सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 8 January 2023
.अण्णामलाई : मॅन ऑफ दि ईयर
*'के.अण्णामलाई : मॅन ऑफ दि ईयर!'*
पंतप्रधान मोदी एखाद्या नेत्याला आलिंगन देताना तुम्ही पाहिले आहे काय ? क्वचित कधीतरीच असं दृश्य बघायला मिळतं.. मोदी अशी जवळीक कुणाशी साधत नाहीत वा कुणाला साधू देत नाहीत.. मात्र याला एका नावाचा अपवाद आहे.. 'के. अण्णामलाई!' हा माणूस जेव्हा जेव्हा मोदींच्या समोर येतो तेव्हा ते त्याचं स्वागत आलिंगन देऊन करतात.. काय कारण असेल याचं ? मुळात हा 'अण्णा' आहे तरी कोण ?
के. अण्णामलाई.. वय 38. भाजप तामिळनाडूचा अध्यक्ष! पण ही ओळख पुरेशी नाही .. किंबहुना इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास अधिक महत्वाचा आणि रोमहर्षक आहे...
'अण्णा'चा जन्म 'करूर' या अती छोट्या खेड्यातला.. आई-वडील गरीब शेतकरी.. आपल्या मुलानं 'कॉलेजचं शिक्षण' घ्यावं ही त्यांची मनीषा! अण्णा 'कॉलेज'मध्ये जाणारा करूरचा पहिलावहिला मुलगा! त्यानं कोईमतूरला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. पण 'मोठं पॅकेज' मिळवण्यासाठी आणखी शिकणं आवश्यक होतं. त्याला लखनौच्या IIM मध्ये MBA ला प्रवेश मिळाला... लखनौमधलं आणि एकूणच उत्तर प्रदेशमधलं दारिद्र्य पाहून त्याला धक्का बसला. एकदा त्याला एका टपरीवर फक्त 'पाच रुपयात आठ पुऱ्या' खायला मिळाल्या.. 'पाच रु मिळाले' म्हणून टपरीवाला खूष होता.. हा अण्णा साठी एक 'शॉक' होता. MBA करताना तो पूर्ण यू. पी.फिरला.. विशेषत: पूर्वांचल.. तिथं त्याला असंख्य बालमृत्यू आढळून आले.. तो अतिशय अस्वस्थ झाला.. आणि त्याच सुमारास मुंबईला 26/11 चा हल्ला झाला..आणि अण्णाचं जीवनच बदललं.. *'आपण समाजसेवा- देशसेवा करण्यासाठी सरकारी नोकरी करायची' असं त्यानं ठरवलं..* MBA करता करता त्यानं UPSC ची प्रिलीम दिली.. नंतर मुख्य परीक्षा 'crack' केली.. इंटरव्ह्यू दिला आणि तो IPS उत्तीर्ण झाला.. पोस्टिंग कर्नाटक मध्ये मिळालं..
उडपीमध्ये S.P. असताना त्यानं आपली कारकीर्द गाजवली. तिथल्या कॉलेजात ड्रग माफियांचं जाळं होतं.. ते अण्णानं मोडून काढलं.. स्वतः 'स्पॉट'वर जाऊन तो गुंडांविरोधात कारवाई करत असे.. लोकांनी त्याला *'सिंघम ऑफ उडपी'* ही पदवी दिली.. पण पुन्हा एक 'टर्निंग पॉईंट' आला..
'दहावीत शिकणाऱ्या एका मुलीवर' सामूहिक अत्याचार झाला आणि तिचा खून झाला.. अण्णामलाई त्या स्पॉटवर गेला तेव्हा तिथे दहा हजार लोक जमले होते व दगडफेक चालू होती.. या गुन्ह्यामागच्या कारणांचा त्यानं शोध घेतला.. त्या मुलीच्या शाळेत फक्त दोन कॉम्प्युटर होते.. ते आळीपाळीनं वापरायला मिळत.. त्या दिवशी कॉम्पुटर वापरून शाळेतून बाहेर पडायला त्या मुलीला खूप उशीर झाला.. अंधार पडला होता. तिच्या गावाकडे जायला संध्याकाळी सात नंतर बस नव्हती.. म्हणून ती एकटी चालत जात होती.. आणि हा दुर्दैवी प्रसंग घडला...
'आपण पोलीस नोकरीत राहून या असुविधा (कॉम्पुटर वा बसचा अभाव) दूर करू शकणार नाही' असं अण्णाला वाटू लागलं.. याच दरम्यान 'सरकारी लायझन ऑफिसर' म्हणून त्याला कैलास मानसरोवर यात्रेला जावं लागलं.. तब्बल 70 दिवस.. आणि इथं तो पूर्णपणे बदलून गेला.. 'जीवन बदलणारा निर्णय घेण्यासाठी' आवश्यक असलेली एक 'आध्यत्मिक ऊर्जा' त्याला मिळाली.. त्याचा निर्णय पक्का झाला.. परत येऊन त्यानं नोकरीचा राजीनामा दिला...
