Wednesday, 8 February 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर

 महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा.

          मुंबई, दि. 8 : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले असून त्यांनी आज रेवदंडा येथे आप्पासाहेबांची भेटही घेतली.  


            14 मे 1946 रोजी जन्मलेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेली 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा निर्मूलन, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.


            डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरित्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवानंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात.   


            रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.


००००

मुंबईत शस्त्रास्त्रे, हत्यार, स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत 5 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

 मुंबईत शस्त्रास्त्रे, हत्यार, स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत

 5 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश.


            मुंबई, दि. 8 : बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये शस्त्रास्त्रे, हत्यार, संक्षारक पदार्थ किंवा स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत 5 मार्चपर्यंत कलम 37 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.


            बृहन्मुंबईचे पोलिस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले असून कलम 37 चे उप कलम (1) आणि (2) कलम 2 चे पोटकलम (6) आणि कलम 10 चे पोटकलम (2) महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 द्वारे 04 फेब्रुवारीपासून ते 5 मार्च 2023 पर्यंत पूर्ण बृहन्मुंबईमध्ये विविध गोष्टींना प्रतिबंधित करण्यात आले आहे.


            या प्रतिबंधात्मक आदेशानुसार बृहन्मुंबईमध्ये शस्त्रे, अग्निशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडुके, सोटे, बिना परवाना बंदुका, चाकू, काठ्या किंवा लाठ्या किंवा इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाठी वापरली जाऊ शकते अशी हत्यारे बाळगण्यावर मनाई करण्यात आली आहे. बंदुकीचे परवानाधारक किंवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून, अशी शस्त्रे वाहून नेण्यासाठी विशिष्ट परवानगी असलेल्यांना यातून वगळण्यात आले आहे.


            कोणताही संक्षारक पदार्थ किंवा स्फोटके वाहून नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा उपकरणे किंवा क्षेपणास्त्रे टाकण्याची किंवा प्रक्षेपित करण्याची साधने, वाहून नेणे, गोळा करणे आणि तयार करणे, व्यक्ती किंवा प्रेत किंवा आकृती किंवा पुतळे यांचे प्रदर्शन, सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे, संगीत वाजवणे, बृहन्मुंबई शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याच्या मते, शालिनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करून सामाजिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकण्यास कारणीभूत ठरू शकेल अशा बाबी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.


            जर कोणतीही व्यक्ती अशा कोणत्याही वस्तूसह सशस्त्र जात असेल किंवा अशा प्रतिबंधाचे उल्लंघन करत कोणताही उपरोधक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्त्र घेऊन जात असेल, अशा व्यक्तींना कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यामार्फत निशस्त्र किंवा त्यांच्याकडील वस्तू, उपरोधिक पदार्थ, स्फोटक किंवा क्षेपणास्त्र जप्त केले जाईल.


            हा आदेश कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेत किंवा नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांना किंवा त्याच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार, शस्त्रे बाळगण्यासाठी लागू होणार नाही. तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार जे साडेतीन फूटापर्यंत लांबीच्या लाठ्या बाळगत आहेत, अशांना लागू होणार नाही.


            दि. 5 मार्च 2023 नंतर या आदेशाची मुदत संपली तरीही कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेल्या कोणत्याही दंड, जप्ती किंवा शिक्षा लागू केल्या जाऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे.


00000

दिलखुलास' कार्यक्रमात उद्योग विभागाचेप्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत

 दिलखुलास' कार्यक्रमात उद्योग विभागाचेप्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरूवार दि. 9, शुक्रवार दि. 10 आणि शनिवार दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


            महाराष्ट्राने नेहमीच नावीन्यपूर्ण लोकाभिमुख संकल्पनांचा अंगीकार करून देशासाठी एक आदर्श वस्तूपाठ ठेवला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र हे देशात उद्योजकांचे नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे. उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, त्यांना लागणारे मनुष्यबळ, रोजगार निर्मिती, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेच्या संमेलनात महाराष्ट्राचे उभारण्यात आलेले दालन आणि उद्योगाला सुलभ परवानग्या देण्यासाठी सुरू करण्यात आलेला मैत्री कक्ष होय. दावोस येथे झालेल्या परिषदेत राज्यात किती गुंतवणूक करण्यात आली आणि मैत्री कक्षाचे स्वरूप काय आहे, अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती, प्रधान सचिव श्री. कांबळे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरूवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

