Saturday, 17 December 2022

चौ ल दत्त मंदिर चोरी , सूचना


 एक अत्यंत महत्वाची सूचना


चौल भोवाले दत्त मंदिर येथील गाभार्यात बसवलेली 40 किलो चांदी दिनांक 15/12/2022 रोजी रात्रि 2 च्या सुमारास चोरीला गेली आहे.

तरी कोणाला काही संशय किवा विकन्यास आली तर माला किवा रेवदंडा पोलिस स्टेशन येथे संपर्क करावा ही नम्र विनंती

प्रविण मधुकर किल्लेकर

9422696120

रेवदंडा पोलिस स्टेशन

9623787648

सत्संगाचे दुकान'*….*

 *देवाचे दुकान*

एके दिवशी मी रस्त्याने जात होतो, वाटेत एक बोर्ड दिसला, 'ईश्वरीय किराणा दुकान...'

माझी उत्सुकता वाढली. या दुकानाला भेट देऊन त्यात काय विकले जाते ते का पाहू नये?

हा विचार येताच आपोआप दार उघडले, थोडेसे कुतूहल असेल तर दरवाजे आपोआप उघडतात, ते उघडावे लागत नाहीत...

मी दुकानात पाहिले तर सर्वत्र देवदूत उभे होते. एका देवदूताने मला टोपली दिली आणि म्हणाला, "माझ्या मुला, काळजीपूर्वक खरेदी कर, माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे ..."


देवदूत पुढे म्हणाला, "जर तुला टोपली एकाच वेळी भरता येत नसेल, तर पुन्हा ये आणि पुन्हा टोपली भर."


आता मी सगळं बघितलं, आधी संयम विकत घेतला, मग प्रेम, मग समजूतदारपणा, मग विवेकाचे एक-दोन डबे घेतले.



पुढे जाऊन विश्वासाचे दोन-तीन डबे उचलले, माझी टोपली भरत राहिली...


पुढे गेलो, पावित्र्य दिसले; विचार केला कसं सोडू, तेवढ्यात शक्तीची पाटी आली, शक्ती पण घेतली..


हिम्मत सुद्धा घेतली, वाटले की हिम्मतीशिवाय आयुष्यात काहीच चालत नाही...


आधी सहिष्णुता घेतली, मग मुक्तीची पेटीही घेतली...


माझे सद्गुरू प्रभुजींना आवडणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतल्या. मग एक नजर प्रार्थनेवर पडली, मी त्याचाही डबा उचलला..


कारण सर्व गुण असूनही माझ्याकडून कधी काही चूक झाली तर मी देवाला प्रार्थना करेन की देव मला माफ कर...


आनंदी होऊन मी टोपली भरली, मग मी काउंटरवर गेलो आणि देवदूताला विचारले, "सर.. या सर्व गोष्टींसाठी मला किती पैसे द्यावे लागतील?"


देवदूत म्हणाला, "माझ्या बाळा, इथली बिल भरण्याची पद्धतही दैवी आहे. आता तू जिथे कुठे जाशील, तिथे या गोष्टींची उधळपट्टी कर, सर्वांना मुक्तपणे वाट. या गोष्टींचे बिल असेच भरले जाते..."


या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो, जो आत जातो तो श्रीमंत होतो, तो या गुणांचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो...


प्रभूंच्या या दुकानाचे नाव आहे *'सत्संगाचे दुकान'*….


सद्गुणांचा खजिना भगवंताने दिला आहे, रिकामा झाला तरी सत्संगाला या आणि टोपली भरा...


देवाच्या या दुकानातून मी एकतरी वस्तू आपलीशी करू शकेन असा मला आशीर्वाद द्या.


✍️*_नमोस्तुते_* !


🙏🙏🙏

विचारपुष्प वाचनिय

 🟥🟪🟧

      *विचारपुष्प*


*प्रश्न - देवदर्शनानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर अथवा ओट्यावर थोडावेळ बसावे असे म्हणतात, परंतु असे थोडावेळ का बरे बसावे?*

 *उत्तर* - एखाद्या मंदिराला भेट दिल्यानंतर आपण बाहेर येऊन मंदिराच्या पायऱ्यांजवळ काही क्षण विसावतो असे परंपरेने चालत आले आहे परंतु यामागील कारण आपणांस माहीत आहे का?

    ही प्राचीन परंपरा काही विशिष्ट उद्देशाने बनवली गेली आहे.

किंबहुना अशाप्रकारे शांतपणे मंदिराच्या

पायऱ्यांशी बसले असताना एका श्लोकाचे पठण करावे आजच्या काळात लोकांना या श्लोकाचा विसर पडला आहे. या श्लोकावर चिंतन करा आणि तो पुढील पिढीपर्यंतदेखील अवश्य पोहोचवा 

 श्लोक पढीलप्रमाणेआहे~


              *अनायासेन मरणम् ,*

            *विना दैन्येन जीवनम्।*

            *देहान्त तव सानिध्यम् ,*

            *देहि मे परमेश्वरम्॥*

 

*अर्थ* ~ *अनायासेन मरणम् ,*

म्हणजे आपल्याला सहजपणे त्रासरहित मृत्यू

आला पाहिजे, आजारी पडून, अंथरुणाला खिळून राहू नये, व्यथित होऊन मरू नये... तर आपल्या दैनंदिन जीवनात सर्वसाधारण दिवशी आपण जसे वावरतो तसेच मृत्यूच्या दिवसालाही सामोरे जावे.


 *विना दैन्येन जीवनम्।*

म्हणजे आपले जीवन कोणावर अवलंबून नसावे. कोणाजवळ असहायपणे आधाराची याचना करायला लागू नये. 

*देहान्ते तव सानिध्यम् ,*

  म्हणजे जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तो परमेश्वराच्या सान्निध्यात यावा.त्याचे दर्शन घेत असताना देहत्याग घडावा.

  *देहि मे परमेश्वरम्*

हे परमेश्वरा मला असा आशीर्वाद दे.


परमेश्वराची प्रार्थना करत असताना वरील श्लोकांचे पठण करावे.

       नोकरी, गाडी, बंगला, कन्या,पुत्र पती-पत्नी, घरदार, पैसाअडका इ. (म्हणजे ऐहिक वस्तू) मागू नका. 

तुमच्या योग्यतेप्रमाणे परमेश्वर त्या स्वतःहून देत असतो. म्हणून आपण देवदर्शनानंतर स्वस्थचित्ताने बसून ही प्रार्थना करावी. ही प्रार्थना आहे, विनंती अथवा याचना नव्हे. घर नोकरीधंदा मुलगा मुलगी ऐहिक सुखे संपत्ती यांसाठी प्रार्थना नसते. अशा प्रकारच्या लौकिक गोष्टींची मागणी करणे म्हणजे भीक मागणे होय.


'प्रार्थना' या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे....

'प्र' म्हणजे विशेष, सर्वोत्तम सर्वोच्च आणि 'अर्थना' म्हणजे विनंती.

अशा रीतीने प्रार्थना म्हणजे 'विशेष आणि सर्वोच्च विनंती.' 

      मंदिरात नेहमीच डोळे उघडे ठेवून देवाचे दर्शन घेतले पाहिजे. काही लोक त्या ठिकाणी त्यांचे डोळे बंद करून उभे राहतात जर आपण पाहायला आलो आहोत तर डोळे बंद कशाला?

      तुमचे डोळे उघडा आणि परमेश्वराच्या रूपाकडे पाहा. त्याच्या दर्शनाचा संपूर्ण आनंद घ्या. त्या सर्वांगसुंदर परमेश्वराच्या निजस्वरूपाकडे डोळे भरून पाहा.

अशा दर्शनानंतर जेव्हा तुम्ही बाहेर स्वस्थ बसाल, तेव्हा बंद डोळ्यानी, तुम्ही पाहिलेल्या या रूपाचे ध्यान करा. आणि जर ध्यानात परमेश्वर येत नसेल तर पुन्हा देवळात जा आणि पुन्हा दर्शन घ्या.



*वाचण्यात आलेला सुंदर लेख*...

गजानन गणराय


 

राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या नवीन सचिवालय इमारतीचे उदघाटन;

 राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या

नवीन सचिवालय इमारतीचे उदघाटन;


 





मुख्यमंत्र्यांनी केली राज्यपालांसह पाहणी.

            मुंबई दि १६ - राज्यपालांच्या सचिवालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन आज (शुक्रवार, दि. १६) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. 

            इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांचेसह संपूर्ण इमारतीची पाहणी केली. 


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी सकाळीच राजभवन येथे जाऊन राज्यपालांसह नव्या सचिवालय इमारतीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांसोबत बंदरे व खाणकाम मंत्री दादाजी भुसे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.  

पर्यावरण स्नेही इमारत.

            पर्यावरण स्नेही हरित इमारत असलेल्या या सचिवालयामध्ये राज्यपालांचे प्रधान सचिव, राज्यपालांचे परिवार प्रबंधक, सहसचिव, उपसचिव यांची कार्यालये असतील तसेच राजभवन सचिवालयातील प्रशासन शाखा, शिक्षण शाखा, आदिवासी कक्ष, वैधानिक विकास मंडळ आदी शाखांची कार्यालये असतील. 


            सचिवालय इमारतीमध्ये बैठकांसाठी छोटे सभागृह, ग्रंथालय तसेच अभिलेख जतन कक्ष देखील बांधण्यात आले आहे. यापूर्वीची राज्यपालांच्या सचिवालयाची इमारत सर्वप्रथम सन १९१२ मध्ये बांधण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी जुनी इमारत पाडून त्याच जागेवर नवीन इमारत बांधण्याचा निर्णय करण्यात आला. नव्या सचिवालय इमारतीमध्ये तळघर, तळमजला व पहिला मजला आहे. 


            जुन्या सचिवालय इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ ४५७.८४ चौमी होते, तर नविन सचिवालय इमारतीचे एकूण क्षेत्रफळ २२८६.०० चौमी आहे.


            इमारतीच्या बांधकामासाठी हरित इमारतीचे नियम पाळण्यात आले आहे. इमारतीमध्ये ३० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अंतर्भुत केलेला आहे त्यामुळे दर महिन्याला ३५०० युनिट ऊर्जेची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले. 


            यावेळी कौशल्य विकास व महिला बाल कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी व सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


000

वेळ द्या

 


कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापणार

 कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापणार

                                                                                              - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी, दि. 16 : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन व विकास करण्याचे काम हे प्राधिकरण करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला, त्यानंतर ते बोलत होते. बैठकीस राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच आमदार व माजी आमदार खासदार आदींसह प्रमुख पदाधिकारी आणि जिल्ह्यातील खाते प्रमुखांची उपस्थिती होती.


 यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मत्स्य व्यवसाय धोरणाबाबत प्रयत्न केले जातील. मत्स्य व्यवसायातून परकीय चलन कसे उपलब्ध होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय धोरणाबाबत अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल.


कोकण विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील. राज्यासह कोकणातील गड- किल्ल्यांच्या विकास संवर्धनाबाबत निर्णय घेतले जातील. केरळप्रमाणे बॅक वॉटरमध्ये पर्यटन वाढीसाठी बांधा आणि वापरा तत्वावर विविध सेवा सुविधा पुरवल्या जातील. कोकणातील साकव, विम्यातील त्रुटी, किनारा विकासा साठी प्रयत्न, सिंचनाच्या सुविधा याबाबत प्रयत्न केले जातील. औरंगाबाद पुणे मार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग हा मार्ग एक्सेस कंट्रोल मार्ग करता येईल का? याबाबतही अभ्यास करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


 रत्नागिरी येथील विमानतळ विकासाच्या कामाला गती देण्यात आली असून यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणातर्फे 77.7 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. गतिमान विकासासाठी आवश्यक ते भूसंपादन करण्याचे काम सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी आपल्या सादरीकरणात सांगितले.


जागतिक स्तरावर येणारे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने कृषी विभागातर्फे विशेष पोस्टर तयार करण्यात आले आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ते मुख्यमंत्र्यांना सादर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे प्रकाशन या बैठकीदरम्यान करण्यात आले.


जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले त्यानंतर जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा त्यांनी एका पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी देखील यावेळी जिल्हा परिषदेच्या योजनांचे सादरीकरण केले.


यावेळी आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे कोकणाच्या विकासाबाबत विविध प्रकारच्या मागण्या सादर केल्या. काजू आणि आंबा पिकाबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्वांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले.


000


 



Featured post

Lakshvedhi