Wednesday, 12 October 2022

बचत gat

 मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात बचत गटांचे प्रदर्शनाचे आयोजन करावे

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. 11 : मुंबई शहरातील बचत गटांनी उत्पादित केलेले साहित्य विक्रीसाठी सहा लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एक बचत गटांच्या स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करा. तसेच महिला बाल विकास विभाग आणि मुंबई महापालिका यांनी हा उपक्रम रोटेशन पद्धतीने उपक्रम राबवावाअशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

           प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅदमी, रवींद्र नाट्य मंदिर येथे महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा आज आणि दि. १२ ऑक्टोबर रोजी मेळावा आयोजित केलेला आहे. मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

            यावेळी महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढाआमदार तमीळ सेलवनमुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहलप्रधान सचिव आय.ए.कुंदनमहिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रूबल अग्रवाल उपस्थित होत्या.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेप्रत्येक लोकसभा मतदारसंघात बचत गटांचे स्टॉल लावल्यास नागरिकांना देखील किफायतशीर किंमतीत वस्तू उपलब्ध होतील. मुंबई शहरातील बचत गटांसाठी दिवाळीपूर्वी हा मेळावा आयोजित केल्यामुळे, बचत गटांच्या उत्पादनांची विक्री होईल. आज महिलांना कर्ज देताना बँकासुद्धा पुढे येत आहेत. कारण महिला बचत गटांना दिलेले कर्ज महिला 100 टक्के परतफेड करतात त्याचबरोबर महिला बचत गटाचा उद्योग वाढवण्याबरोबर आपल्या कुटुंबाला देखील बचत गटाच्या माध्यमातून हातभार लावत असतात. महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. माविममार्फत उत्पादित वस्तूंचे पॅकेजिंगब्रॅण्डिंग यावर भर देण्यात यावा.

            दिल्ली येथे भरवण्यात येणारे महिला बचत गटांचे प्रदर्शन तसेच ‘सरस’ सारख्या प्रदर्शनांना खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो त्यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी काम होणे गरजेचे आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची ही चळवळ वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असेही ते म्हणाले

बचत गटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळून देणार

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

            महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेसध्या कोरोना नंतर मोठ्या उत्साहात सर्व सण साजरे केले जात आहेत. शहरातील बचत गटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दोन दिवसीय दिवाळी मेळावा आयोजित केला आहे. मुंबई शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा तसेच महिला बचत गट यांच्यासाठी विविध मार्गदर्शनपर व्याख्यान देखील ठेवले आहेत. महिला बचत गटांना राज्य, केंद्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना एकत्रितपणे राबवून त्यांचा लाभ महिला बचत गटांना मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या साहित्याची ऑनलाईन साहित्य विक्री व्हावी यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. महिला बचत गटांचे उत्पन्न तिप्पट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

गटांना बँकेमार्फत मंजूर कर्जाच्या धनादेशाचे वाटप

            रुपाली माने यांच्या सिद्धीविनायक महिला बचत गटाला बँक ऑफ महाराष्ट्रकडून रुपये १० लाख, अपर्णा कोरडे यांच्या हयात महिला बचत गटाला बँक ऑफ महाराष्ट्रकडून रुपये ७ लाखबसलिम गम्मा मेकरी यांना आशू महिला बचत गटाला एचडी एफसी बँकेकडून ९ लाख रुपये गटांना बँकेमार्फत मंजूर कर्जाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

महिला उद्योजकांना व्यावसायिक किटचे वाटप

            श्रद्धा महिला बचत गटाच्या कविता कांबळे यांना ब्युटी पार्लर साहित्य, संकल्प महिला बचत गटाच्या मनाली सावंत यांना शिलाई मशीन, पंचशील बचत गटाच्या वनिता सुखदान यांनी किचन सेट अप चे वितरण करण्यात आले.