            राज्याने नेहमीच नावीन्यपूर्ण लोकाभिमुख संकल्पनांचा अंगीकार करून देशासाठी एक आदर्श वस्तूपाठ ठेवला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र हे देशात उद्योजकांचे नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे. उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, त्यांना लागणारे मनुष्यबळ, रोजगार निर्मिती, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेच्या संमेलनात महाराष्ट्राचे उभारण्यात आलेले दालन आणि उद्योगाला सुलभ परवानग्या देण्यासाठी सुरू करण्यात आलेला मैत्री कक्ष होय. दावोस येथे झालेल्या परिषदेत राज्यात किती गुंतवणूक करण्यात आली आणि मैत्री कक्षाचे स्वरूप काय आहे, अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती प्रधान सचिव श्री. कांबळे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.


००००

मुंबईत शस्त्रास्त्रे, हत्यार, स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत 5 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

 मुंबईत शस्त्रास्त्रे, हत्यार, स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत

 5 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश


            मुंबई, दि. 8 : बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये शस्त्रास्त्रे, हत्यार, संक्षारक पदार्थ किंवा स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत 5 मार्चपर्यंत कलम 37 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.


            बृहन्मुंबईचे पोलिस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले असून कलम 37 चे उप कलम (1) आणि (2) कलम 2 चे पोटकलम (6) आणि कलम 10 चे पोटकलम (2) महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 द्वारे 04 फेब्रुवारीपासून ते 5 मार्च 2023 पर्यंत पूर्ण बृहन्मुंबईमध्ये विविध गोष्टींना प्रतिबंधित करण्यात आले आहे.


            या प्रतिबंधात्मक आदेशानुसार बृहन्मुंबईमध्ये शस्त्रे, अग्निशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडुके, सोटे, बिना परवाना बंदुका, चाकू, काठ्या किंवा लाठ्या किंवा इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाठी वापरली जाऊ शकते अशी हत्यारे बाळगण्यावर मनाई करण्यात आली आहे. बंदुकीचे परवानाधारक किंवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून, अशी शस्त्रे वाहून नेण्यासाठी विशिष्ट परवानगी असलेल्यांना यातून वगळण्यात आले आहे.


            कोणताही संक्षारक पदार्थ किंवा स्फोटके वाहून नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा उपकरणे किंवा क्षेपणास्त्रे टाकण्याची किंवा प्रक्षेपित करण्याची साधने, वाहून नेणे, गोळा करणे आणि तयार करणे, व्यक्ती किंवा प्रेत किंवा आकृती किंवा पुतळे यांचे प्रदर्शन, सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे, संगीत वाजवणे, बृहन्मुंबई शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याच्या मते, शालिनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करून सामाजिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकण्यास कारणीभूत ठरू शकेल अशा बाबी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.


            जर कोणतीही व्यक्ती अशा कोणत्याही वस्तूसह सशस्त्र जात असेल किंवा अशा प्रतिबंधाचे उल्लंघन करत कोणताही उपरोधक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्त्र घेऊन जात असेल, अशा व्यक्तींना कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यामार्फत निशस्त्र किंवा त्यांच्याकडील वस्तू, उपरोधिक पदार्थ, स्फोटक किंवा क्षेपणास्त्र जप्त केले जाईल.


            हा आदेश कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेत किंवा नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांना किंवा त्याच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार, शस्त्रे बाळगण्यासाठी लागू होणार नाही. तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार जे साडेतीन फूटापर्यंत लांबीच्या लाठ्या बाळगत आहेत, अशांना लागू होणार नाही.


            दि. 5 मार्च 2023 नंतर या आदेशाची मुदत संपली तरीही कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेल्या कोणत्याही दंड, जप्ती किंवा शिक्षा लागू केल्या जाऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे.


00000

राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे २४ व २५ फेब्रुवारी रोजी मिरज येथे आयोजन

 राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे

२४ व २५ फेब्रुवारी रोजी मिरज येथे आयोजन

कामगार मंत्री डॉ. सुरेश  खाडे

                                                                        

            मुंबईदि. ८ :- सतराव्या राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे आयोजन  दि.२४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरजजि. सांगली येथे करण्यात आले असून सर्व कामगारांनी या संमेलनात उस्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री डॉ.खाडे यांनी संमेलनाबाबत माहिती दिली.

