Thursday, 16 March 2023

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यासलगेचच उपचार करून घ्यावेत

 इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यासलगेचच उपचार करून घ्यावेत


- सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत.

            मुंबई, दि. १५ : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावेत अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.


            एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी आज विधानसभेत निवेदन केले.


            मंत्री सावंत म्हणाले, एच३एन२फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा H3N2 ने मृत्यू झाला आहे. इन्फ्लूएंझा ए आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लूएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. उदा. एच१ एन १ एच३एन२ इ. या आजाराची सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळून येतात. इन्फ्लूएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्यात येतात. १३ मार्च २०२३ अखेर एच१ एन१ बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत.


            राज्यात इन्फ्लूएंझा आजार मुख्यत्वेकरुन पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागात दिसून येत आहेत. या आजाराची लक्षणे तसेच उपचार पध्दती याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. राज्यातील रुग्णालयात संशयीत रुग्णांवर आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत असून आरोग्य संस्थेत आजारावरील उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याचे श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.


०००

नाटू नाटू' गीत व द 'एलिफंट व्हिस्परर' माहितीपटास ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल

 नाटू नाटू' गीत व द 'एलिफंट व्हिस्परर' माहितीपटास ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल


उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विधान परिषदेत अभिनंदनाचा ठराव.

            मुंबई, दि. १५ : ऑस्कर पारितोषिक सोहळ्यात आरआरआर या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गीतास तसेच 'एलिफंट व्हिस्परर' या माहितीपटास पुरस्कार मिळाल्याबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सभागृहातील सदस्यांनी या ठरावाचे समर्थन केले.


            याबाबत अधिक माहिती देताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, 'नाटू नाटू' या गीताचे गीतकार चंद्रा बोस असून एम. एम. किरवाणी यांनी संगीत दिले आहे. राहुल सिपलीगंज व कालभैरव यांनी गायले आहे. या गाण्याची आवृत्ती दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजी टी-सिरिजद्वारे प्रदर्शित झाली होती. लॉसएंजेलिस, अमेरिका येथे हा पुरस्कार १२ मार्च २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.


            याच सोबत द एलिफंट व्हिस्परर या लघु माहितीपटाबाबत माहिती देताना उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, या डॉक्युमेंटरीची निर्मिती अचित जैन यांनी केली आहे. कार्तिकी गोन्सालवीस व गुनीत मोंगा यांनी दिग्दर्शन केले आहे. तामिळनाडूच्या मुदुमिलिया टायगर रिझर्व्ह मधील हत्तींच्या निरीक्षणातील ही जन्मकथा आहे. महिला दिग्दर्शिका कार्तिकी गोन्सालवीस यांनी भारतमातेस हा पुरस्कार अर्पण केला आहे. 


00000

आपणच आपले घर लुटायला कसे आमंत्रण देतो?

 🙏 *आपणच आपले घर लुटायला कसे आमंत्रण देतो?* 🙏


*आपल्या जवळचीच घडलेली सत्य घटना*

( थोडजड जाईल पण हीच सत्य परिस्थिती आहे)


*शाळेत पालकसभेला गेलो होतो, तेव्हा तेथे खास पोलिस अधिकारी ही आले होते, आमची सभा भरवली गेली व त्यांनी आपले वक्तव्य मांडले , " तुमच्यापैकी कितीजण facebook वापरतात?"*

*जवळजवळ सर्वांनी आपले हात उंचावले. तेव्हा त्यांनी एका पालकाला निर्देशून म्हटले, "तुमचे fb friends किती आहेत?"*

*तो इसम ऐटीत बोलला "साहेब पाच हजार!!" जमलेले सर्व आ वासून पाहू लागले. पुढचा प्रश्न विचारला गेला, "यातल्या किती जणांना तुम्ही प्रत्यक्षात ओळखता किंवा भेटला आहात ?"* *आता मात्र त्या व्यक्तीला कसंस वाटू लागले व बोलले," फार फार तर एक हजार"*

