Monday, 16 January 2023

पुणे विकास

 पुणे शहरातील दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            पुणे दि.१पुणे शहरातील दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता४- पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा २ हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून पुढील तीन वर्षात या कामांसाठी शासनाचा हिस्सा देण्यात येईल आणि यावर्षापासून काम सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले.


            पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित येरवडा गोल्फ क्लब चौकातील धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपुलाच्या कोनाशिलाचे अनावरण करुन लोकार्पण तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर, येरवडा येथे दूरदृष्यप्रणालीद्वारे खडकी कटक मंडळ हद्दीतील जुना पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरण करुन बी.आर.टी मार्ग, बावधन बुद्रुक या गावामध्ये समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या पाईप लाईन, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.


            कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुनिल कांबळे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, बापूसाहेब पठारे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, मुख्य अभियंता प्रकल्प श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते.


            प्रगतीशील पुणे तयार करण्याचे काम करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करून श्री.फडणवीस म्हणाले, राज्य शासनाचे ६० टक्के आणि ४० टक्के महानगरपालिकेने खर्च करण्याच्या योजनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या कामांमुळे पावसाळ्यात शहरात नाल्यालगतच्या भागातील पूर परिस्थितीचा आणि सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.


            शहराबाहेरील रिंगरोडचे कामही वेगाने हाती घेण्यात येत आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाला १० हजार कोटी रुपये लागणार असूनही या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्या माध्यमातून पुण्याच्या आर्थिक विकासाला मदत मिळेल. हा रिंगरोड अडीच लाख कोटी रुपयांची व्हॅल्यु तयार करेल. पुढील १० वर्षाची विकासाला दिशा देण्याचे कार्य हा मार्ग करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारीबाबत कडक धोरण

            पुण्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. पुण्यात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर देशातील इतर शहरांप्रमाणे चांगले वातावरण पुण्यात निर्माण करून माहिती तंत्राज्ञान, मॅन्युफॅक्चरींग आणि नाविन्यतेच्या क्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्याचा कडक संदेश देण्यात आला आहे. पुण्यात मनुष्यबळाची खाण असल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार येत आहेत. येत्या काळात मुंबईप्रमाणे पुणे हे दुसरे 'ग्रोथ इंजिन' तयार होईल. पुणे दुप्पट वेगाने आणि दुप्पट क्षमतेने धावावे यासाठी राज्य शासन सहकार्य करेल.

मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल


            गेल्या पाच वर्षात महानगरपालिकेने विकासाची बरीच कामे केली. पुण्याचा विकास आराखडा या काळात मंजूर करून पुण्याचा विकासाचा मार्ग मोकळा केला. पुण्याच्या मेट्रोला गती देण्यात आली असून त्याचा एक टप्पा पूर्ण झाला. पुण्यात निर्माण होणाऱ्या मेट्रोच्या जाळ्यामुळे वाहतूकीची कोंडी कमी करण्याचे काम येत्या काळात होणार आहे. शिवाजीनगरच्या पुढे हिंजवडीपर्यंत मेट्रो न्यायची आहे. त्या संदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव आले आहेत. मेट्रो मार्गाचे इंटिग्रेशन झाल्यावर त्यास मान्यता दिली जाईल. पुण्यात पीएमपीएमएलच्या माध्यमातून चांगली बससेवा देण्यात येत आहे. देशात सीएनजी आणि इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या सर्वाधिक बसेस पुण्यात आहेत. शहरात एसी बसेस सुरू करताना तिकीटाचे दरही वाढविण्यात आले नाही. पुण्याचे चित्र बदलण्याचे काम या विविध माध्यमातून होत आहे.