यशस्वी महिला उद्योजकांची माहिती

            स्पार्कल महिला बचत गटाच्या स्नेहा भालेराव, इलेक्ट्रोफाइल रिसायकलिन व्यवसायमदर सेंट मेरी महिला बचत गटाच्या जयश्री भंडारी, अंगणवाडी पोषण आहार व कटरिंगभिमाई महिला बचत गट श्रीमती कमल सोनवणे, मसाला व्यवसाय यामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

बचत गट स्टॉल ला मान्यवरांनी दिली भेट

            माविम मार्फत ९० स्टॉल लावण्यात आले आहेत. दिवाळी सणा निमित्त वेगवेगळ्या प्रकारचे कंदील त्यात बांबूचे कंदिलघरगुती फराळबांबूच्या परड्या, वारली पेंटिंगचे दिवेविशिष्ट प्रकारचे तोरणघरगुती ज्वेलरीकाथ्यापासून बनवलेली उत्पादने यांचा समावेश आहे. यावेळी सर्व मान्यवरांनी स्वयंसहाय्यता बचत गट उत्पादित वस्तू प्रदर्शनाला भेट देऊन तेथील बचत गटांसमवेत संवाद साधला.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रूबल अग्रवाल यांनी केले. आभार माविमाच्या महाव्यवस्थापक कुसुम बाळ सराफ यांनी मानले. सूत्रसंचालन चैताली कानेटकर यांनी केले.

कांदाचाळ साठवणूक मर्यादेत

 कांदाचाळ साठवणूक मर्यादेत 50 मेट्रिक टनापर्यंत वाढ

- फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

          मुंबई दि. 11 : राज्यात कांदाचाळीकरिता पाच मेट्रिक टन ते 25 मेट्रिक टनाची मर्यादा वाढवून ती 50 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यासाठीचे निर्देश फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

          मंत्री भुमरे म्हणाले, महाराष्ट्र कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. राज्यातील कांदा देश आणि विदेशातही निर्यात होतो. कांदा साठवण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत कांदाचाळीस अनुदान दिले जाते हे अनुदान पाच मेट्रिक टन ते 25 मेट्रिक टन अशी मर्यादा होती. ती मर्यादा 25 मेट्रिक टनापासून 50 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याचे निर्देश फलोत्पादन मंत्री श्री. भुमरे यांनी दिले.

         यावेळी फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेआयुक्त धिरज कुमारफलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

                    श्री. भुमरे म्हणालेआंबा पीक कोकण विभागामध्ये महत्त्वाचा घटक आहे. आंब्याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचबरोबर या पिकावर वेगवेगळया किडींचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यापैकी फळमाशी ही आंबा फळांना नुकसान पोहचविणारी एक महत्त्वाची किड आहे. निर्यातीच्या दृष्टीने व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याने आंबा फळमाशी नियंत्रण मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.

       राज्यातील एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध घटकांना अनुदान दिले जाते यामध्ये कांदाचाळशेडनेटहरितगृहविविध पिकांची काढणी पश्चात व्यवस्थापन या  बाबींचा समोवश होतो. या घटकांचा लाभ घेत असताना साहित्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे योजनेला अल्प प्रतिसाद मिळतो. म्हणूनच राज्य शासनातर्फे पूरक अनुदान देण्याच्या सूचना मंत्री श्री. भुमरे यांनी केल्या.

       राज्यात मोसंबी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहेत्यासाठीची दर्जेदार कलमे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्यातील सर्व रोपवाटिकेत मातृ वृक्ष तपासणी कार्यक्रम राबविण्याचे निर्देश श्री. भुमरे यांनी यावेळी दिले.

         मंत्री श्री. भुमरे म्हणाले की,  पांडुरंग फुंडकर योजनेसाठी मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच कृषी विभागाने यास व्यापक प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री. भुमरे यांनी सांगितले.