*अधिकाऱ्यांनी त्यांना बसायला लावले व त्यांनी आपले पुढील वक्तव्य सुरु केले,*

           *"बघा, म्हणजेच चार हजार व्यक्तींचा त्यांच्याशी फक्त FB परिचय आहे. त्यावर पोलीस अधिकार बोलले आमच्या वारंवारच्या निरीक्षणात व अभ्यासातून असे आढळून आले की, दर पाच माणसांच्या मागे किमान एक criminal mind विचार असतात. आज कालच्या स्वार्थी वातावरणात जेथे काही ठिकाणी घरातल्यांवर विश्वास ठेवणे अवघड झाले आहे व आपण सहजपणे कोणाचीही friend request सहजपणे accept करतो. आणि मानसिक सुख मिळवतो*


 *काही दिवसा पूर्वी आमच्या पोलीस स्थानकात एक केस आली होती. आठ वर्षांची मुलगी बेपत्ता आहे म्हणून. खूप तपास केला व नंतर समोर एक भयंकर व धोकादायक सत्य समोर आले........... त्या मुलीचा शाळेतील पहिला दिवस होता.* *मस्तपैकी तयारी करून झाल्यावर तिच्या वडिलांनी एक मुलीचा छान फोटो काढला व FB वर टाकून लिहिलं,* *"My quite baby going to first day of school."* *चार दिवस ती मुलगी शाळेत गेली व पाचव्या दिवशी गेली ती परत आलीच नाही.* *तपासात कळले कि एक इसम शाळेत fb वरचा फोटो घेऊन आला होता व मुलीच्या घरी problem झाला आहे व त्यामुळे मी तिचा काका तिला घ्यायला आलो आहे असे म्हणून घेऊन गेला.* *अजून खोलवर detail काढल्यावर कळाले कि ही मुलगी त्यानंतरच्या चोवीस तासांच्या आत भारताबाहेर पळवली गेली.* *कारण ही criminal लोक अशी असतात की आपल्या fast साखळीने सर्व तयारी व सूत्र आधीच ready करून ठेवतात व दिवस ठरवून पळवून नेतात.*

 *त्यांनंतर नाही पैशांची मागणी आली ना कुठला फोन. तीन वर्षे झाली, ती मुलगी अजून बेपत्ता आहे.*


*पालकांनो, आता यात चुकी कुणाची? आपल्याचं एका क्षुल्लक चुकीमुळे आपण मुलगी गमावून बसलो हे त्या बापाला किती खोचत असेल.*


 *मुळात ह्या मानसिक समाधानात आपण का अपेक्षा करतो कि आपल्या फोटोवर किंवा तत्सम गोष्टीवर like मिळावं, बाहेरच्या व्यक्तींकडून कौतुक मिळावं व ते ही अंगठा दाखवून,दोन चार comments साठी????*


*ह्या भावनिक आणि मानसिक सोशल मीडिया खेळात आपण आपल्या कुटूंबाच्या व्यक्तीचं सुरक्षित्व हिरावून बसलोय का?? याला जबाबदार आपण आहोत, आपल्या सवयी, आवडी-निवडी एवढ्या विकोपाला पोहचल्या आहेत की त्याशिवाय जगणे व त्यावर नियंत्रण मिळवणे आपल्यालाच कठीण होऊन बसले आहे.*


बऱ्याच वेळा आपली घर लुटण्यासाठी आपण स्वतःहून देतो लुटारुना आमंत्रण!


-●-●-●-●-●-●-●-●-●-●-●-●-

*Fb, whtsapp, insta यावरील selfi, आम्ही इकडे चाललो, इकडे पोहचलो व ते ही proper time सांगून टाकणे* *म्हणजे चोरांना, लुटारूंना आ बैल मुझे मार सारखं होतय. सावरा अन आवरा स्वतःला.* 🤝🙏


आपले वयक्तिक आयुष्य , खाजगी मर्यादित राहुद्यात, ह्यातच सुरक्षा आहे.  


सायबर गुन्हे जनजागृती अभियान, मुंबई.