निर्मळ नदीच्या किनाऱ्यावर वसलेले गाव ही मूळ ओळख देणार


            शहरात नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. मुळा-मुठा आपली ओळख असल्याने आपली नदी अविरत वाहण्यासोबत निर्मल रहायला हवी यासाठी जायका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. निर्मल नदीच्या किनाऱ्यावर वसलेले पुणे ही मुळ ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चोविस तास पाण्याची योजनेचे काम वेगाने सुरू असून त्याद्वारे गळती रोखण्यासोबत शाश्वत आणि योग्यप्रकारे पाणी देण्याचे काम पुणे महानगरपालिका करेल. नदीकाठ सुशोभिकरण आणि विकासाचे कामही वेगाने सुरू आहे. त्यातून पर्यटकांकरीता आकर्षणाचे केंद्र तयार होईल. पुण्यातील एसआरएचे, पुर्नविकास, म्हाडा प्रकल्प मार्गी लावून पुण्याचा विकास घडवायचा आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.



उद्योजक बना,स्टार्टअप,दिवस 16jan

 राष्ट्रीय स्टार्टअप दिवस (१६ जानेवारी) निमित्त विशेष लेख :

स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला मोठी चालना...

            आज काल स्टार्टअप, इनोवेशन, यूनिकॉर्न हे परवलीचे शब्द झाले आहेत. गेल्या दशकभरात या शब्दांनी विशेषत: तरुणाईला भुरळ घातली आहे. मलाही एक स्टार्टअप सुरू करायचंय, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. तेव्हा स्टार्टअप म्हणजे नेमके काय, त्याचे वाढते आकर्षण का आहे, त्याला आज इतके महत्त्व का दिले जात आहे, चला तर याबद्दल थोडे जाणून घेऊयात ..!


            स्टार्टअप म्हणजे व्यवसायाचे नाविन्यपूर्ण (Innovative) स्वरूप. स्टार्टअप म्हणजे व्यवसायाचा असा प्रकार असतो ज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या कोणत्यातरी महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले जाते, त्यासाठी नाविन्यपूर्ण विचारसरणीची मदत घेतली जाते. आता ही नाविन्यपूर्ण विचारसरणी म्हणजे नेमके काय?


            नाविन्यपूर्ण म्हणजे एखाद्या समस्येवर नवविचाराणे, धोपट मार्ग न अवलंबता, (Out of Box thinking) उपाय शोधणे. नाविन्यपूर्ण उपाय - उत्पादने, प्रक्रिया, सेवा, तंत्रज्ञान किंवा कलाकृतीही असू शकतात. नाविन्यपूर्ण उपाय तंत्रज्ञानावरच आधारित असते असे नाही. दैनंदिन जीवनात आपण ज्याला जुगाड म्हणतो तेही एक नाविन्यपूर्ण संकल्पना/इनोवेशन असू शकते. म्हणून स्टार्टअप म्हणजे एखादे अॅप बनविणे किंवा इंटरनेटवरती काही चालू करणे असे नसून यात तंत्रज्ञानविरहित व्यवसायही असू शकतात.


            तंत्रज्ञानविरहित स्टार्टअप म्हणजे जसे की नारळाच्या झाडावर चढण्यासाठी पाईपने बनवलेले चपलेसारखे उपकरण ज्यामुळे झाडावर चढण्याचे कसरतीचे काम सोपे झाले आहे. तसेच तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप म्हणजे जसे की Ola, Uber यांनी दळणवळणाचा प्रश्न सोडविण्यासाठी बनविलेले अॅप, ज्यामुळे ग्राहकांना घर बसल्या सुविधा, टॅक्सी व रिक्षा चालकांना सोप्या रीतीने ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नावीन्यपूर्ण उपाय प्राप्त झाला आहे.


            बऱ्याचदा स्टार्टअप म्हणजे फक्त एखादा लहान उद्योग अशी गैरसमजूत होते परंतु, कुठल्याही स्टार्टअपमध्ये भविष्यात मोठा उद्योग होण्याची क्षमता असते. नेमक्या कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचे हेसुद्‌धा समजणे आवश्यक आहे. एखाद्या गृहिणीने नव्याने सुरू केलेले पोळी-भाजी केंद्र हे तिच्यासाठी स्टार्टअपच असते, फरक इतकाच की त्या केंद्राला आपण स्टार्टअप म्हणत नाही.


