Saturday, 15 October 2022

वाचनाची आवड

 भावी पिढीला वाचनाची आवडत निर्माण करणे गरजेचे

                                            - दीपक केसरकर

 

            मुंबई दि. १५ : जगातील जे देश वाचनाबाबत आघाडीवर होते तेच देश आपला सर्वांगीण विकास जलद गतीने करू शकले आहेत.आपला देश विकसित करण्याकरिता देशातील भावी पिढी म्हणजे लहान मुलांनमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मराठी भाषा विभागाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

            मंत्रालयातील भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे याच्यासह मराठी भाषा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

            मंत्री श्री केसरकर म्हणालेभारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना वाचनाची प्रचंड आवड होती. आपल्या भारत देशाला पुढे घेवून जाण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. भावी पिढी सक्षम करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. डॉ. अब्दुल कलाम यांच्या मनातील संकल्पना पुढे घेवुन जाण्यासाठी मराठी भाषा विभागाने प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच पुस्तका संदर्भात ग्रंथालय हा वेगळा विषय असला तरी संबंधित विभागा सोबत संयुक्त बैठक घेवून ग्रंथालयाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथालय चळवळ चालू करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

            वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती होते.  वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतोविचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. शिकलेल्या माणसाला आपली प्रगती करता येते. मुलांच्या प्रगतीत पालकांचा वाटा असतोच. मुलांनी मागे न राहता जगाबरोबर धावावेयाकडे त्यांची धडपड असतेकल असतो. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचालतर वाचालहा संदेश लक्षात ठेवला पाहिजे'

            राज्यात पुस्तकाचे गाव ही संकल्पना सातारा जिल्ह्यातील भिलारगावापासून सुरुवात झाली आहे. पुस्तकाच्या गावात आता एक अभिनव संकल्पना आता पुस्तकप्रेमींसाठी रुजू झाली आहे. कल्पना तशी साधी आहे पण अनोखी आहे. इथे यापुस्तके हाताळाचाळावाचा. ते देखील अगदी मोफत. थोडी थोडकी नव्हे तर जवळ जवळ १२ हजार ते १५ हजार पुस्तके याठिकाणी आहेत. या पुस्तकांची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या साहित्यप्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या  ठिकाणी केली आहे. यातील काही ठिकाणी तुम्ही निवास करू शकता असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

            मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहून मराठी भाषा अबाधित ठेवली आहे. मुंबई सारख्या राज्याच्या राजधानीत मराठी भाषा बोलतांना कोणालाच कमीपणा वाटता कामा नये.परराज्यातील नागरिकांनी येथे राहतांना मराठी बोलणे शिकले पाहिजे.वाचनाची चळवळ पुढे चालू राहिली तर मराठी भाषा प्रगल्भ होवू शकेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

000


वांद्रे किल्ला

 वांद्रे किल्ला परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करा 

                                              -पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

        मुंबईदि.१५: वांद्रे येथील शिवकालीन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित रित्या पर्यटन करता  यावे यासाठी   स्थानिक पोलीस प्रशासनाने या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपायोजना कराव्यात असे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी   दिले.

        एच पश्चिम वॉर्ड,वांद्रे येथे  आज पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या भेटीलाया उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.यावेळी आमदार अॅड. आशीष शेलार ,  सर्व विभागाचे अधिकारीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                         पालकमंत्री श्री. लोढा म्हणालेखार स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रशासनाने कार्यवाही करावी. तसेच महानगर गॅस ची पॉईप लाईन येत नसल्यामुळे या विषयी महानगर पालिकामेट्रो व महानगर गॅस यांची संयुक्त बैठक मंगळवारी घेण्यात येईल व यावरती त्वरित उपाय काढण्यात येईल. खार रोड पश्चिम येथील राकेश मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार  एस. आर. ए. ने  दहा दिवसात प्राथमिक शाळा  मुंबई महापालिकेला  पूर्ण कार्यवाही करुन हस्तांतरित करावी. तसेच शंकर दीप हाउसिंग सोसायटीला मुंबई महापालिकेने सात दिवसात पाण्याचे कनेक्शन देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री श्री. लोढा यांनी दिले.

            दुर्ग सेवकसह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभागाचे रोहित देशमुख यांनी ऐतिहासिक वांद्रे किल्ल्याचे पावित्र्य जपून येथील परिसरात कायदा व सुव्यवस्थेची गरज आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वातावरनासाठी  उपाययोजना कराव्यात अशी तक्रार केली होती. त्याची दखल घेत पालकमंत्री श्री. लोढा यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाने या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपायोजना करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी तसेच बांद्रा किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम तोडण्यात यावे अशा सूचना केल्या. 

     नागरिकांनी २४२ विविध विषयांवर आपले तक्रार अर्ज दिले.तर  यापैकी १०५ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

        'पालकमंत्री आपल्या भेटीलाहा उपक्रम दि. १९ ऑक्टो रोजी पी नॉर्थ वॉर्डमालाड (पश्चिम) येथे होणार  असून. नियोजित रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन ही  जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in  बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.

000

 

 


विधानसभा निवडणुकीबाबत.

 अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल,प्रवीण कोया आणि सत्यजित मंडल यांनी घेतला कामांचा आढावा


मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाही बाबत तिन्ही केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केले समाधान व्यक्त !


