Saturday, 24 December 2022

कोविड


दिलखुलास’ कार्यक्रमात सं

 दिलखुलास’ कार्यक्रमात सप्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांची मुलाखत.

          मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दिनांक 26, मंगळवार दिनांक 27 व बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. 


            नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) सारख्या नामांकित संस्थेत नाटकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले, 45 वर्षाहून अधिक काळ चित्रपट, मालिका आणि नाटकं अशा 100 हून अधिक कलाकृती हाताळलेले, विविध पुरस्कारांनी सन्मानित, कलाकार घडविणारे नाट्य दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यानिमित्ताने नाटकांची संहिता स्वतःच्या हाताने लिहिण्याची कारणे, नेपथ्य आणि हालचालींचे चित्रमय आराखडे बनवण्याचे फायदे, मालिकांमध्ये व्यस्त असलेल्या नटांना घेऊन तालमींचं काटेकोर नियोजन, स्वगतं सादर करण्यातील नव्या शक्यता काय आहेत, अशा अनेक रोचक विषयांवर विस्तृत माहिती संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000

कोण आरोग्य संपन्न ? *आजी की आइ ?* चिमुकला तुलनात्मक अभ्यास करतोय.!


 कोण आरोग्य संपन्न ?

*आजी की आइ ?*

चिमुकला तुलनात्मक अभ्यास करतोय.!

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे उद्या लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर.

 महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे

उद्या लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर.

          मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डी वॉर्ड’ कार्यक्षेत्रात ताडदेव महापालिका शाळा, बने कम्पाऊंड, साने गुरूजी मार्ग, ताडदेव येथे शनिवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत मोफत लसीकरण आणि वैद्यकीय शिबीराचे आयोजन केले आहे.


          या शिबीरामध्ये महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी, लसीकरण आणि दंत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी सुमारे 1 हजार बालके उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती सुशीबेन शहा यांनी प्रसिध्दीस दिली आहे.


000


 


 

अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

 अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीजागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणीवर भर द्यावा

        - अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन

मुंबई, दि. 23 : अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणी या तिन्ही बाबींचा अवलंब करावा अशा सूचना नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन यांनी दिल्या. श्री. गोपाल कृष्णन यांनी प्राधिकरणाचे संचालक गुणवत्ता हमी तपासणारे अधिकारी श्री हरींदर ओबेरॉय, संचालक पश्चिम विभाग श्रीमती प्रीती चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी आज वांद्रे कुर्ला संकुलातील अन्न व औषध प्रशासन कार्यालय आणि प्रयोगशाळेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.


   अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी केंद्रीय पथकाचे स्वागत केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (विधी) चंद्रकांत थोरात, सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई शशिकांत केकरे, अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक श्रीमती संगीता ठाकूर व इतर अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त आणि प्रयोगशाळेतील सहयोगी कर्मचारी उपस्थित होते.


या भेटीदरम्यान या संकुलात अन्न व औषध प्रशासनाचे कामकाज कसे चालते, तसेच प्रयोगशाळेत येणारे नमूने कशा पध्दतीने तपासले जातात याची पाहणी त्यांनी केली. प्रशासनाच्या चौथ्या मजल्यावर प्रयोगशाळेकरिता नव्याने बांधकाम सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच अत्याधुनिक प्राणी गृह, अन्न तपासणी केंद्र, अन्न दर्जा तपासली जाणारी प्रयोगशाळा येथे भेट दिली.


​ याभेटी दरम्यान अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक श्रीमती ठाकूर यांनी मुंबई, नागपूर व औरंगाबाद प्रयोगशाळेबाबत सादरीकरण केले. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन,यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.


​ सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई श्री. केकरे, यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.


000



फुलले रे क्षण माझे

 


जिवन गाणे

 *कोणतीही स्थिती कायमची नसते. साहजिकच संकटे ही तात्पुरतीच असतात. संकटरूपी अंधारात काहीही दिसत नसले तरी, डगमगून जाऊ नये कारण अंधार संपून लवकरच यशाचा उजेड पडणार असतो.*

         *🌺शुभ सकाळ 🌺*

Featured post

Lakshvedhi