राज्य शासनाच्या नियमानुसार असा उद्योग जो पुढील बाबींची पूर्तता करतो त्याला स्टार्टअप म्हटले जाते,


· कंपनीचा प्रकार (खासगी मर्यादित, नोंदणीकृत भागीदारी किंवा मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी) व


· वार्षिक उलाढाल (स्थापनेपासून कोणत्याही आर्थिक वर्षी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त नसावी) व


· कंपनीचे वय (10 वर्षापेक्षा जास्त नसावे) व


· नाविन्यपूर्ण (Innovative) विचारसरणी अशा उद्योगांस भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून स्टार्टअप म्हणून मान्यता प्राप्त होते. 

            स्टार्टअपविषयी एक गैरसमज प्रचलित आहे, तो म्हणजे फक्त तरुणांनी सुरू केलेल्या उद्योगांना व शहरातील सुरू झालेल्या उद्योगानांच स्टार्टअप म्हणायचे का? याचे उत्तर अर्थातच नाही असं आहे. कारण नाविन्यतेला भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. स्थानिक समस्या व त्याला सोडवण्याचा उपाय स्थानिक नागरिकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांतून मिळू शकतो. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी वयोमर्यादेची आवश्यकता अजिबात नसते. नाविन्यपूर्ण संकल्पना वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सुचू शकते. मात्र हेही खरे की आज भारतातील एकूण स्टार्टअप उद्योजकांपैकी जास्तीत जास्त उद्योजक हे पस्तीशीच्या आतील आहेत. 


            स्टार्टअप्सना यशस्वी होण्यासाठी बऱ्याच घटकांची / बाबींची भूमिका महत्वाची ठरते. या परिसंस्थेतील विविध घटक/ बाबी म्हणजे तज्ज्ञ मार्गदर्शन, ग्रँट, इन्क्युबेशन, सीड फंडिंग, एंजल इन्व्हेस्टमेंट, व्हेंचर कॅपिटल, क्राउड फंडिंग, अॅक्सेलेरेशन, युनिकॉर्न, इत्यादी


            स्टार्टअप बाबत महत्वाची बाब म्हणजे आजकाल स्टार्टअप्सची क्रेझ असली तरी प्रत्येक स्टार्टअप यशस्वी होईलच असे नसते. स्टार्टअप म्हणजे नियमित व्यवसाय पद्धती नसून नवनवीन प्रयोग असतात. स्टार्टअप भविष्यात मोठा होईल याचा विश्वास असतो पण कोणतीही शाश्वती नसते. सर्व बाबी या प्रायोगिक तत्वावर सुरू होत असतात. नाविन्यपूर्ण कल्पना यशस्वी ठरली तर नवउद्योजक स्टार्टअपच्या मदतीने कोट्यावधी कमवितो अन्यथा, पुन्हा नवकल्पनेला न्याय देण्यास प्रयत्नशील असतो.


            भारत हा जगातील सर्वाधिक तरूण देश आहे. लोकसंख्या लाभांश आपल्याकडे सर्वाधिक आहे. आजवर विविध आविष्कारांमुळे आपला देश जगात अग्रेसर ठरत आहे. शून्याचा शोध लावणारे आर्यभट्‌ट असो किंवा पहिले शल्यचिकित्सक म्हणून ओळखले जाणारे महर्षी सुश्रुत असोत ! भारतीय आविष्कारांचा एक समृद्ध वारसा आहे. पारंपारिक व्यवसाय ते नाविन्यपूर्ण उद्योग उभारून जगभरात ठसा उमटवणारे अनेक उद्योगपती देखील या भूमीला लाभले आहेत.


            येणार काळ हा स्टार्टअप व नाविन्यतेचा असणार आणि काळाची हीच गरज ओळखून तरूणांना संधी देत, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नाविन्यपूर्ण आविष्कारांची परंपरा अखंड राहावी यासाठी शासनाच्या पातळीवर सातत्यपूर्ण प्रयत्न चालू आहेत. स्टार्टअप्सना व नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन देऊन देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी शासनाद्वारे विविध उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत. केंद्र शासनाच्या स्तरावर स्टार्टअप इंडिया, नीती आयोग, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अग्नी, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इ. विभागामार्फत विशेष योजना व उपक्रम राबवले जात आहेत.


            महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक औद्योगिकता असलेले राज्य आहे तसेच सर्वार्थाने देशास आवश्यक असणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची सातत्यपूर्ण चाचणी करीत देशाला दिशा देणारे अग्रणी राज्य आहे. औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी, नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८’ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (Maharashtra State Innovation Society) कार्यरत आहे. या धोरणातील मुख्य उद्दीष्टांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, स्टार्टअप्सना सक्षम करणे, नियामक रचना सुलभ करणे व पायाभूत सुविधांना चालना देऊन स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करणे इ. चा समावेश आहे.


            नाविन्यता सोसायटी मार्फत स्टार्टअप वीक, इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण व प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर, हिरकणी महाराष्ट्राची यांसारख्या अनेक कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. अशा विविध उपक्रम व यशस्वीतेमुळे देशातील एकूण ८८ हजार १३६ मान्यताप्राप्त स्टार्टअप्स पैकी सर्वाधिक १६,२५० स्टार्टअप्स (१८%) महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 ते 7 मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. तसेच मुंबई मधे सुमारे ५ हजार ९०० पुण्यामध्ये 4 हजार 535, औरंगाबादमध्ये 3४२, सिंधुदुर्गमध्ये 19 मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत.


            अभिमानाची बाब म्हणजे देशातील १०८ यूनिकॉर्न स्टार्टअप्सपैकी २५ यूनिकॉर्नस् (23%) महाराष्ट्रातील आहेत

            नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी १६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जातो. स्टार्टअप व नवउद्योजकानासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती, आवश्यक पाठबळ व सर्व बाबी आज रोजी उपलब्ध आहेत. युवकांचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र व राज्य शासन महत्वाची भूमिका बजावत आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अथक परिश्रमामुळे स्टार्टअप्सच्या क्षितिजावर महाराष्ट्राचे नाव अभिमानाने कोरले जाईल, असा विश्वास वाटतो. सळसळत्या उत्साहाने भरलेल्या उद्यमी युवाशक्तीच्या जोरावर स्टार्टअप नेशन ही ओळख मिळाल्यापासून जगात आपले मानांकन उंचावण्यासाठी आणि युवा वर्गातील उद्योजकतेला तळागाळापर्यंत नेण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहूया आणि भारताला जगाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवून देऊया.


0 0 0


अमित कोठावदे (सहाय्यक व्यवस्थापक), महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी

9420608942

राष्ट्रीय स्टार्टअप दिवस (16 जानेवारी) निमित्त विशेष वृत्त

 

विविध योजनाउपक्रमांद्वारे स्टार्टअप्सयुनिकॉर्न्सच्या विकासाला चालना

देशातील सर्वाधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स महाराष्ट्रात

 

 

            मुंबईदि. 15 : नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. केंद्र शासनाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) यांच्यामार्फत मान्यताप्राप्त असलेल्या देशातील एकूण 88 हजार 136 स्टार्टअप्सपैकी सर्वाधिक 16 हजार 250 स्टार्टअप्स (18 टक्के) महाराष्ट्रातील आहेत.  त्याचप्रमाणे आज देशातील 108 यूनिकॉर्नपैकी 25 यूनिकॉर्न्स (23 टक्के) महाराष्ट्रातील आहेत. यूनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन 1 बिलियन अमेरिकन डॉलर्स (100 करोड़ डॉलर ) म्हणजेच 8 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आहे.

 

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 ते 7 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 मान्यताप्राप्त तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. मुंबईमधे सुमारे 5 हजार 900पुण्यामध्ये 4 हजार 535औरंगाबादमध्ये 342सिंधुदुर्गमध्ये 19 मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत.

