सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 12 March 2023
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते सिमेंटचे करणार
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते सिमेंटचे करणार
- मंत्री गिरीश महाजन.
मुंबई, दि. 10 : राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत येणारे रस्ते सिमेंटचे करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य सुनील राणे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत केलेल्या कामांचे कंत्राटदारांकडून वस्तू व सेवाकराची रक्कम कपात न केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री.महाजन म्हणाले की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या कामाबाबत संबंधित कंत्राटदाराचे अंतिम देयक अदा करताना नियमानुसार वस्तू व सेवाकराची कपात करून कंत्राटदाराला देयके अदा केली जातात. कंत्राटदारांना काम देण्याअगोदर त्यांची बीड कॅपॅसिटी किती आहे हे तपासली जाते.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, प्रशांत बंब, आशिष जयस्वाल यांनी सहभाग घेतला.
०००००
जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविणार
जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविणार
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई, दि. 10 : राज्य शासन सर्व घटकांच्या विकासासाठी सकारात्मक असून वातावरणातील बदलांमुळे अल निनोचा प्रभाव येणाऱ्या वर्षात जाणवू शकतो. त्यामुळे हे वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षित सिंचनासाठी जलयुक्त शिवार टप्पा 2 आणि जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेनंतर राज्यपालांच्या आभाराचा ठराव मांडताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह 30 सदस्यांनी यासंदर्भातील चर्चेत सहभाग घेतला.
श्री.फडणवीस म्हणाले, शासनाने मागील आठ महिन्यांच्या काळात जनहिताचे विविध निर्णय घेतले आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने सात हजार कोटी रूपयांची मदत केली आहे. 65 मि.मी. पावसाची मर्यादा न ठेवता सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात मदत देण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषांपेक्षा दुप्पट मदत देण्यात आली आहे. सन 2025 पर्यंत 30 टक्के फिडर सौर ऊर्जेवर आणणार असल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज देता येईल, असे त्यांनी सांगितले. विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी आतापर्यंत 12 लाख 84 हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी 12 हजार कोटी रूपये देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. उर्वरित शेतकऱ्यांचे साक्षांकन पूर्ण झाल्यानंतर त्यांना मदत देण्यासाठी एक हजार 14 कोटी रूपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. कांद्याच्या प्रश्नावर देखील शासन सकारात्मक असून यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. कांदा निर्यातीवर केंद्राची बंदी नाही, तसेच राज्यात 42 केंद्रांवर 45796 क्विंटल खरेदी करण्यात आली असल्याने हा प्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाला दिलासा देताना 1553 अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली. उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून डावोस येथील आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेत 1.5 लाख कोटींचे करार करण्यात आले आहेत. ‘आपला दवाखाना’च्या माध्यमातून मोफत उपचार देण्यात येत असून राज्यात लवकरच 700 दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे.
राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागावा आणि दळणवळण गतिमान व्हावे यासाठी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू झाला असून पुढील टप्प्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. राज्यात संरक्षित सिंचनाकरिता जलयुक्त शिवार टप्पा 2 तसेच ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजना महत्त्वपूर्ण ठरणार असून त्याच्या अंमलबजावणीवर भर देण्यात येणार आहे. राज्यातील 846 शाळांना केंद्र शासनाच्या मदतीने ‘पीएम श्री’ योजनेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त राज्यातही तृणधान्य उत्पादनाला चालना देण्यात येणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा अधिक भाव मिळावा यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शाश्वत विकासाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीन वस्त्रोद्योग धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुंबईतील दळणवळणाची समस्या सोडविण्यासाठी वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचे काम लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करण्यात येत असून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, सागरी मार्ग टप्पा-1, मेट्रोचे नवीन मार्ग यांची कामे देखील गतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. मेट्रोची 337 कि.मी.ची कामे सध्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. इंदू मील येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम गतीने सुरू असून त्यांच्या परिवारातील सदस्यांना दाखवून पुतळ्याबाबतचे डिझाईन अंतिम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असून ती उठवावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.
00000
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक संपन्न.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक संपन्न.
मुंबई,दि.11 : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचीआढावा बैठक समितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतपाटील यांनी घेतली.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट कॅम्पस मुंबईयेथे आयोजित केलेल्या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिवविकास चंद्र रस्तोगी, शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) डॉ. शैलेंद्रदेवळाणकर, समितीचे सदस्य सचिव डॉ. संजय शिंदे, शिवा कांबळे, डॉ. मिलिंद
कसबे, डॉ. सोमनाथ कदम, डॉ.प्रमोद गारुडे, डॉ. विजय कुमठेकर, डॉ.बळीरामगायकवाड आदी उपस्थित होते.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित चित्रमय पुस्तक,
समीक्षा ग्रंथ आणि जीवन पट निर्मिती करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्यावतीने तयारकरण्यात येत असलेल्या ग्रंथाचे लवकरात लवकरात प्रकाशन करण्यात येईल. तसेच
समितीच्या कार्यालयासाठी जागेची उपल्बधता करण्यात येईल, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.