 *जागरूक व्हा, सतर्क व्हा!*

सीसीटीएनएस राबविणारे देशातील महाराष्ट्र पहिले

 सुधारित :


सीसीटीएनएस राबविणारे देशातील महाराष्ट्र पहिले


- उपमुख्यमंत्री फडणवीस

            मुंबई, दि. १५ : विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासामधील गुन्हे प्रकटीकरण, गुन्ह्यांचे पर्यवेक्षण, गुन्हे प्रतिबंध करणे याकरीता सुरू केलेल्या "क्राईम ॲन्ड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क ॲन्ड सिस्टीम्स' (सीसीटीएनएस) राबविणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे. याची अधिक व्याप्ती वाढवून आता दुसरा टप्पा हाती घेण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले


            विभागनिहाय अर्थसंकल्पीय मागण्यांवर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईत अत्याधुनिक सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी 1406 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. बारामतीसाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी सुद्धा प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. नक्षलग्रस्त भागात विकासासाठी मोठा निधी उपलब्धता करून देण्यात आला आहे.


            उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्राचे नवीन लॉजिस्टिक धोरण तयार करण्यात येत आहे. स्टार्टअपसाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण-संशोधन संस्था उभारण्यात येणार आहे. नवी मुंबईत जेम्स ॲन्ड ज्वेलरी पार्क उभारण्यात येणार आहे. मैत्री कक्षासाठी 48 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी व्यापार सुलभीकरण (‘इज ऑफ डूइंग बिजनेस’) यावर अधिक भर देण्यात आला आहे.


            कृषीपंपाचेही मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. यावर्षी दीड लाख कृषी पंप देण्याचा प्रयत्न आहे. कृषी पंपाच्या वीजबीलाची थकबाकी 48 हजार 689 कोटीवर गेली आहे. यामध्ये 15 लाख 23 हजार 426 ग्राहकांनी आतापर्यंत एकही वीज बील भरले नाही. त्यांना थकीत बील भरा अशा सूचना नाही तर चालु बील भरण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. ऊर्जा विभागात रिक्त जागा भरण्यासाठीची कार्यवाही सुरू केली. फीडर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.


            तांत्रिक व वाणिज्य खाणी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री रोजगार योजना पुन्हा सुरू करण्यासाठी 501 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

शुुद्ध पाणी-

 *शुुद्ध पाणी-*


प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील पाण्याच्या टाकीत जांभुळाच्या लाकडाचा तुकडा ठेवावा, त्यासाठी एक रुपयाही खर्च होत नाही आणि नफा म्हणजे नफाच. तुम्हाला फक्त जांभुळाचे लाकूड घरी आणायचे आहे आणि ते पूर्णपणे स्वच्छ करून पाण्याच्या टाकीत टाकायचे आहे. यानंतर तुम्हाला पाण्याची टाकी पुन्हा स्वच्छ करण्याची गरज भासणार नाही.


बोट, खूप कमकुवत असताना जांभुळाचे लाकूड तळाशी का ठेवतात माहीत आहे कां ?


भारतातील विविध नद्यांमध्ये प्रवाशांना एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नेणाऱ्या बोटीच्या तळाशी जांभळाचे लाकूड लावले जाते. जे जांभुळ पोटाच्या रुग्णांसाठी घरगुती आयुर्वेदिक औषध आहे, ज्याच्या लाकडाचा उपयोग दात जंतूमुक्त आणि मजबूत बनवण्यासाठी केला जातो, त्याच जांभुळाचे लाकूड बोटीच्या खालच्या पृष्ठभागावर का लावले जाते, हा प्रश्न आहे. तेही जेव्हा जांभुळाचे लाकूड खूप कमकुवत असते, जाड लाकूड हाताने तोडता येते. कारण नदीकाठी त्याच्या वापराने नद्यांचे पाणी पिण्यायोग्य राहते.