 

स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणार - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राज्याचे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले कीप्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी युवकांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्य विकासाची सुरुवात केली. राज्यामध्येही त्यानंतर स्वतंत्र कौशल्य विकास विभाग सुरु करण्यात आला. स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलतीयोजना यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात स्टार्टअप्सच्या विकासासाठी इकोसिस्टम तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल ठरत आहे. राज्यातील अगदी दुर्गम भागातील युवक-युवतींकडूनही स्टार्टअप्स विकसीत केले जात आहेत. नुकत्यात राबविण्यात आलेल्या स्टार्टअप यात्रेला राज्यातील सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांच्याकडील नवनवीन संकल्पनांचा शासनाच्या विविध विभागांच्या कामकाजामध्ये वापर करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

 

स्टार्टअप्सना प्रोत्साहनासाठी राष्ट्रीय दिवस

 

नवउद्योजक आणि स्टार्टअप्सने नाविन्यतेचा घेतलेला ध्यासत्यातून निर्माण होणाऱ्या नवीन रोजगाराच्या संधी व यामुळे देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्याच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

 

      भारत सरकारने 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केला. नवउद्योजकस्टार्टअपला प्रोत्साहन देणेरोजगार निर्मिती व एक मजबूत परिसंस्था तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमासाठी भारत सरकारचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) हा नोडल विभाग आहे. सद्यस्थितीत भारतात सुमारे 2 लाख 44 हजार स्टार्टअप्सची नोंद झालेली आहे व यातील 88 हजार 136 स्टार्टअप्स उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातर्फे (DPIIT) मान्यताप्राप्त आहेत.

 

स्टार्टअप्ससाठी राज्यात विविध धोरणेयोजना

 

  स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात अनेक धोरणेयोजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक औद्योगिकता असलेले राज्य आहे आणि औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊनमहाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांनाउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018’ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. या धोरणातील मुख्य उद्दिष्टांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे,  स्टार्टअप्सना सक्षम करणेनियामक रचना सुलभ करणे व पायाभूत सुविधांना चालना देऊन स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करणे इ. चा समावेश आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजनाउपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. या धोरणांतर्गत स्टार्टअप सप्ताहइनक्यूबेटर्सची स्थापनास्टार्टअप यात्राग्रँड चॅलेंजहॅकॅथॉनगुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजनाबौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजनामहाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर व सीड फंड यांसारख्या अनेक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी सन 2018 पासून कार्यरत आहे.

 

स्टार्टअप दिनानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रम

 

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून सोमवारी 16 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीद्वारे राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा करण्यात येणार आहे. या निमिताने नवउद्योजकांसाठी विशेष योजनादिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शक सत्र व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी अमित कोठावदे (सहाय्यक व्यवस्थापकमहाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी 9420608942 यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईट आणि सोशल माध्यमांवर संपर्क साधता येईल.

000


सकाळच्या प्रहरी

 : *मागुन ढकलणारी व्यक्ती हत्तीला टृकमध्ये बसवू शकते असे आजिबात नाही; पण यातूनच हत्तीला कळते की माझ्या मागे कोणीतरी आहे, जो मला मदत करत आहे. आणि या भावनेने हत्ती टृकमध्ये चढतो. कधी-कधी आपल्यालाही असाच आधार हवा असतो. त्यामुळे एकमेकांना मदत करत रहा. हे परस्पर सहकार्य एकमेकांमध्ये आत्मविश्वास भरून काढते; आणि आत्मविश्वासाने भरलेली व्यक्ती प्रत्येक अडचणीवर मात करु शकते. म्हणून समर्थन ही खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यात एकमेकांना साथ देत राहू.* 🌸                                        🙏🙏Shubh sakaal 🙏🙏🌸:                       *ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रतित्युत्तर देत बसू नका...*

*कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या..*

*गाळ आपोआप खाली बसतो..


*❣️🌹 🙏🙏🙏 🌹❣️*.                                     _मनातले संकेत ज्यांना न बोलता कळतात.._

_त्यांच्याच मनांची खोल नाती जुळतात_


* 🌹

*आपलसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही* ..