         यावेळी आंबा फळमाशी नियंत्रण मोहिम घडी पत्रिका आणि भित्तीपत्रक विमोचन मंत्री श्री. भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा त्यांनी यावेळी घेतला.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

 

नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा

 नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा या भूमिकेतून काम करावे

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे महसुली विभाग कार्यालयाचे

राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

            पुणेदि. 11 : लोकप्रतिनिधीप्रशासनातील उच्चपदस्थापासून शेवटच्या स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपण जनतेच्या सेवेसाठीच आहोतनागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे या भूमिकेतून काम करावेअसे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            पुणे महानगरपालिकेच्या ढोले रोड क्षेत्रीय कार्यालय इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या पुणे महसुली विभाग नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरेविभागीय आयुक्त सौरभ रावमहाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग मुख्य आयुक्त दिलीप शिंदेराज्य सेवा हक्क आयुक्त नाशिक चित्रा कुलकर्णीमहाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग माजी मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रियमनपा आयुक्त विक्रम कुमारपुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ताजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

            श्री. कोश्यारी म्हणालेदेश स्वतंत्र झाला तेव्हा खूप मर्यादित सेवा दिल्या जात होत्या. पुढे जनतेचे कल्याण आणि समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी त्यात भर पडत गेली. सनदी सेवांमध्ये उत्तीर्ण झालेले तरुण उमेदवार पब्लिक सर्व्हिस’ कमिशनमधून आले आहेअर्थात सेवा हेच शासनाचे मुख्य काम आहे हे लक्षात घ्यायला हवे.

            राज्यपाल पुढे म्हणालेजनतेला कशा प्रकारे दिलासा देता येईल हे पाहणे आपले काम आहे. जनतेच्या समस्यांसाठी अनेक आयोग निर्माण करण्यात आले असून या आयोगांनी चांगल्या प्रकारे निर्णय घेण्याचे काम केल्यास जनतेचे कल्याण साधले जाईल. जनतेच्या कल्याणासाठी शासनप्रशासनामध्ये सुधारणा व संशोधन करावे लागेल. डिजिटायझेशनमध्ये देश अग्रेसर असून ते पुढे न्यायचे आहेअसेही श्री. कोश्यारी म्हणाले.

            लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत राज्यात तसेच पुणे विभागात आलेल्या अर्जांपैकी 95 टक्के अर्जांचा निपटारा झाला ही चांगली बाब आहे. अशा प्रकारे सेवा दिल्यास जनतेच्या विविध समस्यांचे समाधान होऊ शकते. आलेल्या अर्जांवर योग्य प्रकारे निर्णय घेऊन सेवा दिल्या गेल्यास अपीलांची संख्या आपोआप कमी होईलअसेही श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

            श्री. क्षत्रिय म्हणालेसेवा हक्क कायदा नागरिकांना अधिकारहक्क देणारा आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनात लागणारे दाखलेप्रमाणपत्रेजमीनपाणीवीज आदीसंबंधी सेवा सुलभतेनेवेळेत मिळाव्यात यासाठी हा कायदा उपयुक्त ठरला आहे. आयोगाने ऑनलाईन सेवांवर भर दिल्यामुळे जास्तीत जास्त सेवा गतीने देणे शक्य झाले आहे. आपले सरकार सेवा केंद्रांच्या संख्येत वाढ झाल्यास नागरिकांना अजून गतीने सेवा मिळतील. नागरिकांच्या सोयीसाठी सेवा केंद्रांची यादीपत्ते प्रशासनाने जाहीर करावेतअसेही श्री. क्षत्रिय म्हणाले.

            प्रास्ताविकात श्री. शिंदे यांनी सेवा हक्क अधिनियमांतर्गत राज्यातविभागनिहाय तसेच पुणे विभागात  नागरिकांना पुरवण्यात आलेल्या सेवांचा संगणकीय सादरीकरणाने आढावा सादर केला. ते म्हणाले, ‘आपली सेवा आमचे कर्तव्य’ हे आयोगाचे घोषवाक्य असून त्यानुसार काम करत असताना ऑनलाईन सेवा पुरवण्यातून जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आहे.

