Monday, 20 February 2023

हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य 'महाशिव आरती' संपन्न

 हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य 'महाशिव आरतीसंपन्न

 

जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी

                       - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

 

            पुणेदि.१९: जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतीलतसेच यावर्षीच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवासारखे आयोजन यापुढे शिवजयंतीनिमित्त दरवर्षी करण्यात येईलअसे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.

 

            शिवजयंतीनिमित्त राज्य शासनाकडून आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य महाशिव आरतीचे जुन्नर येथे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार प्रवीण दरेकरपर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादपोलीस अधीक्षक अंकित गोयल,  माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलमाजी आमदार शरद सोनवणेजिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके आदी उपस्थित होते.

 

            मंत्री श्री. लोढा म्हणालेयावर्षी शिवजयंतीला  उत्साहाचे वातावरण आहे. जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी शिवकालीन गाव उभे करण्यात येईल. पर्यटन विभागाकडून येथे कायमस्वरूपी टेन्ट सिटी उभी करुअसेही ते म्हणाले.

 

            यावेळी हातात दिवेपणती घेऊन शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने महाशिव आरतीशिव वंदना करण्यात आली. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी  आमदार श्री. दरेकरह.भ.प. पंकज महाराज गावडेह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी मनोगत व्यक्त केले. 

 

000


पोवाडा



 सानिका सिध्दार्थ चौरे- वय 5वर्ष  Junior KG 

स्वरल सिध्दार्थ चौरे - वय 9 वर्ष 3 तिसरी

चिंतामणराव केळकर विद्यालय अलिबाग

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत



 *अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांच्या शक्तीचे, युक्तीचे, पराक्रमाचे, शौर्याचे, ध्येयाचे धडे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अख्या जगभर शिकविले जातात असे तुम्हां आम्हा सर्वांचे उद्धारकर्ते श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा*

शुभेच्छुक : नव्या निरव देवेंद्र कोळी


मेरा काम क्यू बिघाड तां हैं


 

हस्त मुद्रा

 *हातात हात घेतला तर मैत्री होते..*

*दोन्ही हात जोडले तर भक्ति होते..*

*हातावर हात आपटला तर टाळी वाजते..*

*कुणाचा हात धरला तर साथ होते..*

*कुणाला हात दाखवला तर धमकी होते..*

*हात वर केले तर असाहाय्यता दिसते..*

*हाता वर हात ठेवले तर निष्क्रियता दिसते..*

*हात पुढे केले तर मदत होते..हात पसरले तर मागणी दिसते..*

*हाताचे महत्व इतक की अनेक हात पुढे आले तर*

 *अशक्य ते शक्य होते.*🌹🌹🌹🌹🌹

  

 🙏🏻🙏🏻 *सुप्रभात.*🙏🏻🙏🏻

भावलेले छत्रपती शिवाजी महाराज

 *छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!*


1. अफजलखानाचा कोथळा 

2. शाईस्तेखानाची बोटे 

3. आग्राहून सुटका


  *पण भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!*


1. आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...!

2. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!

3. सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!

4. विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावूनजगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!

5. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...!

6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्यारात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे चिकीत्सक राजे"

7. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे ! "जलतज्ञ" राजे छत्रपती शिवराय!!

8. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचेकोणतेही साधन नसताना अभेद्य असे १०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, "उत्तम अभियंते राजे"

9. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!

10. परस्त्री मातेसमान मानत महिलांना सन्मानाने वागवाणारे "मातृभक्त, नारीरक्षक" छत्रपती शिवराय! खऱ्या अर्थाने ते "लोकराजे" होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती.....!