*(कदाचित या आध्यत्मिक 'कनेक्ट' मुळे तो मोदींचा लाडका असावा.)* मुख्यमंत्री येडुयेराप्पानी स्वतः विनंती करूनही त्यानं राजीनाम्याचा निर्णय बदलला नाही.. नंतर एक वर्षं त्यानं 'Be the Leaders' हे फौंडेशन चालवलं.. सामान्य तरुणांसाठी..
मग 'दिल्लीतून' कळ फिरली.. भाजपचे काही लोक त्याला भेटले.. त्याला 'convince' केलं.. आणि त्यानं भाजपमध्ये प्रवेश केला.. जिथं भाजप हा अत्यंत नगण्य पक्ष आहे तिथं असा निर्णय घेणं हे फारच धाडसाचं काम! मोदी-शहानीही अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून त्याला तामिळनाडूचा प्रदेशाध्यक्ष केलं... जुलै 2021 मध्ये..
आणि नंतरच्या दीड वर्षात त्यानं तामिळनाडू मध्ये जे लोकप्रियतेचं वादळ निर्माण केलं ते अभूतपूर्व आहे.. महाराष्ट्रात बसून त्याची नेमकी कल्पना येत नाही..
पण सध्या तो एखाद्या सिनेस्टार सारखा लोकप्रिय आहे.. त्याच्या दीड वर्षातील कामगिरी वर स्वतंत्र लेख लिहावा लागेल.. करुणानिधिंच्या गावात जाऊन त्यानं सभा घेतली.. त्याला एक लाख लोक उपस्थित होते.. परवा मोदी चेन्नईला गेले तेव्हाचा रोड शो रेकॉर्ड मोडणारा होता.. *तामिळ तरुणाई सध्या अण्णाच्या प्रचंड प्रेमात आहे..* सध्या तो तिथल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे.. एप्रिल 2023 पासून तो एक वर्षाची पदयात्रा काढणार आहे.. सर्व 234 मतदारसंघातून..
पण तिथलं राजकारण 'क्रूर' मार्गानं जाणारं आहे.. अण्णाला 'संपवण्याचे' प्रयत्न DMK नं हरप्रकारे चालवले आहेत.. जर अण्णामलाई 'सुरक्षित' राहिला तर 2024 चे तामिळनाडूतले निकाल धक्कादायक असतील हे लिहून ठेवा..आणि 2026 च्या विधानसभेचे तर त्याहूनही 'शॉकिंग!'
*'के.अण्णामलाई' हा माझ्या दृष्टीनं 2022 चा 'मॅन ऑफ दि ईयर' आहे...*👍
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
©️®️धनंजय कुरणे
30/12/22
पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे
पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण
प्रमुख 9 पवित्र जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा, सुविधा विकासासाठी कार्यक्रम
मुंबई, दि. 7 : राज्यातील पवित्र जैन तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे आज राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी यांच्या हस्ते आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. याअंतर्गत राज्यातील प्रमुख 9 जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
राजभवन येथे झालेल्या या कार्यक्रमास मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, हिरे व्यावसायिक सेवंतीभाई शाह यांच्यासह जैन समाजबांधव उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले की, पर्यटन विभागामार्फत पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी हाती घेण्यात आलेला कार्यक्रम निश्चितच स्तुत्य आहे. अध्यात्माचे महत्व लक्षात घेता सध्याच्या काळात पर्यटनाबरोबरच तीर्थाटनही तितकेच महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पर्यटन विभागाला आता पर्यटन आणि तीर्थाटन विभाग असे म्हणावे, असे त्यांनी सांगितले.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, मोठमोठी संकटे आणि आक्रमणानंतरही आपली भारतीय संस्कृती आणि धर्म अबाधीत राहीले. जैन धर्म आणि या समाजाचे देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासात फार मोठे योगदान राहीले आहे. यापुढील काळातही प्राचीन भारताच्या मार्गावर तसेच भगवान जिनेंद्र यांच्या मार्गावर आपण पुढे गेले पाहीजे, असे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, पर्यटन विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी निगडीत पर्यटन सर्किटच्या विकासाचा कार्यक्रम नुकताच हाती घेतला आहे. त्याचबरोबर नांदेड येथे नुकताच वीर बाल दिनानिमित्त शीख समाजासमवेत विशेष उपक्रम राबविण्यात आला. आता ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील प्रमुख 9 जैन तीर्थक्षेत्रांचा समावेश असून या क्षेत्रांची सुरक्षा, तिर्थयात्रा तसेच सुविधांच्या विकासासाठी कार्यक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी म्हणाले की, जैन समाजाचे योगदान फार मोठे आहे. आपले मूलतत्व या समाजाने आजही जपून ठेवले आहे. आध्यात्मिक विकासासह देशाच्या सर्व क्षेत्रामध्ये जैन समाज यापुढील काळातही योगदान देत राहील, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह यांनी त्यागाचे महत्व सांगणारे विचार मांडले. ते म्हणाले की, आपली सर्वसमावेशक संस्कृती ही त्यागावर आधारीत आहे. हा भारताचा बहुमोल असा वारसा आहे. या वारशामुळेच आपल्या देशाचे फार पाश्चिमात्यीकरण झाले नाही. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोक त्यागाची भावना घेऊन जातात. या आधारावरच ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’ कार्यक्रम राबवावा, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख 9 जैन तीर्थक्षेत्रांचा समावेश
सटाना (जि. नाशिक) येथील श्री मांगी तुंगीजी दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र देवस्थान, शहापूर (जि. ठाणे) येथील मानसमंदिर (शाहपूर जैन तीर्थ), साक्री (जि. धुळे) येथील श्री बलसाना श्वेतांबर जैन तीर्थ, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील श्री जगवल्लभ पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील कुम्भोज बाहुबली जैन मंदिर, वणी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील श्री अमिझरा शंखेश्वर पार्श्वाभ्युदय तीर्थ, पाबळ (ता. शिरुर, जि. पुणे) येथील पद्म आणि जैन तीर्थ, पायधुनी (मुंबई) येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ तीर्थ, शिरपूर (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान या तीर्थस्थळांचा या पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटमध्ये समावेश आहे.
खास टिप्स जेष्ठ साठी
🌹ज्येष्ठांसाठी खास टिप्स म्हणजे 40/50/60 वयाचे🌹
१- पहिली सूचना: तुम्हाला तहान लागली नसली किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या,आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या आणि त्यापैकी बहुतांश शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होतात.दररोज किमान 2 लिटर.
२- दुसरी सूचना: शरीराकडून जास्तीत जास्त काम करवून घ्या , शरीराची हालचाल झाली पाहिजे, जसे की चालणे,पोहणे किंवा कोणत्याही प्रकारच्या खेळाने.
३-तिसरी टीप: कमी खा.जास्त खाण्याची लालसा सोडून द्या.कारण ते कधीच चांगले आणत नाही. स्वत: ला वंचित करू नका, परंतु प्रमाण कमी करा.प्रथिने, कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ जास्त वापरा.
४- चौथी सूचना: अगदी आवश्यक असल्याशिवाय शक्यतो वाहन वापरू नका. तुम्ही कुठेही किराणा सामान घेण्यासाठी,कोणाला भेटायला किंवा काही कामासाठी जात असाल तर, पायावर चालण्याचा प्रयत्न करा.लिफ्ट,एस्केलेटर वापरण्या ऐवजी पायऱ्या चढा.
५- पाचवी सूचना राग सोडा, काळजी करणे थांबवा, गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. त्रासदायक परिस्थितीत स्वत: ला गुंतवू नका, ते सर्व आरोग्य खराब करतात आणि आत्म्याचे वैभव काढून घेतात. सकारात्मक लोकांशी बोला आणि त्यांचे ऐका. ६- सहावी सूचना सर्वप्रथम पैशाची आसक्ती सोडून द्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधा, हसवा आणि बोला! पैसा जगण्यासाठी बनवला गेला आहे,पैशासाठीआयुष्य नाही.
७-सातवी टीप स्वत:बद्दल, किंवा तुम्ही जे साध्य करू शकले नाही अशा कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही अवलंब करू शकत नाही त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे दुःख करू नका.त्याकडे दुर्लक्ष करा आणि विसरा.
८- आठवी सूचना पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता, सौंदर्य, जात आणि प्रभाव;या सगळ्या गोष्टी अहंकार वाढवतात.नम्रता ही लोकांना प्रेमाने जवळ आणते.
९- नववी टीप जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर त्याचा अर्थ आयुष्याचा अंत होत नाही. ही एका चांगल्या जीवनाची सुरुवात आहे. आशावादी व्हा, स्मृतीसह जगा, प्रवास करा, आनंद घ्या.आठवणी निर्माण करा!