*फक्त आपण जे बोलतो ते सत्य व मनापासून असणे गरजेचे आहे*...


  💐🌹  *ज्ञान म्हणजे तुम्ही काय करु शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करु नये याचे ज्ञान असणे.*.

भातुकलीच्या खेळामध्ये तीळ तीळ

 👆🏻हे बघ काय काय वळलय नी

आपले लाडु नाही वळत 🤭



Sunday, 15 January 2023

तिलाची बनवलेली घ्य..❤️

 पौषातील थंडीस पुरून उरण्याची ताकद पौष्टिक तीळ पासून बनवलेली घ्या .

सूर्याचे धनु राशीतून मकर राशीतील प्रवेशाचे संक्रमण निसर्गशिक्षणाने लाभदायक ठरो.

थंडी पासून रक्षण करा

 नैसर्गिक सवय सबंध जनांस जडो यासाठी हा सण


.. तुमच्या सह तुमच्या परिवारास मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा..❤️


तिलाची घ्या  njoy kara


..❤️

व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये समावेश

 व्हॉट्सअ‍ॅपट्विटरफेसबुकईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये समावेश.

एकत्रित प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण

 

            पुणे दि. १४: प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-११२ या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅपट्विटरफेसबुकईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  करण्यात आले.

            राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्रित येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे साडेअकरा लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या असूनयातील सुमारे २.५० लाख तक्रारी या महिलांशी संबंधित होत्या. या प्रणालीतून सरासरी दररोज १९ हजारावर कॉल्स स्वीकारले जाताततर २८०० तक्रारींचा निपटारा केला जातो. आता यात महाराष्ट्र पोलिसांचे सिटीझन पोर्टलएसओएसफेसबुकई-मेलसिटिझन मोबाईल अ‍ॅपट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जलदगतीने तक्रारींचा निपटारा शक्य होणार आहे.

            सोशल मिडियाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी आणि त्यावर त्वरित प्रतिसादासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची रचना करण्यात आली आहे. यामुळे पीडितापर्यंत तातडीने मदत पोहोचू शकणार आहे. ११२ महाराष्ट्र या नावाने ट्विटर आणि फेसबुकवर हॅण्डल्स असूनअन्य तपशील महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक आपली तक्रार नोंदवू शकताततातडीची मदत पोलिसांना मागू शकतात. यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत आणखी एका जलद प्रतिसाद सेवेची भर पडलेली आहे.

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवूनटाटा मुंबई मॅरेथॉन 2023 शर्यतींना सुरूवात

 राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवूनटाटा मुंबई मॅरेथॉन 2023 शर्यतींना सुरूवात.

            मुंबई दि 15 : 'टाटा मुंबई मॅरेथॉन 2023' शर्यतींमधील विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

            टाटा कन्सल्टन्सीच्यावतीने मुंबईत 'टाटा मुंबई मॅरेथॉन 2023' चे आयोजन करण्यात आले. यावर्षी 'हर दिल मुंबई' हे ब्रीदवाक्य असलेल्या या स्पर्धेत सुमारे 55 हजारहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. इलाईट गटातील स्पर्धांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखविला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'ड्रीम रन' ला सुरूवात झाली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी मुंबईकरांमध्येही मोठा उत्साह दिसून आला.

            स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार प्रिया दत्त, आमदार झीशान सिद्धीकी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, टाटा कन्सल्टन्सीचे उज्वल माथुर, अनिल सिंह, विवेक सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            या मॅरेथॉन मध्ये इलाईट मेन ॲथेलिट इंटरनॅशनल मेन, इलाईट मेन ॲथेलिट इंटरनॅशनल वुमन, इलाईट ॲथेलिट इंडियन मेन, इलाईट ॲथेलिट इंडियन वुमन यासह पुर्ण मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 कि.मी. ड्रीम रन, सिनियन सिटीझन रन, चॅम्पीयन विथ डिसॲबिलीटी रन या प्रकारांचा समावेश करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

0 0 0



Featured post

Lakshvedhi