            अधिसूचित करण्यात आलेल्या ५०६ सेवांपैकी आतापर्यंत ३९२ सेवा ऑनलाईन करण्यात आल्या असून भविष्यात सर्वच सेवा ऑनलाईन करणेआपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणेशासनाच्या सर्व सेवांचे आपले सरकार या एकल संकेतपीठावर एकत्रिकरण करणे आदींसाठी आयोग प्रयत्नशील आहे. महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून वयोवृद्ध तसेच आजारी नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

            आभारप्रदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणालेहे कार्यालय पुणे येथे योग्य व मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध करुन दिले असून कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम प्रशासनाइतकाच पुणे विभागातील जनतेसाठी महत्त्वाचा आहे. या कार्यालयामुळे प्रशासनाच्या कामावर चांगले संनियंत्रण राहील.

            यावेळी अत्यंत कमी वेळेत तसेच उत्कृष्ट अंतर्गत सजावट केलेले कार्यालय उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनपा आयुक्त विक्रम कुमार यांचा सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमास राज्य लोकसेवा हक्क आयोगमहसूल विभागाचे तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

सेवा हक्क कायदा आणि प्रशासनाची कामगिरी

            राज्यात हा कायदा अंमलात आल्यापासून प्राप्त १२ कोटी ६६ लाख ७६ हजार प्राप्त अर्जांपैकी ११ कोटी ९७ लाख सेवा मंजूर करुन पुरवण्यात आल्या आहेत. यावर्षी १ एप्रिलपासून राज्यात सर्वाधिक २५ लाख २४ हजार सेवांचे अर्ज पुणे विभागात दाखल झाले असून सर्वाधिक २३ लाख २२ हजार सेवा मंजूर करण्यात आल्या तर २१ लाख ७२ हजार सेवांचे वेळेवर वितरण करण्यात आले आहे.

पुणे विभागाची कामगिरी

            पुणे विभागात आपले सरकार पोर्टलवर ३७ विभागांच्या ३९२ सेवांबाबत ऑक्टोबर २०१५ पासून सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राप्त २ कोटी ४३ लाख ९८ हजार अर्जापैकी २ कोटी ३१ लाख २ हजार अर्ज (९५ टक्के) निकाली काढण्यात आले आहेत. यावर्षी पुणे विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८ लाख ९६ हजारपैकी ८ लाख १८ हजार अर्जांचा निपटारा करण्यात आला. विभागात एकूण ९३ टक्के अर्जांसंदर्भातील सेवा वेळेवर देण्यात आल्या आहेत.

0000


 


कांदाचाळ साठवणूक

 कांदाचाळ साठवणूक मर्यादेत 50 मेट्रिक टनापर्यंत वाढ

- फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

          मुंबई दि. 11 : राज्यात कांदाचाळीकरिता पाच मेट्रिक टन ते 25 मेट्रिक टनाची मर्यादा वाढवून ती 50 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यासाठीचे निर्देश फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

          मंत्री भुमरे म्हणाले, महाराष्ट्र कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. राज्यातील कांदा देश आणि विदेशातही निर्यात होतो. कांदा साठवण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत कांदाचाळीस अनुदान दिले जाते हे अनुदान पाच मेट्रिक टन ते 25 मेट्रिक टन अशी मर्यादा होती. ती मर्यादा 25 मेट्रिक टनापासून 50 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याचे निर्देश फलोत्पादन मंत्री श्री. भुमरे यांनी दिले.

         यावेळी फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेआयुक्त धिरज कुमारफलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

                    श्री. भुमरे म्हणालेआंबा पीक कोकण विभागामध्ये महत्त्वाचा घटक आहे. आंब्याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचबरोबर या पिकावर वेगवेगळया किडींचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यापैकी फळमाशी ही आंबा फळांना नुकसान पोहचविणारी एक महत्त्वाची किड आहे. निर्यातीच्या दृष्टीने व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याने आंबा फळमाशी नियंत्रण मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.

       राज्यातील एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध घटकांना अनुदान दिले जाते यामध्ये कांदाचाळशेडनेटहरितगृहविविध पिकांची काढणी पश्चात व्यवस्थापन या  बाबींचा समोवश होतो. या घटकांचा लाभ घेत असताना साहित्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे योजनेला अल्प प्रतिसाद मिळतो. म्हणूनच राज्य शासनातर्फे पूरक अनुदान देण्याच्या सूचना मंत्री श्री. भुमरे यांनी केल्या.