खरे तर जांभुळाचे लाकूड हे चमत्कारिक लाकूड आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. पाण्याखाली असतांना ते खराब होत नाही. उलट त्यात चमत्कारिक गुण आहे. जर ते पाण्यात बुडवले तर ते पाणी शुद्ध करते आणि पाण्यात कचरा साचण्यास प्रतिबंध करते. ज्या पूर्वजांना आपण निरक्षर समजतो त्यांनी नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी आणि नाव मजबूत ठेवण्यासाठी इतका प्रभावी आणि सोपा उपाय शोधला हे किती आश्चर्यकारक आहे


*700 वर्षांनंतरही विहिरीच्या पायथ्याशी जांभुळाचे लाकूड खराब झालेले नाही...*


जांभूळाचे लाकडाच्या चमत्कारिक परिणामाचे पुरावे नुकतेच सापडले आहेत. देशाच्या राजधानीत वसलेल्या निजामुद्दीनच्या पायरीची विहीर साफ केली असता त्याच्या पायथ्याशी जांभुळाचे लाकडाची रचना आढळतात. भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख श्री केएन श्रीवास्तव यांनी सांगितले की, संपूर्ण पायरी जांभळाच्या लाकडी संरचनेच्या वर बांधण्यात आली होती. कदाचित त्यामुळेच 700 वर्षांनंतरही या पायरीचे पाणी गोड आहे आणि कोणत्याही प्रकारचा कचरा आणि घाण यामुळे या पायरीचे पाणी स्रोत बंद झालेले नाहीत. तर 700 वर्षांपासून कोणीही स्वच्छता केली नव्हती.


*तुमच्या घरात जांभुळाचे लाकडाचा वापर...* 


जर तुम्ही तुमच्या छतावरील पाण्याच्या टाकीत जांभुळाचे लाकूड ठेवले तर तुमच्या पाण्यात शेवाळ कधीच बसणार नाही पाण्याचे शुद्धीकरण 700 वर्षे सुरू राहील. तुमच्या पाण्यात अतिरिक्त खनिजे सापडतील आणि त्याचा TDS शिल्लक राखला जाईल. म्हणजेच जांभूळ आपले रक्त शुद्ध करण्याबरोबरच नदीचे पाणीही शुद्ध करते आणि निसर्गही स्वच्छ ठेवते


 कृपया नेहमी लक्षात ठेवा की जगातील सर्व राजे, राजेशाही आणि सध्याचे अब्जाधीश श्रेष्ठ जे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. जांभुळाचे लाकडापासून बनवलेल्या ग्लासात पाणी पित होते.

 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*

_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/EhMKvkbMCEAHxigeFg0tTR

स्वयंभू बंदेश्र्ववरमंदिर


 

बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांनाअधिछात्रवृत्ती देण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय.

 बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांनाअधिछात्रवृत्ती देण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय.


-मंत्री संजय राठोड


            मुंबई, दि. 15 : अनुसूचित जाती प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत फेलोशिप देऊन संशोधनास चालना देण्यात येते. यासाठी महाराष्ट्रातून 200 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी, अशी मागणी होत आहे. याबाबत सर्व बाबी तपासून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.


            ‘बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी या अनुषंगाने सदस्य महादेव जानकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री श्री.राठोड यांनी ही माहिती दिली.


            मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले की ‘बार्टी’ने 2013 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती सुरु केली आहे. याबरोबरच विविध योजना आणि कार्यक्रम ‘बार्टी’मार्फत राबविण्यात येत आहेत. सारथी आणि महाज्योती या संस्थांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांना एम फिल व पी एच डी करीता अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. याचधर्तीवर ‘बार्टी’ ने सर्व पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याची मागणी होत आहे. या बाबत बार्टीने शासनास प्रस्ताव सादर केला आहे.


            याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असेही मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.


            अधिछात्रवृत्ती पात्र विद्यार्थ्यांकडून प्रबंध अप्राप्त असल्याचे लक्षात आले आहे. या अनुषंगाने ऑनलाईन निरीक्षण (मॉनिटरिंग) करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.


            या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi