Monday, 19 December 2022

महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार

 महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार

 

·         अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         पारदर्शकभ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल

·         विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

 

            नागपूरदि. 18 : महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा झाला पाहिजे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सांगत होते. अण्णा हजारे समितीने दिलेला रिपोर्ट शासनाने स्वीकारला असून नवीन लोकायुक्त कायदा तयार करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 मान्यतेसाठी मांडण्यात येईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला देखील लोकायुक्तच्या कक्षेत आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहेअसे त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी आज ही पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटीलसुधीर मुनगंटीवारगिरीश महाजनसंजय राठोडशंभूराज देसाईविजयकुमार गावीततानाजी सावंतसुरेश खाडेअतुल सावेरवींद्र चव्हाण उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीआमचे सरकार लोकाभिमुख सरकार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची जी मागणी होती ती आता प्रत्यक्षात येत आहे. सरकार पूर्णपणे पारदर्शकतेने कामकाज करेल. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही कामकाज करूअसे त्यांनी सांगितले.

आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मोठी मदत

            मुख्यमंत्री म्हणाले कीआपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे. यासाठी 9 हजार कोटी रुपयांची मदत मान्य करण्यात आली असून आतापर्यंत 4 हजार 800 कोटी रुपयांचे मदतीचे वितरण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या निकषांमध्येही बदल करून मदत करण्यात येत आहे. कर्जमाफीच्या प्रोत्साहन अनुदानासाठी आमच्या सरकारने 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार 500 कोटी रुपये जमा केले आहेत. जलसिंचन क्षेत्रांमध्ये वाढ व्हावी यासाठी आतापर्यंत 18 प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. यामधून 2 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून यासाठी साधारण 18 हजार कोटी रुपयांस मान्यता देण्यात आली आहे.

विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक कार्य

            मुख्यमंत्री म्हणाले कीविदर्भ आणि नागपूरशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची मागे संधी मिळाली. या माध्यमातून या भागात काम करता आले. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सरकार व्यापक कार्य करेल.

            यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आत्ताच माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले आहे. याद्वारे चांगली सुरुवात झाली आहे. विदर्भातील सर्व प्रकल्पप्रश्न मार्गी लावले जातील. सरकार पूर्णपणे जनतेच्या मागे आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतअसे त्यांनी सांगितले.

जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणास मान्यता

            मुख्यमंत्री म्हणाले कीमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली आहे. हा प्रश्न फार गांभीर्याने घेण्यात आला आहे. सीमा भागातील नागरिकांसाठी असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या योजनासुविधा मागील काळात बंद करण्यात आल्या होत्यात्या सुविधायोजना आमच्या शासनाने पुन्हा सुरू केल्या आहेत. जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी साधारण 2 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेतून कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील 48 गावांना पिण्याचे पाणी तसेच सिंचनाचे पाणी मिळू शकणार आहे. त्या भागातील दुष्काळ दूर होण्यास या विस्तारित प्रकल्पाची मोठी मदत होईलअसे मुख्यमंत्री म्हणाले.

            आमच्या शासनाने सगळे सणउत्सव आनंदात साजरे करण्यासाठी प्रोत्साहन दिले. दिवाळीच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. फक्त शंभर रुपयांमध्ये गोरगरिबांना दिवाळी साजरी करता आली. यासाठी आनंदाचा शिधा योजनेतील अन्नधान्याचे 96 टक्के लोकांना वितरण झालेअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घोषीत केले.

पारदर्शक कारभारभ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीशासनाचे संपूर्ण कामकाज अत्यंत पारदर्शक व्हावे आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त कायद्यास मान्यता देण्यात आली. चालू हिवाळी अधिवेशनातच यासाठीचे विधेयक मांडण्यात येईल. या विधेयकासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समितीने दिलेला रिपोर्ट जसाच्या तसा स्वीकारण्यात आला. हा कायदा भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरेलअसे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            विदर्भाच्या अनुशेषासंदर्भातील सगळे आकडे लवकरच विधिमंडळात मानण्यात येतील. विदर्भातील जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीचा निधी मध्यंतरी कमी करण्यात आला होतातो वाढविण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्रातील जत तालुक्यातील 77 गावांना आम्ही 2016 साली पाणी पोहोचवले होते. उर्वरित गावांनाही पाहणी पोहोचवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. शिष्यवृत्तीसाठी पुढची मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती देण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठवाडाविदर्भाबरोबरच राज्यातील मागास भागातल्या विविध प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा होईल. विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय मिळवून देण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री म्हणाले.

0000

भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे.*

 आपल्या सर्वांचे अभिनंदन.  आपले राष्ट्रगीत *"जन गण मन..."* हे युनेस्कोने *"जगातील सर्वोत्कृष्ट 2022"* म्हणून घोषित केले आहे.  काही मिनिटांपूर्वीच.


 कृपया हे शेअर करा

 *भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे.*


 🇮🇳👏


 आपल्या राष्ट्रगीताचा अर्थ...


 🎵जन = लोक

 🎵गण = गट

 🎵मन = मन

 🎵अधिनायक = नेता

 🎵जय हे= विजय

 🎵भारत = भारत

 🎵भाग्य = भाग्य

 🎵विधाता = निपटारा करणारा

 🎵पंजाब= पंजाब

 🎵सिंधू = सिंधू

 🎵गुजरात = गुजरात

 🎵मराठा = मराठी महाराष्ट्र

 🎵द्राविड = दक्षिण

 🎵उत्कल= ओरिसा

 🎵बंगा = बंगाल

 🎵विंध्य = विंध्य

 🎵हिमाचल = हिमालय

 🎵यमुना = यमुना

 🎵गंगा = गंगा

 🎵उच्छल= हालचाल

 🎵जलधी = महासागर

 🎵तरंगा = लाटा

 🎵तव= तुमचा

 🎵शुभ = शुभ

 🎵नामे= नाव

 🎵जागे = जागे व्हा

 🎵तव= तुमचा

 🎵शुभ= शुभ

 🎵आशिष= आशीर्वाद

 🎵मागे = विचारा

 🎵गाहे = गा

 🎵तव= तुमचा

 🎵जय= विजय

 🎵गाथा = गाणे

 🎵जन = लोक

 🎵गण = गट

 🎵मंगल= भाग्य

 🎵दायक = देणारा

 🎵जय हे= विजय असो

 🎵भारत = भारत

 🎵भाग्य = भाग्य

 🎵विधाता = दवाखाना


 💐जय हे, जय हे जय हे, जय जय जय जय हे = विजय, विजय, विजय C6, कायमचा विजय...

 जा


 *कृपया शेअर करा आणि सर्व लोकांना आमच्या राष्ट्रगीताचा अर्थ कळू द्या...*

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

आरे संसार संसार

 "... मम्मी, तू आणि बाबांनी खूप अडचणी असताना त्या काळात लग्न केलंत...

 गेली *छत्तीस वर्षं* संसार केलात...

आमच्या पिढीला का गं जमत नाही  हे ?


*" तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली*. 


चार वर्षं मज्जेत *बॉयफ्रेन्ड* असलेल्याचा आठ महिन्यापुर्वी *हजबन्ड* झाल्यानंतरचा हा राग होता.


*"प्रश्न विचारलास, का ?


पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली; 


" *उत्तर हवंय*, का   ?

'हो 


"उत्तर हवंय", लेक म्हणाली. 


"असे आहे न बाळा," आई सहजच म्हणाली;


"आम्ही *'कसं जमवता येईल'* ते शोधत होतो; 

तुम्ही *'जमलं तर पाहू'* म्हणताय.


"आमच्या वेळी प्रेम हे *व्हायचं*; तुमच्या काळात ते *केलं* जातं.


"आम्ही *साथीदार* व्हायचो; तुम्ही *पार्टनर* बनवता. 


"आमच्यात प्रेम ही *सहजता* होती; तुमच्यात तो *अट्टहास* झालाय.


"आमचं प्रेम *लहानाचं मोठं* व्हायचं; तुमचं प्रेम *लहानपणीच घाई* करतं. 


"आमच्या वेळी *मैत्री विश्वासात* रुपांतरीत व्हायची; तुम्ही *जवळिकीला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई* करताय.


"आम्ही कविता *लिहायचो*; तुम्ही त्या *फॉरवर्ड* करताय. 


"आमचे *जीवनसाथी* होते; तुमचे *बॉयफ्रेन्ड* नि *गर्लफ्रेन्ड* आहेत.


"आमचं प्रेम *आमच्यासाठी* होतं; तुमचं प्रेम *'सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहीजे',* म्हणून केलं जातंय. 


"आमचे *बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट* जाणवायचं. तुमच्यात *इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहीजे तसा बॉयफ्रेन्डही असलाच पाहीजे*, 


"आम्ही *गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित* करायचो; तुमच्या *गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल* याची *कैलक्युलेशन्स* असतात. 


"आम्ही *धुंद* होतो; तुम्ही *उधळलेले* आहात. 


"आम्ही *चेहऱ्यावरचं तेज* शोधायचो; तुम्ही *शर्टचा ब्रान्ड* पाहताय. 


"आम्हाला नजरेतली *समजदार चमक* भाळायची; तुम्हाला *गॉगलच्या किमती* भुरळ घालतायत. 


"आमच्या शरीरांना *पेशन्स* मंजूर होता; *तुमच्या मनालाच तो नकोय."*


..."बाळा; *जमणं - न जमणं हे क्षमतेवर* अवलंबून असतं. क्षमता *डेव्हलप* करायची

 असते..!

✍🏻✍🏻

*जगता आलं पाहिजे... मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृव उजाळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पापं काय* *कसही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे.* *शहाण्याचं सोंग घेऊन, वेड होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे.* *जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून. फक्त समाधानी राहता आलं पाहिजे...* 

*आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे*

👏


*लेखक कोण आहेत, हे माहीत नाही पण् जे काही लिहिले आहे ते आजच्या पिढीला डोळ्यात अंजन घालणारे आहे.*

Sunday, 18 December 2022

प्रमुख उद्दिष्ट्य आहे. लक्ष्य २०१७ च्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात सन २०१८-१९ पासून लक्ष्य कार्यक्रम

 प्रमुख उद्दिष्ट्य आहे. लक्ष्य २०१७ च्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात सन २०१८-१९ पासून लक्ष्य कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे..

          महिला व बालकाचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याला यश मिळाले आहे.

          दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या शुभहस्ते हे दोन्ही पुरस्कार उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर आणि सहाय्यक संचालक डॉ.अनिरुध्द देशपांडे यांनी स्वीकारले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल आशा व परिचारिका गटात महाराष्ट्र राज्याला द्वितीय पुरस्कार गोंदिया जिल्ह्यातील डव्वा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशासेविका गीता चोपराम भेंडारकर व परिचारिका पंचफुला राने यांना देण्यात आला.

          पुणे येथे बैठकीत मंत्री सावंत यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन आंबाडेकर, सहसांचलक डॉ.भोये, डॉ.रामचंद्र हंकारे, डॉ.अशोक नंदापूरकर , डॉ.अनिरुद्ध देशपांडे आणि इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

प्या अमृततुल्य ,निरोगी राहा

 आत्ता प्रथम *अमृततुल्य* या शब्दाला खरा न्याय मिळाला


Saturday, 17 December 2022

हा आक्रोश मोर्चा नसून हा तर थयथयाट मोर्चा



हा आक्रोश मोर्चा नसून हा तर थयथयाट मोर्चा

आ. भातखळकर यांची मविआवर टीका



संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान करत काढलेला मोर्चा हा आक्रोश मोर्चा नसून सत्तेची खुर्ची गेल्यानंतर होणारा थयथयाट आहे, त्यामुळे हा थयथयाट मोर्चा असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

कांदिवली पूर्व येथे भाजपाच्या वतीने माफी मांगो आंदोलनात ते बोलत होते. आमदार  भातखळकर म्हणाले सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान केला आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी 12 व्या शतकात विज्ञानाधिष्ठित मानवतेची आणि समभावाची शिकवण दिली, संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली त्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील प्रत्येकासाठी प्रति परमेश्वर आहेत त्यांचाही संजय राऊत आणि अमोल मिटकरी यांनी अपमान केला आहे, त्यानंतर साधा खुलासा आणि माफी सुद्धा मागितली नाही हा त्यांचा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करण्याचे काम भाजपने केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आहे

आ. भातखळकर यांची मविआवर टीका


मुंबई, दि. १७ डिसेंबर (प्रतिनिधी)


संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान करत काढलेला मोर्चा हा आक्रोश मोर्चा नसून सत्तेची खुर्ची गेल्यानंतर होणारा थयथयाट आहे, त्यामुळे हा थयथयाट मोर्चा असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली.


कांदिवली पूर्व येथे भाजपाच्या वतीने माफी मांगो आंदोलनात ते बोलत होते. आमदार भातखळकर म्हणाले सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान केला आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी 12 व्या शतकात विज्ञानाधिष्ठित मानवतेची आणि समभावाची शिकवण दिली, संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली त्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील प्रत्येकासाठी प्रति परमेश्वर आहेत त्यांचाही संजय राऊत आणि अमोल मिटकरी यांनी अपमान केला आहे, त्यानंतर साधा खुलासा आणि माफी सुद्धा मागितली नाही हा त्यांचा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करण्याचे काम भाजपने केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आहे

सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्येसकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा

 सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्येसकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा.

 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

            मुंबई, दि. 17 : मुंबई शहर जिल्ह्यात ‘माझी मुंबई - स्वच्छ मुंबई’ अभियान राबविले जात आहे. सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अभियानाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.


       मुंबईचा शाश्वत विकास करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून या अभियानामध्ये शाळांचा सक्रीय सहभाग असावा या उद्देशाने श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीवकुमार, पी.वेलारासू, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, महानगरपालिकेच्या उपायुक्त चंदा जाधव, अभियानाचे मुख्य समन्वय अधिकारी डॉ.सुभाष दळवी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळांचे सुमारे 1000 मुख्याध्यापक ऑनलाईन उपस्थित होते.


       अभियान कालावधीत प्रत्येक आठवड्यातील शनिवार व रविवार स्वच्छता दिवस म्हणून घोषित करण्यात येतील. या दिवशी अभियान भागीदार त्यांच्याशी निगडीत अथवा त्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये स्वच्छता अभियान राबवतील. अभियान कालावधीत उर्वरित दिवशी स्वच्छता विषयक विविध कार्यक्रम हाती घेण्यात येतील. तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजन व मिशन मोडमध्ये स्वच्छताविषयक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प राबविणे अशा कार्यक्रमांचा अंतर्भाव करण्यात येईल असे बैठकीत नियोजन करण्यात आले.


       सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, महानगरपालिकेच्या शाळा, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक/ माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल घडवून अभियानाची अंमलबजावणी करतील. सदर अभियान यशस्वी होण्याकरीता आपल्या शाळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला जाईल तसेच महानगरपालिकांचे प्रभाग कार्यालय व शिक्षण विभागाची कार्यालये यांच्याकडून आवश्यक ते साहाय्य करण्यात येईल, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.


०००


 




Featured post

Lakshvedhi