            बालगंधर्व नाट्य मंदिरमिरजजि.सांगली येथे हे  संमेलन होणार असून  शुक्रवारदि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. विभागामार्फत संमेलनासाठी इच्छुक कामगारांची नोंदणी करण्यात येत असून अधिक माहितासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास व कार्यलयास भेट द्यावीअसे आवाहन मंत्री डॉ.खाडे यांनी यावेळी केले.

            या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्षा डॉ. राजा दीक्षित या संमेलनाचे उद्घाटक तर कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश  खाडे स्वागताध्यक्ष असून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इलदे या संमेलनाचे प्रमुख कार्यवाह आहेत.

            डॉ.भवाळकर यांनी लोकसंस्कृती विषयी विपूल लेखन केले असून मराठी विश्वकोशमराठी ग्रंथकोश आदी महत्वाच्या कार्यात त्यांचे योगदान आहे. तसेच नाटककथासंग्रहवैचारिकललित लेखनसमीक्षात्मक अशा विविध प्रकारची साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे.

            संमेलनाच्या पहिल्या सत्रात 'चला उद्योजक होऊ या विषयावर डॉ विठ्ठल कामत (कामत हॉटेल्स गृप लि.)गिरीश चितळे (चितळे उद्योग समुह)हनुमंतराव गायकवाड (भारत विकास गृप इंडिया लि.) या उद्योजकांची प्रकट मुलाखत होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात कामगार चळवळीची कथा आणि व्यथा', 'मराठी साहित्यात कामगार जिवनाचे चित्र शोधताना', 'आम्ही का लिहितो ?', 'व्यसनमुक्तीची लढाई या विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कवींचे कवी संमेलन आणि काव्य मैफिलीचा रसिक प्रक्षेकांना आस्वाद घेता येणार आहे. निमंत्रित तसेच कामगार कवींचा कवी संमेलनात सहभाग असेल. संमेलनात कथाकथनाचे सादरीकरण होणार असून अभिरुप न्यायालय देखील भरवले जाणार आहे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार अभिरुप न्यायालय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात व्यापारवृद्धीला विपुल संधी

 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात व्यापारवृद्धीला विपुल संधी


उच्चायुक्त यांनी घेतली उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट.

            मुंबई, दि. 08 : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे मैत्रीसंबंध दृढ असून दुग्धउत्पादने, आयुर्वेदिक औषधे, पर्यटन विस्तार, मसाल्याचे पदार्थ, वायनरीसारखे कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान, उच्च शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यापार कक्षा आणखी वृध्दींगत व्हावी अशी अपेक्षा विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.


            आज विधानभवनात ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त श्री.बेरी ओ फॅरेल, वाणिज्यदूत श्री.पीटर ट्रसवेल, उप वाणिज्यदूत श्री.मायकल ब्राऊन यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. महिला सक्षमीकरणासंदर्भात राज्यात सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती देताना त्या बोलत होत्या.


            उच्चायुक्त श्री.बेरी ओ फॅरेल यांनी यासंदर्भात ऑस्ट्रेलियातील शासकीय आणि अशासकीय संस्था यांच्या समन्वयातून महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती क्षेत्रात भरीव कार्य केले जाऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली. ऑस्ट्रेलियात 10 लाखांपेक्षा अधिक भारतीय वंशाचे रहिवासी आहेत. त्यांच्या माध्यमातूनदेखील भारताचा ऑस्ट्रेलियासोबत होणारा व्यापार आणखी वाढविता येईल. योग विद्या आणि आयुर्वेदिक औषधे यांना जगभराप्रमाणे ऑस्ट्रेलियात देखील मोठी मागणी आहे. महाराष्ट्रात अनेक प्रगतीशील शेतकरी केवळ औषधी गुणधर्म असलेल्या कृषी उत्पादनांची लागवड करतात. या उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहान मिळावे, या मुद्यावर उभयपक्षी विस्ताराने चर्चा झाली. विधानसभा सदस्य श्री.आदित्य ठाकरे यांनी पर्यटन मंत्री असताना सागरी किनारा सुरक्षा प्रशिक्षण उपक्रम राबविला होता, तो यापुढेही सुरू ठेवण्यात यावा असे मत यावेळी वाणिज्यदूत श्री.पीटर ट्रसवेल यांनी नोंदविले.


            येणाऱ्या जागतिक महिलादिनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांत महिलांच्या प्रश्नांसदर्भात विचारमंथन करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती उप सभापती, डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली. "समानतेकडून विकासाकडे: शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने" ही आपली पुस्तिका यावेळी उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भेट दिली.


