Saturday, 8 April 2023

महाराष्ट्राच्ष्ट् औद्योगिक - व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद :

 महाराष्ट्राच्या औद्योगिक - व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद : उपराष्ट्रपती जगदीश धनकड

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिल्ली येथे घेतली उपराष्ट्रपतींची भेट


नवी दिल्ली : उपराष्ट्रपती महामहीम जगदीशजी धनकड यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नवी दिल्ली येथे संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.

महाराष्ट्राच्या औद्योगिक व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपदी जगदीश धनकड यांनी काढले. त्यासह महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय- नाशिकच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभासाठी त्यांना दिलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारले. या वेळी हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्र चेंबरचे युवा उद्योजक समितीचे चेअरमन संदीप भंडारी उपस्थित होते.

चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी महाराष्ट्र चेंबरतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, चेंबरचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांचे भारतीय उद्योग जगतातील अफाट योगदान आहे. देशाच्या जडणघडणीत उद्योजकांचा मोठा वाटा आहे. उद्योजक, व्यापारी आणि सरकारमधील महत्वाचा दुवा म्हणून महाराष्ट्र चेंबर कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या उद्योग, व्यापाराच्या जडणघडणीत चेंबरचा मोठा वाटा आहे. उद्योजक, व्यापारी यांचे हक्कांचे व्यासपीठ चेंबर असून त्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.

अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात उत्तर महाराष्ट्र शाखेच्या नवीन कार्यालयाची उभारणी केली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र शाखा माइलस्टोन आहे. उत्तर महाराष्ट्रातील व्यापार उद्योगाच्या विकासासाठी उत्तर महाराष्ट्र शाखेने महत्त्वाचे कार्य केलेले असून व्यापार उद्योगाच्या विकासासाठी व्यापारी उद्योजकांच्या विविध संघटना स्थापन केल्या आहेत. दरम्यान अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले. त्यांनी महाराष्ट्र चेंबरचे आमंत्रण स्विकारुन उपस्थित राहण्याची ग्वाही अध्यक्ष गांधी यांना दिली.

००

सैनिक हो तुमच्यासाठी,


 

जीवन गाणे

 







Friday, 7 April 2023

साहेब , ह्या वयात कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून*.......

 *साहेब , ह्या वयात कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून*.......

---------------------------------------------------

*सायंकाळचे ५.३० वाजले होते. नेहमीप्रमाणे ऑफिसचे काम आटोपून घरी जायला निघालो. येताना एकदम लक्षात आले की "ड्रायक्लिंनींगला टाकलेले कपडे घ्यायचेत" . मग सागरला गाडी प्रोफेसर चौकाकडे घ्यायला लावली. चौकात आलो तर तिथे जैन बांधवांची महावीर जयंतीच्या मिरवणूकीची तयारी सुरू होती. त्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली होती. "गजराज" च्या दुकानात जाणे देखील अवघड झाले होते. सागरने गाडी तशीच पुढे घेतली आणि श्री क्षीरसागर महाराज दत्त मंदिरापाशी गाडी लावून तो चालत चालत गजराज मधून कपडे आणायला गेला. गर्दी जास्त असल्यामुळे त्याला वेळ लागत होता. मी गाडीत बसून कधी थोडा मोबाईल पाहत होतो तर कधी आजूबाजूचे निरिक्षण करत होतो. तेवढ्यात समोरच मला "सायकलीवर भाजलेले शेंगदाणे विकणारे" एक बाबा दिसले. मला शेंगदाणे खायची इच्छा झाली. मी गाडीतून खाली उतरलो आणि बाबाच्या जवळ गेलो*. 


*आणि म्हटलं, "बाबा एक शेंगदाण्याची पुडी द्या, किती पैसे ?*


 *ते म्हणाले, "वीस रुपये".*

 *मी वीस रुपये दिले आणि शेंगदाणे चावायला सुरुवात केली. सागर येईपर्यंत त्यांच्याशी तिथेच गप्पा मारत उभा राहिलो.*


 *मी म्हटलं," बाबा तुमचं वय काय ?".बाबा म्हणाले,"८० वर्षे ".*


*बाबांचा रापलेला चेहरा त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाच्या खुणा दर्शवीत होता*.


*मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा ते खिशातील दहावीस रुपयांच्या नोटा व्यवस्थित लावत होते. त्यातलीच एक नोट खाली पडली होती. मी ती नोट उचलून त्यांना दिली.*


*बाबा म्हणाले,"गिरहाईक आलं की नोटांचा गोंधळ होतो. म्हणून वेळ मिळाला की मी नोटा अशा लावुन ठेवतो, साहेब.*


 *मग माझा पुढचा प्रश्न*


.*"किती पैसे मिळतात रोज?"* 


*ते म्हणाले, "पैसे किती मिळतात हे महत्त्वाचं नाही साहेब .पण माझा चार पाच तासाचा वेळ चांगला जातो आणि पाच-पन्नास रुपयांची रोजची कमाई देखील होते. त्यामुळे घरी जाताना माझ्या किरकोळ खर्चाची सोय माझ्या हाताने मी करतो. कधी नातवंडांसाठी खाऊ तर कधी म्हातारीसाठी काही बाही घेऊन जातो. त्यासाठी कुणासमोर हात पसरायची वेळ येत नाही. बोलता बोलता ते सांगू लागले, "साहेब, परवाचच उदाहरण. पलीकडच्या गल्लीत शेंगदाणे विकण्यासाठी मी उभा होता. एक आजी आपल्या नातवाला घेऊन आली आणि "शेंगदाणे द्या म्हणाली". तीने मला देण्यासाठी पैसे काढले. तेवढ्यात घरातून बाहेर आलेलं तिचं पोरगं तिच्यावर वसकलं ." कशाला फालतू पैसे घालवतेस. घरात शेंगदाणे नाहीत काय? "*