            मुंबई उपनगर, दि. 15:- अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याद्वारे करण्यात येत असलेली कार्यवाही समाधानकारक असल्याचे मत केंद्रीय निवडणूक निरीक्षक तथा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेश‌ देवल यांनी व्यक्त केले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक समन्वय अधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय निवडणूक निरीक्षक तथा भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी प्रवीण कोया आणि भारतीय राजस्व सेवेतील वरिष्ठ अधिकारी सत्यजित मंडल उपस्थित होते.


            मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या विविध स्तरीय कार्यवाहींची माहिती या बैठकीदरम्यान निवडणूक निरीक्षकांना दिली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी अजित साखरे आणि निवडणूक विषयक कार्यदायित्वे सोपविण्यात आलेले समन्वय अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            या बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या वतीने निवडणूक निरीक्षकांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी 'अंधेरी पूर्व' पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या कामांची सविस्तर माहिती मान्यवर निवडणूक निरीक्षकांना दिली. यामध्ये प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्था, अंधेरी पूर्व परिसरातील मतदारांच्या विषयीची संक्षिप्त माहिती, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबतची माहिती, प्रसिद्धी व प्रचार विषयक बाबी, निवडणूक कर्तव्य सोपविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणांचा तपशील आदी माहितीचा समावेश होता.


            बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यदायित्वाची आणि करण्यात आलेल्या कामांची माहिती निवडणूक निरीक्षकांना दिली. तसेच याबाबत निवडणूक निरीक्षकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी समाधानकारक उत्तरे देत माहिती दिली.


            भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार येत्या ३ नोव्हेंबर रोजी '१६६ - अंधेरी पूर्व विधानसभा' मतदार संघाची पोटनिवडणूक असून या निवडणुकीत मतदान करण्याबाबत राबविण्यात येत असलेल्या जनजागृती कार्यक्रमांची माहिती देखील निवडणूक निरीक्षकांनी आवर्जून घेतली व त्याबाबत देखील समाधान व्यक्त केले.


            या बैठकीच्या अखेरीस जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मान्यवर केंद्रीय निवडणूक निरीक्षकांचे आभार मानले. तसेच या निमित्ताने त्यांनी अंधेरी पूर्व परिसरातील मतदारांना येत्या दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या निवडणुकीदरम्यान मतदान अवश्य करण्याचे व आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन देखील पुन्हा 

शुभ दीपावली,स्वच्छ दीपावली

 आपण सर्वांनी मिळून स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी आग्रही राहूया

                                     पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

                शुभ दीपावली,स्वच्छ दीपावली" उपक्रमास बांद्रा पश्चिम येथून सुरूवात

 

            मुंबई,दि.१५: मुंबईतील नागरिकांना स्वच्छतेच्या सोयी चांगल्या दर्जाच्या मिळाव्यात यासाठी आपण सर्वांनी मिळून आग्रही असले पाहिजे. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी शुभ दीपावली,स्वच्छ दीपावली" हा उपक्रम संपूर्ण मुंबई उपनगरात डिसेंबर २०२२ पर्यंत राबवणार असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

             बांद्रा पश्चिम मुंबईगोविंद पाटील रोड खार सार्वजनिक शौचालय येथे शुभ दीपावली,स्वच्छ दीपावली" उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते.यावेळी माजी मंत्री ॲड.आशिष शेलारउपायुक्त रणजीत ढाकणेवॉर्ड ऑफिसर विनायक विसपुतेजिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडेयासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले,मुंबई उपनगर येथील संपूर्ण जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छतारंगरंगोटीदुरुस्ती करणेआवश्यकता भासेल तिथे ड्रेनेज पाइप लाईन बदलणेशौचालयातील आसन क्षमता  वाढवणे,शौचालय जर  खराब असेल तर त्याची पुनर्बांधणी करणे असा उपक्रम दीपावलीच्या दरम्यान आपण राबवणार आहोत. आज  या उपक्रमाची आपण बांद्रा पश्चिम येथून सुरुवात केलेली आहेदिवाळी पुर्वी नागरिकांना स्वच्छ सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शौचालयांकरिता विज बिल आकारणी करताना व्यावसायिक दराने न आकारता घरगुती कनेक्शनच्या दराने विज बिल आकारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना प्रशासनाला केली. नागरिकांनीही या उपक्रमासाठी सहकार्य करावे. काही सूचना असतील तर जरूर कराव्यात  असे मंत्री श्री.लोढा म्हणाले.

            यावेळी माजी मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वॉर्ड ऑफिसर विनायक विसपुते यांनी केले.

000

 


कान्हा घेवून जय vani

 ही वासरे नसून पुनगूर नावाची गाय आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात या गाई सापडतात. एक ते दीड लिटर रोज दूध देतात.एका गाईची किंमत पाच लाखांहून अधिक आहे. असं मानलं जातं कि या गाईच्या दुधात सोन्याचा अंश असतो. तिरूपती बालाजीला या गाईच्या दुधाचा रोज दुग्धाभिषेक केला जातो  असे म्हटले जाते.


Kana घेवून जाय वनी, वेणू घेवून जाय


 

गेले ते क्षण गेले



Featured post

Lakshvedhi