            या भेटीप्रसंगी मा.उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, विशेष कार्य अधिकारी, प्रदीप ठाकरे, डॉ.अर्चना पाटील, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, कौस्तुभ खांडेकर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या स्टार्टअपविषयक नाविन्यपूर्ण पद्धतींमधून भूतानला शिकण्याची मोठी संधी

 महाराष्ट्राच्या स्टार्टअपविषयक नाविन्यपूर्ण पद्धतींमधून

भूतानला शिकण्याची मोठी संधी


- भूतान नॅशनल असेंब्ल‍िचे अध्यक्ष वांगचुक नामग्याल


कौशल्य, स्टार्टअप्सच्या विकासासाठी महाराष्ट्र-भूतानमध्ये होणार आदान-प्रदान


            मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग तसेच या विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी यांनी स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी हाती घेतलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत. भूतान देशासाठी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास आणि स्टार्टअपविषयक नावीन्यपूर्ण पद्धतींमधून शिकण्याची मोठी संधी आहे, असे प्रतिपादन भूतान नॅशनल असेंब्ल‍िचे अध्यक्ष महामहिम श्री. वांगचुक नामग्याल यांनी केले.


            वांगचूक नामग्याल यांच्या नेतृत्वाखालील भूतान देशातील 13 सदस्यीय संसदीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. मुंबईत आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. शिष्टमंडळात भूतानचे संसद सदस्य श्रीमती त्सेवांग ल्हामो, कर्मा गयेल्त्सशेन, जिम दोरजी, कर्मा वांगचुक, ग्येन वांगडी, श्री. उग्येन त्शेरिंग, श्रीमती लहाकी डोल्मा, श्रीमती कर्मा लहामो, भूतान नॅशनल असेंब्लीचे भाषा तज्ज्ञ लोट्ये गयेल्त्सशेन, मुख्य माहिती व माध्यम अधिकारी थिनले वांगचूक यांचा समावेश होता. याप्रसंगी कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


            या कार्यक्रमात महाराष्ट्राची नावीन्यता परिसंस्था आणि स्टार्टअप धोरण तसेच शासनाची यासंबंधी भूमिका या विषयांवर संवाद झाला. या भेटीदरम्यान भूतान आणि महाराष्ट्र यांच्यातील कौशल्य विकास व स्टार्टअप संदर्भातील सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने मुंबई आयआयटीस्थित बेटीक (BETIC) या आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी काम करणाऱ्या संशोधन प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील स्टार्टअप्सशी संवाद साधला.


भूतानसह विविध कल्पना, उपक्रम यांचे आदानप्रदान - प्रधान सचिव मनीषा वर्मा


            कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी राज्यातील स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. श्रीमती वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्राला भूतानच्या शाश्वतता क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींमधून बरेच काही शिकता येईल. तसेच कौशल्य आणि नावीन्यता क्षेत्रामध्ये भूतानला महाराष्ट्राच्या सर्वोत्तम पद्धतींचा लाभ होऊ शकतो. भूतानसह विविध कल्पना, उपक्रमांचे आदान-प्रदान करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे त्यांनी सांगितले.


            देशात तसेच राज्यात स्टार्टअपसाठी निधीचे स्त्रोत काय आहेत, स्टार्टअपसाठी कोणकोणत्या योजना आहेत, उद्योजकता आणि नावीन्यतेच्या क्षेत्रात महिलांचा प्रतिसाद कसा मिळतो अशा विविध अनुषंगाने शिष्टमंडळातील सदस्यांनी प्रश्न विचारून यासंदर्भात महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेले धोरण, उपक्रमांची माहिती घेतली. प्रधान सचिव श्रीमती वर्मा यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. स्टार्टअपविषयक धोरणे, राज्यात स्टार्टअप्सना कशा पद्धतीने चालना देण्यात येते यासह महिला उद्योजकता कक्ष, महिला स्टार्टअप्स, ग्रामीण भागातील महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम, योजनांची माहिती श्रीमती वर्मा यांनी दिली. 


            श्री. वांगचूक नामग्याल यांनी राज्य शासनाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. ते म्हणाले की, भूतानसाठी भारताच्या कौशल्य आणि नाविन्यपूर्ण पद्धतींमधून शिकण्याची मोठी संधी आहे. यासाठी भविष्यात महाराष्ट्र राज्य आणि भूतान देशामध्ये परस्पर सहकार्य करता येईल, असे ते म्हणाले.

Featured post

Lakshvedhi