Monday, 6 February 2023

दिलखुलास' कार्यक्रमात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. शीतल सावनकर यांची मुलाखत.

 दिलखुलास' कार्यक्रमात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ

डॉ. शीतल सावनकर यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. शीतल सावनकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूजऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 7, बुधवार दि. 8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.


            वंध्यत्व काय आहे, यावर असणारी प्रभावी उपचार पद्धती, आरोग्याची घ्यावयाची काळजी अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती डॉ. सावनकर यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राजभवनात ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ रेखाचित्र कार्यशाळेचा समारोप.

 राजभवनात ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ रेखाचित्र कार्यशाळेचा समारोप.

            मुंबई, दि. ६ : राजभवन येथे आयोजित सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसांच्या ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील कार्यशाळेचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रविवारी राजभवन येथे झाला.


            राज्यपालांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची तसेच अधिव्याख्यात्यांची रेखाचित्रे पाहिली व त्यांना कौतुकाची थाप दिली. 


            विद्यार्थ्यांनी काढलेली छायाचित्रे राजभवनातील प्रमुख वास्तूंमध्ये दर्शनी भागात लावण्यात येतील, असे राज्यपालांनी सांगितले व विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केले.


            यावेळी जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे, कार्यशाळेचे समन्वयक व अधिव्याख्याता प्रकाश सोनावणे तसेच सहयोगी अधिव्याख्याता शार्दूल कदम उपस्थित होते.


            या कार्यशाळेत जे. जे. च्या ४८ पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी तसेच २ अधिव्याख्यात्यांनी राजभवनातील विविध वास्तू तसेच शिवकालिन गडकिल्ल्यांची ५० रेखाचित्रे काढली.   


*****


 


Two day workshop on 'Glory of Heritage' concludes at Raj Bhavan


Paintings by students to adorn walls of Raj Bhavan buildings


 


            Mumbai, 6th Feb : The 2- day painting workshop organised by Raj Bhavan for the students of Sir J J School of Art concluded at Raj Bhavan on Sunday.


            Governor Bhagat Singh Koshyari at whose instance the workshop was organised, visited the display of paintings and patted the students and lecturers for bringing Raj Bhavan heritage on the canvass.


            Stating that the paintings of Raj Bhavan heritage buildings and those of the forts of Maharashtra drawn by the students will adorn the walls of various Raj Bhavan buildings, the Governor announced a token reward for all the participants.


            Dean of the Sir JJ School of Art Dr Vishwanath Sable, coordinating lecturer Prakash Sonawane, lecturer and artist Shardul Kadam and undergraduate and postgraduate students of the Sir J J School were present.  


*****

बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी

 बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच

परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी


                                                - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


        ठाणे, दि. 6 (जिमाका) : प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही खड्डेमुक्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.          


            एमसीएचआय - क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन यांच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर आयोजित गृहबांधणी प्रकल्पांच्या (प्रॉपर्टी) प्रदर्शनास आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, क्रेडाई एमसीएचआय ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, दीपक गरोडिया, राजू व्होरा, बांधकाम व्यावसायिक व राज्य शासनाच्या मैत्री समितीचे उपाध्यक्ष अजय अशर, रेमंडचे संदीप माहेश्वरी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन आदी उपस्थित होते. प्रदर्शनानिमित्त आयोजित डेस्टिनेशन ठाणे परिसंवादाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते यावेळी झाले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गृहनिर्माण व्यवसायात मोठ्या प्रमाणावर तरुण येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षेत्रात एकमेकांच्या सहकार्याची गरज लागणार असून राज्य शासन या व्यवसायासाठी सर्वतोपरी सहाय्य करेल. कोविड काळात या क्षेत्राने राज्य शासनाला खूप सहकार्य केले. ठाणे एमसीएचआयने ग्लोबल कोविड हॉस्पिटल व इतर रुग्णालय उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले. ज्या शहरात आपण व्यवसाय करतो, काम करतो त्या शहरासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून एमसीएचआयने काम केले आहे.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाइड डिसीआर) तयार केली. या नियमावलीमुळे बांधकाम व्यवसायाला गती मिळाली आहे. अनेक प्रकल्प सुरु होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या नियमावलीचा लाभ सर्वसामान्यांनाही व्हायला हवा. त्यासोबतच कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला बसलेल्या फटक्यातून हे क्षेत्र सावरण्यासाठी स्टॅम्प ड्यूटी आणि प्रीमीयम मधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचाही मोठा फायदा बांधकाम व्यावसायिक आणि त्यानंतर थेट ग्राहकाला मिळाला आहे.


            सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे बांधकाम क्षेत्र असून या व्यवसायावर अडीचशेहून अधिक व्यवसाय अवलंबून आहेत. त्यामुळे या क्षेत्राला सर्व सवलती देण्याचे काम राज्य शासनामार्फत केले आहे.


            राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत. पायाभूत सुविधांचा लाभ गृहनिर्माण क्षेत्राला होणार आहे. रस्ते चांगले असतील, तर त्या क्षेत्राचा विकास होतो. त्यामुळे आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम झपाट्याने केले. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचला असून प्रदूषणही कमी होण्यास मदत होत आहे. या प्रमाणेच मुंबई महानगर परिसरातही वसई विरार मल्टिमॉडल कॉरिडॉर, ठाणे ते बोरिवली टनेल मार्ग, शिवडी न्हावाशेवा एमटीएचएल मार्ग असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या 357 किलोमीटरच्या मेट्रोच्या जाळ्यामुळे ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा महानगर प्रदेशाचा भाग जवळ आला असून प्रवासाचा वेळ वाचला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बायपास रस्ता तयार करणार आहोत. या कनेक्टिव्हिटीमुळे शहराचा पर्यायाने राज्याचा विकास होण्यास मदत होत आहे. यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य आहे. राज्यातील प्रलंबित प्रकल्पांसाठी सुमारे 2 लाख कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.


            एमसीएचआयच्या गृहबांधणी क्षेत्राशी संबंधित प्रदर्शनाच्या ठिकाणी सर्व बांधकाम व्यावसायिक, वित्त पुरवठा कंपन्या एकाच ठिकाणी आल्यामुळे ग्राहकांना फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


            आमदार श्री. सरनाईक, मैत्रीचे उपाध्यक्ष श्री. अशर, क्रेडाईचे अध्यक्ष श्री. मेहता यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.


00000


 

ताडदेवमधील दादरकर कंपाऊंडला रस्ता उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय टाळावी

 ताडदेवमधील दादरकर कंपाऊंडला रस्ता उपलब्ध करून 

नागरिकांची गैरसोय टाळावी  


- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा.

            मुंबई, दि. 6 : ताडदेव येथील रहेजा एक्सलस यांनी रस्ता गेट लावून बंद केलेला आहे, तो रस्ता मोकळा करावा जेणेकरुन दादरकर कंपाऊंडला रस्ता उपलब्ध होईल आणि नागरिकांची गैरसोय टाळावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.


               मंत्रालय येथील दालनात ताडदेव येथील नागरिकांच्या रस्त्याच्या समस्येसंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त शरद निवृत्ती उघडे, कार्यकारी अभियंता संजय निर्मल, जयंत वालवटकर यासह इतर अधिकारी उपस्थित होते.


                 मंत्री श्री.लोढा म्हणाले, आज ताडदेव या ठिकाणी भेट दिली आहे. तातडीने या विषयी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. रहेजा एक्सलस यांनी गेट लावून रस्ता बंद केलेला आहे, तो रस्ता मोकळा करावा जेणेकरुन दादरकर कंपाऊंडला रस्ता उपलब्ध होईल. या विषयाच्या अनुषंगाने सर्व शासकीय परवानग्या घेवून योग्य ती कार्यवाही प्रत्येक विभागाने गतीने करावी जेणेकरून नागरिकांची गैरसोय टळेल .मुख्य अभियंता(विकास विभाग) यांनी सुनावणी घेऊन पोटविभागणीबाबत निर्णय द्यावा, दादरकर कंपाऊंडला लागून असलेला 22 फुट रस्ता महानगरपालिका अधिनियम अन्वये घोषित करण्याकरिता इस्टेट विभागाने कार्यवाही करावी. तसेच 09 मीटर रस्ता रुंद करण्याकरिता सर्व्हेक्षण करुन सहाय्यक अभियंता यांनी प्रस्ताव महापालिका आयुक्त यांना प्रस्ताव सादर करावा अशा विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चा होऊन यासंदर्भात संबधित यंत्रणांना कार्यवाही करावी, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना.

 जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांवर

तत्काळ कार्यवाही करण्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना.

            मुंबई, दि. 6 : स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या.


            विभाग आणि जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या कामकाजासंदर्भातील ऑनलाईन आढावा बैठक मुख्य सचिव श्री.श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यासोबतच दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बैठकीस उपस्थित होते.