 शिवजन्मोत्सव_सोहळा🚩🙏

*ऋणानुबंध समुह अमरावती*

Sunday, 19 February 2023

निवृत्त शासकीय कर्मचऱ्यांसाठी पेन्शन

 * केंद्रीय कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2016 पासून सातवे वेतन आयोग लागू झाले. परंतु महाराष्ट्र राज्य शासनाने, आपल्या कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2019 रोजी आदेश काढून, सातवे वेतन आयोग लागू केले. परंतु 01 जानेवारी 2016 पासून सेवानिवृत्त झालेले. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्तीचे लाभ देण्यात आले. त्यानंतर. एक जानेवारी 2019 रोजीच्या राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे. आपल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही सातव्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्तीच्या लाभाचा फरक देण्यात आला. परंतु एक जानेवारी 2016 पासून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी. पैकी काही कर्मचारी प्रकृती बरी नसल्याने किंवा अल्पशा आजाराने मयत झाले. अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात आले. त्यामध्ये ग्रॅज्युएटीचा फरक देण्यात आला. रजा रोखीकरणाचा फरक देण्यात आला. परंतु पेन्शन विक्रीचा फरक नाकारण्यात आला. याबाबत मी स्वतः सेवानिवृत्त एपीआय पाणींद्रे माझे मित्र नामे दिनकर शिरसाट. यांच्या पत्नीला पेन्शन विक्रीच्या लाभातील फरक न मिळाल्याने. त्याबाबत मी त्यांच्या वतीने पूर्व प्रादेशिक विभाग कार्यालय येथे पेन्शन विक्रीच्या लाभातील फरक मिळावा म्हणून अर्ज विनंती केली. परंतु पूर्व प्रादेशिक विभागाने विनंती नाकारली. त्यानंतर सदरबाबत मी या महिलेच्या वतीने प्रतिष्ठा बिल्डिंग एक जी ऑफिस चर्चगेट. आपले पेन्शन कार्यालय येथे सदर महिलेसोबत जाऊन पेन्शन विक्रीच्या फरकाबाबत चौकशी केली. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की वेतन आयोग लागू होण्यापूर्वी जे राज्य शासकीय कर्मचारी मयत झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेन्शन धारकांना पेन्शन विक्रीचा लाभ देता येत नाही. कारण त्यांच्या पेन्शन मधून त्यांना देण्यात आलेल्या फरकाची रक्कम वसूल करता येत नाही. त्यामुळे शासनाने असे आदेश केले आहेत की. त्यांना पेन्शन विक्रीचा फरक देऊ नये. सदर महिलेस पेन्शन विक्रीचा फरक मिळावा म्हणून मी सर्व संबंधित कार्यालयाची भेट घेऊन सर्व अधिकाऱ्यांना विनंती केली. परंतु त्यांनी माझ्या विनंतीस काही एक सहकार्य केले नाही. म्हणून मी महाराष्ट्र राज्य कर्मचारी न्यायालय ( मॅट) न्यायालयात दावा (केस) दाखल केली. सदर दाव्याचा निकाल 22 डिसेंबर 2022 रोजी देण्यात आला. त्यामध्ये सदर महिलेस पेन्शन विक्रीच्या लाभातील फरक सहा आठवड्यात देण्याबाबत न्यायालयाने आदेश केले. त्याप्रमाणे आज दिनांक 10/02/2023रोजी सदर महिलेस पेन्शन विक्रीच्या लाभातील फरक त्यांचे बँकेच्या पेन्शन खात्यात जमा केलेला आहे. तरी माझी आपणास विनंती आहे की सदरचा संदेश आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या नंबर वर व ग्रुप वर पाठवा जेणेकरून आपल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेन्शनधारकांना याचा लाभ मिळवून देता येईल. सदर महिलेस पेन्शन विक्रीच्या लाभातील फरकाची रक्कम रुपये सहा लाख एवढी मिळालेली आहे. आपल्या कुटुंब पेन्शन धारकांच्या दृष्टीने ही रक्कम फार मोठी आहे. तरी सर्व कुटुंब पेन्शन धारकांना ही रक्कम मिळावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. तरी कृपया हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करावा ही माझी विनंती आहे . काही चूक झाली असल्यास क्षमा असावी ही विनंती आहे मी ए. पी. आय. पाणिंद्रे माझा मोबाईल नंबर 9082919905 आपल्याला मदतीची अपेक्षा असल्यास संपर्क साधने

Featured post

Lakshvedhi