१०- दहावी सूचना तुमच्या लहान मुलांना प्रेमाने, सहानुभूतीने आणि आपुलकीने भेटा! काही उपहासात्मक बोलू नका! चेहऱ्यावर हसू ठेवा!तुम्ही भूतकाळात कितीही मोठे पद भूषवले असले तरी ते वर्तमानात विसरून जा आणि या सर्वांशी मिळून मिसळून रहावे!हरी 🕉️
🌹जेष्ठ सेवानिवृत्त एन्जॉय ग्रुप पुणे शहर🌹
Saturday, 7 January 2023
लार्सन अँड टुब्रो कौशल्य संस्थेनेराज्याच्या कौशल्य विद्यापीठासोबत सहकार्य करावे
लार्सन अँड टुब्रो कौशल्य संस्थेनेराज्याच्या कौशल्य विद्यापीठासोबत सहकार्य करावे
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.
मुंबई, दि. ७ : राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले असून राज्यात कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु उद्योग जगत व कॉर्पोरेट्सच्या सहकार्याशिवाय अर्थपूर्ण कौशल्य प्रशिक्षण देता येणार नाही. या दृष्टीने लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक संस्थेने कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य करावे असे आवाहन करताना औद्योगिक क्षेत्रातील या समूहाचा प्रत्यक्ष अनुभव युवकांना उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक संस्थेने व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने आयटीआय प्रशिक्षकांसाठी आयोजित कौशल्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप संस्थेच्या मढ आयलंड, मुंबई येथील अकादमीत संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लार्सन अँड टुब्रोचे समूहाचे अध्यक्ष ए.एम.नायक, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. रामकृष्णन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शहाणे, प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख बी.ए.दमाहे, मास्टर ट्रेनर लार्सन अँड टुब्रो प्रिया सावंत, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी तसेच संस्थेत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करीत असलेले राज्यातील आयटीआय प्रशिक्षक उपस्थित होते.
लार्सन अँड टुब्रो हे देशाच्या उद्योग जगतातील एक प्रेरणादायी नाव आहे. समूहातर्फे केलेल्या प्रत्येक कार्यात गुणवत्ता असते असे सांगून एल अँड टी समूहाने देशातील अनेक राज्यांमध्ये कौशल्य प्रशिक्षण संस्था उभाराव्या व इतर उद्योग समूहांनी देखील युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी पुढे यावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
श्रमप्रधान कार्याला दुय्यम मानण्याची मानसिकता बदलली पाहिजे : ए एम नायक
समाजात पांढरपेशा नोकऱ्यांना मान आहे परंतु श्रमप्रधान कार्याला दुय्यम मानले जाते ही मानसिकता बदलली पाहिजे, असे प्रतिपादन एल अँड टी चे समूह अध्यक्ष ए.एम.नायक यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगाची कौशल्य राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे व कौशल्याच्या माध्यमातूनच देशाला आत्मनिर्भर बनविता येऊ शकते. देशाला कौशल्य राजधानी बनविण्याच्या दृष्टीने मात्र अजूनही फार मोठे कार्य करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
एल अँड टी समूहाने मुंबई येथे सन २०२१ साली अत्याधुनिक सुविधा असलेली कौशल्य प्रशिक्षक अकादमी सुरु केली असून त्याठिकाणी एल अँड टी मधील अनुभवी लोकांना अध्यापक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे असे त्यांनी नमूद केले.
आतापर्यंत अकादमीने महाराष्ट्र शासनाच्या १ हजार ७ आयटीआय प्रशिक्षकांना या संस्थेत प्रशिक्षण दिले असून या कौशल्याचा समाजात सकारात्मक परिणाम होईल असे त्यांनी सांगितले.
लार्सन अँड टुब्रोने आपल्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत स्थापन केलेल्या लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक अकादमी अंतर्गत १ हजार आयटीआय प्रशिक्षकांचे कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
*****
L & T Skills Trainers Academy complete straining 1000 ITI instructors
Maharashtra Governor, L & T Chairman attend Festival of Skills.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the concluding session of 'Kaushal Utsav', a festival of skills organised by L & T Skill Trainers Academy at Madh Island of Mumbai on Sat (7 Jan). The Kaushal Utsav was organised by L & T to mark the completion of 5 days of specizlied training of 1000 trainers of Industrial Training Institutes from Maharashtra at its training facility in Mumbai.
Group Chairman of L & T A.M. Naik, Vice Chancellor of Maharashtra State Skills University Dr Apoorva Palkar, CE of L &T Skill Development Mission K. Ramakrishnan, Dy CE Ashok Shahane, Director of the Academy B A Damahe, Master Trainer L&T Priya Sawant, Trainers and ITI Instructors completing 5 days skills training were present.
Complimenting L & T for starting the Skill Trainers Academy the Governor called upon L & T to work closely with the Maharashtra State Skills University started by the Government of Maharashtra. He further appealed to L & T to open more such skill training academies all over the country to realize the Prime Minister's goal of making India the skill capital of the world.
The L & T Skill Trainers Academy, a CSR initiative of L & T, organised the Skills Festival in collaboration with the Directorate of Vocational Education and Training, Government of Maharashtra.
*****
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...