            नागरिकांना मंत्रालयापर्यंत न येता स्थानिक पातळीवरच सुलभरित्या आपले म्हणणे,अडचणी मांडता याव्यात, यासाठी विभागीय आणि जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याठिकाणी गतिमान कार्यपद्धतीचा वापर करुन प्राधान्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे मुख्य सचिवांनी निर्देशित केले. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कक्षाकडे प्राप्त अर्जांवर तत्पर कार्यवाही करण्यासाठी यंत्रणांवर, क्षेत्रीय कार्यालयांवर नियंत्रण ठेवावे. लोकांचा शासन,प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या व्यापक जाणीवेतून प्राप्त प्रत्येक अर्ज,निवेदन तातडीने निकाली काढण्यात यावे. ई ऑफीसच्या माध्यमातून हे काम अधिक गतिमानतेने करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी सेतू केंद्राच्या माध्यमातून पूरक व्यवस्था,आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता ठेवावी. प्राप्त अर्जांचे लगेच वर्गीकरण करुन जिल्हास्तरावरील अर्जांवर कार्यवाही सुरु करुन राज्यस्तरावरील अर्ज मंत्रालयात वर्ग करण्यात यावेत. अर्धन्यायिक प्रकरणांशी निगडीत अर्जांबाबत योग्य ती पाहणी करुन अर्जदारास योग्य ते मार्गदर्शन करावे. शासकीय कर्मचा-यांची सेवा विषयक प्रकरणे या कक्षाच्या अखत्यारित येत नसल्याने, विहीत पद्धतीने संबंधित यंत्रणेकडे अर्ज करण्याबाबत अर्जदाराला अवगत करावे.


            मुख्यमंत्री महोदयांना जिल्हा दौ-यात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने तातडीने वर्गीकृत करुन राज्यस्तरावरील विषय मंत्रालयाकडे हस्तांतरित करावेत तसेच जिल्हा, विभागीय विषयावरील अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावे.  


            स्थानिक पातळीवरच आपल्या समस्या सोडवल्या जातात, हा विश्वास नागरिकांना या कक्षामुळे मिळाल्याने मंत्रालयात मोठ्या संख्येने राज्यभरातून येणाऱ्या अर्जांची संख्या नियंत्रणात राहील, त्याचसोबत अतिमहत्वाच्या विषयांवरील अर्ज तातडीने निकाली काढणे शक्य होईल, या दृष्टीने जिल्ह्यात, विभागात प्राप्त प्रकरणे विनाविलंब निकाली काढल्या जात असल्याची खबरदारी विभागीय आयुक्तांनी, जिल्हाधिकारी यांनी घ्यावी. तसेच स्थानिक पातळीवर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची गुणवत्ता आणि कालमर्यादा याचा संबंधित विभागाच्या सचिवांनी, पालक सचिवांनी वेळोवेळी आढावा घ्यावा, अशा सूचना श्री. श्रीवास्तव यांनी यावेळी दिल्या.


            लोकाभिमुख प्रशासकीय कार्यप्रणालीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी सूचित केल्याप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी नियमितपणे अभ्यागतांसाठी ठराविक वेळ ठेवावी, त्याबाबत आपल्या दालनाच्या बाहेर वेळ निर्देशित करावी, त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रीय कार्यालय प्रमुखांनी देखील आपल्याकडे येणाऱ्या अभ्यागतांना आर्वजून भेटावे. नागरिकांना विनासायास सुलभरित्या सेवा, योजनांचा लाभ उपलब्ध होईल यादृष्टीने ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देत यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.


००००

ढोल, गवार, क्षुब्ध पशु, रारी.!

 ❌ ~ढोल, गवार, शूद्र, पशु, नारी.!~❌

आज तक गलत प्रचारित किया गया है

 सही शब्द हैं ✅👇🏿

ढोल, गवार, क्षुब्ध पशु, रारी.!”

श्रीरामचरितमानस मे, शूद्रों और नारी का अपमान कहीं भी नहीं किया गया है।

भारत के राजनैतिक शूद्रों* को पिछले 450 वर्षों में गोस्वामी तुलसीदास द्वारा रचित हिंदू महाग्रंथ 'श्रीरामचरितमानस' की कुल 10902 चौपाईयों में से

 आज तक मात्र 1 ही चौपाई पढ़ने में आ पाई है, और वह है भगवान श्री राम का मार्ग रोकने वाले समुद्र द्वारा भय वश किया गया अनुनय का अंश है जो कि सुंदर कांड में 58 वें दोहे की छठी चौपाई है ..

"ढोल, गँवार, क्षुब्ध, पशु नारी.! सकल ताड़ना के अधिकारी”

इस सन्दर्भ में चित्रकूट में मौजूद तुलसीदास धाम के पीठाधीश्वर और विकलांग विश्वविद्यालय के कुलाधिपति श्री राम भद्राचार्य जी जो नेत्रहीन होने के बावजूद संस्कृत, व्याकरण, सांख्य, न्याय, वेदांत, में 5 से अधिक GOLD Medal जीत चुकें हैं।

"महाराज का कहना है कि बाजार में प्रचलित रामचरितमानस में 3 हजार से भी अधिक स्थानों पर अशुद्धियां हैं" और..

इस चौपाई को भी अशुद्ध तरीके से प्रचारित किया जा रहा है।

उनका कथन है कि..


तुलसी दास जी महाराज खलनायक नहीं थे,


आप स्वयं विचार करें


यदि तुलसीदास जी की मंशा सच में शूद्रों और नारी को प्रताड़ित करने की ही होती तो क्या रामचरित्र मानस की 10902 चौपाईयों में से वो मात्र 1 चौपाई में ही शूद्रों और नारी को प्रताड़ित करने की ऐसी बात क्यों करते ?


यदि ऐसा ही होता तो..


भील शबरी के जूठे बेर को भगवान द्वारा खाये जाने का वह चाहते तो लेखन न करते।यदि ऐसा होता तो केवट को गले लगाने का लेखन न करते।


स्वामी जी के अनुसार..

        ये चौपाई सही रूप में -

         ढोल,गवार, शूद्र,पशु,

                नारी नहीं है


बल्कि यह 

            "ढोल,गवार,क्षुब्ध 

                 पशु,रारी” है।

ढोल = बेसुरा ढोलक 

गवार = गवांर व्यक्ति 

क्षुब्ध पशु = आवारा पशु जो लोगो को कष्ट देते हैं 

रार = कलह करने वाले लोग

चौपाई का सही अर्थ है कि जिस तरह बेसुरा ढोलक, अनावश्यक ऊल जलूल बोलने वाला गवांर व्यक्ति, आवारा घूम कर लोगों की हानि पहुँचाने वाले..

(अर्थात क्षुब्ध, दुखी करने वाले पशु और रार अर्थात कलह करने वाले लोग जिस तरह दण्ड के अधिकारी हैं.!

 उसी तरह मैं भी तीन दिन से आपका मार्ग अवरुद्ध करने के कारण दण्ड दिये जाने योग्य हूँ।

स्वामी राम भद्राचार्य जी के अनुसार श्रीरामचरितमानस की मूल चौपाई इस तरह है और इसमें *‘क्षुब्ध'* के स्थान पर *'शूद्र'* कर दिया और *'रारी'* के स्थान पर *'नारी'* कर दिया गया है।

भ्रमवश या भारतीय समाज को तोड़ने के लिये जानबूझ कर गलत तरह से प्रकाशित किया जा रहा है।इसी उद्देश्य के लिये उन्होंने अपने स्वयं के द्वारा शुद्ध की गई अलग रामचरित मानस प्रकाशित कर दी है।रामभद्राचार्य कहते हैं धार्मिक ग्रंथो को आधार बनाकर गलत व्याख्या करके जो लोग हिन्दू समाज को तोड़ने का काम कर रहे है उन्हें सफल नहीं होने दिया जायेगा।

  आप सबसे से निवेदन है , इस लेख को अधिक से अधिक share करें।

और

तुलसीदास जी की चौपाई का सही अर्थ लोगो तक पहुंचायें 


विश्व का कल्याण हो


    🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼

का,कशासाठी,outlet imp

 🙏``` अप्रतिम लेख आहे नक्की आवडेल.


      "OUT LET" 


               लाखो जीव घेणार्‍या क्रूर "हिटलरने" शेवटी आत्महत्या केली !........

               सुंदर विचार देणारे "साने गुरुजी" आत्मघात करुन घेतात.

               मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे "स्वामी विज्ञानानंद" मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.

              आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे "भैय्युजी महाराज" आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.

                पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही "सुशांत सिंग राजपुतनं" नैराश्यातून आत्महत्या केली.

                -आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या "शीतल (आमटे) करजगी" आपलं जीवन संपवतात. 

               -आजची नागपूरची बातमी 'उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम' यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.


                या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण? ........


                पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.

     'माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही.' त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.

           भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्या नंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.

त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक 'अध्यात्मीक गूरू' होते परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील 'स्ट्रेस' बाहेर काढायला त्याच्या जवळ outlet नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले.)

               इतकं महत्वाचं असतं का हे outlet ?

होय !!!

              कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल 'धरण' बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir ...मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक 'धरणच' आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फुटेल की राहील ?

                 

  मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.

               म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे

   outlet वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं       

  outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध...वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा.. पिस्तुलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोपं नाही का.?

    म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!

हसा ! बोला ! रडा ! भांडा !

व्यक्त व्हा !! मुक्त व्हा.. !!


काळजी घ्या....


  🙏😊🙏सोडून गेल्यावर "ᴍɪss ʏᴏᴜ" म्हणण्यापेक्षा


🙏😊🙏सोबत आहे तोपर्यंत "ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ" म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खुप मोठं भाग्य लागतं. 

 

          समस्तांना सकारात्मकासाठी समर्पित...```🙏

Featured post

Lakshvedhi