक्त स्वच्छ करण्यास देखील मदत करते. बीटरुटमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. याशिवाय लोह, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी घटकांमध्येही समृद्ध आहे. एकीकडे बीट आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर दुसरीकडे त्वचा सुधारण्यासही फायदेशीर आहे. हे अँटीएजिंग म्हणून कार्य करते.

चला तर मग जाणून घेऊया बीटाचे फायदे...


*फायदे -*


डागविरहित त्वचेसाठी - चमकदार आणि गुळगुळीत त्वचेसाठी बीटचा रस खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन-ए, सी आणि व्हिटॅमिन-के असते जे शरीराच लोह, तांबे आणि पोटॅशियमची आवश्यकता पूर्ण करते आणि त्वचा निरोगी ठेवते. बीटचा रस इतर कोणत्याही भाज्या किंवा फळांच्या रसात मिसळला जाऊ शकतो


*चमकदार त्वचेसाठी* - 

चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आपण बीट फेस मास्क वापरू शकत फेस मास्क बनविण्यासाठी, ब्लेंडरमध्ये सोलून बीटचे तुकडे घालून पेस्ट तयार करा एका भांड्यात पेस्ट काढा आणि त्यात एक चमचा मॉइश्चरायझिंग क्रीम मिसळा. ही तयार पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे ठेवा. पेस्ट सुकल्यावर चेहरा धुवा. यानंतर आपल्याला आपला स्वतःचा चमकणारा चेहरा दिसेल.


*डाग नाहीसे करण्यासाठी* 

 मुरुमांचे चेहऱ्यावर कुरूप डाग पडतात. अशा प्रकारे, बीटचा मास्क चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. बीट मास्क तयार करण्यासाठी, दोन चमचे मुलतानी माती मध्ये 5-6 चमचे बीटचा रस घाला आणि एक पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा आणि 15 मिनिटे कोरडे होऊ द्या. जेव्हा ते कोरडे होईल तेव्हा त्यावर हातांनी चेहरा आणि गळ्यावर मालिश करा. काही काळ मालिश केल्यानंतर, ते पाण्याने स्वच्छ करा. हे डाग काढून टाकण्यास मदत करेल.


*त्वचेचे टोनिंग करण्यासाठी* 


बीटचे सेवन देखील टोनरसारखे कार्य करते. यासाठी बीटरूटचे तुकडे करा आणि त्यात थोडा कोबी घाला आणि बारीक वाटू घ्या. आइस क्यूब तयार करण्यासाठी हि तयार होणारी पेस्ट आइस ट्रेमध्ये टाका आणि डीप फ्रीजरमध्ये ठेवा. जेव्हा गोठते तेव्हा ते चेहऱ्यावर लावा.


*ओठांकरिता* 


 फाटलेल्या ओठांना बरे करण्यासाठी आणि ते मऊ करण्यासाठी बीटरूटचा रस वापरा. बीट रस फ्रिजमध्ये ठेवा, तो दाट झाल्यावर रात्री आपल्या ओठांवर लावा. सकाळी आपण मलईच्या मदतीने ते स्वच्छ करा. ओठांना मऊ आणि गुलाबी बनवण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,



*⭕️

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे सोमवारी वितरण

 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे सोमवारी वितरण

              पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत "उत्सव महासंस्कृतीचा" चे आयोजन


            मुंबई 8:कलेच्या विविध क्षेत्रात नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन आणि कलादान या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने दि.10 एप्रिल 2023 रोजी कलांगण, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे.


         रुपये एक लक्ष, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे स्वरुप असलेले राज्य सांस्कृतिक पुरस्कार

            नाटक : कुमार सोहोनी(2020) गंगाराम गवाणकर (2021), कंठसंगीत : पंडितकुमार सुरशे (2020) कल्याणजी गायकवाड (2021),उपशास्त्रीय संगीत : शौनक अभिषेकी (2020) देवकी पंडीत (2021),चित्रपट ( मराठी) : मधु कांबीकर (2020) वसंत इंगळे (2021), किर्तन : ज्ञानेश्वर वाबळे (2020) गुरुबाबा औसेकर (2021),शाहिरी : अवधूत विभूते (2020) कै. कृष्णकांत जाधव(मरणोत्तर) (2021),नृत्य : शुभदा वराडकर (2020) जयश्री राजगोपालन (2021),कलादान : अन्वर कुरेशी (2020) देवेंद्र दोडके (2021),वाद्यसंगीत : सुभाष खरोटे (2020) ओंकार गुलवडी (2021), तमाशा : शिवाजी थोरात (2020) सुरेश काळे (2021),लोककला : सरला नांदुरेकर (2020) कमलबाई शिंदे (2021),आदिवासी गिरीजन : मोहन मेश्राम (2020) गणपत मसगे (2021) या मान्यवरांना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान केले जाणार आहेत.