समितीचे सदस्य सचिव डॉ.संजय शिंदे यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेचरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने तयार करण्यात येत असलेल्या चारखंडाचे काम पुर्णत्वास येत आहे. तसेच या खंडाचे ऑडिओ आणि ई-बुक तयारकरण्यात येत असल्याची माहिती दिली.
शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीअंमलबजावणी करावी
शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीअंमलबजावणी करावी
- मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई,दि.11 : स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांनी
प्रेरणा जागृती करण्याचे काम करावे. राज्यातील शैक्षणिक दर्जा
उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यात प्रभावीअंमलबजावणी करावी. यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट कॅम्पस मुंबईयेथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिलाविद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिकधोरण 2020 च्या अंमलबजावणीकरिता सुकाणू समितीसमवेत स्वायत्त
महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री
श्री. पाटील बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसीमहिला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव, सुकाणू समितीचे अध्यक्ष
डॉ.नितीन करमळकर, स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वसंबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, प्रत्येक महाविद्यालयाने माजी विद्यार्थी वसामाजिक उत्तरदायित्व निधीतून स्वायत्त निर्माण करावी. स्वायत्तमहाविद्यालयांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना आणखी पाचमहाविद्यालयांना या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयार करावे. गुणवत्ता
राखण्यासाठी नॅक मूल्यांकन महत्त्वाचे आहे.त्यामुळे ज्या महाविद्यालयांनानॅकचे मानांकन मिळाले आहे, अशा महाविद्यालयांनी इतर महाविद्यालयांना नॅकमानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.
आज जागतिक स्तरावर भारताचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. विविध क्षेत्रातमहत्त्वाच्या प्रमुख पदावर भारतीय वंशाच्या व्यक्ती कार्यरत आहेत. देशाचे
नाव जागतिक स्तरावर नंबर एकवर राहण्यासाठी शैक्षणिक धोरणातील बदलमहत्त्वाचे आहेत. देशातल्या उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मकसुधारणेचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्याअंमलबजावणीसाठी प्राध्यापकांनी जबाबदारी घेऊन प्रेरणा जागृत करण्याचे कामकरावे असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.
या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुकाणू समितीचेअध्यक्ष डॉ.नितीन करमळकर यांनी केले. यावेळी पनवले, मुंबई, पुणे,
कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आदी स्वायत्त महाविद्यालयांच्या
प्राचार्यांनी सादरीकरण केले.
000
जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना
जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 11 : जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ
देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे.
समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे
गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले.
राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज
यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव कार्यक्रम आज मुंबईतील महालक्ष्मी
रेस कोर्स येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री
मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा
रामदेव तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने नुकताच
राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यात सर्व लोकांच्या प्रगती आणि
उन्नतीचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात गो-सेवा
आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी
मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाकडून
त्यांचे अभिनंदन केले.
जैन समाजाची आचार्य पदवी ही एक तपश्चर्या
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज राष्ट्रसंत नयपद्मसागर यांना प्रदान करण्यात आलेली आचार्य
ही पदवी असली तरी हे पद एक तपश्चर्या आहे. आचार्य बनण्यासाठी तप करावे
लागते. या पदावर पोहोचल्यानंतर कोटी कोटी जनतेच्या विधायक आशा-आकांशांनाआशीर्वाद द्यावा लागतो. हे काम अविरतपणे सुरू राहणारे आहे, अशी भावनाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, राष्ट्रसंत
नयपद्मसागर केवळ संत नसून एक विचार आहेत. ते समाजाला संघटीत करून पुढेनेत आहेत. ते धर्मासोबतच लोकांना राष्ट्रभक्तीचीही शिकवण देत आहेत.
समाजातील सर्व लोकांना योग्य वाटेने जाण्याचे मार्गदर्शन राष्ट्रसंत
नयपद्मसागरजी यांच्याकडून मिळेल असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस,
पालकमंत्री श्री.लोढा, योगगुरू रामदेव यांच्या हस्ते महान मंगल ग्रंथाचे
विमोचन करण्यात आले.
- - - - - 000 - - - - --
कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याकरिताशिक्षण विभागाचा अमेझॉन सोबत करार
कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याकरिताशिक्षण विभागाचा अमेझॉन सोबत करार.
मुंबई, दि. 11 - कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना
भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. या उद्देशाने राज्याचाशालेय शिक्षण विभाग आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर इनिशिएटिव तसेच लीडरशिपफोर इक्विटी या दोन संस्थांसमवेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याउपस्थितीत शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाचेप्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्यप्रकल्प संचालक कैलास पगारे आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला अनुसरून समस्या सोडविण्याचीक्षमता विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.
या अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा तयार करणे आणिएकात्मिक अभ्यासक्रम तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग,नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद या नऊ जिल्ह्यात हा उपक्रम सुरू करण्यात येतअसून एक लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. भविष्यात रोजगार
मिळविण्यासाठीच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रमउपयुक्त ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...