       राज्यात मोसंबी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहेत्यासाठीची दर्जेदार कलमे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्यातील सर्व रोपवाटिकेत मातृ वृक्ष तपासणी कार्यक्रम राबविण्याचे निर्देश श्री. भुमरे यांनी यावेळी दिले.

         मंत्री श्री. भुमरे म्हणाले की,  पांडुरंग फुंडकर योजनेसाठी मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच कृषी विभागाने यास व्यापक प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री. भुमरे यांनी सांगितले.

         यावेळी आंबा फळमाशी नियंत्रण मोहिम घडी पत्रिका आणि भित्तीपत्रक विमोचन मंत्री श्री. भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा त्यांनी यावेळी घेतला.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

 


 


ओळखा पाहू

  *मी ....................कर  कसा झालो ??*


*माझी गाडी एकदा भर पावसात म्हात्रे पुलाजवळ बंद पडली...*


*मी खाली उतरून काय झालंय ते बघत होतो...*


*कारण सापडत नव्हतं.*


*मागचा गाडीवाला सतत हॉर्न वाजवीत होता.*


*किंबहुना तो हॉर्नवरचा हात काढतच नव्हता.*


*मी शांतपणे त्याच्याजवळ गेलो व भिजत भिजतच म्हणालो...*


*तुम्ही बघता का माझ्या गाडीला काय झालंय ते?*


*तेवढा वेळ मी तुमच्या गाडीचा हॉर्न वाजवीत बसतो.*


😜😜


*त्या दिवशी मला पुण्याचे नागरिकत्व मिळाले ...*


😊😊😊


🙏. 🙏

: *स्थळ अर्थातच* 😉


*आपटे काका :- अग, ए, पाहुणे येऊन अर्धा तास झाला , नुसती बोलत काय बसलीएस, त्याना कमीत कमी पाण्याचं तरी विचार ना….*


*आपटे काकू :- अरें हो , मी विसरलेच बघा….*

*(पाहुण्यांना)*


*"तुमच्याकडे पाणी सकाळी*

 *येतं की दुपारी येतं….?"*


😜😜


*हसा अणि दिवसातून येकदा तरी ग्रुप वर दिसा..*:           *काही पुरुषांना कामावरुन घरी जाताना मेसेजर डिलीट करुन जावं लागतं.*


*मी म्हणतो एवढी लफडी करायचीच कशाला!!*

🤣🤣🤣

खा आवला

 


रामभक्त गौरव सोहळ्या

 राई गावातील रामभक्त गौरव सोहळ्यास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

 

            ठाणेदि. 11 (जिमाका) : बालयोगी श्री सदानंद महाराज यांनी सामाजिक जाणिव ठेवून लोकांच्या जीवनात बदल घडविण्याचे काम केलेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

            भाईंदर मधील राई गावात बालयोगी सदानंद महाराज आयोजित रामभक्त गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल राम नाईकबालयोगी श्री सदानंद महाराजआमदार प्रताप सरनाईकआमदार गीता जैननरेंद्र मेहताजिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीसदानंद महाराज हे राज्याचे वैभव आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरीचे हिंदी भाषांतर करून जगभर पोचविण्याचे काम केले. ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा देशभर आयोजित करण्याचा संकल्प सदानंद महाराज यांनी केला आहे. बालयोगी सदानंद महाराजांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी गेल्यावर वेगळीच भावना व अनुभूती निर्माण होते. सदानंद महाराज हे सामाजिक सुधारणेचे अग्रदूत आहेत. परिवर्तन घडविण्याचे काम ते करत आहेत. बाबांमुळे व्यसनमुक्तीचे काम होत आहे. बाबांच्या दर्शनाने लोकांसाठीचांगले काम करण्याचे बळ मिळते. महाराष्ट्राला वारकरी परंपरेचा मोठा वारसा मिळाला आहे. विश्वशांतीमुळे मानवकल्याणाचा संदेश मिळतो आहे.


Featured post

Lakshvedhi