            या पुरस्कार प्रसंगी उत्सव महासंस्कृतीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्रीधर फडके, सावनी रवींद्र, भजनसम्राट ओमप्रकाश, कार्तिकी गायकवाड, संदेश उमप, संपदा माने, संपदा दाते, शाहीर संतोष साळूंखे, संघपाल तायडे तसेच शिल्पी सैनी आदि कलाकारांचे नृत्य, नाटय, भक्ती, संगीत, रंजन करणाऱ्या कलांचे सादरीकरण होणार आहे. या कायक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर करणार आहेत. महाराष्ट्राच्या कलारत्नांचा सन्मान करण्यासाठी तसेच यासोबत सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.


0000

यशराज भारती सन्मान 2022-23 पुरस्कारांचे वितरण

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत


यशराज भारती सन्मान 2022-23 पुरस्कारांचे वितरण


         मुंबई,दि.8 : यशराज रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा यशराज भारती सन्मान 2022-23 करीता आरोग्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम, लोकांचे जीवनमान उंचावणे आणि एथिकॅल गव्हर्नन्स या श्रेणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आज पुरस्कार प्रदान करण्यात आले.


               जमशेद भाभा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्टस (एन.सी.पी.ए.), नरीमन पॉईंट, मुंबई येथे यशराज भारती सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्ष आणि विश्वस्त श्रीमती दीपाली भानुशाली, डॉ एस.एस. मुंद्रा, यशराज रिसर्च फाउंडेशनचे सल्लगार डॉ.डी. के. जैन, प्रो. राम चरण, प्रो. गोविंदराजन पद्मनाभन आदी मान्यवर उपस्थित होते.


               स्वयंसेवी संस्था समाजाप्रती काम करतात त्याच्यामध्ये संवेदना असतात. जे लोक समाजाप्रती काम करतात, ज्यांचे कार्य चांगले असते त्यांच्या पाठीमागे समाज उभा असतो. यशराज रिसर्च फाऊंडेशनचे समाजाप्रती अत्यंत चांगले कार्य आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


               यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, यशराज रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचे आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम, लोकांचे जीवनमान उंचावणे आणि एथिकॅल गव्हर्नन्स या तीन श्रेणीतील काम चांगले आहे. या तीन श्रेणीवर शासन काम करत आहे.


               यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा यशराज भारती सन्मान 2022-23 करीता आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम या श्रेणीसाठी ‘सर्च’ (SEARCH), गडचिरोली या स्वयंसेवी संस्थेस पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार डॉ. अभय बंग व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथील प्रा. नवकांता भट यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. लोकांचे जीवनमान उंचावणे या श्रेणीत ‘प्रदान’ (PRADAN) या स्वयंसेवी संस्थेस हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे सरोज महापात्रा यांनी स्वीकारला आणि एथिकॅल गव्हर्नन्स या श्रेणीसाठी डॉ. अजय भूषण पांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


               सर्च (SEARCH), गडचिरोली या स्वयंसेवी संस्थेस व येथील प्रा. नवकांता भट यांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये आणि प्रदान (PRADAN) या स्वयंसेवी संस्थेस आणि डॉ. अजय भूषण पांडे यांना प्रत्येकी एक कोटी रुपये पुरस्काराची रक्कम देण्यात आली. यावेळी डॉ.अजय पांडे यांनी पुरस्काराची एक कोटी रुपये रक्कम प्रधानमंत्री साहाय्यता निधीमध्ये देत असल्याचे जाहिर केले.


               2022-2023 साठी यशराज भारती सन्मान खालील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आले.


आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम : या सन्मानाची 2 श्रेणीत विभागून देण्यात आला. पहिली म्हणजे सर्च (SEARCH), गडचिरोली या संस्थेची जी दुर्गम भागात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. जी की विशेषत: नवजात बालकांच्या आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करते. या श्रेणीतील दुसरे सन्मानकर्ते प्रा. नवकांता भट आहेत. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एका उपकरणाचा शोध लावला आहे जो एकाच कन्सोलद्वारे अनेक निदान चाचण्या करतो. या मशिनच्या विकासामुळे आरोग्य सेवा क्षेत्रावर मोठा प्रभाव पडण्याची क्षमता आहे आणि ते अधिक कार्यक्षम आणि परवडणारे आहे.


लोकांचे जीवनमान उंचावणे: या वर्षासाठी हा सन्मान ‘प्रदान’ (PRADAN) या स्वयंसेवी संस्थेस देण्यात आला. ही संस्था बऱ्याच काळापासून विकास क्षेत्रात काम करत आहे. या संस्थेने जवळजवळ 19,47,979 कुटुंबांपर्यंत मोठा प्रभाव निर्माण केला आहे. ही संस्था महिला विकास आणि लिंग संवेदना याविषयावर चांगले काम करत आहे. 


एथिकॅल गव्हर्नन्स : या श्रेणीसाठी हा सन्मान डॉ. अजय भूषण पांडे यांना देण्यात आला. डॉ.पांडे हे महाराष्ट्र केडरमधील सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि सध्या एप्रिल, 2022 पासून राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. गेल्या दशकभरात, डॉ. पांडे यांनी वित्त, आधार, डिजिटल पेमेंट आदी क्षेत्रात योगदान दिले

 आहे.


0000


 


 


Featured post

Lakshvedhi