.*ती बाई नाराज झाली आणि तिने शेंगदाणे घेतले नाहीत.मात्र तिच्या चेहऱ्यावर "नातवाला शेंगदाणे देऊ दिले नाही, याच दु:ख दिसत होतं. काही वेळाने मुलगा गेला. आजीने स्वतःच्या हातात ठेवलेले पैसे मला दिले आणि नातवासाठी शेंगदाणे घेतले.*


*साहेब ,या वयात स्वाभिमानाने जगण्यासाठी फार पैसे लागत नाहीत.पण थोडे का होईना आपले हक्काचे असावे लागतात*. 


 *आता माझंच बघा. दोन मुल आहेत, सुना आहेत, माझी बायको आहे घरी. मी दररोज साडेचार पाच वाजता शेंगदाणे विकायला बाहेर पडतो. आणि रात्री साडेआठला घरी जातो. घरी गेलो की जेवण करतो आणि लगेच शांत झोपतो. सकाळी मात्र निवांत उठतो. मला शुगर नाही, बीपी नाही. कुठलाच त्रास नाही. काही दिवसांपूर्वी पोरांनी गुडघ्याचे ऑपरेशन करून दिलं. तेवढ्या गुडघ्याच्या गोळ्या चालू आहेत. पूर्वी सायकल चालवत शेंगदाणे विकत असे. आता गुडघ्याच्या ऑपरेशन मुळे सायकल चालवता येत नाही. म्हणून सायकल हातात धरतो आणि पायी चालत शेंगदाणे विकतो.*


*बाबा माझ्याशी भरभरून बोलत होते. बहुधा अनेक दिवसांनी कुणीतरी त्यांच्याशी अशा व्यक्तिगत गप्पा मारत होते* 


 *बाबा सांगत होते, "साहेब, रोज पाच सहा किलोमीटर मी चालतो. आणि त्यामुळेच माझी तब्येत ठणठणीत राहते. मला किती नफा मिळतो, याच्यापेक्षा या वयात कुणासमोर हात पसरायची वेळ येत नाही आणि स्वाभिमानाने जगता येतं, याच्यातच मला खरा आनंद आहे.*


 *प्रसंग छोटासाच*......

 *मात्र या छोट्या प्रसंगाने विचाराला चालना दिली. परत परत एकच वाक्य आठवत होते*,


*"या वयात कुणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये, साहेब "*

मदत वेळेवरच द्या टायटॅनिक होवू देवू नका.

 ✒️टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला .

९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते.

त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल,ते गेले नाहीत.

 १८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.

  ६८ किमी वर कैथरीन नावाचे जहाज होते, त्यांनीही हा प्रकाश पाहीला व ते त्वरीत मदतीसाठी वळले पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरी सुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले.


थोडक्यात तुम्हाला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात.

एक - त्यांच्या स्वार्थानुसार अजिबात तुमचा विचार न करणारे

दोन - त्यांच्या वेळेनुसार ,सवडी प्रमाणे मदत करणारे

तीन - कुठलाही विचार न करता, तुमच्या मदतीसाठी बेधडक हात देनारे.

💞

दिलखुलास' कार्यक्रमात कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांची मुलाखत.

 दिलखुलास' कार्यक्रमात कृषी संचालक (आत्मा)

दशरथ तांभाळे यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 6: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्याचे कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. 7 आणि शनिवार दि. 8 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


            शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून शेती क्षेत्राचा विकास करता यावा यासाठी शासनामार्फत राज्यात ‘आत्मा’ यंत्रणेची स्थापना करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन व उत्पन्न कसे वाढवावे, वातावरणातील बदलांचा अभ्यास करून कोणते तंत्रज्ञान वापरुन कोणते पीक कधी घ्यावे, शेतकरी गटाचे बळकटीकरण आणि कृषीपूरक उद्योगांना प्रोत्साहन अशा विविध विषयांवर सविस्तर माहिती, कृषी संचालक (आत्मा) श्री. तांभाळे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. ही मुलाखत पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी घेतली आहे.


००००

महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी पाच वर्ष मुदतीचे 1 हजार 500 कोटींचे रोखे विक्रीस.

 महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी

पाच वर्ष मुदतीचे 1 हजार 500 कोटींचे रोखे विक्रीस.

            मुंबई, दि. 6 : राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासंबधीत खर्चासाठी पाच वर्षे मुदतीचे एकूण 1 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या रोखे विक्रीतून मिळालेल्या रकमेचा वापर विविध विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.


            या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.


            राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                    


            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 11 एप्रिल, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 11 एप्रिल, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.


            यामध्ये स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 12 एप्रिल, 2023 रोजी करण्यात येईल.         


            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 12 एप्रिल, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी पाच वर्षांचा असेल.


            रोख्यांचा कालावधी 12 एप्रिल, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 12 एप्रिल, 2028 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 12 ऑक्टोबर व 12 एप्रिल रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.


            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 6 एप्रिल, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्या

त आली आहे.


००००


Featured post

Lakshvedhi